शारदा साहित्य संमेलन रद्द हा निर्णय कौतुकस्पद..!
लेखनप्रकार
नुकत्याच मुंबईत घडलेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, त्या घटनेमागचे गांभिर्य जाणून रत्नांग्रीत होऊ घातलेले शारदा साहित्य संमेलन रद्द करण्यात आले असून त्या पैशांतून जखमींची आणि शहिदांची मदत केली जाणार आहे असे कळले.. मंगेश पाडगावकर हे या संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष होते..
माझ्या मते ही घटना खरंच कौतुकास पात्र आहे!
महाराष्ट शासनाच्या २५ लाखांवर अमेरीकावारीची फुक्कटची पोळी भाजण्याचे स्वप्न रंगवीत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष पानतवणे आणि इतर पदाधिकारी यावरून काही धडा घेतील अशी अपेक्षा आहे, अर्थात ती व्यर्थ आहे!
तात्या.
वाचन
8394
प्रतिक्रिया
26