मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्यांचाच जीव घे तू ..

गंगाधर मुटे ·

"शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता" त्या दिवसापासुन हिंदुस्थानाचा सुवर्ण-काळ सुरु होइल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मूकवाचक 25/04/2013 - 08:56
गझल वाचून चार ओळी सुचल्या: पैशामधून सत्ता सत्तेमधून पैसा भावुक अन अडाणी मतदार आहे सस्ता ते 'जाणते' पुढारी जात्यंध माजलेले मातीत राबतो जो खाईल तोच खस्ता

In reply to by मूकवाचक

गंगाधर मुटे 25/04/2013 - 11:17
सुंदर ओळी झाल्यात. फक्त वृत्त सांभाळण्यासाठी खालीलप्रमाणे बदल करावा लागेल. पैशामधून सत्ता सत्तेमधून पैसा भावूक अन अडाणी मतदार खूप सस्ता..... सुंदर स्वतंत्र व्दिपदी होतोय. ते 'जाणते' पुढारी जात्यंध माजलेले मातीत राबतो जो खाईल तोच खस्ता...... सुंदर स्वतंत्र व्दिपदी होतोय.

गंगाधर मुटे 22/04/2013 - 20:15
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. ही गझलसुद्धा आंतरजालावर तुरळकप्रमाणावर का होईना पण स्वीकारली गेली, ही बाब माझ्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी आहे.

अर्धवटराव 23/04/2013 - 01:17
मागे अण्णा हजारे उपोषण प्रकरणी मिपावर बरीच (अपेक्षीत) चर्चा झाली होती. त्यावेळी, भ्रष्टाचाराने गांजलेला शेतकरी स्वतःच्या गळ्यात फास अडकवण्याआधि व्यवस्थेतील दोन-चार जणांना संपवेल, असा काहिसा मुद्दा निघाला होता. एका आंदोलक शेतकर्‍याच्या गजलीत आज तेच भाव बघुन थोडी काळजी वाटायला लागलीये. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

गंगाधर मुटे 24/04/2013 - 17:10
अर्धवटराव कशी गंमत आहे बघा. ३ लाख शेतकरी आत्महत्त्या करून मेलेत पण कुण्णाला म्हणून काळजी नाहीये. पण तो जर का "व्यवस्थेतल्या" एखाद्याला मारणार असेल तर त्या एकासाठी तुम्हाला देखील काळजी पडलीय. ;( - ज्या दिवशी त्या आत्महत्या करणार्‍याला हे गमक कळेल की, अरे आपण स्वतःच मरणे म्हणजे निष्कारणच जीव गमावणे आहे. पण सोबत एखाद्याला घेऊन मेलो तर हा देश हादरेल.मरणोप्रांत आपला फोटो टीव्हीवर झळकेल, ब्रेकींग न्यूज होईल. पेपरचे रकानेच्या रकाने भरून येईल.... तर त्यास सोबत एखाद्याला घेऊन मरणे केव्हाही परवडेल. ;) -

In reply to by गंगाधर मुटे

अर्धवटराव 24/04/2013 - 17:30
परिस्थिती खरच इतकी बीकट होत चालली आहे याचीच चिंता आहे. 'अभय' ला इतकं निर्वाणीचं लिहावं लागतय.... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

गंगाधर मुटे 24/04/2013 - 18:57
क्षमस्व अर्धवटराव, तुम्हाला शेतकर्‍यांची नव्हे तर त्याला आत्महत्तेला प्रवृत्त करणार्‍या व्यवस्थेची काळजी पडली की काय, असा मी चुकीचा अर्थ घेतला होता. दिलगीर आहे. :)

कविता आवडली …फ़ार भयानक परिस्थिती आहे…ग़ंमत म्हणजे समाजात एका व्यवसाय करणारा दुसरा व्यवसाय करणा~या च्या दुःखाबाबत आपला संबंधच नाही असे वागताना दिसतो.-९२-९ ५ च्या दरम्यान लाखो कामगार बेकार झाले ।गिरणॆ कामगार देशोधडीस लागले सारे जणच ह्या चक्रातून जात आहेत। गेले आहेत। शेत क~यानॆ हिंमत धरून मुकाबला करावा ………… सरकारी नोकरी हि एकच शाश्वत नोकरी आहे। ………। आत्मा हत्ये बद्दल अनेक नेते विचार वंत यांनी आपापली मते व्यक्त केली आहेतच।

"शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता" त्या दिवसापासुन हिंदुस्थानाचा सुवर्ण-काळ सुरु होइल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मूकवाचक 25/04/2013 - 08:56
गझल वाचून चार ओळी सुचल्या: पैशामधून सत्ता सत्तेमधून पैसा भावुक अन अडाणी मतदार आहे सस्ता ते 'जाणते' पुढारी जात्यंध माजलेले मातीत राबतो जो खाईल तोच खस्ता

In reply to by मूकवाचक

गंगाधर मुटे 25/04/2013 - 11:17
सुंदर ओळी झाल्यात. फक्त वृत्त सांभाळण्यासाठी खालीलप्रमाणे बदल करावा लागेल. पैशामधून सत्ता सत्तेमधून पैसा भावूक अन अडाणी मतदार खूप सस्ता..... सुंदर स्वतंत्र व्दिपदी होतोय. ते 'जाणते' पुढारी जात्यंध माजलेले मातीत राबतो जो खाईल तोच खस्ता...... सुंदर स्वतंत्र व्दिपदी होतोय.

