मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी बी काय तरी लिहीन म्हणतो : औरंगाबाद तडका. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
(प्रेरणा) मूळ कवीची क्षमा मागून. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. पांढर्‍या कागदावर काळे शब्द पाहीन म्हणतो. मीबी काही तरी लिहिन म्हणतो. कवितेला रास्त प्रतिसाद भेटले काय, न भेटले काय कवीला उपासमारीत जगायची सवयच हाय तरीबी मी आपलं जमवून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. कवीला मूक्ती भेटली काय, न भेटली काय कवीला स्वप्नात जगायची जन्मजात सवयच हाय मी तरी वास्तव जगात जगून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेतून सामाजिक प्रश्न सुटलेत काय, न सुटलेत काय या कवींना अजिबात काय कळतच नसतं. कविता पेनड्राइव्ह मधे भरुन पुस्तक काढीन म्हणतो, मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेशी प्रतारणा करुन कथा लिहिता येते, कवितेशी इमान राखणारे घरात कुढत बसतात, कवीचे नाव फक्त संदर्भापुरते घ्यायचे, काम झाले की वार्‍यावर सोडायचे पण,कवितेतून नवं काय मांडावे म्हणतो. मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेला कंटाळून कोण तरी म्हणतं भाऊ 'दिलीपला' कोणी तरी दोन घोट 'पाजा'भाऊ.

वाचन 22351 प्रतिक्रिया 0