हे असंच चालायचं. ( आंदोलन मासिक फेब्रु.२००९).
- जगात ज्यांना पुरेसे स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही असे ३३% म्हणजे ६५ कोटी लोक भारतात आहे.
- अमेरिकेतही १३% लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत आताच्या मंदीमुळे हे प्रमाण २०% पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
- १९८० च्या उत्त्पन्नात जी काही वाढ झाली, त्यातली ७० % वाढ फक्त १% कुटूंबीयांनाच मिळाली, त्यानंतर ही विषमता अधिक वाढत गेली.
- १९९० च्या सुमारास १% श्रीमंत लोकांकडे ४२.२% शेअर्स, ५५.७ % बाँडस्, लहानमोठ्या उद्योगातील ७१.४ % उद्योग होते.
- जगातील सर्वात जास्त श्रीमंत तिघाकडे जगातील ४८% पेक्षा जास्त श्रीमंती आहे.
- जगातील सर्वात श्रीमंत अशा २२५ लोकांच्या उत्पन्नातील ४% अतिरीक्त कर वाढवला तर जगातल्या प्रत्येकाला अन्न, स्वच्छ पाणी, शिक्षण आणि आरोग्यसेवा देता येईल.
- भारतात ५०% मुले कुपोषित आहे.
- भारतातील बालमृत्यूचे प्रमाण बांगलादेशापेक्षा जास्त आहे.
- २००३ साली भारताचा विकास क्रमवारीत १७५ देशात आपला क्रमांक १४७ वा होता.
- १९९१ मध्ये टिस्को मध्ये ८५००० कर्मचारी १० लाखटन पोलादाचे उत्पादन करित. २००५ साली उत्पादन ५० लाख टन आणि कर्मचारी वर्ग मात्र ४४००० इतका झाला.
वाचन
19423
प्रतिक्रिया
0