गंगाधर मुटे 22/04/2013 - 20:15
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. ही गझलसुद्धा आंतरजालावर तुरळकप्रमाणावर का होईना पण स्वीकारली गेली, ही बाब माझ्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी आहे.

अर्धवटराव 23/04/2013 - 01:17
मागे अण्णा हजारे उपोषण प्रकरणी मिपावर बरीच (अपेक्षीत) चर्चा झाली होती. त्यावेळी, भ्रष्टाचाराने गांजलेला शेतकरी स्वतःच्या गळ्यात फास अडकवण्याआधि व्यवस्थेतील दोन-चार जणांना संपवेल, असा काहिसा मुद्दा निघाला होता. एका आंदोलक शेतकर्‍याच्या गजलीत आज तेच भाव बघुन थोडी काळजी वाटायला लागलीये. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

गंगाधर मुटे 24/04/2013 - 17:10
अर्धवटराव कशी गंमत आहे बघा. ३ लाख शेतकरी आत्महत्त्या करून मेलेत पण कुण्णाला म्हणून काळजी नाहीये. पण तो जर का "व्यवस्थेतल्या" एखाद्याला मारणार असेल तर त्या एकासाठी तुम्हाला देखील काळजी पडलीय. ;( - ज्या दिवशी त्या आत्महत्या करणार्‍याला हे गमक कळेल की, अरे आपण स्वतःच मरणे म्हणजे निष्कारणच जीव गमावणे आहे. पण सोबत एखाद्याला घेऊन मेलो तर हा देश हादरेल.मरणोप्रांत आपला फोटो टीव्हीवर झळकेल, ब्रेकींग न्यूज होईल. पेपरचे रकानेच्या रकाने भरून येईल.... तर त्यास सोबत एखाद्याला घेऊन मरणे केव्हाही परवडेल. ;) -

In reply to by गंगाधर मुटे

अर्धवटराव 24/04/2013 - 17:30
परिस्थिती खरच इतकी बीकट होत चालली आहे याचीच चिंता आहे. 'अभय' ला इतकं निर्वाणीचं लिहावं लागतय.... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

गंगाधर मुटे 24/04/2013 - 18:57
क्षमस्व अर्धवटराव, तुम्हाला शेतकर्‍यांची नव्हे तर त्याला आत्महत्तेला प्रवृत्त करणार्‍या व्यवस्थेची काळजी पडली की काय, असा मी चुकीचा अर्थ घेतला होता. दिलगीर आहे. :)

कविता आवडली …फ़ार भयानक परिस्थिती आहे…ग़ंमत म्हणजे समाजात एका व्यवसाय करणारा दुसरा व्यवसाय करणा~या च्या दुःखाबाबत आपला संबंधच नाही असे वागताना दिसतो.-९२-९ ५ च्या दरम्यान लाखो कामगार बेकार झाले ।गिरणॆ कामगार देशोधडीस लागले सारे जणच ह्या चक्रातून जात आहेत। गेले आहेत। शेत क~यानॆ हिंमत धरून मुकाबला करावा ………… सरकारी नोकरी हि एकच शाश्वत नोकरी आहे। ………। आत्मा हत्ये बद्दल अनेक नेते विचार वंत यांनी आपापली मते व्यक्त केली आहेतच।
लेखनविषय:
त्यांचाच जीव घे तू ..... हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता मातीत राबताना इतके कळून आले फुकटात ठोस जखमा!

दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

गंगाधर मुटे ·

नानबा 25/03/2013 - 15:36
गझल मस्त... विशेषतः
तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे
प्रचंड आवडेश...

बॅटमॅन 25/03/2013 - 15:46
वाह!!!!!!
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे
कितीदा असे काव्य हे वाचताना, मनाची अहा लागली पूर्ण तंद्री कसे शब्द ते देखणे-आशयो ही, सवे वृत्त आहे वगैरे वगैरे!!! :)

मस्तच... भन्नाट!!
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे
क्या बात!! व्वाह!!!

आज बर्‍याच दिवसांनी मिपावरती आलो आणि पहिला हाच धागा उघडला. अप्रतिमच !
तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
हे खासच !!

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गंगाधर मुटे 26/03/2013 - 18:51
अहो, दुष्काळाला काय प्रेमाचे वावडे असते? लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्यात; पण म्हणून काही प्रेमाची चंदेरी/रंगेली दुनिया थोडीफार तरी थबकली काय?

राही 25/03/2013 - 18:12
कविता खूपच आवडली, पण.. भुईसंग जगणे असो ते खरेही,परी मृण्मयीची आस होती खरे ना? मृदेचीच काया,मृदेचीच माया, कसा स्वप्नभंग? वगैरे वगैरे...

