मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विवाह मुहुर्त

भिंगरी · · काथ्याकूट
लग्न ठरले कि लग्नाचा मुहूर्त पाहीला जातो. तो मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का? मला यातले काही कळत नाही म्हणून जाणून घ्यायचे आहे कि मुहूर्त का पहिला जातो? खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का? (हं आता लग्न लागायला उशीर झाला तर जाणाऱ्या पाहुण्यांची पंचाईत होते हा भाग निराळा.) साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का? (प्रेमविवाहात तर या गोष्टी सहसा होतंच नाहीत.) भारतिय संस्कृतीत याचे विशेष महत्व आहे का? या विषयावर शास्त्रोक्त माहिती कोणी देईल का?

वाचन 9417 प्रतिक्रिया 0