उत्तरायण २०१४ - बडोदा ते पुणे (भाग ५ - समाप्त)
उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग १)
उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग २)
उत्तरायण २०१४ - काsssssssssssssयपो छेssss (भाग ३)
उत्तरायण २०१४ - अमुल डेअरी - आणंद (भाग ४)
आणंदहून परतताना एके ठिकाणी EME AREA अशी पाटी दिसली. EME Temple हे ठिकाण बडोद्यात असताना भेट देण्याच्या ठिकाणांमध्ये होतेच. गाडी तिकडे वळवली.
या मंदिराची एकूण रचना बघण्याची खूप उत्सुकता होती कारण Electrical and Mechanical Engineering (EME) या आर्मीच्या एका विभागाने हे मंदिर बांधले आहे असे वाचनात आले होते आणि आर्मीच्या अखत्यारीत असल्याने "सर्वधर्मसमावेशक मंदिर" असणे उघड होते.
आर्मी एरीयामध्ये प्रवेश करताना कडक तपासणी केली गेली. एका मोठ्या रजिस्टरमध्ये डिट्टेल माहिती भरून घेतली व आयडी प्रूफची मूळ प्रत त्यांच्याकडे ठेवून घेतली. बाहेर जाताना त्यांनी दिलेला तात्पुरता पास परत केला की आपला आयडी प्रूफ परत मिळत होता. आर्मीच्या पद्धतीनुसार हेल्मेट असेल तरच गाडी आत सोडत होते.
येथे माहिती नोंदवून घेणारा कोणी गोस्वामी नामक अधिकारी मी त्यांच्या रजिस्टरमध्ये माहिती भरताना एकदम उसळलेच..
गाडीचे पासींग आणि लायसन्स वरचा पत्ता पाहून..
गोस्वामीजी - इतना दूर गाडीपे क्यों घूम रहे हो..?
मी - उत्तरायण. फेस्टीवल के लिये आया हूं!
गोस्वामीजी - ठीक है. लेकीन गाडीपे..???
मी - हां!
गोस्वामीजी - क्यों करते हो ऐसा..?
मी - ठीक है ना सर.. ये सब अभी नही करेंगे तो कब करेंगे..?
गोस्वामीजी - तुम्हारा डॉक्युमेंट बिना भूले लेके जाना और संभालके जाओ!!
मान डोलावून पास ताब्यात घेतला. मंदिराच्या आवारात पोहोचलो. एका पीटी / परेड ग्राऊंडमध्ये जवानांना इकडून तिकडे पळवण्याचे सत्र सुरू होते.
मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सर्वप्रथम जाणवते ती शांतता. हे मंदिर खूप चांगले व नीटनेटके ठेवले गेले आहे. मंदिराच्या आवारात पुरातनकालीन मुर्ती जतन करून ठेवल्या आहेत. वल्लीसाठी फोटो काढून घ्यावेत असा विचार केला पण कॅमेर्यावर बंदी होती, सगळीकडे कडक पहारा होता आणि आर्मीवाले अशा गोष्टींना खूप सिरीयसली घेत असल्याने फोटो काढण्याची रिस्क घेतली नाही.
( शिक्षा म्हणून दोन-तीन तास गवत उपटायला लावले तर काय घ्या..? ;) )
पुढील फोटो अंतर्जालावरून साभार..
हे संपूर्ण स्ट्रक्चर अॅल्युमिनीयमचे आहे.
डोमच्या वरचा कलश हिंदुत्वाचे प्रतिक आहे
डोम हे इस्लामचे
टॉवर हे ख्रिस्ती धर्माचे
टॉवरच्या वरचा सोनेरी कळस बौद्ध धर्माचे
आणि मंदिराचे प्रवेशद्वार जैन संस्कृतीचे प्रतिक आहे.
या मंदिराच्या भोवती छोटीशी बाग आहे व बागेमध्येही देवदेवतांची मंदिरे आहेत. एका कृत्रीम गुहेमध्ये शिवलिंग स्थापन केले आहे.