In reply to by राही

गंगाधर मुटे 26/03/2013 - 18:56
भुईसंग जगणे असो ते खरेही,परी मृण्मयीची स होती खरे ना? मृदेचीच काया,मृदेचीच माया, कसा स्वप्नभं? वगैरे वगैरे... थोडयाशाने व्रूत्त गंडले ना! आशय/प्रश्न चांगला आहे. :)

अभ्या.. 25/03/2013 - 20:46
अभयराव. मस्तच हो एकदम. अग्दी कौतुक, टाळ्या, स्टॅण्डींग ओव्हेशन वगैरे वगैरे.

गंगाधर मुटे 26/03/2013 - 17:18
सर्व प्रतिसाद दात्यांना रामराम, नमस्कार, जयहिंद, जयभीम, सलाम वालेकूम, सुप्रभात/सुदुपार/शुभरात्री, मनपूर्वक आभार, धन्यवाद ..... वगैरे वगैरे! :)

मालोजीराव 26/03/2013 - 19:42
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे
वाह वाह ! क्या बात थोड्या सारख्या ओळी वाटल्या म्हणून टाकतोय…
तनको तनको उधरे पद औचक I ' शंभु ' कसु पडयो पावतसे II दिनमेंह लगेह पगेह रहे I सब रैन कुहीसी जगावतसें II -छत्रपति संभाजीराजे

In reply to by जयवी

गंगाधर मुटे 27/03/2013 - 12:54
जयवीतै, मी आजवर एकही प्रेम विषयाला अनुसरून एकही प्रेमकाव्य लिहिलेलं नव्हतं. कारण शृंगार हा माझ्या लेखनीचा ना तर विषय आहे नाही लेखणीचे उद्दीष्ट. मात्र गझल लिहायची पण गझलेचा मुळ केंद्रबिंदू असलेला "प्रेम" हा विषय सोडूनच द्यायचा म्हटले तर माझ्यातल्या गझलकाराला ते पचणीही पडत नव्हतं. शृंगार हा विषय मला वर्ज्य असला तरी माझ्यातल्या गझलकारावर तसे बंधन लादणे, मला फारसे संयुक्तित वाटले नाही. जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट मुडमध्ये जातो, तेव्हा आपल्याला नकोसं/नावडीचं असलं तरीही बरंच काही सुचत राहतं; एखादवेळ चक्क काही शब्द लयबद्ध होऊन ओठावर रेंगाळायला लागतात. माझा एक अनुभव असाही आहे की, एकदा दादा कोंडकेंनी स्वतः लिहिलेलं एक द्वीअर्थी फिल्मी गीत गुणगुणतांना त्यासोबतच त्यापुढे माझ्या तोंडातून काही ओळी उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या होत्या. त्या ओळी माझ्यामते तरी दादा कोंडकेंच्या ओळीपेक्षा जास्त दर्जेदार, कसदार आणि श्रवणीय होत्या. मात्र त्या ओळी अर्थातच द्वीअर्थी व किंचितश्या अश्लिलतेकडे झुकणार्‍या होत्या... आणि मी.. स्वतःच स्वतःविषयी काही स्टेटस/मर्यादा/बंधने राखणारा असल्याने मला त्या माझ्याच ऑळी स्विकारता आल्या नाहीत. त्या ओळींच्या दफणविधीचा कार्यक्रम त्याच क्षणी तिथेच पार पडला. :( मात्र मला त्याच क्षणी जाणीव झाली की आपण आपल्यातल्या कवीवर/गीतकारावर एक मोठा अत्याचार/अन्याय केलेला आहे. मी आणि माझ्यातल्या कवी या दोन वेगवेगळ्या आणि स्वतंत्र अभिव्यक्ती आहेत, याचीही जाणीव झाली. :) त्या दिवशी अचानक त्या ओळी सुचत गेल्या आणि मतला बनत गेला. यावेळेस मी माझ्यातल्या गझलकाराला अजिबात अटकाव केला नाही. त्याला दिलोजानसे सहकार्य केले आणि त्यातूनच ही गझल साकारली. ही गझल सफल झाली आहे. शृंगार हा विषय घेऊन चांगल्या रचना माझ्या हातून रचल्या जाऊ शकतील याचा अदमास आलेला आहे; मात्र तरीही यापुढे एकट-दुकट प्रसंग वगळता या विषयावर कौशल्य दाखविण्याची स्वैर अनुमती मी माझ्या लेखणीला देणार नाही. माझ्यासोबत जगायचे तर माझ्या लेखणीला माझ्या आवडीचेच विषय हाताळावे लागतील. एका ध्येयपूर्ण उद्देशासाठीच जगावे लागेल आणि त्यात शृंगाररसाला फारसे स्थान नाही. :) तुम्हाला सुद्धा यानंतर एकदम रोमँटिक वगैरे वगैरे रचना माझ्याकडून वाचायला मिळण्याची शक्यता धूसर आहे कारण शृंगार हा माझा विषय नाही. :)

