मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आम्ही येतोय

अॅस्ट्रोनाट विनय · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
a तो संदेश सर्वात आधी नासाच्या उपग्रहांनी पकडला. “आम्ही येतोय.” फक्त दोनच शब्द होते संदेशात. “आपण शांततेच्या मार्गाने बोलणी करू.” संयुक्त राष्ट्रसंघ “सर्व देशांनी आपापले क्षेपणास्त्र अवकाशाच्या दिशेने वळवावेत.” अमेरिका “जगाचा अंत जवळ आलाय.” व्हॅटिकन “ते आपले मित्र असावेत.” भारत “ही भारताची चाल.” पाकिस्तान काही दिवसांनी परत एक संदेश मिळाला- “लढायला तयार रहा.” यावेळचा संदेश पृथ्वीच्या अगदी जवळून आलेला. जगभरातलं सैन्य अन शस्त्रास्त्रं खडबडून जागे झाले, धार्मिक स्थळी जाणाऱ्यांची संख्या शेकडो पटींनी वाढली. अन दुसऱ्या दिवसापासून- किण्वनाशी संबंधित उद्योगधंदे बंद पडू लागले. जिवाणू विषाणूंमुळे होणारे रोग जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे छुमंतर झाले. ते अतिप्रगत मायक्रो-एलीयन्स पृथ्वीवरच्या सुक्ष्मजिवांना मारून केव्हाच निघून गेले होते.

वाचने 4987 वाचनखूण प्रतिक्रिया 14

सस्नेह Fri, 02/10/2017 - 11:00
एक शंका : सगळे सूक्ष्म जिवाणू मेल्यावर जीवनोपयोगी बॅक्टेरिआंचे काय ? आणि पर्यायाने त्यावर अवलंबून असलेल्या निसर्गचक्राचे काय ?

In reply to by सस्नेह

शब्दबम्बाळ Fri, 02/10/2017 - 11:19
कचऱ्याचे ढीग, मेलेली न कुजलेली जनावरे आणि इतर अनेक परिणाम होतील. माणसाला जीवसृष्टी टिकवून ठेवायला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल! :) च्यामारी पण ते एलीयन्स आपल्या बॉलीवूड विल्लन सारखे आहेत वाटत. आवाज करून मग येतात, मारायला!