मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्रीचे अस्तित्व!

अश्विनि कोल्हे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय स्रीचा. जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरीने बांधलंय तिला. या दोरीतुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही! कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे. एक स्री जेव्हा लहान कळी असते,तेव्हा आईच्या पोटातच तिला कुचलुन टाकले जाते. कशी तरी करत जन्म घेतलाच तिने ,तर कर्तव्याच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते. आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते. आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय. स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारा नवरा मुलगाही "आईवडिल म्हणतील तसंच" म्हणुन स्वतःची सुटका करुन घेतो. अशावेळी कोण घेईल पुढाकार स्रीला वाचवण्याचा? लग्नानंतर स्रीला पत्नीचा दर्जा मिळतो ,तरी ती माञ सतत काम करणारं यंञ बनुन जाते. तिचा दर्जा फक्त नावालाच राहतो. प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक व्यक्ती तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करुन देत असतो. पण स्वतःची कर्तव्ये कधी कुणी समजुन घेतलीयंत? पैसा कमवुन कुटुंब पोसणं हेच फक्त कर्तव्य नसतं तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान, त्यांच्या भावना सांभाळनं हेदेखिल पुरुषांचं एक कर्तव्य असतं . प्रत्येक वेळी पुरुषांकडुन स्रीच्या मनाची घालमेहल केली जाते. शब्दरुपी तलवारीने तिचे नाजुक मन घायाळ केले जाते. पण हेही लक्षात ठेवा की ,स्री ही शक्ती आहे. मनाने घायाळ झालेली स्री ही घायाळ वाघिणी सारखी असते. तिच्या मुखातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.कारण ती जरी सहनशक्ती ची मुर्ती असली तरी क्रोधाची जननी देखिल आहे. म्हणुन स्रीचा सन्मान करा.व दुसर्यांनाही शिकवा. तरंच स्रीचे अस्तित्व अबाधित राहीन. जय महाराष्ट्र! रचना-सौ.अश्विनी कोल्हे.

वाचन 30926 प्रतिक्रिया 170