थोड्यावेळाने घरी पोहोचलो, बॅग ठेवली व पुन्हा बाहेर पडलो. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज मार्केट सुरू होणार होते. श्रीराम टमटमवाल्याला भेट द्यायची होती. नमकीन्स आणि मसाले खरेदी करायचे होते.
टमटम
वेगवेगळे नमकीनचे प्रकार, कांदा, लिंबू, द्राक्षे आणि तीनचार वेगळेच मसाले भुरभुरून केलेला एक टेस्टी प्रकार. मजा आली.
बडोदा ट्रीप जवळजवळ पूर्ण झाली होती. उद्या सकाळी बाहेर पडायचे होते.
सकाळी लवकर उठलो चार एक तास झोप झाली होती. फ्रेश होतो. आज एकाच दिवसात पुण्याला पोहोचायचे की येताना मुंबईत थांबलो तसेच एक मुक्काम करून पुण्यात पोहोचायचे हे ठरले नव्हते म्हणून मुद्दाम थोडे लवकर उठलो, आवरून पांच वाजता गाडीला किक मारली..!!
बडोदा शहरातून जाणारा रस्ता असला तरी भल्या पहाटेची वेळ असल्याने क्वचित एखादी गाडी दिसत होती. अर्ध्यातासाने हायवे सुरू झाला. प्र चं ड थंडी होती. दोन जर्कीन घालूनही थंडी वाजतच होती. तासाभरातच पहिला चहाचा ब्रेक घेतला. सुर्योदयानंतर थंडी कमी होण्याची अपेक्षा होती.. पण गारठा जाणवत होताच. थोडा वेळ प्रवास केल्यानंतर कडाका आणखी वाढला.
नर्मदा नदीच्या सान्निध्यात असल्याने वातावरण थंडगार झाले होते. नर्मदा नदीवर फक्त दोन लेनचे आणि थांबायला आजीबात जागा नसलेले असे अरूंद पूल होते. दोन्ही वेळा फोटो काढता आला नाही.
जाता जाता - "गंगास्नाने यमुनापाने नर्मदादर्शने तापी स्मरणे..."
असा एक श्लोक आहे. गंगेमध्ये स्नान केल्याने, यमुनेचे जल प्राशन केल्याने, नर्मदेचे दर्शन केल्याने आणि तापीचे स्मरण केल्याने.. (पुढची ओळ माहिती नाही. पुण्य मिळेल वगैरे असावी. पूर्ण श्लोक माहिती आहे का कोणाला..??)
सलग ६० चा स्पीड पकडून चाललो होतो. थंड हवा असली तरी आता बोचरी थंडी कमी झाली होती. आजुबाजूला विरळ झाडी असलेल्या रस्त्यावरून, एक एक गांव मागे पडत होते. अचानक अंकलेश्वर जवळ धुक्याच्या पडद्यामध्ये प्रवेश केला.
खूप दाट धुके होते. रोंरावत जाणारे ट्रक, कंटेनर्स आणि सुसाट सुटलेल्या गाड्यांचे स्पीड आपोआप कमी झाले होते.
परतीच्या प्रवासात वेळेवरती काटेकोर लक्ष ठेवले होते व थांबेही कमी केले होते. जाताना तीन तासात १०० किमी पार करत गेलो होतो, तो वेळ आता अडीच तासांपर्यंत आणला होता. दरम्यान चहाचे आणखी एक दोन ब्रेक झाले होते.
वाटेत लागलेला असाच एक बंधारा.
वाटेत एका सरदारजीच्या धाब्यावरती बटर फ्राईड आलू पराठा आणि दोन मोठ्ठे ग्लास भरून चहा असे खाणे आवरले. शाजीचा मोठा भाऊ शोभावा असा प्राठ्याचा आकार होता.
रस्ता खूपच चांगला होता.. (NHAI, गुजरात सरकार, केंद्रातले सरकार जे जे कोणी भागीदार असतील त्यांना धन्यवाद्स देत देत गाडी पळवत होतो..!)
5:00 AM बडोदा - 00 KM
7:30 AM अंकलेश्वर - 102 KM
9:30 AM चिखली - 193 KM
1:00 PM मनोर - 325 KM
असा एका लयीत प्रवास सुरू होता.
