अरण्यातील प्रकाशवाटा....
मित्र हो,
आजपर्यत आपण अनेक गोष्टीं वर बोललो ,हसलो, गंभीर झालो आपापली मते दिली. आता आपण खूप मोठे नाही पण
एक छोटेसे काम करुया, आपण पण कोणाला तरी सहाय्य करुन त्यांचे जीवन घडविण्यासाठी थोडा हातभार लावूया.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी २३ डिंसे. १९७३ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात 'हेमलकसा'
या गावी माडीया गोंड या अति मागास अदिवासी लोकांच्या उत्थानासाठी "लोकबिरादरी" प्रकल्प चालू केला.
त्यांच्या जोडीला त्यांचा मुलगा डॉ. प्रकाश आमटे व त्यांची पत्नी डॉ.मंदा आमटे ह्यांनी सुद्धा आपले जीवन ह्या
माडींया साठी वाहीले. त्यांनी गवताने शाकारलेल्या बांबूच्या झोपडीत आपला संसार थाटला. गडचिरोली जिल्ह्यात इंद्रावती,
गोदावरी, वैनगंगा, प्राणहीता या नद्यानी वेढलेल्या या प्रदेशात चंद्रपुर पासून सुमारे २०० किलोमीटर वर 'हेमलकसा'
हे ठीकाण आहे.
जगाशी कुठ्लीच ओळ्ख नसलेल्या अदीवासींना " माणूस" बनविण्याचे काम या प्रकल्पाने सुरु केले.
या भागात जाण्यासाठी २० वर्षापुर्वी रस्ता नव्ह्ता , वाहने नव्ह्ती, संपर्कासाठी कुठलेही साधन नव्ह्ते वीज नवती,
आजुबाजुचा निर्सग अत्यंत रौद्र ,उन्हाळयात ४८ अंश तापमान , हिवाळ्यात नको तेवढा थंडावा. मरण तर नेहमी बरोबरच,
कधी वाघाच्या,अस्वलाच्या रुपात ,कधी नागाचं विष बनुन तर कधी भुकेचा वणवा त्यांच्या वाटयाला येतो. पावसाळ्यात पुरामुळे
उरलासुरला संपर्क तुटतो. अशा या भागात डॉ. प्रकाश व डॉ. मंदा हयांनी ३५ वर्ष काढली. व अजुनही ते अहोरात्र
अदिवासींसाठी झट्त आहेत.
प्रकाश आमटे सांगतात्,आम्ही प्रथम गेलो तेव्हा माडीया त्यांच्या जवळ येत नसत म्हणून त्यांनी त्याच्यासारखा वेष म्हणजे
बनियान व हाफ पॅट घालायला सुरुवात केली. ऑपरेशन करण्यासाठी वीज नव्हती म्हणून कंदिलाचा वापर करुन या समस्ये-
वर मात केली. (१९९० साली वीजपुरवठा सुरू झाला.)
माडींयासाठी फक्त दवाखानाच नाही तर शाळेची सुद्धा सुरुवात केली, मुले शाळेत येत नसत म्हणून खाऊचे आमिष
दाखवून शाळेत आणत. आज या शाळेतील १५० मुले शिक्षक, २५ मुले पोलीस काही वनरक्षक, वकील तर २ मुले डॉ़क्टर
होउन याच भागात काम करीत आहेत.
हे अदिवासी सगळ्याच बाबतीत मागास आहेत, दरिद्रीपणा हा शब्द स्वतःला लाजवेल त्याच्या पेक्षाही परीस्थीती
दारुण होती. उदा. मीठ हा प्रकार त्यांना माहीत नव्हता . शेती हा प्रकार माहीत नसल्यामुळे ''मुंग्यांची चटणी व ऊंदीर
भाजून खाणे" हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते. त्यामुळे प्रकाश आमटे यांनी मिठापासून सुरुवात केली व त्याचा वापर
शिकवला. सावकार एक पोती मिठाच्या बद्ल्यात त्यांच्याकडुन एक पोती चारोळी वा डिंक अशा वस्तु घेऊन माडीयांची
फसवणू़क करत.
