<नाव सुचले नाही>
लेखनविषय:
काव्यरस
काळजातल्या जखमांना, न्याय पाहिजे होता
तु घाईत होतीस अन् , त्यांना वेळ पाहिजे होता
तू गेलीस परंतु , हा वसंत ईथेच आहे
मोग-याला तुझा जरासा, सुगंध पाहिजे होता
रोजचेच आहे, हे ही धुके परंतु
सुर्यास आज यायला, उजेड पाहिजे होता
तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते
एकदा तरी पण करायला, मी वार पाहिजे होता
एकटाच येत गेलो , हरेक मैफिलीतून मी
ऎकल्या स्वरांचा मला, झंकार पाहिजे होता
हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू
आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता
वाचन
5659
प्रतिक्रिया
0