भौत विज्ञानाकडून अतींद्रिय विज्ञानाकडे - विज्ञान आणि बुद्धिवाद - प्रकरण 1
या प्रकरणात प्रा. अद्वयानंद गळतगे म्हणतात.....
जे पाच इंद्रियांना जाणवते , त्याचाच फक्त वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे शक्य आहे, असे समजण्याचे काऱण नाही. मनोविज्ञान हे मनाचा वैज्ञानिक व पद्धतीने अभ्यास करते. पण मन हे इंद्रियविषय होऊ शकत नाही. पण म्हणून मनच अस्तितावात नाही असे म्हणता येणार नाही. जीव विज्ञान (Biology) जीवाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करते. पण जीव इंद्रियविषय नाही. पण म्हणून जीवच अस्तित्वात नाही असे म्हणता येणार नाही. जीव व मन हे स्वतंत्रपणे अस्तित्वात नसून ते भौतिक विश्वाचेच भाग आहेत, असे मात्र भौत वैज्ञानिक म्हणू शकतात. पण ते भौतिक विश्वाचे कसे भाग होऊ शकतात, हे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करणे भाग आहे. तसे सिद्ध झालेले नाही. मनाचा किंवा जीवाचा 'फॉर्म्युला' तयार करता आलेला नाही. पण म्हणून त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासच करता येत नाही , असे समजता येईल काय?....
... आपण काल भूत कालाकडून भविष्यकालाकडे जात आहे असे मानतो. पण फेनमनच्या शोधानुसार काल भविष्याकडून भूतकालाकडे जात आहे (या शोधाबद्दल 1965 साली फेनमनला नोबेल पारितोषक मिळाले आहे.) ज्याला 'फेनमनची आकृती' (Feynman's Diagram)म्हणतात. त्या आकृतीत जो कण भूतकालातून भविष्यकालाकडे जात आहे तो कण आकृती फिरवली की भविष्याकडून भूतकालाकडे जात असल्याचे दिसतो. काळाच्या या कल्पनेनुसार मी जसा भूतकालाचे 'अपत्य' ठरतो तसे भविष्यकालाचे 'भूत' ही ठरतो. म्हणजे माझे अस्तित्व भूतकालाप्रमाणेच भविष्यकालावरही अवलंबून आहं. दुसऱ्या शब्दात मी भूतकालाप्रमाणेच भविष्यकालाशीही जखडला गेलो आहे. कशाने? हे भौतिक शास्त्र सांगू शकत नाही. अध्यात्मशास्त्र मात्र 'कर्मा ने' हे उत्तर देते. आणि या जखडण्यालाच 'पुनर्जन्म' हे नाव देते. यातून सुटका करून घेणे म्हणजे स्थलकालातीत होणे होय...
इथे आपण आणखी काय वाचाल?
मन स्थळ काळाची मर्यादा ओलांडू शकते...
मन भौतिक विश्वाची मर्यादा ओलांडू शकते...
क्वांटम भौत वाद...
गूढवादी भौतिक शास्त्र
एकात्म विश्व ...
या पुढील संशोधन....
वाचन
13789
प्रतिक्रिया
42