डॉ. प्रकाश आमटे यांनी शेती करणे, पिके लावणे यांचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या सोबतीला श्री. व सौ. मनोहर ,गोपाल
व प्रभा फड्णीस, जगन व मुक्ता मचकले दादा व बबन पांचाळ, मनोहर व संध्या येम्पलवार या लोकांनीही माडीयांसाठी
अविरत कार्य केले. डॉ. प्रकाश यांचा मोठा मुलगा डॉ. दिगंत व त्यांची पत्नी डॉ. अनघा म्हणजेच बाबा आमटे यांची तिसरी पिढी
सुध्दा या कार्यात सह्भागी आहेत.
डॉ. प्रकाश आमटे यांच्या दवाखान्याचा १००० गाव विनामुल्य लाभ घेतात. साधारण २ लाखापर्यत रुग्ण
त्यांच्याकडे उपचारासाठी येतात या दवाखान्याला सरकारी अनुदान नाही त्यांचा वर्षभराचा ख्रर्च सुमारे १० लाख इतका आहे
हा ख्रर्च जनसामान्यांच्या देणगीतुन भागविला जातो.
मोनॅ़को या युरोपातील अतिसुंदर चिमुकल्या देशाने डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्यावर १९९५ मध्ये खास
टपाल तिकिट काढले आहे व त्या तिकिटाद्वारे येणारे उत्पन्न या प्रकल्पाला देण्यात येते.
खास टीप : या कार्यात त्यांच्या कुठ्ल्याही त्यागाचे अवडंबर दिसत नाही. भौतिक जगापासून तुटलेपण आल्याची खंत नाही
अशा प्रकल्पाचा आपल्याच नशेत असलेल्या लोकांना याचा नीटसा परीचय नाही . गेली ३५ वर्ष ही सगळी मंडळी अखंडपणे
येणारी नवनवी आव्हाने समर्थपणे पेलत आहेत. त्यांच्या साथीला त्यांची मुलेही या प्रकल्पात सह्भागी आहेत.
आपण ही त्यांच्या खांद्याला खांदा लावुन एक तरी जवाबदारी घेऊया, आपण आपले आयुष्य तिथे काढु शकत नाही परंतु
देणगी देउन त्यांच्या कार्याला हातभार तरी लावू शकतो.
कॄपया आपली देणगी
"महारोगी सेवा समिती , वरोरा " या नावाने खालील पत्त्यावर पाठवावी
लोकबिरादरी प्रकल्प मु. हेमलकसा, पो. भामरागड , जिल्हा गडचिरोली,
पिन कोड : ४४२ ७१०, महारार्ष्ट राज्य, भारत.
फोन : ++९१-७१३४-२२०००१
ई- मेल : अनिकेत_आमटे@रेडीफमेल.कॉम
त्यांच्या जोडीला त्यांचा मुलगा डॉ. प्रकाश आमटे व त्यांची पत्नी डॉ.मंदा आमटे ह्यांनी सुद्धा आपले जीवन ह्या
माडींया साठी वाहीले. त्यांनी गवताने शाकारलेल्या बांबूच्या झोपडीत आपला संसार थाटला. गडचिरोली जिल्ह्यात इंद्रावती,
गोदावरी, वैनगंगा, प्राणहीता या नद्यानी वेढलेल्या या प्रदेशात चंद्रपुर पासून सुमारे २०० किलोमीटर वर 'हेमलकसा'
हे ठीकाण आहे.
जगाशी कुठ्लीच ओळ्ख नसलेल्या अदीवासींना " माणूस" बनविण्याचे काम या प्रकल्पाने सुरु केले.
या भागात जाण्यासाठी २० वर्षापुर्वी रस्ता नव्ह्ता , वाहने नव्ह्ती, संपर्कासाठी कुठलेही साधन नव्ह्ते वीज नवती,
आजुबाजुचा निर्सग अत्यंत रौद्र ,उन्हाळयात ४८ अंश तापमान , हिवाळ्यात नको तेवढा थंडावा. मरण तर नेहमी बरोबरच,
कधी वाघाच्या,अस्वलाच्या रुपात ,कधी नागाचं विष बनुन तर कधी भुकेचा वणवा त्यांच्या वाटयाला येतो. पावसाळ्यात पुरामुळे
उरलासुरला संपर्क तुटतो. अशा या भागात डॉ. प्रकाश व डॉ. मंदा हयांनी ३५ वर्ष काढली. व अजुनही ते अहोरात्र
अदिवासींसाठी झट्त आहेत.
