मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ?

माहितगार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ? पण तुझी नव्हे तर अजून कुणाची व्हावी ? याक्षणी तुझ्या सारखा राजर्षी स्वर्गात ऐषफर्मावत असेल असेही शक्य नाही तू ज्या कुंपणावर थांबून रयतेसाठी देशाची राखण केलीस तेच कुंपण शेत खाते आहे पाहून तू अस्वस्थ होत असशील कुठेतरी धडपडतही असशील, काळाने अभिप्रेत नसलेले गूण उधळत ठोके चुकवताना तुझ्या जैवीक गुणसूत्रांचीही आब नाही राखली त्याला तू तरी काय करशील? नैतीकता दूकानातून विकत आणून का कुणाला देता येते ? न ही जैवीक गुणसूत्रांमधून वाटता येते, देश शब्दातून 'जैवीक कुटूंबीय' आदर्श शब्दातला आदर्श, त्यागी शब्दातला त्याग गांधी शब्दातला गंध हरवलेला पाहून तुझे डोळे पाणावले असतील या विचारानेच तुझ्या अखंडभारत-कुटूंबातील गोरगरीबांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या व्हाव्यात, होय फिरोज, तूझ्या सारखा देशप्रेमी आपल्या भारतीय कुटूंबात होऊन गेल्याचा अभिमान ठेवणारा सामान्य देशवासीय, तुझी प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा या देशाच्या रक्षणासाठी नक्कीच उभा टाकेल, ज्याला तुझे कार्य समजेल तूझा आशिर्वाद घेईल तो अजून करु तरी काय शकेल काळ चुकत असेल तर त्याला नक्कीच वठणीवर आणेल अशी आशा करत डोळ्याच्या कडा पुसून, पुन्हा एकदा नव्या जोशाने उभे टाकूया, एक सैनीक बनून या आपल्या भारत भूमीच्या प्रेमा खातर ! चल उद्घोष करुयात जय हिंदचा मोठ्या जोमाने अजून एकदा आणि पुन्हा पुन्हा, जय हिंद ! जय हिंद !! . . . . (माझी सदर उपरोक्त कविता या मिसळपाव संस्थळावरील http://www.misalpav.com/node/35922 ह्या दुव्याचा संदर्भ आणि कवितेत बदल न करण्याच्या अटीवर, आणि अनुवादांसाठी पुर्वानुमतीच्या अटीवर प्रताधिकारमुक्त करत आहे)

वाचन 8001 प्रतिक्रिया 0