भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
वनपर्वाच्या ३०७व्या अध्यायात सूर्य म्हणतो, "हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर. ..."
- इतिहासाचार्य वि. का. राजवाडे. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
हे पुस्तक आज जालावर सापडले. त्या आधी नुक्तीच इथली आयपील चर्चा वाचली होती. चर्चेत काय काय नि कुठे कुठे लिहायचे, म्हणून या स्वतंत्र धाग्यात पुस्तकाची माहिती देते आहे. केवळ चाळीसेक पाने आहेत. जरूर वाचावे.
सध्याची भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपासून प्रगती, अधोगती की चक्र फिरून पुन्हा त्याच जागी? तुम्हाला काय वाटते.
प्रगत संस्कृतीत काय घडत असावे/ घडायला हवे?
वाचन
42018
प्रतिक्रिया
0