प्रिय सचिन
प्रिय सचिन,
प्रिय सचिन,
मुंबईतील बोरीबंदर ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली 16 एप्रिल 1853 रोजी. त्या ऐतिहासिक घटनेचे आता 170 वे वर्षे सुरू झाले आहे. यंदाच्या 170व्या वर्षाच्या निमित्ताने 20 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी भारतीय रेल्वेचे 150वे वर्ष सुरू झाले होते. त्या निमित्ताने 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत एका वेगळ्याच घटनेचे साक्षीदर होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी बोरीबंदर ते ठाणेदरम्यानच्या लोहमार्गांच्या दुतर्फा, जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती. अगदी 16 एप्रिल 1853 ला केली होती तशीच.
बघता बघता दिवाळीची सुट्टी संपली. पंधरा दिवस शेवरीच्या कापसासारखे भुर्रकन उडून गेले. नाहीतर शाळेतला एक तास एका दिवसासारखा, संपता संपत नाही. त्यात मधल्या सुट्टीनंतर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा किचकट विषयांचा तास असेल तर जास्तच कंटाळा येणार. हातात घड्याळ नसल्यानं किती वाजलेत समजायचं नाही, म्हणून खिडकीतून वर्गात डोकावून पाहणाऱ्या सूर्याच्या किरणांची खूण ठेवायचा प्रयत्न केला, पण सूर्यमहाराज कधी वेळेवर नसायचे.
नाम बडे और...
'वकीलीचा धंदा आता पयल्या सारखा राह्यला नाही. काही राम उरला नाही',कोर्टाच्या आवारातल्या कॅटिन समोरच्या बाकावर बसून अर्धाकटींग चहा बशीतून पिताना त्र्यंबकराव मान हलवत म्हणाले.समोर बसलेल्या वामनचा चेहरा पडला.एकोणीसशे ऐशी साली मराठवाडय़ातल्या एका तालुक्याचे गावी वकीली सुरू करून त्याला तीन वर्षे झाली होती.अजूनही गोडबोले वकीलांकडे ज्युनियरशीप चालू होती.म्हणजे,कोर्टात मुदतवाढीचे अर्ज लिहिणे आणि कोर्टात देणे,प्रकरणांच्या तारखा घेणे,सिनीयर
पॅरिसमध्ये एलिझे पॅलेस (फ्रेंच भाषेतील नाव – Palais de l’Élysée) उभारला जाईपर्यंत तो परिसर गुरांना चरण्यासाठीचे माळरान म्हणूनच वापरला जात होता. 17व्या शतकात या जागेचा मूळ मालक अर्मांद-क्लाऊद मोलेत याने ही जागा हेंरी लुईस दे ला तूर द’आउव्हर्गन याला विकली. त्यानंतरची अनेक वर्षे या परिसराची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे जात राहिली. त्यामुळे त्या जागी 17व्या शतकात उभारलेल्या टाऊन हॉलच्या रचनेमध्येही सतत बदल होत राहिले. या राजवाड्याचे अगदी अलीकडचे नुतनीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर करण्यात आले होते.
कुठलाही प्रवास मला आवडतो. अगदी कमी अंतरावरचा रिक्षातला सुद्धा. काय एक एक नमुने दिसत असतात. पण फक्त नमुनेच पाहिले पाहिजेत असं नाही. आत्ताच मेट्रोने (पुण्यातली नाही, आधीच स्पष्ट करतो) प्रवास करताना एक खूपच गोड म्हणता येईल असं एक कुटुंब सोबत होतं. त्यात एक सर्वात गोड अशी मुलगी होती. वय असेल अंदाजे 5-6 वर्षे. इथे हैदराबादला परकर पोलकं घालणाऱ्या मुली सर्वत्र असतात. त्यामुळेच की काय छान दिसत होती. तिचा दादा असेल 10-12 वर्षाचा. तर तो तिला सारखं मास्क लावण्याविषयी टोकत होता. पण ह्या मुलीचे वरचे 4 दात पडले होते आणि त्याचा कोण आनंद तिला झाला होता!
भटियार चे स्वर मनामधे रुंजी घालत रहातात. त्यापासून एकदम बाजूला होता येत नाही. स्वरांना असं झट्कून टाकता येत नाही.
आरोह अवरोहाच्या वेलबुट्ट्या मनात गुंजतच रहातात.
बासरी ओठाला लागलेलीच आहे. मी त्यात स्वरांची फुंकर घालतो.
मागील दुवा
सा ध प म , प ग रे सा.
न ठरवताही अचानक कोमल ऋषभ स्वर येवून जातो. जीव कसावीस करणारा हा स्वर.एक तर तन्मय होऊन आसपासाच्या जगाला विसरून उत्कटतेने वाजवत रहावे किंवा सर्वसंग परित्याग करून दूर कुठेतरी निघून जावे अशी काहीशी भावना जागवणारा हा स्वर.
उत्तरात्र झाली आहे. कसल्याशा चाहुलीमुळे मी जागा झालो आहे.
उत्तररात्रीच्या त्या शांत वातावरणात रातकिड्यांच्या आवाजाशिवाय दुसरा कसलाच आवाज नाही. नाही म्हणायला दूरवरून अस्पष्ट ऐकू येणारी समुद्राची गाज ऐकू येतेय.
गवाक्षाबाहेरून येणारा प्राजक्ताच्या फुलांचा गंध वातावरणातील प्रसन्नता आणखीनच वाढवतोय.
इतक्या शांततेची सवय जवळजवळ संपलीच आहे. आजकाल वेळच कुठे असतो शांततेसाठी आपल्या कडे. दिवसभर काही ना काही चालूच असतं. कोणी ना कोणी सोबत असतंच. आपण एकटे असे नसतोच कधी.
"घरातून बाहेर पडलास तर तंगड्या तोडून हातात देईन," आईनं दम दिलेला. दम देण्याची तिची ही नेहमीची पद्धत. मला माहित होतं आपल्या तंगड्या बिंगड्या काही तूटणार नाहीत, पण रट्टे पडतील या भीतीने डोळे बंद करून खाटेवर नुसता पडून होतो. डोळ्यासमोर दिसत होते उनाडक्या करत हिंडणारे मित्र. कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नव्हती. दुपार चांगलीच तापली होती.संध्याकाळी झाडांना गदगदा हलवणारा वारा म्हाताऱ्या माणसासारखा कुठेतरी झोप काढत असावा. कूस बदलावी तशी झाडाची पानं मधूनच हलू लागायची अन् वाटायचं वाऱ्याची गार झुळूक अंगाला स्पर्श करून जाईल. पण, तसं होत नव्हतं. खूपच उकडत होतं.