मुला मुलींची नावे
लेखनप्रकार
'नावात काय आहे' असं म्हणू दे कोणी
पण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. ते ठेवताना काय विचार असतो ठेवणार्यांचा ?
अनेक जण असेही असतात ज्यांना आपले नाव आवडत नाही. काही जणांना ते खूप आवडते.
तसं मुलांची नावे काय असावीत याचा काही कायदा नाही पण वैशिष्ट्ये पहायला मिळतात
पहिल्या मुलाचं नाव ज्या अक्षरावरून वरून असेल त्याच प्रकारे पुढच्यांचीही असावीत हा नियम नाही पण तो पहायला मिळतो
पहिल्या मुलीचे नाव शलाका तर मग पुढे शर्वरी, शर्वाणी असेही पहायला मिळते.
आमच्याकडे एक साहित्यिक होते त्यांच्या मुलांची नावे
कविता, अभंग, मुक्तछंद अशी होती.
एक सरकारी अधिकारी होते मुलांची नावे योजना, प्रगती नि विकास.
कोल्हापूरकडे गेलं की नावं जरा भारदस्त संग्रामसिंह, विजयसिंह, समशेरसिंह अशी
इतर ठिकाणी अगदी नेत्यांच्या मुलांची नावेही अमित, अजित, सचिन, विजय
मग त्याला काहीतरी जोडून वजनदारपणा आणण्याचा प्रयत्न होतो
उदा: अमितभाऊ, अजित अण्णा, विजय अप्पा इ.
महाराष्ट्राबाहेर आन्ध्रात मुलाच्या नावावरून बनवलेली मुलींची नावे पहायला मिळतात
प्रदीपा, सिरीषा(शिरीषा), प्रवीणा, जयन्ती
नावावरूनही एखाद्याचा प्रांत थोड्याफार प्रमाणात सांगता येइल
रवी श्रीनिवास - आंध्र
विनोद - केरळ
मंजुनाथ, कोट्रेश - कर्नाटक
असो
जुळ्यां मुलांची नावेही सारखवट ठेवावीत असा कायदा नाही पण
उदाहरणे पहायला मिळतात ती अशी
अमित-अजित, विजय-विनय, श्रीराम-श्रीरंग
संगीता-सुनीता, विजया-विनया, अक्षता-अस्मिता
हिंदी मराठी सिनेमात
सचिन सुप्रिया, सचिन सारीका जोडी गाजत होती
तीच नावं अनेक बहिणभावांनाही मिळालेली दिसतात
आई वडिलांच्या नावातली अक्षरे वापरूनही काही मुलांची नावे तयार होतात
समीर + मानसी = रमा
विजय + सुचित्रा = सुजय
पण मुलगी झाली तर काय 'विचित्रा' ठेवणार का
त्या त्या भागाचा राकटपणा किंवा नाजूकपणाही नावात दिसून येतो
म्हणजे
पंजाबात परकाश, बलविंदर, परविन्दर, हरप्रीत या. नावावरून सांगता येत नाही
हे नाव मुलाचं की मुलीचं.
मुलींची नावं मुलांसारखीच फक्त पुढे कौर लावलेले असते
हरप्रीत कौर वगैरे
या उलट
गुजराथी मारवाडी नावे कधी धृष्टद्युम्न, प्रद्युम्न, विश्वंभर अशी फारशी पहायला मिळणार नाहीत
शक्यतो जोडाक्षरे टाळली जातात त्यामुळे नितीन, सचिन, समीर, सुनील अशी साधी सोपी सुटसुटीत
नावे पाहायला मिळतात.
नावातही एक नजाकत जपली जाते.
गंमत म्हणजे पंजाब्यांच्यापेक्षा वेगळा प्रकार आढळतो. तिकडे मुली देखील मुलांची नावे धारण करतात
इकडे मुलांची नावे शीतल, सेजल, सोनल
त्यामुळे नुसत्या नावावरून जराही संशय येणार नाही की हा मुलगा आहे म्हणून
काही नावं एखाद्या काळात फारच प्रचलित होतात
पूर्वी जितेन्द्र, मनोज, दिलीप ही हीरोंची नावे प्रचारात होती
पुण्या मुंबईतील मराठी घरात काही नावे फार पॉप्युलर होती
अभिजीत, मंदार, संतोष
म्हणजे रस्त्याने जातान सहज मंदार म्हणून हाक मारावी तर १० जण ओ देतील
बर एका मुलाचं नाव मंदार असेल तर धाकट्याचे केदार असावं असा नियमही असावा
सध्या अभिषेक, ऐश्वर्या, आर्या या नावांची चलती आहे
अभिषेक च्या सिनेमाला नाही पण नावाला उठाव आहे.
अभिनव बिन्द्राने सुवर्ण जिंकलं त्यावर्षी 'अभिनव' नावची लाट येऊन गेली
आताशा मुलगी झाली तर 'गार्गी' सोडून दुसरं नाव ठेवायला परवानगी नाही असे ऐकायला मिळते.
त्यामुळे मुलगी झाली म्हणण्याऐवजी आम्हाला 'गार्गी' झाली असे म्हणण्याची प्रथा रुढ होते आहे
त्यामुळ
मुलीचे नाव काय ठेवणार याऐवजी गार्गीचे नाव काय ठेवणार
असाही संवादही पुण्यामुम्बईत कानी पडू लागला आहे
वाचन
274508
प्रतिक्रिया
0