"पुण्यातील मिपाकरांच्या भेटीगाठी समारंभ ........
गेले काही दिवस "मी " आणि "धमाल मुलगा" यांच्यात "पुण्यातील मिपाकरांच्या भेटीगाठी समारंभ [ हो आमचा आपला साधाच , नाहितर संभेलन म्हटले की फार काहितरी मोठे वाटते आणि जवळजवळ त्याचे 'सूप वाजणे' हे सुध्धा ठरलेले असते.] " ठरवायचा की नाही यासंबंधी चर्चा चालू होती ...
वास्तविक पाहता मी "धमाल" ला बेंगलोरचे आमंत्रण दिले होते पण मार्चच्या अखेरीस होळीची आणि जोडून शनिवार / रविवार अश्या २१ , २२ आणि २३ मार्च या ३ दिवशी सुट्ट्या येत आहेत. बहूतेक 'दूर देशी काम करणारे हमाल लोक' त्या मुहुर्तावर आपापल्या गावी परत येण्याची शक्यता आहे. तेव्हा मी "धमाल" ला म्हणले की 'बेंगलोरला भेटण्यापेक्षा पुणे कसे?" त्यानेही या प्रस्तावाला अनुमोदन दिले .....
तर माझा प्रश्न असा आहे की " जर समजा कार्यक्रम ठरवला तर किती जणांची यायची तयारी आहे ????" जर लोक जमणार असतील तर फोनवरून वगैरे तारखा, ठिकाण ठरवता येईल....
पण आधि किती जण तयार आहेत, याची ही चाचपणी ....
ह्याबद्दल तुम्ही माझ्याशी अथवा "धमाल" शी चर्चा करू शकता .........
अवांतर : ह्या मुहुर्तावर जर "तात्यांचे" येणे होणार असेल तर या "जश्न -ए-बहार" ला 'चार चांद" लागतील......
"विनोबा ठाकरे" सध्या पुणेमुक्कामी असल्याने त्यांच्याकडून मला मदतीची अपेक्षा आहे .......
वाचन
21636
प्रतिक्रिया
0