मॅरेज लाईफ.....१
लेखनप्रकार
हॅलो, वेळ आहे का रे या रविवारी??
का रे?
अरे आपल्याला एका काम आहे मुंबईत!! मला तुझी मदत लागेल...
रविवारी..... ?? बघतो..
बघु नकोस मी वाट पाहतोय. नि तू इकडे येतोहेस हे नक्की. आता हे लक्षात ठेऊन तू बाकीचं प्लॅनिंग कर.
अरे पण काय आहे ते सांग ना..
ते नंतर सांगतो सविस्तर बोलू ना आपण....
तरी पण...
फोनपेक्षा सविस्तर भेटून बोलू.....
पराला निखिलचा अचानक फोन आला आणि मुंबईला का बोलावतोय ते तो सांगायला तयार नव्हता.... काही विचारले तर तू फक्त ये इकडे असं म्हणत होता..
शनिवारी संध्याकाळी निखिलने पराला पुन्हा फोन केला.. उद्या निघतोयस ना पाचच्या बस ने?
पाच??? अरे तेव्हा तर माझी मध्यरात्र होते..!!! Sad
ते काही सांगू नकोस.. तू पाचच्या बसने निघ मात्र...
पराला हे निखिलला अचानक काय झाले होते कळायला काही मार्ग नव्हता.. विचार करून कशाला दिमाग का दही करून घ्यायचं? जे काय असेल ते कळेलच मुंबईला गेल्यावर. अशा विचारानं परा रविवारी पहटे लवकर निघाला.. इकडे ठाण्याला निखिल फॉर्मल पोषाखात वाट पाहतच होता..
परा: काय रे? इतक्या घाईने का बोलावलेस?? काही पालथे धंदे तर करून बसला नाहीस ना?
निखिलः नाही....
परा: मग कुणी फाटयावर मारलं का??
निखिलः नाही रे....
परा: मग काही चप्पल प्रकरण?
निखिलः असलं काही नाही रे.... आपल्याला दहाच्या आत पोचायला हवं रे दादरला...
परा: अरे ९ तर वाजताहेत.. नि आपल्याला थोडंच बस किंवा टॅक्सीने जायचंय.. ट्रेन ने पोचू दहाच्या आत निवांत...
चहापान पटकन आटोपून दोघांनी प्लॅटफॉर्म क्र. १ ची ठाण्याहून सुटणारी गाडी पकडली.. "परा.. पोळी-भाजी केन्द्रातलं अन्न खाऊन वैतागलोय रे!!!" ट्रेननं वेग घेतला तसा बोलावं की न बोलावं असं होऊन शेवटी निखिल म्हणाला...
हात्तिच्या.. एवढंच ना.. मग घरी स्वयंपाकीण ठेवायची....
तरं नाही रे....
बघ ना मी इतकी वर्षे ऑफिसात राबराब राबतो. काय मिळतं मला.??? कामाच्या अनियमीत वेळा.. बर्याचदा नुसतं सॅण्डविच नि कॉफी.. संध्याकाळी पण ९ वाजेपर्यंत घरी गेलो तर ठीक आहे नाहीतर विकतची पोळीभाजीही मिळत नाही.. पोटाचे हाल पण एकवेळ परवडले रे.. पण घरी गेल्यावर चार शब्द बोलायलाही कुणी नाही... ऑफीसमध्ये चार मित्र असतात तेवढेच.. पण प्रोफेशनल रिलेशन्स वेगळे नि आपलं हक्काचं माणूस असणं वेगळंच रे!!! विकांताला जरा पाय मोकळे करू म्हणून कुठे मॉलमध्ये गेलो.. की हातात हात घालून फिरणारी जोडपी जखमेवर पोतंभर मीठ चोळतात..
निखिल अगदी मनातून बोलत होता. तोच काय त्याच्या सारख्या असंख्य अविवाहित लोकांची व्यथाच त्याने मांडली होती. नि त्यात नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर राहणार्यांची अवस्था तर त्याहूनही वाईट.
पण दुकटं होणंही तितकं सोपं नव्हतं.. आधीच आजकाल मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या.. अशात हवी तशी मुलगी मिळणं.. नि तीनंही पसंत करणं कठीण झालंय... एकवेळ मंदीत नोकरी मिळेल पण छोकरी मिळणं अवघड आहे.. लग्न हे एखाद्या चक्रव्यूहाप्रमाणे आहे यात येता येतं बाहेर पडता येत नाही. नि त्यात जर लग्न करताना सप्तपदीचा विधी केला तर काय काय भयानक परिणाम होऊ शकतात याचा नुकताच साक्षात्कार झालेला!! एखादाच योगेश्वर पिवळा डांबिस असेल तरच त्याची यातून सुटका... चांगलं खाऊ-पिऊ घालणारी.., रोज हापिसातून निघण्या आधी फोन करणारी..(काही पालथे धंदे केले असतील निस्तरण्याची पूर्वसूचना तर मिळते ना!!), छान मोगर्याचे गजरे माळणारी बायको मिळते नाहीतर.. तात्या काय किंवा अवलिया काय सगळ्यांनीच यातून माघार घेतल्यासारखी गत!!!