प्रकाश आमटे सांगतात्,आम्ही प्रथम गेलो तेव्हा माडीया त्यांच्या जवळ येत नसत म्हणून त्यांनी त्याच्यासारखा वेष म्हणजे
बनियान व हाफ पॅट घालायला सुरुवात केली. ऑपरेशन करण्यासाठी वीज नव्हती म्हणून कंदिलाचा वापर करुन या समस्ये-
वर मात केली. (१९९० साली वीजपुरवठा सुरू झाला.)
माडींयासाठी फक्त दवाखानाच नाही तर शाळेची सुद्धा सुरुवात केली, मुले शाळेत येत नसत म्हणून खाऊचे आमिष
दाखवून शाळेत आणत. आज या शाळेतील १५० मुले शिक्षक, २५ मुले पोलीस काही वनरक्षक, वकील तर २ मुले डॉ़क्टर
होउन याच भागात काम करीत आहेत.
हे अदिवासी सगळ्याच बाबतीत मागास आहेत, दरिद्रीपणा हा शब्द स्वतःला लाजवेल त्याच्या पेक्षाही परीस्थीती
दारुण होती. उदा. मीठ हा प्रकार त्यांना माहीत नव्हता . शेती हा प्रकार माहीत नसल्यामुळे ''मुंग्यांची चटणी व ऊंदीर
भाजून खाणे" हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते. त्यामुळे प्रकाश आमटे यांनी मिठापासून सुरुवात केली व त्याचा वापर
शिकवला. सावकार एक पोती मिठाच्या बद्ल्यात त्यांच्याकडुन एक पोती चारोळी वा डिंक अशा वस्तु घेऊन माडीयांची
फसवणू़क करत.
डॉ. प्रकाश आमटे यांनी शेती करणे, पिके लावणे यांचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या सोबतीला श्री. व सौ. मनोहर ,गोपाल
व प्रभा फड्णीस, जगन व मुक्ता मचकले दादा व बबन पांचाळ, मनोहर व संध्या येम्पलवार या लोकांनीही माडीयांसाठी
अविरत कार्य केले. डॉ. प्रकाश यांचा मोठा मुलगा डॉ. दिगंत व त्यांची पत्नी डॉ. अनघा म्हणजेच बाबा आमटे यांची तिसरी पिढी
सुध्दा या कार्यात सह्भागी आहेत.
डॉ. प्रकाश आमटे यांच्या दवाखान्याचा १००० गाव विनामुल्य लाभ घेतात. साधारण २ लाखापर्यत रुग्ण
त्यांच्याकडे उपचारासाठी येतात या दवाखान्याला सरकारी अनुदान नाही त्यांचा वर्षभराचा ख्रर्च सुमारे १० लाख इतका आहे
हा ख्रर्च जनसामान्यांच्या देणगीतुन भागविला जातो.
मोनॅ़को या युरोपातील अतिसुंदर चिमुकल्या देशाने डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्यावर १९९५ मध्ये खास
टपाल तिकिट काढले आहे व त्या तिकिटाद्वारे येणारे उत्पन्न या प्रकल्पाला देण्यात येते.
खास टीप : या कार्यात त्यांच्या कुठ्ल्याही त्यागाचे अवडंबर दिसत नाही. भौतिक जगापासून तुटलेपण आल्याची खंत नाही
अशा प्रकल्पाचा आपल्याच नशेत असलेल्या लोकांना याचा नीटसा परीचय नाही . गेली ३५ वर्ष ही सगळी मंडळी अखंडपणे
येणारी नवनवी आव्हाने समर्थपणे पेलत आहेत. त्यांच्या साथीला त्यांची मुलेही या प्रकल्पात सह्भागी आहेत.
आपण ही त्यांच्या खांद्याला खांदा लावुन एक तरी जवाबदारी घेऊया, आपण आपले आयुष्य तिथे काढु शकत नाही परंतु
देणगी देउन त्यांच्या कार्याला हातभार तरी लावू शकतो.
कॄपया आपली देणगी
"महारोगी सेवा समिती , वरोरा " या नावाने खालील पत्त्यावर पाठवावी
लोकबिरादरी प्रकल्प मु. हेमलकसा, पो. भामरागड , जिल्हा गडचिरोली,
पिन कोड : ४४२ ७१०, महारार्ष्ट राज्य, भारत.
फोन : ++९१-७१३४-२२०००१
ई- मेल : अनिकेत_आमटे@रेडीफमेल.कॉम
वाचन
8695
प्रतिक्रिया
0