थिअरी
काल २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती.
काल मिसळपाववर त्यासंबंधी अनेक लेख येतील अशी अपेक्षा ठेवून होतो. परंतु कोणालाही, विशेषत: सशस्त्र लढे हेच स्वातंत्र्य मिळण्याचे कारण आहे असे मत असलेल्यांना, त्यांची आठवण झाली नाही. एकही लेख लिहिला गेला नाही.
त्यातून माझी एक थिअरी कॉरोबोरेट झाली असे दिसते.
बहुतेकांना सुभाष बोस किंवा इतर सशस्त्र स्वातंत्र्यसैनिक यांची आठवण सत्याग्रहाच्या मार्गाला आणि त्या मार्गावर वाटचाल करणार्यांना डिस्क्रेडिट करण्यापुरतीच येते.
मिपाकरांचे काय मत आहे?
अशीच गोष्ट मागील वर्षी भगतसिंग/राजगुरू/सुखदेव यांच्या पुण्यतिथीला घडल्यावर येथील माझ्या एका स्नेह्यांना खव/व्यनितून निदर्शनास आणून दिले होते.
वाचन
24831
प्रतिक्रिया
85