या आगीमदी काय दडलय काय....
आज म्हणे मंत्रालयाच्या ४, ५ आणि ६ व्या मजल्यांना आग लागली.
दक्षिण मुंबईकडे जाणारे अनेक रस्ते संध्याकाळी बंद केले गेले - आग विझविणार्या यंत्रणेला मार्ग मिळावा म्हणुन.
आग कशी लागली. कुठुन लागली वगैरे चर्चांचे गुर्हाळ अनेक वाहिन्यांवर धडाक्यात सुरू आहे.
आगीत नक्की काय काय जळलय?
- अर्थातच फायली!
चला मंडळी पाहुया आता कुणा कुणाचं नशिब उघडतय ते. शहर रचना विभागातले नकाशे आणि फायली गेल्या तर मज्जाच मज्जा! बनवा हवे ते नकाशे आणि पाडा नवे भूखंड. उगाच कुणावर नोंदी फिरवल्याचे आरोप नकोत. झालं गेलं आगीला मिळाल.
वाचन
40489
प्रतिक्रिया
62