मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(चेतन सुभाष गुगळे- ??)

सोत्रि · · काथ्याकूट
{([मूळ लेखा])}चा दुवा येथे देतो. http://www.misalpav.com/node/20105 मिसळपाव ह्या संस्थळावर वाचकावस्थेत असताना एकदा चेतन सुभाष गुगळेंच्या ''ज न नी हि ता य (प्रकरण १ ते २५)' च्या पंचवीस प्रकरणांचा संच (०८-२०११) दाखल झाला. प्रगल्भ आणि परिपक्व लेखनशैलीची ओळखच चेतन सुभाष गुगळे यांच्या ह्या मालिकेतून झाली. कितीतरी दिवस मिपावर त्या मालिकेचे पारायण केले जायचे आणि चेतन सुभाष गुगळेंचे विचार, त्यांचा एकंदर अभ्यास आणि एक स्वातंत्र्यप्राप्त 'देश' म्हणून भारतात, आंतरजालावर होत नसलेल्या वैचारिक लेखनामुळे होणारी तळमळ शब्दाशब्दातून दिसायची. चेतन सुभाष गुगळेंचे लेख ही काही फक्त राणा भीमदेवी थाटाचे बाजारू लेख नव्हते - त्यांच्या प्रत्येक मुद्याला इतिहासातील साधार विवेचन, संदर्भ, विश्लेषणाची जोड असे. ते लेख वाचूनच अंतरजालावर आणि विवीध मराठी स‍ंस्थळांवर येणार्‍या काही थिल्लर लिखाणाकडे बघणे बंद झाले. भारताला भरताची कशी गरज आहे, गुन्हेगारीने कशी देशाची वाट लावली आहे, मतदान न करता आपणही त्यात अजाणता कसा त्या अराजकतेत भाग घेतोय वगैरे मुद्यांवरुन कित्येकदा वाद घालून झाले.. अशीच काही महिने गेले. चेतन सुभाष गुगळेंचे लेख आणि काही प्रमाणात तेही विस्मरणात गेले. काल-पर्वा फेसबुकवर पुन्हा एकदा चेतन सुभाष गुगळेंच्या लिखाणाची लिंक समोर आली. त्यात मात्र चेतन सुभाष गुगळे आध्यात्मिक बाबांसोबत बसून आजही ’अशारिरीक प्रेम’ ह्या विषयावर ( मी वाचले तेव्हाचा काळ ०६-११ २०११) तेच विचार, त्याच तळमळीने, 'ऐसी अक्षरे रसिके मिळवीन' ह्या तडफेनं वाचकांसमोर मांडताना दिसत होते. मन आपोआप कितीतरी महिने मागे गेले. लेख संपला. पुढे एक चर्चा वाचून मात्र काळीज चिरुन गेले. त्या चर्चेमधे चेतन सुभाष गुगळे यांचे 'मिसळपाव' ह्या मराठी संस्थळांवरून महानिर्वाण झाले असे चर्चिले गेले होते. हे कधी झालं? आपल्याला कळलं कसं नाही? कदाचित काहीतरी घोळ असेल म्हणून चेतन सुभाष गुगळेंच्या मिसळपाव वरील महानिर्वाणाची बातमी शोधू लागलो. गुगलची कितीतरी पाने उलटवली.. पण एकाही लेखानं चेतन सुभाष गुगळेंच्या अंतरजालीय महानिर्वाणाची बातमी दिलेली नव्हती. फार दिवस नाही झाले ते जाऊन.. ह्याच वर्षीच्या नोव्हेंबर मध्‍ये चेतन सुभाष गुगळे गेले. त्यांच्या मिसळापाव ह्या मराठी स‍ंस्थळांवरील मंचांवर केलेल्या चर्चा तेवढ्‍या दिसल्या. डोकं सुन्न झालंय! अशा व्यक्तीकडे, मराठी स‍ंस्थळांकडून, अंतर्जालाकडून एवढे दुर्लक्ष होऊ शकते, व्हावे का? मिसळपाव सारखी मराठी स‍ंस्थळं खरंच विकली गेलेली आहेत? चेतन सुभाष गुगळे जन्मभर ’मतदान का करावे’, ’गुन्हेगारी कशी रोखावी’, ’प्रस्थापितांचे क‍पूं’ ह्याविरोधात बोलत राहिले. त्यांचा असा एक विचार होता. तो खरंच दुर्लक्ष करण्‍या सारखा होता? एक ध्‍येय घेऊन जीवन झोकून देणारी चेतन सुभाष गुगळेंसारखी माणसे समाजाला, अंतर्जालाला, मराठी स‍ंस्थळांना खरंच नको असतात? ही असं वेड्यासारखं एकच एक ध्‍येय घेऊन जीवन समर्पित करणार्‍या चेतन सुभाष गुगळेंची शोकांतिका की नेहमी स्वत:मध्‍ये मश्गुल असलेल्या तथाकथित 'समाजाची (मिपाकरांची)' शोकांतिका? चेतन सुभाष गुगळें - अधिकृत संकेतस्‍थळ: http://www.che-su-gu.com/ (सध्या बंद पडले आहे, उगाच टायपत बसू नये) छायाचित्र साभार.

वाचन 36166 प्रतिक्रिया 0