मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिळी जिलेबी - १

धन्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
१ धीर गंभीर गाज सागराची सोबतीला आहे बोचरा वारा हरवून गेल्या दिशा सार्‍या अन मी शोधतो आहे किनारा २ किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले किती ऋतू तसे पावसात चिंब झाले कळले नाही मला कधीही ते सारं माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले ३ डोळे पाण्याने भरून आलेले आणि मनात आठवणींचे आभाळ दाटलेले झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या थर होते टोकणार्‍या वेदनांचे साचलेले ४ तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे मी स्वत:ला खूप सावरलं होतं मन तसं भिजून आलं होतं पण माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं ५ काळ वेळ कधी तशी नसतेच तशी गुलमोहर फुलांनी बहरून यायला मनाचंही थोडंसं असंच असतं पुरते एक जाणीव, मोहरून जायला ६ चांगलं वाईट तसं काहीच नसतं हा सारा खेळ आपल्या मनाचा दुखात हसत असे कुणी येथे अन् कुणी सुखात आसरा घेई वनाचा ७ आपला परका आभास सारे इथे कुणीच कुणाचं नसतं प्रत्येक क्षण सापेक्ष इथला तरीही मन जाळ्यात फसतं ८ भावनेचा ओलावा शोधताना मी मलाच हरवून गेलो शिकलो मात्र बरंच काही अन् वृत्तीने नीर्विकार झालो ९ जाणिवेनेनीवेच्या पलीकडे एक अस्वस्थ जग असतं साथ आपलीच आपल्याला तिथेही कुणी आपलं नसतं १० विसरायचं आता सारं अस मी पुन्हा पुन्हा ठरवतो क्षण दोन क्षण जातात अन् मी पुन्हा स्वत:ला हरवतो

वाचन 6475 प्रतिक्रिया 30