In reply to by गंगाधर मुटे

जयवी 27/03/2013 - 17:52
गंगाधरजी.... तुम्ही म्हणताय ते पटतंय असं वाटतंय :) पटलं असं न म्हणता पटतंय असं वाटतंय असं म्हणतेय कारण तुम्ही जसं म्हणताय की शृंगार तुमचा प्रांत नाही तसं मी म्हणेन की माझा प्रांत शृंगार रसच आहे ;) हल्ली हल्ली जरा वेगळं लिहायचा प्रयत्न सुरु केलाय. एकेकाचा पिंड असतो पण दुसर्‍या प्रांतात डोकवायचंच नाही असं नसतं ना.... म्हणून तुम्ही जशी तुमच्या लेखणीला सुट देताय तशीच थोडीफार मी पण त्या प्रयत्नात आहे :)

In reply to by गंगाधर मुटे

यशोधरा 31/03/2013 - 08:28
मुटेसाहेब, 'वगैरे वगैरे' हा वैभवचा गाजलेला रदीफ आहे. त्याला त्याचे योग्य क्रेडीट पोचवायला एखादी ओळ ह्या प्रतिसादात आली असती तर चालू शकलं असतं. :)

In reply to by यशोधरा

गंगाधर मुटे 31/03/2013 - 14:47
यशोधराजी, वैभव जोशींनी गझलेत वापरलेला रदीफ "वगैरे वगैरे" असा नसून "वगैरे" असा आहे. त्यांच्या त्या गझलेचा मक्ता पहा. पुन्हा घेतली मी भरारी वगैरे पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे जिथपर्यंत गझल आणि गझलकारांचा प्रश्न आहे; रदीफ, काफिया किंवा गझलेतील कल्पना पुन्हा वापरल्या तरी कुणी कुणाला श्रेय देत नाहीत. "तरही गझलसाठी" तर जुन्या गझलेतील चक्क संपूर्ण ओळच वापरली जाते. तसे करण्यासाठी मुळ गझलकाराची अनुमती घेणे किंवा निदान त्याला तशी कल्पना देणेसुद्धा आवश्यक मानले जात नाही. मी गझल लिहायला लागलो त्याला अजून तीन वर्ष व्हायची आहेत. सुरूवातीला हा प्रकार जेव्हा मला माहीत झाला तेव्हा मी गझलकारांना हे गैर आहे, असे म्हणालो तर उपस्थित सर्वच माझ्यावर तुटून पडलेत. आंतरजालावरील नावाजलेला एकही गझलकार माझ्या बाजूने उभा राहीला नाही. उलट असे करणे म्हणजे "आमचा अधीकार" अशाच अविर्भावात माझ्याशी वागलेत. असो, मी व्यक्तिगत पातळीवर तुमच्याशी "ज्याचे त्याला योग्य क्रेडीट देणे" या मताशी सहमत आहे. वैभव जोशींनी गझलेत वापरलेला रदीफ "वगैरे वगैरे" असा नाहीच. त्यामुळे या गझलेत तसा प्रश्न उद्भवतच नाही. पण जेव्हा मी "वगैरे" हा रदीफ घेऊन गझल लिहिली तेव्हा प्रतिसादात नव्हे तर मुळ गझलेच्या खालीच तशी नोंद केली होती. :) बघा. http://www.misalpav.com/node/23921 http://www.baliraja.com/node/444 ---------------------------------------------

In reply to by गंगाधर मुटे

यशोधरा 31/03/2013 - 14:49
रदीफ, काफिया किंवा गझलेतील कल्पना पुन्हा वापरल्या तरी कुणी कुणाला श्रेय देत नाहीत. "तरही गझलसाठी" तर जुन्या गझलेतील चक्क संपूर्ण ओळच वापरली जाते. तसे करण्यासाठी मुळ गझलकाराची अनुमती घेणे किंवा निदान त्याला तशी कल्पना देणेसुद्धा आवश्यक मानले जात नाही. हो? बरं :)

In reply to by गंगाधर मुटे

यशोधरा 31/03/2013 - 08:31
रदीफ नाही, काफिया. स्वसंपादन येत नाही आणि गझलीचे व्याकरण फारसे कळत नाही, पण मुद्दा हा की वैभवचे क्रेडीट त्याला जरुर मिळायला हवे. :)

In reply to by यशोधरा

गंगाधर मुटे 31/03/2013 - 14:58
यशोधराजी, तुम्ही सदर गझलेविषयी काहीच बोलल्या नाहीत. लहानमुलांना उगीचच खोटीनाटी का होईना पण जराशी शाबासकी दिली, पाठीवर प्रेमाने कौतुकाची थाप दिली आणि मग हळूच कान उपटलेत की ते कान उपटने जास्त प्रभावी ठरत असते. :)

In reply to by गंगाधर मुटे

यशोधरा 31/03/2013 - 15:08
मी खरं लिहिलं तर आपल्याला आवडणार नाही आणि खोटी वाह वाह मला जमणार नाही. राग नसावा. काही मनापासून आवडले तर लिहितेच त्या त्या वेळी तसे.

