मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवरात्र जल जागर : माळ दहाव्वी

नाखु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
================================================================== नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी... माळ नववी... माळ दहावी... ==================================================================

राज्यात 56 टक्के जलसाठा

  • दहावी माळ विजयादशमीला प्रकाशीत केली नाही कारणः
  • अजूनही दुष्काळ रावणाचे दहन झालेले नाही. समस्त विजय कसा साजरा करणार ?
  • मालीकाच जलजागर असण्याने शेवटच्या लेखाला "कोजागर" सारखा दुग्धशर्करा योग येणे क्रमप्राप्त आहे.
  • लेखमाला नक्की कशासाठी आणि मिपा वाचकांकडून काय अपेक्षा ते त्यांच्या शंका समाधानात देत आहेच.
मी जलतज्ञ नाही की शेतकरीही नाही.कुठल्याही फुटकळ किंवा मुख्य राजकीय पक्षाचा (संघटनेचाही) अगदी गेलाबाजार चार आण्याचा सभासदही नाही. जे इथे डकवतोय ते मी गेले ४ महीने लक्षपूर्वक वाचलेले आणि मागोवा घेतलेले, आणि जे चांगले, ते मिपाकरांचे निदर्शनास आणून देणे इष्ट समजतो. त्या आणि त्याच भावनेतून इथे डकवत आहे. सजग मिपा वाचकांचे अनुभव आणि त्यांच्या त्या भागातील मित्र-आप्तेष्टांचे अनुभव वाचण्यास उत्सुक आहेच. याची दुसरी बाजूही असेल आणि तीही कशीही असली तरी मिपाकरांना माहीत व्हावी हीच या नव रात्र जल जागरचा उद्देश आहे. यातील काही लेख खफवर आले असल्याने द्विरुक्ती वाटेल पण त्याला नाईलाज आहे. खरडफळ्यावर फारसी चर्चा न होता तो विषय "शिळा" होतो असे लक्ष्यात आले म्हणून हा वेगळा लेखन प्रपंच.
आणि हो मी फक्त हमाल आहे भारवाही मूळ मालक वेगळा आहे . जी माहीती आहे ती सकाळ प्रकाशनच्या "अग्रोवन" मधून जशीच्या तशी फक्त आपल्या करिता देत आहे.मी विचारवंत नसल्याने त्याचे मूल्यमापन करण्यास असमर्थ आहे. पण महाराष्ट्रभर विखुरलेले मिपाकर नक्की त्याबद्दलचे अनुभव सिद्ध मत देत देतील आणि सगळी माहीती मिळेल हाच धाग्याचा साधा आणि सरळ उद्देश आहे

त्यात दिलेल्या लोकांशी (सरकारी अधिकारी,सरपंच आणि लाभार्थी यांच्याशी फोनवर बोललो आहे)

स्नेहांकिता – पाण्याचा थेंबही वाया जाताना पहिला तर मन तळमळते. दुर्दैवाने भारतात याविषयी अत्यंत अनास्था दिसते. जल-अभियान होणे आवश्यक आहे
धन्यवाद पाणी साक्षरता याची शहरातील सर्वच थरातील लोकांना फार गरज आहे . घराघरातून पाणी वापराची काटकसर शिकवली गेली तरी चांगला फरक पडेल. मुख्य शहरातील प्रत्येक कुटुंबाने दिवसाला किमान १० लिटर वाया जाणारे पाणी वाचवले तरी शेतीचे हक्काचे पाणे जे शहराला पुरवले जाते ते वाचेल आणि शेतीसाठी देता येईल. शहर पुणे किमान १० लीटर लोकसंख्या ३१,२४,४५८ (साक्षर २४,९६,३२४) किमान २०% लोकांनी जरी पाणी वाचवले (बंगल्यातील-झोपडीतील-चाळीतील-सोसायटीतील-फ्लॅट मधील) असा भेदभाव न बाळगता तरी किमान ६,५०,००० लोक होतात. आता सहा लाख पन्नास हजार गुणीले १० लिटर गुणीले ३६५ दिवस असा हिशेब