मनोर नंतर झाडी दाट होवून लागली.. घनदाट झाडीच्या मागून डोंगर डोकावू लागले होते. महाराष्ट्रात खर्या अर्थाने प्रवेश केला आहे याची जाणीव झाली.
३८० किमी पार करून घोडबंदर रोड आला तेंव्हा दुपारचे दोन वाजले होते. एका नीरा वाल्यापाशी गाडी बाजुला घेतली व थोडावेळ गाडीला विश्रांती दिली.
आजच पुणे गाठणे शक्य होते.
वेग आहे तोच ठेवला. पनवेल मार्गे मुंबई पुणे रोड पकडला व साडेचारच्या सुमारास कर्जतला पोहोचलो.
कर्जत लोणावळा रूट एकदम गोंधळात टाकणारा आहे - दुचाकीसाठी. नक्की कुठून कसे जायचे कळत नाही. मध्ये एकाच दिशेला जाणारे पण वेगवेगळे दोन रस्ते सामोरे आले. तेथेही पाट्या नव्हत्या. जीपीएस रस्ता दाखवत होते पण तो रस्ता एक्प्रेस हायवेवर जात होता. दोनेक मिनीटे तेथेच थांबलो तर एक मारूती अल्टो अवतरली. त्यातले बाबाजी पुण्यालाच चालले होते. त्यांना विचारून त्यांच्या मागोमाग लोणावळा गाठले. घरी हव्या असलेल्या चिक्कीची खरेदी केली.
संध्याकाळी सात वाजता चिंचवड. मित्रांना भेटलो व रात्री साडेदहाच्या दरम्यान घरी पोहोचलो.
दिवसभरात एकून ५६० किमी रनींग झाले होते (१५ तास!!). विश्रांतीची गरज भासावी इतकी दमणूकही झाली नव्हती.
जवळपास महिनाभर सुरू असलेल्या प्लॅनींगची मनजोगती सांगता झाली होती. एक अविस्मरणीय आणि अनेक नवीन अनुभव देणारी ट्रीप व्यवस्थीत पार पडली होती.
आता हिमालय खुणावतो आहे.. बुलेटवर!
******************************************************
व्यनी, खव आणि धाग्यात विचारलेल्या प्रश्नांची एकत्रीत उत्तरे द्यायचा प्रयत्न करत आहे.
"गाडीवरून एक दूरची ट्रीप करायची आहे" हे दरवर्षी घोकत होतो पण मजल फारतर दरवर्षी दापोली(~५०० किमी), अनेकदा सांगली/कोल्हापूर (~६०० किमी) आणि एकदाच बेळगांव (~६६० / ७०० किमी) इतकीच जात होती. ऑक्टोबर / नोव्हेंबरच्या दरम्यान एकदा मित्रांच्यात हाच विषय निघाला व नंतर काही कारणाने रद्दही झाला. मात्र या वर्षी कुठेतरी जायचेच्च्च असे ठरवले व संक्रांत + बडोदा असा प्लॅन ठरला.
मनरावची लेह वारी आणि अजिंक्य नामक भटक्या मित्राने अक्षरशः जॉब सोडून तीन महिने उत्तर भारतात १० हजार किमीहूनही अधिक अंतराची केलेली भटकंती यांमुळे थोडी जास्त जळजळ झाली. यावर उतारा म्हणूनही ही ट्रीप मस्ट होती. ;)
२००८ साली उत्तरायण निमीत्तानेच बडोदा भेट झाली होती. जाताना बस व येताना रेल्वे. त्यावेळी व्यवस्थीत असलेले ४ लेनचे रस्ते आणखी मोठे - ६ लेनचे करण्याची युद्धपातळीवरची तयारी (ट्रॅफीकजॅममध्ये अडकून) पाहिली होती. त्यामुळे रस्त्यांबाबत काही टेन्शन नव्हते. मुख्य काळजी होती ती गाडीची. इतक्या लांब पॅशन प्लसवरून जावे की नको हा कळीचा मुद्दा होता.