In reply to by यशोधरा

गंगाधर मुटे 31/03/2013 - 15:37
नाही आवडले तर त्यात काय विशेष आहे? :) उलट कुणी जर लेखनाची दुसरी बाजू दाखविली तर ते लेखन सुधारण्यासाठी फायद्याचेच असते. मात्र कधीकधी त्यावर विनाकारण चर्चा वाढत जाते, हेही खरेच. त्यामुळे वादग्रस्त मुद्दे टाळणेही कधीकधी फायद्याचेच असते. (मी सहज विनोद साधायचा प्रयत्न केला होता. बाकी काही नाही. :))

In reply to by गंगाधर मुटे

गंगाधर मुटे 31/03/2013 - 15:41
मी :) स्मित करून नंतर ) कंस पूर्ण केला. त्यामुळे ती स्मित वाली बाहूली गडबडा लोळतेय. भलताच विनोद झाला. :)

In reply to by गंगाधर मुटे

यशोधरा 31/03/2013 - 15:44
काहीच विशेष नाही. :) हल्ली तसेही कोणत्याच गोष्टीत विशेष नसते, आणि मला गझलेमधले खूप काही समजतही नाही, तेह्वा मी काय सांगूही शकत नाही, पण वैभवसारख्या जाणकाराकडे खरच शिकायचे असेल तर जरुर गझल न्या. :) >>वादग्रस्त मुद्दे टाळणेही >> म्हणजे योग्य क्रेडिट द्यावे वगैरे असले मुद्दे ना? खरे आहे, ते सोयीचे नसतातच कधीही. सोडून द्या झाले. :)

एस 31/03/2013 - 15:42
कसला दुपट्टा अन् कसलं ते प्रेम सुखांच्या क्षणांची रोजचीच गेम अन् म्हणे तुमचं अन् आमचं असतंय शेम अवांतर - प्रेमबिम करायला बंदी घातली पाहिजे.

In reply to by इन्दुसुता

बॅटमॅन 01/04/2013 - 12:32
इंदुसुता यांच्याशी सहमत. यशोधरा यांचा आग्रह अंमळ अस्थानी वाटला. आमच्या वाल्गुदभारतात पंडित कवींच्या श्लोकांची नक्कल आम्हीही केलीच होती, तेव्हा कुणीच काही बोलले नव्हते, मग गझलेने काय घोडं मारलंय?

In reply to by बॅटमॅन

यशोधरा 01/04/2013 - 12:42
बॅटमनसाहेब, करा की नक्कल :) फक्त योग्य ते क्रेडिट द्या इतकेच माझे म्हणणे आहे. तेही चुकीचे आहे का? तुम्ही म्हणताय ना की नक्कल केली से, की नाकारताय? :)

In reply to by यशोधरा

बॅटमॅन 01/04/2013 - 12:46
तुम्ही म्हणताय ना की नक्कल केली से, की नाकारताय?
पहिल्यांदाच मी म्हटले की नक्कल केली आहे, तर परत या प्रश्नाचे प्रयोजन काय? बाकी क्रेडिट देणे ओके आहे, पण मी माझे काव्य सर्वथैव वरिजिनल, औट ऑफ द ब्ल्यू आहे असा क्लेम तरी कुठे करतोय? लोक ते काव्य वाचून म्हणाले की पंडित कवींची मशिनरी बरी वापरलीये, त्याला मी होच म्हटले आहे. नाकारण्याचा प्रश्न येतच नै. पण मजा अशी आहे, की क्रेडिट द्यायचे तरी कुणाकुणाला? कवी म्हटला की बर्‍याच गोष्टी इतरांकडून तो उसन्या घेतच असतो. उल्लेख करायचा तरी कुणाकुणाचा. असो.

In reply to by बॅटमॅन

यशोधरा 01/04/2013 - 12:52
>परत या प्रश्नाचे प्रयोजन काय? >> माझा मुद्दा समजावण्यासाठी :) >>पण मी माझे काव्य सर्वथैव वरिजिनल, औट ऑफ द ब्ल्यू आहे असा क्लेम तरी कुठे करतोय? >> मी असे कुठेच म्हटलेले नाही :) किंबहुना सुचवलेले नाही, रादर आत्तापरेंत असा विचारही केला नाही. माझे तितकेच म्हणणे आहे की मग, की क्रेडिट द्या. :) जर कोणाकडून मूळ कल्पना उसनी घेत असू, तर क्रेडिट देण्याने काही कमी तर होत नाही ना? तर जिथे उल्लेख आवश्यक आहे तिथे करावा असे मला वाटते. माझेही असो. :)

नानबा 25/03/2013 - 15:36
गझल मस्त... विशेषतः
तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे
प्रचंड आवडेश...

बॅटमॅन 25/03/2013 - 15:46
वाह!!!!!!
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे
कितीदा असे काव्य हे वाचताना, मनाची अहा लागली पूर्ण तंद्री कसे शब्द ते देखणे-आशयो ही, सवे वृत्त आहे वगैरे वगैरे!!! :)

मस्तच... भन्नाट!!
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे
क्या बात!! व्वाह!!!

आज बर्‍याच दिवसांनी मिपावरती आलो आणि पहिला हाच धागा उघडला. अप्रतिमच !
तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
हे खासच !!