निखिल बोलत होता हे सगळे या पूर्वीही बर्याचदा बोलून झालं होतं. सहनही होत नाही अन सांगताही येत नाही!!!
"मी यातून बाहेर पडायचे ठरवलय". - निखिल
" मग काय करणार आहेस तू त्या साठी"? - परा
"माझी एक मैत्रिण आहे.. मस्त कलंदर नावाची... तिच्या ऑफिसमध्ये चाललोत आपण"
" काय करतात त्या"?
" हे काय येईलच त्यांचे ऑफीस"
निखिलने मोघम शब्दात पराचा प्रश्न टाळला.
ऑफिसच्या इमारतीच्या तलमजल्यावर आल्यावर निखिलने गळ्यात टाय अडकवला, खिशातून काढून एक पराला ही दिला आणि एकदम वेगळाच हसला.
"कलंदरतै टाय नसेल तर आपल्याला भेटणार नाहीत."
दोघे एका पॉश ऑफिसच्या बाहेर थांबले....
आत प्रवेश करताना का कोण जाणे पराला एका वेगळ्याच दुनियेत पाय ठेवतो आहोत असे वाटत होते!!!!
महागड्या अत्तराचा मंद दरवळ.. दूर कुठेतरी सौम्य आवाजात संतूरवादन ऐकू येत होते.. छान प्रसन्न करणारे वातावरण होते.. दादरच्या गर्दीतून बाहेर आलेल्या पराचा जीव थोडा सुखावला.. आधीचे आलेले लोकही टाय लावून आले होते.. सगळ्यांना एका हॉल मध्ये बोलावण्यात आले..
समोर भिंतीवर एक वाक्य मोठ्या ठळक अक्षरात लिहिले होते
"मॅरेज इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग इन द वर्ल्ड..... सो.. डोन्ट ओन्ली ड्रीम अबाऊट इट.. बट.. डू इट!!!"
परा त्या वाक्यावर विचार करू लागला.
खरंच शादी का लड्डू... जो खाये वो पछताये, जो ना खाये ललचाये.. लग्नाची स्वप्ने सगळेचजण बघतात... कोणी तो तिच्याबरोबर.. तर कोणी तो "त्या"च्या बरोबर लग्न करण्याची स्वप्नं बघतात.. हक्काच्या-प्रेमाच्या माणसाची स्वप्ने बघतात.. नोकरी मिळाली की लगेच सगळेजण छोकरीची स्वप्ने बघतात. आणि ती स्वप्ने साकार व्हावीत म्हणून प्रयत्नशील होतात. आपण त्याला स्वप्ने म्हणतो खरेतर त्या आपल्या गरजा असतात. पण मग स्वप्ने आणि गरजा यात फरक काय असतो? गरजा जेंव्हा अप्राप्य होतात तेंव्हा त्यांची स्वप्ने होतात? बापरे!!! म्हणजे लग्न अप्राप्य आहे?????
पराच्या नजरेसमोर आता पर्यंत दिलेल्या वरपरीक्षा उभ्या राहिल्या... त्यावेळी मुलींनी विचारलेल्या स्वयंपाक येतो का?? घरकाम येतं का??? सप्तपदीतल्या सगळ्या वचनांचं पालन करशील का?? या असल्या प्रश्नांनी पराला गारद केलं होतं.. लग्न झाले/ठरले नाही.. गर्लफ्रेंड पण नाही.. म्हणून नाईलाजास्तव कॅफेतल्या मुलींकडे पाहत कसेबसे रडतखडत जगत होता. नि "लडकी और बस के पीछे कभी भागना नहीं चाहिए.. एक गयी तो दुसरी आती है.." असे काहितरी बरळून मनाची समजूत घालत होता... छे: माणूस स्वतःच्या इच्छा मारणे याला समाधान म्हणत असतो................. आपण नक्की जगणे जगत असतो का जगण्याची तयारी करण्यासाठी खपत असतो? आनन्दात / स्वतःच्याच मस्तीत जगणे असू शकते हे स्वप्नही पहायला आपण नालायक आहोत?
आसपासचे बहुतेक लोक परासारखेच विचारात गढलेले होते.
त्या मस्त वातानूकुलीत हॉलमध्ये अन्धार झाला. हाय आय अॅम मॅस्ट कालान्डर. व्हॉट यू आर गोइन्ग टू सी टुडे इज अ वंडर ऑफ धिस मिलियिनम!!!
वाचन
13052
प्रतिक्रिया
0