पुणे-मुंबई-पुणे - एक पुनर्नवानुभव
फारा वर्षांपूर्वी आम्ही मुंबई पुणे रेल्वे प्रवास सातत्याने करायचो. ३ तासांच्या डेक्कन क्वीन प्रवासासाठी, दोन तास रिझर्व्हेशनच्या रांगेत उभे रहाण्याचाही आम्ही विक्रम नोंदवला आहे. त्या रिझर्व्हेशन केलेल्या डब्यांत तीन्-दोन अशी बसण्याची व्यवस्था असल्याने , आम्ही सेकंड क्लासमधेही , अगदी मांडी घालून प्रवास केलेला आहे. पुढे, रेल्वेला भिकेचे डोहाळे लागल्याने, त्यांनी आमचा विश्वासघात करुन तीन्-तीन अशी बसण्याची व्यवस्था आणली. त्याचा आम्ही भरपूर निषेध केला. कारण तोपर्यंत आमची बुडे भरपूर रुंदावल्यामुळे, आमची, अंगाला अंग लागू न देण्याची ब्रिटिश सभ्यता धोक्यांत आली.
मिसळपाव
नवी मुंबईचं खारघर रेल्वे स्टेशन. मी रात्री मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होतो. स्टेशन वर त्यामानाने गर्दी नव्हती. इतक्यात समोरच्या प्लॅटफ़ॉर्मवर एक तरुण एका दहा - बारा वर्षाच्या मुलाला मानगुटीला धरून चालताना दिसला. मुलाच्या एकंदर अवतारावरून तो भिकारी दिसत होता. तो तरुण त्या मुलाला रेल्वे पोलिसांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. आत जाऊन त्याने दरवाजा ओढून घेतला. क्षणभर मी चरकलो. तळव्यांना घाम फुटायला लागला.
"अगं पण का? माझं काय चुकलंय?"
"अरे तुझं नाही काहीच चुकलेलं, पण मी शब्द दिलाय त्याला.."
"तुझ्यासाठी सगळ्यांनी सरप्राईज पार्टी अरेंज केलीये... आजतरी नको जाऊस..."
"त्यांच्यासाठीच थांबले होते इतकी वर्ष, फक्त एक वाढदिवस मला माझ्या मनाप्रमाणे सेलिब्रेट करू दे..प्लीज"
सागरकिनारे...
फोन वाजला.
अरे, टीव्ही लावलास का ? मोदीनी तुमच्या कपाळात घातल्यात. तुझ्याकडचे लाखो रुपये आता कागद झाले कागद.
पण तुला का एवढा आनंद होतोय ?
वाईट रे! आता तुमची पूर्ण नाकेबंदी झालीये, हरामाचा पैसा कधी पचत नाही.
बरं, बरं, बघू या.
भक्त म्हणून हिणवतोस काय? आता कळेल त्याची ताकद!
डिसेंबरचा शेवटचा आठवडा.
काय, मग जाळल्या का नोटा ?
मी मजेत आहे. तू किती वेळा लायनीत उभा राहिलास ?
आम्ही मोजत नाही.