संपूर्ण प्रवासात गाडीने अप्रतीम सोबत केली. कोणताही त्रास झाला नाही. सोबत नेलेली ट्युब आणि क्लच केबल अजून वेष्टणातच सुरक्षीत आहे. (टचवुड!!) :)
जाताना ६८ चे माईलेज मिळाले. येताना थोडा वेग जास्ती ठेवल्याने ६० च्या दरम्यान माईलेज मिळाले.
टायर प्रेशर थोडे जास्ती ठेवले होते. नंतर त्यामध्ये काहीही बदल केला नाही.
गुजरात पोलीसांनी बाहेरची गाडी आहे हे बघून्ही कोणत्याही प्रकारे त्रास दिला नाही. बडोद्यात फिरताना किंवा आणंदमध्ये एकदा रस्ता बरोबर आहे की नाही याची खात्री करून घेताना मुद्दाम ट्रॅफीक पोलीसांना रस्ते विचारत होतो. व्यवस्थीत सहकार्य मिळाले.
महाराष्ट्र गुजरात बॉर्डरही सहजगत्या पार पडली. कारण कुणी अडवलेच नाही. ओव्हरसाईझची बॅग बघून थांबवतील असे वाटले होते. पण नाही. (ही काळजी करण्यासारखी गोष्ट असावी का..?)
आल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. दुसर्याच दिवशी एक बुक क्लबचा सेशन, अडीच/तीन तास बॅडमिंटन आणि संध्याकाळी वसंतोत्सव हे ही सहजगत्या एकाच दिवसात जमले.
******************************************************
उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. :)
******************************************************
हे संपूर्ण स्ट्रक्चर अॅल्युमिनीयमचे आहे.
डोमच्या वरचा कलश हिंदुत्वाचे प्रतिक आहे
डोम हे इस्लामचे
टॉवर हे ख्रिस्ती धर्माचे
टॉवरच्या वरचा सोनेरी कळस बौद्ध धर्माचे
आणि मंदिराचे प्रवेशद्वार जैन संस्कृतीचे प्रतिक आहे.
या मंदिराच्या भोवती छोटीशी बाग आहे व बागेमध्येही देवदेवतांची मंदिरे आहेत. एका कृत्रीम गुहेमध्ये शिवलिंग स्थापन केले आहे.
थोड्यावेळाने घरी पोहोचलो, बॅग ठेवली व पुन्हा बाहेर पडलो. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज मार्केट सुरू होणार होते. श्रीराम टमटमवाल्याला भेट द्यायची होती. नमकीन्स आणि मसाले खरेदी करायचे होते.
टमटम
वेगवेगळे नमकीनचे प्रकार, कांदा, लिंबू, द्राक्षे आणि तीनचार वेगळेच मसाले भुरभुरून केलेला एक टेस्टी प्रकार. मजा आली.
बडोदा ट्रीप जवळजवळ पूर्ण झाली होती. उद्या सकाळी बाहेर पडायचे होते.
सकाळी लवकर उठलो चार एक तास झोप झाली होती. फ्रेश होतो. आज एकाच दिवसात पुण्याला पोहोचायचे की येताना मुंबईत थांबलो तसेच एक मुक्काम करून पुण्यात पोहोचायचे हे ठरले नव्हते म्हणून मुद्दाम थोडे लवकर उठलो, आवरून पांच वाजता गाडीला किक मारली..!!
बडोदा शहरातून जाणारा रस्ता असला तरी भल्या पहाटेची वेळ असल्याने क्वचित एखादी गाडी दिसत होती. अर्ध्यातासाने हायवे सुरू झाला. प्र चं ड थंडी होती. दोन जर्कीन घालूनही थंडी वाजतच होती. तासाभरातच पहिला चहाचा ब्रेक घेतला. सुर्योदयानंतर थंडी कमी होण्याची अपेक्षा होती.. पण गारठा जाणवत होताच. थोडा वेळ प्रवास केल्यानंतर कडाका आणखी वाढला.