२३७२५

लाख लीटर इतकाच फक्त येतो. हे फक्त पुण्याचे मुंबई ठाणे आणि औद्योगीक यांचा विचार केला तर किती होईल ते क.अकौंटंट यांनी पहावे ही विनंती
मदनबाण –महाराष्ट्राला बर्याच काळाने एक उत्तम मुख्यमंत्री लाभला आहे !
फडणवीस माझ्या कंपनीतील सहकारी आणि इअतर काही मित्रांच्या मते (थेट पैश्याची खिरापत करीत नसल्याने) अगदी शहरी मुख्यमंत्री आहेत (त्यातही काही महाभाग ब्राम्हण असल्यानेच अकार्यक्षम आहेत असा शिक्का ठेवूनही मोकळे झाले आहेत. जाणत्या राजांनीच फडणवीस मुख्यमंत्री ठरताच "महाराष्ट्राला ब्राम्हण मुख्यमंत्री परवडणार नाही" असे जाहीर विधान केले होतेच.त्यामुळे रा.काँच्या पाठीराख्यांकडून मला वेग्ळी अपेक्षा नव्हतीच. तरी देवेंद्रांची बातचीत तुमच्या साठी फडणवीशी
प्रसाद१९७१ - नाखु साहेब, ह्या लेख माले बद्दल तुमचे आभार मानावेत तितके कमी आहेत
साहेब म्हणून दूर लोटू नका. मला मिपाकरच राहू द्या. ही माहीती मी फक्त आप्लयपर्यंत पोहोचवली मी फक्त वाढपी आहे. पाक कौशल्य अअ‍ॅग्रोवनचे आहे. आभार+ अभिनंदन त्या त्या भागातील लाभार्थींचे,सहभागींचे करा
एस -सवडीनुसार मीही काही टंकण्याचा प्तयत्न करतो.
अवश्य वाट पहात आहे.
पैसा - वाचते आहे! बंधार्यातील गाळ काढणे एकूण शेतीला सर्वप्रकारे फायदेशीर झालेले दिसते
अर्थात आर्थीक फायदा तर आहेच प जमीनीची सुपीकता आणि भोगर्भातील पाणीसाठा यासाठी संजीवनी आहे.
डॉ सुहास म्हात्रे -पुढची पायरी म्हणून, या सर्व लेखांचा गोषवारा करून एखाद्या मोठ्या वाचकसंख्या असलेल्या नियतकालिकात प्रसिद्ध केल्यास ते अजून खूप मोठ्या लोकसंख्यपर्यंत पोहोचू शकेल. नाखु यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! जिथे हे काम चालले आहे तेथिल मिपाकरांनी त्यांचे प्रत्यक्ष अनुभव लिहून या माहितीत भर टाकावी असे सुचवतो.
ही माहीती मी नियतकालीकातून संकलीत केलेली आहे मिपा वाचकांना लेखमालेत प्रस्तुत केली आहे. लेखांचे दुवे देण्यापेक्षा थेट माहीतीच दिली आहे. मी फक्त वाढपी आहे.
स्वधर्म - लेख व विषय अावडला.
धन्यवाद. आजच श्री भुजबळ यांचे कडून माहीती घेतली त्या नुसार अद्द्यावत केली आहे
अभ्या.. -लहान गांवे जरी पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी झाली तरी सध्या पुरेसे आहे. बाकी शहरांना राजकारण्यांना हाताशी धरुन पाणी मिळवायची टॅक्ट जमते
दोन्ही बाबतीत तंतोतंत सहमत. शहरी भागातील लोकांचे राजकीय महत्व (मतदार) असल्याने पाण्याचे बाबतीत जरा फाजील लाड होतात हे मी पिंपरी-चिंचवड मध्ये अनुभवले आहे. काही भागात पाण्याची कमतरत असेल पण एकूण पाण्याची चंगळ आहे हे सर्वांना मान्य आहे.
गुलाम -या योजनेतल्या त्रुटी (प्रामाणिकपणे) दाखवणारे प्रतिसाद देखील आले असते तर धाग्याचा दर्जा अजुन उंचावला असता.
ही लेख माला लिहिण्यामागे हाच उद्देश होता. ती एकांगी राहू नये याकरीता तरी मिपाकरांनी त्यांचे वौक्तीक (मित्रांचे) अनुभव इथे मांडावेत ही विनंती.
नमकिन -महाराष्ट्रात दुष्काळ जाहिर झाला, परंतु सोलापूरचे नाव यादीत नाहीं, हे का? अवर्षण इथे कायम आहे, वर्षों पासुन तरीही? शिवारात पाऊसच नाहीं तर कसं होणार?
दुष्काळाचे निकष काय आहेत मला माहीत नाहीत सरकारी कर्मचारीच ठीक सांगू शकतील.
अनुप ढेरे - यातलं ७४६ हा आकडा टीएम्सी नसावा. खूप जास्तं होइल ते
लहान बंधार्यातील पाणी साठा Thousand Qubic Meter असा मोजला जातो आणि तो मोठ्या धरणांतील (थाउजंड मिलीयन क्युबिक फीट) बरेच लहान(छोटे) परिमाण आहे (मैल आणि फूट).

