Skip to main content

महाराष्ट्राचे दुर्गसंवर्धन आणि आपण

लेखक कर्रोफर नमुरा यांनी बुधवार, 11/01/2017 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सारखा ज्वलंत इतिहास आणि ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. क्षेत्रफळाचा विचार करता एकट्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण एवढे किल्ले जरी मोजले तरी त्याच्या अर्धे किल्लेही दुसऱ्या राज्यात नसतील. पण, कर्नाटक, गोवा, राजस्थान, तामीळनाडू व इतर राज्यात जशी जोपासना किल्ल्यांची आणि इतर ऐतिहासिक वारशांची झाली तशी ती महाराष्ट्रात होत नाही. हा आपला कर्मदरिद्रीपणाच म्हणावा लागेल. समाज आणि प्रशासन दोन्ही आघाड्यांवर आपण अपयशी ठरलोय. राज्य सरकारने तर मुंबई उच्च न्यायालयात एका जनहीत याचिकेच्या सुनावणी वेळी, ऊन-पाऊस-वाऱ्यामुळे किल्ल्यांची वाताहात झाली असे प्रतिज्ञापत्र दाखल केले.

एक शून्य तीन ..... नक्की पहावे असे रहस्य....

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 10/01/2017 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
नाटकाचा सफाईदार प्रयोग म्हणजे काय हे जर अनुभवायचे असेल तर सुदीप मोडक लिखीत " एक शून्य तीन " हे मराठी नाटक आवर्जून पहावे. सदानंद केळकर हे आंबोली गावातील एक वयस्कर उद्योजक. त्यांच्या वाढदिवशी दर वर्षी येणारे ते एक पत्र या वर्षी का आले नाही म्हणून चिंतेत आहेत अनिता या त्यांच्या पुतणीचा अपहरणकर्ता हे पत्र पाठवत असावा आणि त्यातून पुतणी अजून जिवंत आहे हा संदेश तो देत असावा असे त्याना वाटतय .

I Miss My King!!

लेखक बाजीप्रभू यांनी मंगळवार, 10/01/2017 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
खाs वोरा पुथा चाओ, आव मनो लय सिरा क्रान, नोप फ्रा फुमि बान बुन्यडीरेक. "थाई रॉयल अँथम" च्या ह्या सुरवातीच्या ओळी. या ओळींचा अर्थ असा होतो कि "हे महान राजा आम्ही तुझे नोकर/सेवक आहोत, आम्ही झुकून, मनापासून आदरपूर्वक तुला आणि तुझ्यातल्या अमर्याद गुणवत्तेला नमन करतो". अँथममधे पुढे बरंच काही चक्री साम्राज्याच्या स्तुतीपर लिहिलं गेलेले आहे.

बुद्धीमत्ता, सर्जनशीलता,latent inhibition आणि मानसिक रोग!!!

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी मंगळवार, 10/01/2017 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने केलेली प्रगती ही त्याच्या बुद्धीमत्तेमुळे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पण माणुस ही खुप मोठी टर्म आहे.माणसांचे अनेक प्रकार पडतात,कॉकेशीअन (युरोपियन्स), मंगोलॉईड (पौरात्य),ऑस्ट्रेलॉईड्स (भारतीय), निगरॉईड्स (आफ्रिकन) व इतर अनेक.यांच्यात जसे वर्णादी भेद आहेत , तसेच बुद्धीमत्तेतही भेद आहेत. बुद्धीमत्ता म्हणण्याऐवजी सर्जनशीलतेत (creativity) खूप फरक आहे.जगाच्या बुद्ध्यांकावर जर नजर टाकली तर पौरात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आहे व त्यांचा मेंदू सर्वात मोठा आहे.त्या खालोखाल युरोपियनांचा बुद्ध्यांक व मेंदू व बाकीचे नंतर.

लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग -२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 10/01/2017 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग -२ Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire पहिले लाकुंडीचे आहे.