नर्मदा नदीच्या सान्निध्यात असल्याने वातावरण थंडगार झाले होते. नर्मदा नदीवर फक्त दोन लेनचे आणि थांबायला आजीबात जागा नसलेले असे अरूंद पूल होते. दोन्ही वेळा फोटो काढता आला नाही.
जाता जाता - "गंगास्नाने यमुनापाने नर्मदादर्शने तापी स्मरणे..."
असा एक श्लोक आहे. गंगेमध्ये स्नान केल्याने, यमुनेचे जल प्राशन केल्याने, नर्मदेचे दर्शन केल्याने आणि तापीचे स्मरण केल्याने.. (पुढची ओळ माहिती नाही. पुण्य मिळेल वगैरे असावी. पूर्ण श्लोक माहिती आहे का कोणाला..??)
सलग ६० चा स्पीड पकडून चाललो होतो. थंड हवा असली तरी आता बोचरी थंडी कमी झाली होती. आजुबाजूला विरळ झाडी असलेल्या रस्त्यावरून, एक एक गांव मागे पडत होते. अचानक अंकलेश्वर जवळ धुक्याच्या पडद्यामध्ये प्रवेश केला.
खूप दाट धुके होते. रोंरावत जाणारे ट्रक, कंटेनर्स आणि सुसाट सुटलेल्या गाड्यांचे स्पीड आपोआप कमी झाले होते.
परतीच्या प्रवासात वेळेवरती काटेकोर लक्ष ठेवले होते व थांबेही कमी केले होते. जाताना तीन तासात १०० किमी पार करत गेलो होतो, तो वेळ आता अडीच तासांपर्यंत आणला होता. दरम्यान चहाचे आणखी एक दोन ब्रेक झाले होते.
वाटेत लागलेला असाच एक बंधारा.
वाटेत एका सरदारजीच्या धाब्यावरती बटर फ्राईड आलू पराठा आणि दोन मोठ्ठे ग्लास भरून चहा असे खाणे आवरले. शाजीचा मोठा भाऊ शोभावा असा प्राठ्याचा आकार होता.
रस्ता खूपच चांगला होता.. (NHAI, गुजरात सरकार, केंद्रातले सरकार जे जे कोणी भागीदार असतील त्यांना धन्यवाद्स देत देत गाडी पळवत होतो..!)
5:00 AM बडोदा - 00 KM
7:30 AM अंकलेश्वर - 102 KM
9:30 AM चिखली - 193 KM
1:00 PM मनोर - 325 KM
असा एका लयीत प्रवास सुरू होता.
मनोर नंतर झाडी दाट होवून लागली.. घनदाट झाडीच्या मागून डोंगर डोकावू लागले होते. महाराष्ट्रात खर्या अर्थाने प्रवेश केला आहे याची जाणीव झाली.
३८० किमी पार करून घोडबंदर रोड आला तेंव्हा दुपारचे दोन वाजले होते. एका नीरा वाल्यापाशी गाडी बाजुला घेतली व थोडावेळ गाडीला विश्रांती दिली.
आजच पुणे गाठणे शक्य होते.
वेग आहे तोच ठेवला. पनवेल मार्गे मुंबई पुणे रोड पकडला व साडेचारच्या सुमारास कर्जतला पोहोचलो.
कर्जत लोणावळा रूट एकदम गोंधळात टाकणारा आहे - दुचाकीसाठी. नक्की कुठून कसे जायचे कळत नाही. मध्ये एकाच दिशेला जाणारे पण वेगवेगळे दोन रस्ते सामोरे आले. तेथेही पाट्या नव्हत्या. जीपीएस रस्ता दाखवत होते पण तो रस्ता एक्प्रेस हायवेवर जात होता. दोनेक मिनीटे तेथेच थांबलो तर एक मारूती अल्टो अवतरली. त्यातले बाबाजी पुण्यालाच चालले होते. त्यांना विचारून त्यांच्या मागोमाग लोणावळा गाठले. घरी हव्या असलेल्या चिक्कीची खरेदी केली.
संध्याकाळी सात वाजता चिंचवड. मित्रांना भेटलो व रात्री साडेदहाच्या दरम्यान घरी पोहोचलो.
