पुण्यातील जागांचे भाव
नमस्कार मंडळी,
पुण्यातील जागांचे भाव आकाशाला भिडले आहेत. लोक पार तळेगाव, लोणावळा, पिरंगुट, सासवड, उंड्री, चाकण पर्यंत राहावयास गेले आहेत / जात आहेत. जागेच्या किमती २००० ते ६५०० च्याही वर गेलेल्या आहेत. आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे. आय.टी. वाले सेकंड होम घेत आहेत तर इतरांस घरभाडेही परवडेनासे आहेत. विशेषतः स्थानिक लोकांस जागा घेणे अवघड झाले आहे. पुणे आता मुंबई होऊ लागले आहे काय? इतर शहरांतील लोकांचे काय अनुभव आहेत?
मध्यमवर्गीयांची संख्या वाढत असतांनाच दारिद्र्य रेषाही वर जात आहे का? आपण एखाद्या गृहयुद्धाकडे जात आहोत काय? उत्तम, मोफत वा इंश्यूरंसवर आधारीत मेडिकल सेवा, शिक्षण, पारदर्शक न्यायव्यवस्था, उत्तम पब्लिक ट्रांस्पोर्ट, मुबलक पाणी, वीज व इतर सोई ह्या शिवाय एखादा देश प्रगत होणे शक्य आहे काय? आपण एकाच देशात दोन प्रकारचे नागरीक व नागरी सुविधा तयार करतो आहोत काय? आपल्यातीलच काही वर्गांस बरोबर न घेता, पुढे पळत सुटणे योग्य आहे काय? आपली मते व्यक्त करावीत.
वाचन
18819
प्रतिक्रिया
0