Skip to main content

समाज

सस्नेह निमंत्रण

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 07/12/2011 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्या 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' या पहिल्या वाहिल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दिनांक १०/१२/२०११ रोजी माननीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते होणार आहे. तरी ह्या आनंदाच्या प्रसंगी सर्व मिपाकरांची उपस्थिती आवश्यकच आहे. मिपाकरांच्याच आशीर्वादाने, प्रेमाने आणि पाठिंब्याने आज हे यश मिळत आहे.

कोड ऑफ कंडक्ट

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 07/12/2011 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
"ह्या देशात लोकशाही आहे की सरंजामशाही"? मी वाफाळता चहा घेता घेता एकदम आवेशात बोललो. "काय झाले सक्काळी सक्काळी", आमचे अर्धांगं. "अरे, आता आमच्या बोलण्या चालण्यावर बंधने आणण्याची तयारी चाललीय ह्यांची.", मी. "मी अजून पेपर वाचलेला नाही, मेलं सकाळी उठल्यापासून तुमची आणि मुलांची उठबस करावी लागतेय, लोकशाही नाहीच आहे इथे.", उंच आवाजात आमचे अर्धांगं कडाडले. त्या आवाजाच्या "उंची" वरून जाणवले की आता आपल्या कोंडलेल्या भावनांना ऐकण्यासाठी जर श्रोता हवा असेल तर बायकोशी मांडवली करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मी लगेच आवाजात जरा मार्दव आणले.

केल्याने देशाटन, पंडित-मैत्री, 'सभेत संचार'............

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 07/12/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल स्पर्धा कोण वाढली आहे. वर जाण्यासाठी जो तो धडपडतोय. आता जे हुषार आहेत त्यांच ठिक आहे पण आमच्या सारख्यांच काय? आणि आजकाल वर चढायला हुषारी पुरतेच असही नाही. मग मोठ्ठ व्हायचं असेल तर काय करावं बर? आहेत, त्यालाही उपाय आहेत. एक उपाय मागे मी इथे सांगितला होता. आता दुसरा सांगतो. चारचौघात आपल वजन वाढवायच असलं, महत्व प्रस्थापित करायच असल तर मग काहीतरी वेगळं कराव लागतं. थोडक्यात आपणच आपल्याला मोठ कराव लागतं. ते कस? अहो हे कलियुग आहे, बोलणाऱ्याचे दगड खपतात आणि न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही म्हणे. कस खपणार?

एवरु लेरनी

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 06/12/2011 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टींचे मोल ती गोष्ट ज्याच्याकडे आहे त्याला जितकी कळते त्याहून चांगल्या तर्‍हेने ती गोष्ट ज्याच्याकडे नाही त्याला उमजत असावी. आईचे प्रेम म्हणजे काय? ममता म्हणजे काय? या गोष्टी कधी सांगून कळण्यासारख्या असतात काय? तर एखाद्या अनाथ म्हणून वाढलेल्याला ही जाणीव प्रकर्षाने होत असेल. असो, सांगायचा उद्देश हा, की परवा आमच्या लाडक्या टॉलिवूड मधील एक निरंजन हा चित्रपट परत बघत होतो.

भाषण

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/12/2011 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मिश्रेया यांच्या धाग्यावरून याची आठवण झाली. भाषण कसे असावे, भावना कशा व्यक्त कराव्यात, विनोद कसा हलका फुलका असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पु.लंचे भाषण...ऐकले नसेल तर - येथे जरूर ऐका...

येळकोट येळकोट जय मल्हार!!

लेखक यकु यांनी मंगळवार, 06/12/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवडे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना. खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्‍या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय. खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं.

आजोबांच पेन

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 02/12/2011 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, कधी कधी उन्हाळ्यात एक थंड हवेची झुळुक येते, ऊर भरून आपण श्वास घेतो, थंडावा अंगभर पसरतो. श्वास न सोडावासा वाटतो. पण निसर्गाचा नियम.. श्वास सोडावाच लागतो. असंच काहीसं सुख आणी दु:ख. ते यावं आणि जावं हेच कदाचित आयुष्य. :) कॉलेज मधे होतो तेव्हा "मेस"वर जेवायचो. मेसवर एक आजोबा यायचे. खळखळून हसायचे. आम्हाला सामील व्हायचे. वय ८५ आहे असे ते म्हणायचे. दुपारी आणि रात्री भेटायचे. आम्हाला बघून खुप खुश व्हायचे. हसायचे, आमच्याबरोबर विनोद करायचे आणि स्वतःचे तरुणपण आठवून पुन्हा खुश व्हायचे. आजोबा एकदा जेवणानंतर गप्पा मारताना म्हणाले की त्यांच्या वयाचे त्यांच्याबरोबर कुणीच नाही.

कोणते मराठी पेपर सध्या चांगले आहेत !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 02/12/2011 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोणती वृत्तपत्रे सध्या चांगली आहेत. काही पेपर आता बदलायला लागले आहेत. काही पेपर तर पेड न्यूजवर चालतात