दिवसभरात एकून ५६० किमी रनींग झाले होते (१५ तास!!). विश्रांतीची गरज भासावी इतकी दमणूकही झाली नव्हती.
जवळपास महिनाभर सुरू असलेल्या प्लॅनींगची मनजोगती सांगता झाली होती. एक अविस्मरणीय आणि अनेक नवीन अनुभव देणारी ट्रीप व्यवस्थीत पार पडली होती.
आता हिमालय खुणावतो आहे.. बुलेटवर!
******************************************************
व्यनी, खव आणि धाग्यात विचारलेल्या प्रश्नांची एकत्रीत उत्तरे द्यायचा प्रयत्न करत आहे.
"गाडीवरून एक दूरची ट्रीप करायची आहे" हे दरवर्षी घोकत होतो पण मजल फारतर दरवर्षी दापोली(~५०० किमी), अनेकदा सांगली/कोल्हापूर (~६०० किमी) आणि एकदाच बेळगांव (~६६० / ७०० किमी) इतकीच जात होती. ऑक्टोबर / नोव्हेंबरच्या दरम्यान एकदा मित्रांच्यात हाच विषय निघाला व नंतर काही कारणाने रद्दही झाला. मात्र या वर्षी कुठेतरी जायचेच्च्च असे ठरवले व संक्रांत + बडोदा असा प्लॅन ठरला.
मनरावची लेह वारी आणि अजिंक्य नामक भटक्या मित्राने अक्षरशः जॉब सोडून तीन महिने उत्तर भारतात १० हजार किमीहूनही अधिक अंतराची केलेली भटकंती यांमुळे थोडी जास्त जळजळ झाली. यावर उतारा म्हणूनही ही ट्रीप मस्ट होती. ;)
२००८ साली उत्तरायण निमीत्तानेच बडोदा भेट झाली होती. जाताना बस व येताना रेल्वे. त्यावेळी व्यवस्थीत असलेले ४ लेनचे रस्ते आणखी मोठे - ६ लेनचे करण्याची युद्धपातळीवरची तयारी (ट्रॅफीकजॅममध्ये अडकून) पाहिली होती. त्यामुळे रस्त्यांबाबत काही टेन्शन नव्हते. मुख्य काळजी होती ती गाडीची. इतक्या लांब पॅशन प्लसवरून जावे की नको हा कळीचा मुद्दा होता.
संपूर्ण प्रवासात गाडीने अप्रतीम सोबत केली. कोणताही त्रास झाला नाही. सोबत नेलेली ट्युब आणि क्लच केबल अजून वेष्टणातच सुरक्षीत आहे. (टचवुड!!) :)
जाताना ६८ चे माईलेज मिळाले. येताना थोडा वेग जास्ती ठेवल्याने ६० च्या दरम्यान माईलेज मिळाले.
टायर प्रेशर थोडे जास्ती ठेवले होते. नंतर त्यामध्ये काहीही बदल केला नाही.
गुजरात पोलीसांनी बाहेरची गाडी आहे हे बघून्ही कोणत्याही प्रकारे त्रास दिला नाही. बडोद्यात फिरताना किंवा आणंदमध्ये एकदा रस्ता बरोबर आहे की नाही याची खात्री करून घेताना मुद्दाम ट्रॅफीक पोलीसांना रस्ते विचारत होतो. व्यवस्थीत सहकार्य मिळाले.
महाराष्ट्र गुजरात बॉर्डरही सहजगत्या पार पडली. कारण कुणी अडवलेच नाही. ओव्हरसाईझची बॅग बघून थांबवतील असे वाटले होते. पण नाही. (ही काळजी करण्यासारखी गोष्ट असावी का..?)
आल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. दुसर्याच दिवशी एक बुक क्लबचा सेशन, अडीच/तीन तास बॅडमिंटन आणि संध्याकाळी वसंतोत्सव हे ही सहजगत्या एकाच दिवसात जमले.
******************************************************
उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. :)
******************************************************
वाचन
16614
प्रतिक्रिया
0