मनसे यश: मिथ आणि वास्तव
राज ठाकरेंनी शिवसेना सोडून नविन पक्षाची घोषणा करण्यापुर्वी बराच वेळ घेतला होता. त्यामुळे ते नवीन काहीतरी भरीव अजेंडा घेउन येणार ह्या आशेने मी, सद्य स्थितीतील सर्व विचारशून्य आणि कर्तृत्वशून्य राजकीय पक्षांचा वीट आलेला, आनंदीत झलो होतो.
मी राज ठाकरेंचा विद्यार्थीदशेपासून समर्थक आहे (आता.... होतो म्हणावे का?) परंतू ‘मराठी अस्मिता’हाच मुद्दा ‘जुनी दारु नवी बाटली’ असा पुढे आणल्यामुळे माझा काहीसा हीरमोड झाला होता. काल हा लेख ‘ राज ठाकरे यश: मिथ आणि वास्तव’ वाचला आणि माझ्या मनातल्या विचारांना प्रकट रूप मिळाले. लेखातील प्रमुख पटलेले मुद्दे:
1. ‘नेमके काय हवे’ याचे उत्तर जेव्हा राज ठाकरे देण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ते खोल पाण्यात उतरलेले असतील आणि जितक्या लवकर ते या खोल पाण्यात उतरतील तितक्या लवकर महाराष्ट्रातील राजकारण हे अस्मितावादाच्या प्रभावापासून मुक्त होऊन विकासवादी राजकारणाकडे जाईल
2. प्रस्थापित राजकीय पक्षाच्या कर्तृत्वशून्यतेमुळे आणि कोणीच आश्वासक नसताना हे नवे उदयोन्मुख नेतृत्व तरी काही नवीन घडवेल अशी आशा राज ठाकरेंकडून अनेकांना आहे (माझ्याही ह्याच विचारने आशा पल्लवीत झाल्या होत्या...असो). अर्थातच ती नकारात्मक आहे. कारण राज ठाकरेंनी मराठीच्या अस्मितेचा मुद्दा वगळता दुसरा कोणताही विकासवादी मुद्दा उचललेला नाही.
3. मराठी अस्मितेचा मुद्दा जर मुंबईबाहेर प्रभावी ठरला असता तर राज ठाकरेंनी शिवसेनेची मर्यादा ओलांडली असे म्हणता आले असते किंवा जेथे शिवसेनेचा प्रभाव नाही अशा ठिकाणी जरी मनसेचा प्रभाव दिसला असता तरी ते लक्षणीय ठरले असते. पण राज ठाकरेंचा प्रभाव ज्या ठिकाणी शिवसेनेचा प्रभाव आहे त्याच भागात आहे हेच निवडणूक निकाल सांगतात.
पूर्वग्रहविरहीत व साधक-बाधक चर्चेची अपेक्षा आहे.
(मिपावार नव-अर्भकावस्थेत असल्यामुळे जुन्या खोंडांकडून आणि कंपूबाजांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.)
वाचन
10586
प्रतिक्रिया
24