परतीच्या पावसाने झाली वाढ - धरणांमध्ये 751.49 टीएमसी पाणी

पुणे - राज्यात पावसाने ओढ दिल्याने राज्यात टंचाई स्थिती निर्माण झाली होती. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सोमवारपर्यंत (ता.5) राज्यातील सर्व प्रमुख 2559 प्रकल्पांमध्ये मिळून 751.49 अब्ज घनफूट (टीएमसी) (56 टक्के) पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील पाणीसाठा दोन टक्क्यांनी वाढून, तेथे 40.81 टीएमसी (15 टक्के) पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. गतवर्षी या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून 1045.30 टीएमसी (78 टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. परतीचा प्रवास सुरू होताच मॉन्सून सक्रिय झाल्याने सप्टेंबर महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस पडला. दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या पावसाने मोठा दिलासा दिला. ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहिल्याने, राज्यातील लहान, मोठे बंधारे, पाझर तलावामध्ये पाणी गोळा झाले. राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये धरणांच्या पाणीसाठ्यात जवळपास 40 टीएमसी वाढ झाली आहे. कोकण विभागात सर्वाधिक 87 टक्के पाणीसाठा असून, विदर्भातील धरणांमध्येही 72 ते 75 टक्के पाणी उपलब्ध आहे. पश्चिम महाराष्ट्र, खानदेशात 60 टक्के पाणी असून, मराठवाड्यात अवघे 15 टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्यातील 90 मोठ्या प्रकल्पांमध्ये 528.05 टीएमसी (57 टक्के), 225 मध्यम प्रकल्पांमध्ये 98.57 टीएमसी (58 टक्के), तर 2233 लघू प्रकल्पांमध्ये 78.27 टीएमसी (45 टक्के) पाणीसाठा आहे. तर मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी, बारवी, मुळशी, इरई, या इतर 11 प्रकल्पांमध्ये मिळून प्रकल्पांमध्ये मिळून 46.60 टीएमसी (74 टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे विभागातील पाणीसाठ्यात होतेय वाढ पुणे जिल्ह्यातील भीमा नदी व भीमेच्या उपनद्यांच्या खोऱ्यात सुरू असलेल्या पावसाने विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पुणे विभागातील प्रमुख धरण असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा उपयुक्त पातळीत आला असून, धरणामध्ये एकूण 66.65 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. उपयुक्त साठ्यामध्ये 3 टीएमसी पाणी आहे. कोयनेमध्ये मृतसाठा धरून जवळपास 80 टीएमसी पाणीसाठा आहे. विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून 281 टीएमसी (60 टक्के) पाणीसाठा झाला आहे. विभागातील 29 मोठ्या प्रकल्पांमध्ये 245.01 टीएमसी (62 टक्के), 44 मध्यम प्रकल्पांमध्ये 25.84 टीएमसी (52 टक्के) आणि 326 लघू प्रकल्पांमध्ये 10.13 टीएमसी (38 टक्के) पाणीसाठा आहे. कोकणात समाधानकारक पाणीसाठा राज्यात यंदा पावसाने ओढ दिली असली, तरी कोकणात पडणाऱ्या कमी अधिक पावसामुळे कोकण विभागातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. विभागातील 160 प्रकल्पांमध्ये 86.60 टीएमसी (87 टक्के) पाणीसाठा झाला आहे. कोकणातील 5 मोठ्या प्रकल्पांमध्ये 58.88 टीएमसी (89 टक्के), 5 मध्यम प्रकल्पांमध्ये 11.54 टीएमसी (84 टक्के) आणि 150 लघू प्रकल्पांमध्ये 16.17 (84 टक्के) पाणीसाठा आहे. नागपूर विभागात पाणीसाठा खालावला परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर इतर विभागांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, पावसाने जोर न धरल्याने पूर्व विदर्भातील नागपूर विभागाचा पाणीसाठा काही प्रमाणात खालावला आहे. विभागातील सर्व धरणांमध्ये यंदा 112.83 (75 टक्के) पाणीसाठा आहे. विभागातील 17 मोठ्या प्रकल्पांमध्ये 82.71 टीएमसी (72 टक्के), 