जेव्हा दु:खच परतून येते
मायेने ते कवेत घ्यावे,
मालिश करुनी तळपायाला
हलके त्याला शांत करावे.
येणारच ते पुन्हा पुन्हा घरी
हक्कच त्याचा आपुलकीचा
सासुरवाशीण लेकीसाठी
माहेराने सज्ज रहावे.
कितीही आले ओठावर तरी
प्रश्न विचारू नये तयाला,
नशीब असते एकेकाचे
अपुले आपण मानून घ्यावे.
जाईल निघुनी उद्या सकाळी
नवीन क्षितिजे क्रांत कराया ,
करू नये पण उगीच त्रागा
तळहातावर दही वाढावे.
(लिहिल्यावर जाणवले कवी अनिल यांच्या उशिरा आलेला पाऊस या कवितेशी साम्य आहे.)
प्रतिक्रिया
9 Mar 2015 - 12:00 pm | ज्योति अळवणी
विषय असा आहे की सुंदर म्हणणे विरोधाभास आहे... तरीही... उत्तम कविता..
9 Mar 2015 - 12:31 pm | एक एकटा एकटाच
छान लिहिलीय
9 Mar 2015 - 12:56 pm | चुकलामाकला
आत्ता एकदम लक्षात आले, इथे दु:खाला माहेरवाशिणीची उपमा दिली आहे, माहेरवाशिणीला दु:खाची नव्हे.
चु.भू.द्या.घ्या.
9 Mar 2015 - 1:16 pm | एक एकटा एकटाच
रूपक अगदी बरोबर आहे
तुमच्या लिखानातुन दु:ख आणि माहेरवाशिण यांची योग्य सांगड लागतेय
काळजी नसावी.
पुढिल लिखाणास शुभेच्छा
9 Mar 2015 - 1:05 pm | सस्नेह
छान कविता.
9 Mar 2015 - 3:40 pm | सूड
जरा वेगळी, पण सुंदर!
9 Mar 2015 - 4:05 pm | अत्रुप्त आत्मा
ठिक.
12 Mar 2015 - 5:21 pm | चुकलामाकला
गुर्जी, लोभ असावा! :)
10 Mar 2015 - 9:12 am | अजब
फारच वेगळा विचार ! आवडली .
10 Mar 2015 - 6:01 pm | रेवती
छान आहे कविता.
12 Mar 2015 - 5:20 pm | चुकलामाकला
धन्यवाद मंडळी!