दाहीरची यमदिक्षा
चुका वांझोट्या नसतात
कधीनाकधी त्या
प्रसवतात
भूतकाळातील पातके
मग
सारे जगणे
यातनामय होवून जाते.
गलितगात्र असे जगणे
मोहपाशात गुरफटलेले,
सतत भूतकाळाची
सावली घेवून नाचणारे,
सारे थरारून जाते
अन
सुन्न पडते.
बाणासारखा अंधार
छेदुन चिवडलेला काळोख
त्याच्या चित्रविचित्र
मुर्त्या होवून नाचतात
अन घेवून जातात
त्या अनाकलनीय जगात
जिथे
मानवाचे प्रथम वंशज
प्रत्येक भयाण वस्तूला
देवत्व देत होते.
मग संस्कृतीपाठोपाठ
हाव आली
त्याचाच परिपाक
आक्रमणे,
प्रत्येक संस्कृतीवर
बलात्कार होवून
अनौरस वंशाचे ओझे
वाढत राहिले,
त्यात शेवटची आहुती
दाहीरची पडली
मग
सारेच दाहीर होत राहिले.
संस्कृती अन धर्म
त्यागाताना भोगलेल्या
यमयातना
वंशास यमदीक्षा
देवून गेल्या,
मग कत्तलींचे खेळ
पोरखेळ वाटू लागले,
आक्रमक धर्माचे वरवंटे
भरडू लागले
आदिम अनंत जगणे.
तक्षशिला नालंदेच्या
ढिगा-यात
कित्येक ज्ञानाच्या
अर्भकांची आहुती
पडली
रक्तात भिजल्या पुनरुत्थानास
पुन्हा कधी
मोड आलेच नाहीत.
सारे जराजर्जर होवून राहिले.
पुन्हा सांगतो
चुका वांझोट्या नसतातच !
मूळमाती विसरून
आभाळाला धर्म समजणारे
सारे हिजडे
टाळ्या वाजवू लागतात
व
नपुंसक संस्कृतीरक्षक
फक्त पहात राहतात
विनाश
ज्यात त्यांचे पूर्वजही
कधीतरी सामील होते.
विजयकुमार.........
२३ / १० / २०१०, मुंबई