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गंगाधर मुटे 26/03/2013 - 18:51
अहो, दुष्काळाला काय प्रेमाचे वावडे असते? लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्यात; पण म्हणून काही प्रेमाची चंदेरी/रंगेली दुनिया थोडीफार तरी थबकली काय?

राही 25/03/2013 - 18:12
कविता खूपच आवडली, पण.. भुईसंग जगणे असो ते खरेही,परी मृण्मयीची आस होती खरे ना? मृदेचीच काया,मृदेचीच माया, कसा स्वप्नभंग? वगैरे वगैरे...

In reply to by राही

गंगाधर मुटे 26/03/2013 - 18:56
भुईसंग जगणे असो ते खरेही,परी मृण्मयीची स होती खरे ना? मृदेचीच काया,मृदेचीच माया, कसा स्वप्नभं? वगैरे वगैरे... थोडयाशाने व्रूत्त गंडले ना! आशय/प्रश्न चांगला आहे. :)

अभ्या.. 25/03/2013 - 20:46
अभयराव. मस्तच हो एकदम. अग्दी कौतुक, टाळ्या, स्टॅण्डींग ओव्हेशन वगैरे वगैरे.

गंगाधर मुटे 26/03/2013 - 17:18
सर्व प्रतिसाद दात्यांना रामराम, नमस्कार, जयहिंद, जयभीम, सलाम वालेकूम, सुप्रभात/सुदुपार/शुभरात्री, मनपूर्वक आभार, धन्यवाद ..... वगैरे वगैरे! :)

मालोजीराव 26/03/2013 - 19:42
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे
वाह वाह ! क्या बात थोड्या सारख्या ओळी वाटल्या म्हणून टाकतोय…
तनको तनको उधरे पद औचक I ' शंभु ' कसु पडयो पावतसे II दिनमेंह लगेह पगेह रहे I सब रैन कुहीसी जगावतसें II -छत्रपति संभाजीराजे

In reply to by जयवी

गंगाधर मुटे 27/03/2013 - 12:54
जयवीतै, मी आजवर एकही प्रेम विषयाला अनुसरून एकही प्रेमकाव्य लिहिलेलं नव्हतं. कारण शृंगार हा माझ्या लेखनीचा ना तर विषय आहे नाही लेखणीचे उद्दीष्ट. मात्र गझल लिहायची पण गझलेचा मुळ केंद्रबिंदू असलेला "प्रेम" हा विषय सोडूनच द्यायचा म्हटले तर माझ्यातल्या गझलकाराला ते पचणीही पडत नव्हतं. शृंगार हा विषय मला वर्ज्य असला तरी माझ्यातल्या गझलकारावर तसे बंधन लादणे, मला फारसे संयुक्तित वाटले नाही. जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट मुडमध्ये जातो, तेव्हा आपल्याला नकोसं/नावडीचं असलं तरीही बरंच काही सुचत राहतं; एखादवेळ चक्क काही शब्द लयबद्ध होऊन ओठावर रेंगाळायला लागतात. माझा एक अनुभव असाही आहे की, एकदा दादा कोंडकेंनी स्वतः लिहिलेलं एक द्वीअर्थी फिल्मी गीत गुणगुणतांना त्यासोबतच त्यापुढे माझ्या तोंडातून काही ओळी उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या होत्या. त्या ओळी माझ्यामते तरी दादा कोंडकेंच्या ओळीपेक्षा जास्त दर्जेदार, कसदार आणि श्रवणीय होत्या. मात्र त्या ओळी अर्थातच द्वीअर्थी व किंचितश्या अश्लिलतेकडे झुकणार्‍या होत्या... आणि मी.. स्वतःच स्वतःविषयी काही स्टेटस/मर्यादा/बंधने राखणारा असल्याने मला त्या माझ्याच ऑळी स्विकारता आल्या नाहीत. त्या ओळींच्या दफणविधीचा कार्यक्रम त्याच क्षणी तिथेच पार पडला. :( मात्र मला त्याच क्षणी जाणीव झाली की आपण आपल्यातल्या कवीवर/गीतकारावर एक मोठा अत्याचार/अन्याय केलेला आहे. मी आणि माझ्यातल्या कवी या दोन वेगवेगळ्या आणि स्वतंत्र अभिव्यक्ती आहेत, याचीही जाणीव झाली. :) त्या दिवशी अचानक त्या ओळी सुचत गेल्या आणि मतला बनत गेला. यावेळेस मी माझ्यातल्या गझलकाराला अजिबात अटकाव केला नाही. त्याला दिलोजानसे सहकार्य केले आणि त्यातूनच ही गझल साकारली. ही गझल सफल झाली आहे. शृंगार हा विषय घेऊन चांगल्या रचना माझ्या हातून रचल्या जाऊ शकतील याचा अदमास आलेला आहे; मात्र तरीही यापुढे एकट-दुकट प्रसंग वगळता या विषयावर कौशल्य दाखविण्याची स्वैर अनुमती मी माझ्या लेखणीला देणार नाही. माझ्यासोबत जगायचे तर माझ्या लेखणीला माझ्या आवडीचेच विषय हाताळावे लागतील. एका ध्येयपूर्ण उद्देशासाठीच जगावे लागेल आणि त्यात शृंगाररसाला फारसे स्थान नाही. :) तुम्हाला सुद्धा यानंतर एकदम रोमँटिक वगैरे वगैरे रचना माझ्याकडून वाचायला मिळण्याची शक्यता धूसर आहे कारण शृंगार हा माझा विषय नाही. :)

