Skip to main content

असं का?

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 07/03/2017 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या आठ मार्च.... त्या निमित्ताने परत एकदा स्त्रीच्या अस्तित्वाचं... तिच्या त्यागाचं... तिच्या संसारासाठी झिजण्याचं आणि झटण्याच.... ती करत असलेल्या सर्वांच्या सेवेचं.... खूप कौतुक होईल! आणि अर्थात ते झालच पाहिजे. Because she deserves it! Rather its her right. पण आपण हे अस स्त्रीच्या स्त्रीत्वाच कौतुक करून तिने कायम सगळ्यांच सगळ केलच पाहिजे ही अपेक्षा करायला मोकळे होतो का? आज एक व्हिडीओ whatsapp वर मला आला. किशोरी शहाणे आणि सचिन खेडेकर दोघे आहेत यात. १ मिनित ४० सेकंदाचा व्हिडीओ आहे. पण त्यात खूप सुंदर गोष्ट इतक्या कमी वेळात चित्रित केली आहे.

मी बाई होते म्हणुनी - भाग १४

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 07/03/2017 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या वाड्यापासुन वनविहाराची नवीन जागा बरीच लांब होती, तिथे पोहोचेपर्यंत कुणीच काही बोललं नाही, असे ही त्या रथाच्या खडखडाटामध्ये काही ऐकु येणं शक्य ही नव्हतं. आम्ही वनाजवळ पोहोचलो आणि रथातुन उतरुन विश्रांतीस्थळाकडे चालत निघालो, दहा बारा योजने चाललो तेवढ्यातच राजा दशरथ आणि राजकुमार आल्याची सुचना घेउन एक सैनिक आला, आम्ही त्यांच्या स्वागतासाठी होतो तिथेच थांबलो. राजा दशरथ स्वत्ः सगळ्यांत पुढे होते, त्यांच्या डाव्या बाजुला राम आणि भरत तर उजव्या बाजुला लक्ष्मण आणि शत्रुघ्न होते.

भान सुटलेल्या निवेदीतांच्या निवेदनातील (निसटत्या) बाजू

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 07/03/2017 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
देश कसा एकत्र राहील त्या एवजी देश इतिहासात एक कसा नव्हता यावर फोकस करणारी जी काही प्राध्यापक मंडळी गेल्या काही दशकात दिल्लीत एकत्रित जमून त्यांचे तत्वज्ञान गल्ली पर्यंत पोहोचावे असा त्यांचा जोरकस प्रयत्न चालू आहे आणि उथळ माध्यमांची साथ पाहता ते होण्यास खूप कालावधी लागेल असे नव्हे. असो अशा देश विभाजनावर फोकस असलेल्या दिल्लीतील प्राध्यापक मंडळीतील एक नाव म्हणजे निवेदीता मेनन या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील एक प्राध्यापक आहेत.

अंजलीची गोष्ट - रिप्लाय

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 07/03/2017 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
"फ्री आहेस का बोलायला?"..... मनस्वीने विचारलं. "हो बोल. सगळं आटपलंय . रात्र झालीये इथे. तू घरी चाललीयेस का?" अंजली "हो" मनस्वी म्हणाली. दोघीनाही घरी जाताना ऑन द वे एकमेकींना फोन करायची सवय होती. "ब्लूटूथ वर बोलतेयस ना, ड्राईव्ह करताना हातात नको घेऊ हं फोन !" अंजली. "हो ग. ब्लूटूथवरच बोलतेय. ऐक ना. स्वप्नीलचा मेसेज आलाय व्हॉट्स अँपवर." मनस्वीला पाल्हाळ लावायची सवयच नव्हती. डायरेक्ट मुद्द्यावर! "स्वप्नील आठवतो ना? माझ्याबरोबर इंजिनीरिंगला होता" तिने थोडं बिचकत विचारलं. "हो आठवतो.... इतक्या वर्षांत कधी बोलणं नाही झालं त्याच्याबद्दल. कुठे असतो तो?आणि मेसेज का केला होता?" अंजलीने विचारलं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - सेमीफायनल - भारत विरुद्ध पाकिस्तान