सावरकरांचे मनोगत

लेखक कवि मानव यांनी मंगळवार, 10/01/2017 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांचे मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे - ते मातृभूमी ला उद्देशून हे सांगत आहेत शतदा नकार मज राजमुकुट सोन्याचा, मी तृप्त पाहुनी काळ हा स्वातंत्र्याचा, घेऊन हजारो जन्म तुझ्या उदरातून, मी सदैव राहीन, दास तुझ्या चरणांचा !! प्राणांची देऊन आहुती या यज्ञाला, मी किंचित केले भार कमी खांद्याला, नसता हे जीवन व्यर्थ मानले असते, तुझं कारण आले अर्थ नवे मारण्याला !!
काव्यरस

कोड मंत्र - अत्यंत प्रभावी सादरीकरण

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 10/01/2017 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
लष्कराचे सैनिकांसाठी अत्यंत कठोर प्रशिक्षण सुरू आहे. मराठा रेजिमेंटच्या सैनिकांची एक मोठी तुकडी अत्यंत कठोर प्रशिक्षणाची वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखवित आहे. परंतु या तुकडीतल्या रवी शेलार नावाच्या प्रशिक्षणार्थीला हे कठोर प्रशिक्षण झेपत नाहीय्ये. इतरांच्या तुलनेत तो मागे पडतो. त्यांच्या अधिकार्‍याला, कर्नल प्रतापराव निंबाळकरांना त्याचे मागे पडणे अजिबात सहन होत नाही.ते स्वतः अत्यंत कर्तव्यकठोर आहेत. नक्षलवाद्यांशी समोरासमोर लढताना स्वतःला गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा त्यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड केलेला आहे.

नीलकांत आणि प्रशांत, मनःपूर्वक अभिनंदन !

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 10/01/2017 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
नवी थीम मोबाईल आणि कंप्युटर दोन्हीवर उत्तम चालते आहे. नवा फाँटसुद्धा वाचायला छान आहे. मिपासारखी सुरेख सुविधा नुसती पुरवण्याबद्दलच नव्हे तर ती वेळोवेळी अपग्रेड करण्याच्या तुमच्या मेहेनतीचं विषेश कौतुक ! नीलकांतनी काढलेल्या चर्चेच्या धाग्यावर प्रतिसाद न देता हा धागा मुद्दाम यासाठी काढला की मोठ्या चर्चेत असे प्रतिसाद हरवून जातात. इथे लिहायला आता पूर्वीपेक्षा जास्त मजा येईल हे नक्की. सध्या मिसळपाव हे मराठीतलं अत्यंत देखणं आणि मोस्ट यूजर फ्रेंडली संकेतस्थळ झालं आहे. सो थँक्स अ लॉट अँड ऑल द बेस्ट !

हरभऱ्याचे सीक कबाब

लेखक केडी यांनी मंगळवार, 10/01/2017 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
सदर पाककृती काही कारणास्तव उडालेली, ती पुनः प्रकाशित करीत आहे

गैरसमज

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 10/01/2017 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
गैरसमज होतात. कधीकधी खूप बोललो की आणि कधी खूप कमी बोललो म्हणून. आजकाल माझ्या स्वप्नातपण गैरसमज येतात. म्हणजे मी कुणाला काहीतरी बोलतो. मग समोरचा माणूस स्त्री असेल तर ढसाढसा रडायला लागते आणि पुरुष असेल तर करकचून भांडायला. मग काही वेळानी मी दिसतो. समजूत काढताना. मला तसं म्हणायचं नव्हतं, तुझी ऐकण्यात चूक झालीये, असं काही माझ्या मनात नव्हतं इत्यादी इत्यादी. कधी कधी उलटही होतं, म्हणजे स्त्री भांडायला लागते आणि पुरुष रडायला. पण प्रत्येक वेळेला समजूत मात्र मीच काढतो. कधी चुकूनही असं होत नाही की मी भांडतोय, रडतोय आणि समोरची पार्टी समजूत काढतेय. च्यायला आता पडू दे परत स्वप्न. नाहीच काढणार समजूत.