In reply to by गंगाधर मुटे

जयवी 27/03/2013 - 17:52
गंगाधरजी.... तुम्ही म्हणताय ते पटतंय असं वाटतंय :) पटलं असं न म्हणता पटतंय असं वाटतंय असं म्हणतेय कारण तुम्ही जसं म्हणताय की शृंगार तुमचा प्रांत नाही तसं मी म्हणेन की माझा प्रांत शृंगार रसच आहे ;) हल्ली हल्ली जरा वेगळं लिहायचा प्रयत्न सुरु केलाय. एकेकाचा पिंड असतो पण दुसर्‍या प्रांतात डोकवायचंच नाही असं नसतं ना.... म्हणून तुम्ही जशी तुमच्या लेखणीला सुट देताय तशीच थोडीफार मी पण त्या प्रयत्नात आहे :)

In reply to by गंगाधर मुटे

यशोधरा 31/03/2013 - 08:28
मुटेसाहेब, 'वगैरे वगैरे' हा वैभवचा गाजलेला रदीफ आहे. त्याला त्याचे योग्य क्रेडीट पोचवायला एखादी ओळ ह्या प्रतिसादात आली असती तर चालू शकलं असतं. :)

In reply to by यशोधरा

गंगाधर मुटे 31/03/2013 - 14:47
यशोधराजी, वैभव जोशींनी गझलेत वापरलेला रदीफ "वगैरे वगैरे" असा नसून "वगैरे" असा आहे. त्यांच्या त्या गझलेचा मक्ता पहा. पुन्हा घेतली मी भरारी वगैरे पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे जिथपर्यंत गझल आणि गझलकारांचा प्रश्न आहे; रदीफ, काफिया किंवा गझलेतील कल्पना पुन्हा वापरल्या तरी कुणी कुणाला श्रेय देत नाहीत. "तरही गझलसाठी" तर जुन्या गझलेतील चक्क संपूर्ण ओळच वापरली जाते. तसे करण्यासाठी मुळ गझलकाराची अनुमती घेणे किंवा निदान त्याला तशी कल्पना देणेसुद्धा आवश्यक मानले जात नाही. मी गझल लिहायला लागलो त्याला अजून तीन वर्ष व्हायची आहेत. सुरूवातीला हा प्रकार जेव्हा मला माहीत झाला तेव्हा मी गझलकारांना हे गैर आहे, असे म्हणालो तर उपस्थित सर्वच माझ्यावर तुटून पडलेत. आंतरजालावरील नावाजलेला एकही गझलकार माझ्या बाजूने उभा राहीला नाही. उलट असे करणे म्हणजे "आमचा अधीकार" अशाच अविर्भावात माझ्याशी वागलेत. असो, मी व्यक्तिगत पातळीवर तुमच्याशी "ज्याचे त्याला योग्य क्रेडीट देणे" या मताशी सहमत आहे. वैभव जोशींनी गझलेत वापरलेला रदीफ "वगैरे वगैरे" असा नाहीच. त्यामुळे या गझलेत तसा प्रश्न उद्भवतच नाही. पण जेव्हा मी "वगैरे" हा रदीफ घेऊन गझल लिहिली तेव्हा प्रतिसादात नव्हे तर मुळ गझलेच्या खालीच तशी नोंद केली होती. :) बघा. http://www.misalpav.com/node/23921 http://www.baliraja.com/node/444 ---------------------------------------------

In reply to by गंगाधर मुटे

यशोधरा 31/03/2013 - 14:49
रदीफ, काफिया किंवा गझलेतील कल्पना पुन्हा वापरल्या तरी कुणी कुणाला श्रेय देत नाहीत. "तरही गझलसाठी" तर जुन्या गझलेतील चक्क संपूर्ण ओळच वापरली जाते. तसे करण्यासाठी मुळ गझलकाराची अनुमती घेणे किंवा निदान त्याला तशी कल्पना देणेसुद्धा आवश्यक मानले जात नाही. हो? बरं :)

In reply to by गंगाधर मुटे

यशोधरा 31/03/2013 - 08:31
रदीफ नाही, काफिया. स्वसंपादन येत नाही आणि गझलीचे व्याकरण फारसे कळत नाही, पण मुद्दा हा की वैभवचे क्रेडीट त्याला जरुर मिळायला हवे. :)

In reply to by यशोधरा

गंगाधर मुटे 31/03/2013 - 14:58
यशोधराजी, तुम्ही सदर गझलेविषयी काहीच बोलल्या नाहीत. लहानमुलांना उगीचच खोटीनाटी का होईना पण जराशी शाबासकी दिली, पाठीवर प्रेमाने कौतुकाची थाप दिली आणि मग हळूच कान उपटलेत की ते कान उपटने जास्त प्रभावी ठरत असते. :)

In reply to by गंगाधर मुटे

यशोधरा 31/03/2013 - 15:08
मी खरं लिहिलं तर आपल्याला आवडणार नाही आणि खोटी वाह वाह मला जमणार नाही. राग नसावा. काही मनापासून आवडले तर लिहितेच त्या त्या वेळी तसे.

