मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नौस

आतिवास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
म्या सक्काळी उटायच्या आदीच आण्णा कुटतरी जातेत. आज सांजच्याला आले तवा हासत व्हते. म्हन्ले, “आन्जाक्का, उद्यापासून आम्ही पण तुमच्या शाळेत येणार बरं का!” ह्ये काय ल्हान नाईत. उगा कायबी बोल्तेत. “तुमास्नी गुर्जी घ्येणार नायती,” म्या बोल्ली. आण्णा हस्ले. म्हन्ले, “हेडमास्तर आहे मी...”. बाबौ! आता कायबी कराया येतंय. कुणाची टाप नाय भांडायची. गुर्जीबी वरडायचे न्हाईत. मज्जा. पन आण्णांचं कायतरी येगळंचं सुरु. अब्यास कर, सुद्द बोल, भांडू नको, श्या दिऊ नको, पाडे म्हन. अकशर चांगलं कहाड. गंपतीचं भजन म्हन. घरात आय, साळंत हे. हैतच. पोरपोरी हस्त्येत. रडू रडू होतंय मला. येशीतल्या मारोतीरायाला दोन रुपैचा नौस बोलून आलेय. “द्येवा, माजीबी बदली कर” म्हनूनशान! *शतशब्दकथा

वाचन 13610 प्रतिक्रिया 0