
साहित्यः-२ वाट्या ज्वारीच्या लाह्या.
१ वाटी काजू.
१ वाटी खवलेले खोबरे.
८-९ चमचे साखर(गोडीप्रमाणे)
अर्धा चमचा वेलचीपूड.
दिड वाटी कोमट पाणी(नारळाच्या दुधासाठी).
तूप.
कृती :-प्रथम थोड्या गरम पाण्यात दोन तास काजू भिजत घाला.पाऊण वाटी कोमट पाणी घालून खोबरे वाटा व
घट्ट पिळून दाट दूध काढा.परत उरलेले पाणी घालून दूध काढा.दोन्ही दूध एकत्र करा. भिजलेले काजू
व लाह्या एकत्र करून मिक्सर मध्ये वाटा.त्यात साखर व दूध घालून गंधासारखी(देवाला लावण्यासाठी
उगाळतात त्याप्रमाणे) पेस्ट करा. वेलचीपूड मिसळा. हे मिश्रण तूप लावलेल्या डब्यात ओता. हा डबा
कुकरमध्ये ठेवून खरवस उकडा. थंड झाल्यावर खरवसाच्या वड्या कापा.