भारताच्या क्रिडा क्षेत्राला चांगले दिवस.
सरकारी धोरणात क्रिडा प्रकाराला जरी फारसे चांगले स्थान नसले तरी काही क्रिडा संघटनाची चांगली कामगिरी आणि खेळाडुंच्या अथक परीश्रमामुळे चांगले दिवस येउ लागले असे वाटत आहे.
आजच बातमी आली की भारताची महिला मुष्टियुद्ध खेळाडू एम.सी. मेरीकोम हिने सलग पाचव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले आहे.
प्रथमतः तीचे अभीनंदन.
काही दिवसापुर्वी ऑलींपिकमधे कांस्य पदक मिळविणा-या सुशिलकुमार या मल्लाने जागतीक अजींक्यापद स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
तत्पुर्वी तेजस्वीनी सावंतने इतीहास घडवला. नेमबाजीत जागतीक अजींक्यापद स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
साईना नेहवाल जागतीक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर पोहोचली आहे.
भारताच्या पुरूषांच्या व्हॉलिबॉल संघाने नुकतेच आशीयाई स्पर्धेत कास्यपदक पटकावले.
भारताच्या युवकांच्या व्हॉलिबॉल संघाने मागील वर्षी पुण्यात झालेल्या जागतीक अजींक्यपद स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवीला होता.
(जाता- जागतीक व्हॉलिबॉल संघटनेला [FIVB] जागतीक फुट्बॉल संघटनेपेक्षा [FIFA] जास्त देश संलग्न आहेत. आणि या २२१ देशात क्रमवारीप्रमाणे भारत २५ व्या स्थानावर आहे. माझ्यामते ८-१० देशातील क्रिकेटचे स्थान, हॉकीची वाताहात बघता हे आशादायक चित्र आहे).
वरील सर्व खेळाडुंचे आणी संघटनांचे अभीनंदन.
भवीष्यात कॉमवेल्थ गेमसारखी चराउ कुरणे न भरवता क्रिडा क्षेत्राला सरकार भक्कम सहाय्य देइल अशी आशा करतो.
वाचन
4854
प्रतिक्रिया
0