मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुष्काळ आणी पॅकेज:काही किस्से २

जेपी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दुष्काळ आणी पॅकेज;काही किस्से १ वेळः साल २००५ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दुष्काळग्रस्तांनसाठी १०७५ कोटीचे पॅकेज जाहिर केले.एकीकडे हे पॅकेज जाहीर झाले व दुसरीकडे सरकारने कापसाच्या हमीभावावर दिला जाणार २०% बोनस रद्द केला.त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांना पहिल्या वर्षी १७०० कोटी,दुसर्‍या वर्षी १४०० कोटी तर तिसर्‍या वर्षी १५०० कोटीचा फटका बसला. म्हणजेच १००० कोटीच्या बदल्यात शेतकर्‍यांचे ५००० कोटी गेले.मुळात या पॅकेज मध्ये शेतकर्‍यांच्या चढउतार निधीतील ७७९ कोटी समाविष्ट करुन सरकारने चलाखी दाखवली आणी हे पॅकेज फक्त ३०० कोटीचे राहीले. परीणाम कोरडवाहु शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ.. ================================================================================= वेळ : साल २००६ तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ३७५० कोटीचे पॅकेज जाहीर केले.यातले २७०० कोटी दीर्घकालीन सिंचन व्यवस्थेसाठी होते.त्यामुळे प्रत्यक्षात शेतकर्‍यांना १००० कोटीचा लाभ झाला.त्यातही कृषीसाहित्य खरेदीत मोठा घोटाळा झाला. पॅकेज अंर्तगत सिंचनाच्या सोयी नसताना शेतकर्‍यांना मोटार पंपाचे वाटप झाले. वाटलेल्या अनेक गायी म्हशी भाकड निघाल्या.अनुदानाची आकडेवारी फुगवली.घोटाळा उघडकीस आल्यावर चारशे सरकारी कर्मचारी निलंबीत.पुढे कारवाई शुन्य. परीणाम कोरडवाहु शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ.. ================================================================================= वेळः साल २००८ युपीए सरकारने गाजावाजा करुन जाहीर केलेली ७२ हजार कोटींची कर्जमाफी योजना आली. यातुन राज्याच्या वाट्याला १० हजार कोटी आले.त्यातील ५२% रक्कम पश्चिम महाराष्ट्राला मिळाली,तर विदर्भाला २२% टक्के मिळाले.उर्वरीत रक्कम बाकीच्या राज्याला मिळाली. कारण हि कर्जमाफी करताना शरद पवांरानी अतिशय चलाखीने पाच एकराची अट ठेवली. राज्यात कोरडवाहुचे सिलिंग ५० एकर तर ओलीताचे १८ एकर आहे.त्यापेक्षा जास्त जमीन शेतकर्‍यांना ठेवता येत नाही. त्यामुळे ओलीताच्या क्षेत्रात जमीनधारणा कमी तर कोरडवाहुत जास्त असते. विदर्भात कोरडवाहु शेतकरी असल्याने व त्याची जमीनधारणा जास्त असल्याने कर्जमाफीचा फायदा त्यांना मिळाला नाही. या योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील ३ एकर ओलीत क्षेत्रावरील १ कोटीचे कर्जमाफ झाले.तर विदर्भात तेवढ्याच कोरडवाहु जमिनीवरिल २५,०००/- कर्ज माफ झाले. परिणाम कोरडवाहु शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ.. =============================================================================== जाता जाता - काही दिवसांपुर्वी श्री.जयंत कुलकर्णी यांनी देवास बद्दल एका लेखात माहिती दिली होती. त्या लेखातील फक्त देवासलाच पाहु नका,त्याचे वृत्तांकन करणार्‍या ..राहुल कुलकर्णीला पण फॉलो करा. कोकणात पावसाचे वाया जाणारे पाणी अडवुन दुष्काळ ग्रस्त भागात वळवण्याचा"लातुर पॅटर्न" २००२ साली तयार झालता. पण दुसर्‍या टर्म मधे विलासरावांनी स्वत:च्या विकासा कडे लक्ष दिले आणी तो प्लॅन मागे पडला. राहुल कुलकर्णीने तो प्लॅन २०१२ साली पुन्हा समोर आणला.फक्त आणलाच नाही तर योग्य जागी पोहचेल हे पण पाहीले. (लेख माझ्या वाचनावर आधारीत आहे.त्याबद्दल कुठलाही विदा नाही.)

वाचन 7985 प्रतिक्रिया 0