हिशोब..
लेखनविषय:
काव्यरस
मी जन्मांचा विचार केला ,तुझी धाव पण वर्षांपुरती
कसे निभावू नाते अपुले ,परतुनी आले अर्ध्यावरती …
किती विनवण्या, किती अबोले, एका छोट्या पत्रासाठी
हट्ट पुरवी तू अखेरीस पण पत्ता दुसरा पत्रावरती…
शब्द असे तू उधळीत जाशी, जशी फुले वा माणिक मोती
फसवे तरीही वेचीत गेले, माया केली अर्थांवरती …
उगाच वेडा जीव लावला ,अशी कशी मी विसरून गेले ,
कितीही गुणले शून्याला तरी हाती अपुल्या शून्यच उरती...
वाचन
3522
प्रतिक्रिया
0