सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर.. कळसुबाई !!
कळसुबाई!! उंची 1,646 m (5,400 ft) ह्याला गवसणी घालायचे ठरवुन .. बारी गावात पाऊल ठेवले. समोर पाहतो तर कळसुबाई
आणि विस्तारीत सह्याद्रीचा कडा
बारी गाव पार करताना शेताडीमधुन वाहणारा हा ओढा
कळसुबाईची सुरवात.. पहिला डोंगर, सरळ अंगावर येणारा चढ...पुढे काय वाढुन ठेवलय याची यथार्थ कल्पना देणारा, सह्याद्रीच्या कुशीत कष्टाला फार महत्व!
दोन दिवसांची सुट्टी साजरी करायची होती. थोडे चढुन झाल्यावर आंब्याच्या थंड सावलीत श्रमपरिहार करुन, ह्या भावड्याकडे आलो. २-३ दा आलो असल्याने परीचय होताच. घराच्या मागचे खोपटे, शेकोटीला लाकडे मिळाली. जेवायची न निजायची सोय लागली.
वडाची पोर्णिमा कालचीच. पुर्ण चंद्राच्या प्रकाशात, शेकोटीची ऊब घेत, गप्पांचा फड छान रंगला. सगळंच कसं छान जमुन आलं होते. १९५०-७० मधील चित्रपट संगीत, गायकांचे स्वर्गीय स्वर माहोल अजुनच नशीला करीत होते. रात्र कधी सरली कळलीच नाही. सकाळी गरमा-गरम पोह्यांचा नाश्ता करुन मार्गाला लागलो.
कसलेली शेती, मधुनच हिरवे गवत.. निसर्गाच्या कुंचल्याची अदाकारी निव्व़ळ पहात रहावी!!
महत्वाचा टप्पा.. कड्याची खडी चढण, धुक्यात हरवलेली वाट..
हा अतिप्रचंड सह्यकडा
काही विहंगम द्रुश्ये
पहीली शिडी
मगाशी उंच, अभेद्य वाटणारा कडा आता जरा कह्यात वाटत होता
दुसरी शिडी
इथे मात्र फसलो. दोन शिड्या झाल्याकी आलो आपण असा आमचा गैरसमज पुरता धुतला गेला
शिडीनंतर पार करावे लागणारे ३ डोंगर, चढण पुर्वीइतकी नसली तरी चढणच होती..
दोन डोंगर पार केल्यावर धुक्यापल्याड दिसले ते कळसुबाई!!
एवढ्या उंचीवर कुणातरी पुण्यवंतानी बांधलेली विहीर.. तशी परंपरागत विहीर नाही. पाण्याचे चौकोनी कुंड, आणि जमिनीखालुन तिथेच येणारा प्रवाह, याला एका खड्ड्यात बंदीस्त करुन बाजुने ४ फुट दगड बांधुन काढले आहेत.
हुश्श!! पोचलो एकदाचे,,, पण हे काय, शेवटच्या शिडीवर ही गर्दी
मग आम्ही शिडीच्या बाजुचा पुर्वापार वापरात असलेला रस्ता निवडला. थोडे हात-पाय ताणुन पोचलो वर, वर होते धुक्याचे साम्राज्य!!
देवीचे मंदीर आणि भटके
एवढ्या उंचीवर मुक्तपणे बागडणारी फुलपाखरे..
सभोवताली ढग असल्याने, कुठलाही गड, कुठलाही प्रदेश काहीच दिसले नाही.
उतरताना काही ठिकाणी क्लिक्ड....

आणि विस्तारीत सह्याद्रीचा कडा
बारी गाव पार करताना शेताडीमधुन वाहणारा हा ओढा
कळसुबाईची सुरवात.. पहिला डोंगर, सरळ अंगावर येणारा चढ...पुढे काय वाढुन ठेवलय याची यथार्थ कल्पना देणारा, सह्याद्रीच्या कुशीत कष्टाला फार महत्व!
दोन दिवसांची सुट्टी साजरी करायची होती. थोडे चढुन झाल्यावर आंब्याच्या थंड सावलीत श्रमपरिहार करुन, ह्या भावड्याकडे आलो. २-३ दा आलो असल्याने परीचय होताच. घराच्या मागचे खोपटे, शेकोटीला लाकडे मिळाली. जेवायची न निजायची सोय लागली.
वडाची पोर्णिमा कालचीच. पुर्ण चंद्राच्या प्रकाशात, शेकोटीची ऊब घेत, गप्पांचा फड छान रंगला. सगळंच कसं छान जमुन आलं होते. १९५०-७० मधील चित्रपट संगीत, गायकांचे स्वर्गीय स्वर माहोल अजुनच नशीला करीत होते. रात्र कधी सरली कळलीच नाही. सकाळी गरमा-गरम पोह्यांचा नाश्ता करुन मार्गाला लागलो.
कसलेली शेती, मधुनच हिरवे गवत.. निसर्गाच्या कुंचल्याची अदाकारी निव्व़ळ पहात रहावी!!
महत्वाचा टप्पा.. कड्याची खडी चढण, धुक्यात हरवलेली वाट..
हा अतिप्रचंड सह्यकडा
काही विहंगम द्रुश्ये
पहीली शिडी
मगाशी उंच, अभेद्य वाटणारा कडा आता जरा कह्यात वाटत होता
दुसरी शिडी
इथे मात्र फसलो. दोन शिड्या झाल्याकी आलो आपण असा आमचा गैरसमज पुरता धुतला गेला
शिडीनंतर पार करावे लागणारे ३ डोंगर, चढण पुर्वीइतकी नसली तरी चढणच होती..
दोन डोंगर पार केल्यावर धुक्यापल्याड दिसले ते कळसुबाई!!
एवढ्या उंचीवर कुणातरी पुण्यवंतानी बांधलेली विहीर.. तशी परंपरागत विहीर नाही. पाण्याचे चौकोनी कुंड, आणि जमिनीखालुन तिथेच येणारा प्रवाह, याला एका खड्ड्यात बंदीस्त करुन बाजुने ४ फुट दगड बांधुन काढले आहेत.
हुश्श!! पोचलो एकदाचे,,, पण हे काय, शेवटच्या शिडीवर ही गर्दी
मग आम्ही शिडीच्या बाजुचा पुर्वापार वापरात असलेला रस्ता निवडला. थोडे हात-पाय ताणुन पोचलो वर, वर होते धुक्याचे साम्राज्य!!
देवीचे मंदीर आणि भटके
एवढ्या उंचीवर मुक्तपणे बागडणारी फुलपाखरे..
सभोवताली ढग असल्याने, कुठलाही गड, कुठलाही प्रदेश काहीच दिसले नाही.
उतरताना काही ठिकाणी क्लिक्ड....

लेखनविषय:
वाचन
11722
प्रतिक्रिया
0