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 07/03/2017 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
३० मार्च २०११ पीसीए, मोहाली चंदीगडमधल्या मोहालीच्या मैदानात 'Mother of all contests' - भारत आणि पाकिस्तान या पारंपारीक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली दुसरी सेमीफायनल रंगणार होती. क्वार्टरफायनलला भारताने सलग ३ वेळा वर्ल्डकप जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवला होता तर पाकिस्तानने वेस्ट इंडीजचा अक्षरशः खिमा केला होता. या सेमीफायनलमधील विजेत्या संघाची फायनलमध्ये मुंबईला वानखेडेवर श्रीलंकेशी गाठ पडणार होती. क्वार्टरफायनलमध्ये दक्षिण आफ्रीकेला धूळ चारणार्‍या न्यूझीलंडचा श्रीलंकेपुढे मात्रं निभाव लागला नव्हता.

द क्लिफ !

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 06/03/2017 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी लग्नाच्या वाढदिवसाला कुठे जायचं हा निर्णय घ्यायला अर्धांगिनीनी अक्षम्य वेळ लावला त्यामुळे जिथेजिथे फोन केले तिथेतिथे `वी आर ऑलरेडी सोल्ड आऊट, सर !' असा गोड प्रतिसाद मिळाला. पण वस्तुस्थिती कायम निर्वैयक्तिक असते, आपण तिच्याकडे पॉजिटीवली बघितलं तर ती संधी होते नाही तर अडचण ठरते हा बेसिकच फंडाये. त्यामुळे नवं डेस्टीनेशन ट्राय करु या म्हटलं. अँड इट रिअली टर्न्ड आऊट टू बी अ ग्रेट सरप्राईज ! 1 भूगावच्या फॉरेस्ट ट्रेल स्कीममधे हे रिसॉर्ट आहे. पुण्यापासून फारतर सोळा/ सतरा किलोमिटर्स असेल.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - क्वार्टरफायनल - दक्षिण आफ्रीका विरुद्ध न्यूझीलंड

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 06/03/2017 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
२५ मार्च २०११ शेरे बांगला, मीरपूर बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाक्क्यातल्या मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडीयममध्ये दक्षिण आफ्रीका आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकपची तिसरी क्वार्टरफायनल रंगणार होती. आदल्या दिवशीच महेंद्रसिंग धोणीच्या भारतीय संघाने क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधली सद्दी संपुष्टात आणल्यामुळे १९९९ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया सोडून दुसर्‍या संघाला वर्ल्ड चँपियन होण्याची संधी मिळणार होती. ऑस्ट्रेलियानंतर या वर्ल्डकपचा प्रमुख दावेदार म्हणून अर्थातच दक्षिण आफ्रीकेकडे पाहिलं जात होतं.

भिल्ल भारत: शेवटचा भाग

लेखक मिडास यांनी सोमवार, 06/03/2017 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग पूर्वरंग:- अर्जुनाची निर्भत्सना करून शेष निघून जातो. पण त्याचे भोग इतक्यात चुकलेले नाहीत. इथून पुढे आपल्याला दिसते ती एक धूर्त अशी राजकारणी महाराणी. अर्जुनाच्या पुढे ती शेषासमोर हतबल झाल्याची भाषा करते. हताश अर्जुन देखील तिच्यापुढे असहाय बनून तिलाच एखादा उपाय सुचवण्याची विनंती करतो. द्रौपदी चा सूड आत्ता कुठे अर्धवट पूर्ण झालाय. तिला आता शेषाचा काटा तर काढायचाच आहे पण या प्रसंगाचा उपयोग करून अर्जुनाने तिचा गैरवापर करू नये याचा देखील बंदोबस्त तिला आता करायचा आहे.