40 मध्यम प्रकल्पांमध्ये 16.95 टीएमसी (87 टक्के) तर 307 लघू प्रकल्पांमध्ये 13.17 टीएमसी (78 टक्के) पाणीसाठा झाला आहे. अमरावती विभागात पाणीसाठ्यात वाढ विदर्भाच्या पश्चिम भागात असलेल्या जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने जोर धरला. त्यामुळे अमरावती विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली. विभागातील सर्व 460 प्रकल्पांमध्ये 76.47 टीएमसी (72 टक्के) पाणीसाठा झाला आहे. यात 9 मोठ्या प्रकल्पांमध्ये 38.80 टीएमसी (79 टक्के), 23 मध्यम प्रकल्पांमध्ये 17.16 टीएमसी (74 टक्के) आणि 428 लघू प्रकल्पांमध्ये 20.51 टीएमसी (62 टक्के) पाणीसाठा झाला आहे. नाशिक विभागात पाणी स्थिती सुधारली नाशिक विभागातील धरणांच्या पाणलोटात सप्टेंबर महिन्यात पावसाने जोर धरल्याने पाणीसाठ्याची स्थिती सुधारली आहे. धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असून, विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघू अशा 351 प्रकल्पांमध्ये एकूण 107.18 टीएमसी (60 टक्के) पाणीसाठा आहे. विभागातील 19 मोठ्या प्रकल्पांमध्ये 74.17 टीएमसी (60 टक्के), 38 मध्यम प्रकल्पांमध्ये 21 टीएमसी (66 टक्के) आणि 294 लघू प्रकल्पांमध्ये 12 टीएमसी (51 टक्के) पाणीसाठा झाला असल्याचे जल संपदा विभागातर्फे सांगण्यात आले. - मराठवाड्यात 41 टीएमसी पाणी सप्टेंबर महिन्याच्या मध्यात मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील तलाव, बधांऱ्यांमध्ये पाणी गोळा झाले. पावसाने मराठवाड्याला दिलासा दिला असला, तरी पाणीटंचाई पूर्णपणे दूर झालेली नाही. मराठवाड्यात यंदा अवघा 40.81 टीएमसी (15 टक्के) पाणीसाठा असून, पुढील काळात टंचाईची तीव्रता जाणवणार आहे. गतवर्षी 5 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात 116.68 टीएमसी (43 टक्के) पाणीसाठा होता. नाशिक, औरंगाबादसह मराठवाड्यात झालेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात थोडीशी वाढ झाली आहे. जायकवाडी धरणामध्ये 5.15 टीएमसी (7 टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. विष्णुपुरी, निम्नदुधना, ऊर्ध्वपेनगंगा ही धरणे वगळता इतर प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. माजलगाव, मांजरा (बीड), निम्न तेरणा, सीना कोळेगाव (उस्मानाबाद) या धरणांचा पाणीसाठा मृत पातळीतच आहे. विभागातील 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये 28.46 टीएमसी (16 टक्के), 75 मध्यम प्रकल्पांमध्ये 6.07 टीएमसी (18 टक्के) आणि 728 लघू प्रकल्पांमध्ये 6.28 टीएमसी (11 टक्के) पाणीसाठा आहे. राज्यातील मोठे, मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांमधील सोमवारपर्यंतचा (ता. 5) उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी) विभाग --प्रकल्पांची संख्या-- एकूण पाणीसाठा-- शिल्लक साठा-- टक्केवारी कोकण - 160-- 99.06-- 86.60-- 87 मराठवाडा - 814-- 270.40-- 40.81-- 15 नागपूर - 364-- 151.35-- 112.83-- 75 अमरावती - 460--105.74-- 76.47-- 72 नाशिक - 351-- 179.52-- 107.18-- 60 पुणे - 399-- 470.53-- 280.99-- 60 इतर धरणे -- 11-- 62.88-- 46.60-- 74 एकूण --2559-- 13941-- 751.49—56 एकूण या योजनेबद्दल संकीर्ण आढावा घेणारा लेख पुढारीत आला आहे. त्यातील विशेष लक्षणीय बाब म्हणजे. "दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी देवेंन्द्र फडणवीस सरकारने सरसकट कर्जमाफी सारख्या पारंपारीक पर्यायाचा स्वीकार न करता अन्न सुरक्षा योजनेचा वापर आणि मनरेगाचा पडून राहिलेला विधी वापरून जलसंधारणाचा महत्वकांक्षी योजना म्हणजे जलयुक्त शिवार" संपूर्ण लेख वाचण्यासारखा आहे आणि आता कोल्हेकुई करणार्या राणे-पवार-विखे पाटील यांच्या नक्राश्रूंना चपराक देणारा आहे.

