मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कर्दळी वनात जात आहात का ?

नितीनचंद्र · · भटकंती
कर्दळी वन ही जागा अध्यात्मिक दृष्ट्या अतिशय जागृत अशी सांगीतली जाते, यु ट्युब वर तर प्रा क्षितीज पाटकुले एक करोड व्यक्तीतली एक व्यक्ती कर्दळीवनाची यात्रा करते असा प्रचार करतात. कारणही तितकच प्रभावी आहे. इथे स्वामी समर्थ प्रकटले. ही यात्रा आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या टुरिझम पॉलीसीत बसते का यावर कोणी काही बोलत नाही. ही जागा आंध्र सरकारच्या वनखात्यात येते. या प्रदेशात वन्य पशुंचा संचार आहे. जिथे जेवणाची व्यवस्था नाही. जिथे संपर्काचे साधन नाही. कोणला साप चावला तर औषध नाही. एखादा व्यक्ती यात्रेच्या अतिश्रमाने आजारी पडला तर औषध उपचार नाहीत अश्या ठिकाणी ट्रेकर्स मंडळी सोडुन काही सामान्य माणसे जातात आणि त्यांचे अतोनात हाल होतात. ज्याने एकही ट्रेक केलेला नाही अश्या कोणत्याही वयाच्या स्त्री/पुरुषाला कर्दळीवन सेवा संघ जाहीरात करुन भुरळ घालते. कधी कधी आंध्र प्रदेश सरकार परवानगी नाकारते. अश्या वेळी ह्या सहली अ‍ॅरेंज करणारे विना-परवाना लोकांना जंगलात घुसवतात. एकेका दिवशी २५ किलोमीटर्स पेक्षा जास्त जंगलातल्या पायदळीवर चालण्यास भाग पाडतात. वनखात्याचे पोलीस धमक्या देतात आणि स्वतःच्या जबाबदारीवर लोक ही यात्रा पुर्ण करतात. माझी ही श्रध्दा आहे की स्वामी कोणाचे काही बिघडु देणार नाहीत. पण स्वामींना त्रास कशाला. या ऐवजी ह्या म्हहत्वाच्या स्थळी जर स्त्री पुरुष यांना न्यायचे असेल तर अश्या सोयी सुविधा उपलब्ध होतील याकडे आयोजक आणि शासन लक्ष देईल का ?

वाचन 18486 प्रतिक्रिया 0