मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इथे सुद्धा मराठी द्वेष

योगी९०० · · काथ्याकूट
हि बातमी वाचा.. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3774786.cms आज दहशतवादा विरुद्ध एकत्र येण्याची गरज असताना आपले चतूर(?) राजकारणी आणि मिडिया "राज" कारण करत आहेत. अर्थात जखमी लोकांना मदत करायला मनसे आणि शिवसेनाच पुढे होती हि गोष्ट विसरलीच गेली आहे. हा एस एम एस वाचा.. दहशतवादी हल्ला होत असताना राज ठाकरे व त्यांची शूर सेना कुठे होती?... भूमिपुत्रांना, मनसेच्या गुंडांना बरोबर घेऊन जा आणि आमची मुंबई वाचवा... आर्मी किंवा कमांडो मराठी नव्हते, मग त्यांनी मुंबईसाठी का प्राण गमावले? दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी एनएसजीचे कमांडो दिल्लीहून आले म्हणूनच मनसेचे नेते रात्रभर शांत झोपू शकले. कमांडो उत्तर आणि दक्षिण भारतीय होते, मुंबईकरांनो जागे व्हा' हे घ्या... म्हणजे मनसे कडुन गोळीबार करायची अपेक्षा...आणि समजा आम्ही मराठी लोकांनी दहशतवाद्यांशी जर त्यांच्याच भाषेत मुकाबला केला तर हेच लोक आम्हाला मानवधिकाराच्या नावाखाली अडकवतील.. आमच्या सत्ताधारी लोकांना अश्या कमांडो सेनेची गरज आत्ता भासते आहे..आधी अशी जर सेना असती तर आम्हाला दिल्लीहुन काय..कोठुनच सेना मागवावी लागली नसती...बोलणार तरी कोणाला..आपलेच दात आणि आपलेच ओठ.. शेवटी त्या शिवराज पाटलांनी दिलाच राजिनामा..पण येथेही राजकारण दिसत आहे. खादाडमाऊ

वाचन 2318 प्रतिक्रिया 0