पुढारी मधील समतोल लेखा जोखा प्रस्तावीत मोठ्या प्रकल्पांची सद्य्स्थीती. ------------------------------------------------------------- दमणगंगा - पिंजाळ (पेयजल पुरवठा योजना) • दमणगंगा नदीवर भूगड येथे धरण (एकूण क्षमता- ४२६ द.ल.घ.मी.) • भूगड धरणातून २८७ द.ल.घ.मी. (१०० टक्के विश्‍वासार्हतेचे) पाणी ८५ कि.मी. लांबीच्या जोडबोगद्यातून खारगीहिल जलाशयात सोडण्यात येईल. • वाघ नदीवर खारगीहिल येथे धरण (एकूण क्षमता - ४६१ द.ल.घ.मी.) • खारगीहिल धरणातून २९० द.ल.घ.मी. (१०० टक्के विश्‍वासार्हतेचे) पाणी २६ कि.मी. लांबीच्या जोडबोगद्यातून पिंजाळ जलाशयात सोडण्यात येईल. • पिंजाळ नदीवर खिडसे येथे पिंजाळ धरण (एकूण क्षमता ४१४ द.ल.घ.मी.) • पिंजाळ धरणातून मुंबईसाठी ३३२ द.ल.घ.मी. पाणी सोडण्यात येईल. • १२८० कोटी रुपये. नार-पार-तापी-नर्मदा योजना • पश्‍चिम घाटातील जास्तीचे पाणी सौराष्ट्र व कच्छला देणार. त्यासाठी सात धरणं व ३९५ कि.मी. लांबीचा कालवा. पाणी सोडणार सरदार सरोवर धरणात. किंमत ६००० कोटी रुपये. • महाराष्ट्रातील या योजनेतील ८१३ द.ल.घ.मी. पाण्यापैकी ६०० द.ल.घ.मी. पाणी गुजरातला द्यायचा मूळ प्रस्ताव. • पण महाराष्ट्राला गिरणा उपखोऱ्यासाठी ३०० द.ल.घ.मी. पाणी आवश्‍यक आहे. त्याबाबत चर्चा चालू. • गुजरातने अय्यंगार समितीच्या शिफारशींचा आदर करावा, अशी महाराष्ट्राची भूमिका. गोदावरी-कृष्णा प्रकल्प • गोदावरी नदीवर या योजनेद्वारे ८० टीएमसी पाणी उचलणार. • १७४ कि.मी. लांबीच्या पोलावरम उजव्या कालव्यातून ते ८० टीएमसी व अन्य स्रोतातील ४० टीएमसी असे एकूण १२० टीएमसी पाणी कृष्णेत सोडणार. • १३ लाख एकर जमीनीला पाणी मिळणार. • किंमत १३०० कोटी रुपये. