मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऑलिंपिक - २०१२

ऑलिंपिक २०१२ · · काथ्याकूट
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली तिथपासुनचा प्रवास २०१२ ला लंडन पर्यंत येऊन ठेपला आहे. आत्तापर्यंतच्या सर्व ऑलिंपिक स्पर्धेत एकुण भारताच्या वाट्याला नऊ सुवर्ण पदकं आली आहेत. हॉकीत आठ आणि मागील वर्षी अभिनव बिंद्राला मिळालेले एक पदक अशी आपली वाटचाल आहे. आता २०१२ च्या ऑलिंपिक स्पर्धेत भारत पुन्हा एकदा दमदारपणे उतरला आहे. भारतासहित विविध देशाचे स्पर्धक विविध खेळांमधे आपले कसब दाखवणार आहेत. स्पर्धेचं उद्घाटन सोहळा सानिका स्वप्नील यांनी अविस्मरणीय अनुभवातून दाखवलं आणि तो सोहळा अनेकांनी अनुभवला. ऑलिंपिक २०१२ च्या उद्घाटनाची आणखी काही छायाचित्र आपल्याला इथे ही पाहता येतील. भारत या स्पर्धेत किती पदकं मिळवेल ? कोणत्या स्पर्धेत कोणत्या स्पर्धकाकडुन पदकांची अपेक्षा आहे ? कोणत्या सांघिक क्रिडा प्रकारात यश मिळु शकते ? विजयी स्पर्धकांच्या अभिनंदनाबरोबर देश-विदेशातील विविध खेळांच्या आणि खेळाडुंच्या वैशिष्ट्यांसह आपण अधिक माहिती इथे टाकाल अशी अपेक्षा. हॉकीतलं आपलं आव्हान संपल्यातच जमा आहे. सुशीलकुमारकडुन कुस्ती , कश्यप तसेच सायना नेहवाल कडुन बॅडमिंटन, बॉक्सींगमधे देवोंद्रो कडुन पदकांची अपेक्षा आहे. आपलं काय मत आहे ?

वाचन 17132 प्रतिक्रिया 0