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना • पश्‍चिम महाराष्ट्रातील सहा वेगवेगळ्या नद्यांतून एकूण ११५ टीएमसी ‘अतिरिक्त पाणी’ फक्त पावसाळ्यात आणले जाईल. त्या नद्या व कंसात प्रत्येक नदीतली तथाकथित ‘अतिरिक्त पाणी’ टीएमसीमध्ये पुढीलप्रमाणे ः कुंभी (३), कासारी (७), वारणा (३७), कृष्णा (५१), पंचगंगा (१०) व निरा (७). • तथाकथित अतिरिक्त पाण्याचे प्रस्तावित वाटप प्रकल्पनिहाय पुढीलप्रमाणे आहे ः (कंसातील आकडे ‘टीएमसी’मध्ये) ः टेंभू (१३.२५), ताकारी (३.०), म्हैसाळ (१०), माण-खटाव-कोरेगाव (७.५), ढाकाळे (२.०५), नीरा (१६.२०), उजनी (४२), कृष्णा-मराठवाडा (२१). • सिंचन क्षमता - ६,७२,७०६ हेक्टर. • पाणी वापर - ११५ टीएमसी. • किंमत ः १३,५७६ कोटी (२००९-१०). • सद्यःस्थिती ः प्रकल्प रद्द झाला. कारण वाचा :

करंटा नाकर्तेपणा

कोयनेचे पाणी मुंबईला! • किंमत २३३८ कोटी रुपये • राष्ट्रीय प्रकल्प समजावा अशी विनंती मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथला फायदा

समस्त मिपाकरांना आवाहन त्या त्या भागातील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून अभिनंदन आणि अनुभव विषद करावेत. आपले संवाद त्या संबधीत धाग्यावरच द्यावेत म्हणजे संबधीत लोकांच्याही कामात हुरुप येईल आणि शहरी माणसेही आपल्या प्रयत्नांची आवर्जून दखल घेतात हेच मोठे आहे. (नेहमी आर्थीक मदतीची अपे़क्षा नसते आपल्या शेतकरी बंधूला) काही आक्षेप पण पुढे काहीच (अगदी वर्तमान पत्रातही पाठ पुरावा नाही) त्या मुळे नक्की काय आरोप्/आक्षेप समजण्यास मार्ग नाही. विश्वासार्ह राहुल कुलकर्णीचा मराठवाड्यातील लेखा जोखा. मालीकेत काही चुकले असल्यास माफ करावे ही विनंती.


वाचन 31029 प्रतिक्रिया 0