In reply to by यशोधरा

गंगाधर मुटे 31/03/2013 - 15:37
नाही आवडले तर त्यात काय विशेष आहे? :) उलट कुणी जर लेखनाची दुसरी बाजू दाखविली तर ते लेखन सुधारण्यासाठी फायद्याचेच असते. मात्र कधीकधी त्यावर विनाकारण चर्चा वाढत जाते, हेही खरेच. त्यामुळे वादग्रस्त मुद्दे टाळणेही कधीकधी फायद्याचेच असते. (मी सहज विनोद साधायचा प्रयत्न केला होता. बाकी काही नाही. :))

In reply to by गंगाधर मुटे

गंगाधर मुटे 31/03/2013 - 15:41
मी :) स्मित करून नंतर ) कंस पूर्ण केला. त्यामुळे ती स्मित वाली बाहूली गडबडा लोळतेय. भलताच विनोद झाला. :)

In reply to by गंगाधर मुटे

यशोधरा 31/03/2013 - 15:44
काहीच विशेष नाही. :) हल्ली तसेही कोणत्याच गोष्टीत विशेष नसते, आणि मला गझलेमधले खूप काही समजतही नाही, तेह्वा मी काय सांगूही शकत नाही, पण वैभवसारख्या जाणकाराकडे खरच शिकायचे असेल तर जरुर गझल न्या. :) >>वादग्रस्त मुद्दे टाळणेही >> म्हणजे योग्य क्रेडिट द्यावे वगैरे असले मुद्दे ना? खरे आहे, ते सोयीचे नसतातच कधीही. सोडून द्या झाले. :)

एस 31/03/2013 - 15:42
कसला दुपट्टा अन् कसलं ते प्रेम सुखांच्या क्षणांची रोजचीच गेम अन् म्हणे तुमचं अन् आमचं असतंय शेम अवांतर - प्रेमबिम करायला बंदी घातली पाहिजे.

In reply to by इन्दुसुता

बॅटमॅन 01/04/2013 - 12:32
इंदुसुता यांच्याशी सहमत. यशोधरा यांचा आग्रह अंमळ अस्थानी वाटला. आमच्या वाल्गुदभारतात पंडित कवींच्या श्लोकांची नक्कल आम्हीही केलीच होती, तेव्हा कुणीच काही बोलले नव्हते, मग गझलेने काय घोडं मारलंय?

In reply to by बॅटमॅन

यशोधरा 01/04/2013 - 12:42
बॅटमनसाहेब, करा की नक्कल :) फक्त योग्य ते क्रेडिट द्या इतकेच माझे म्हणणे आहे. तेही चुकीचे आहे का? तुम्ही म्हणताय ना की नक्कल केली से, की नाकारताय? :)

In reply to by यशोधरा

बॅटमॅन 01/04/2013 - 12:46
तुम्ही म्हणताय ना की नक्कल केली से, की नाकारताय?
पहिल्यांदाच मी म्हटले की नक्कल केली आहे, तर परत या प्रश्नाचे प्रयोजन काय? बाकी क्रेडिट देणे ओके आहे, पण मी माझे काव्य सर्वथैव वरिजिनल, औट ऑफ द ब्ल्यू आहे असा क्लेम तरी कुठे करतोय? लोक ते काव्य वाचून म्हणाले की पंडित कवींची मशिनरी बरी वापरलीये, त्याला मी होच म्हटले आहे. नाकारण्याचा प्रश्न येतच नै. पण मजा अशी आहे, की क्रेडिट द्यायचे तरी कुणाकुणाला? कवी म्हटला की बर्‍याच गोष्टी इतरांकडून तो उसन्या घेतच असतो. उल्लेख करायचा तरी कुणाकुणाचा. असो.

In reply to by बॅटमॅन

यशोधरा 01/04/2013 - 12:52
>परत या प्रश्नाचे प्रयोजन काय? >> माझा मुद्दा समजावण्यासाठी :) >>पण मी माझे काव्य सर्वथैव वरिजिनल, औट ऑफ द ब्ल्यू आहे असा क्लेम तरी कुठे करतोय? >> मी असे कुठेच म्हटलेले नाही :) किंबहुना सुचवलेले नाही, रादर आत्तापरेंत असा विचारही केला नाही. माझे तितकेच म्हणणे आहे की मग, की क्रेडिट द्या. :) जर कोणाकडून मूळ कल्पना उसनी घेत असू, तर क्रेडिट देण्याने काही कमी तर होत नाही ना? तर जिथे उल्लेख आवश्यक आहे तिथे करावा असे मला वाटते. माझेही असो. :)
लेखनविषय:
                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला

गहाणात ७/१२.....

गंगाधर मुटे ·

गंगाधर मुटे 13/02/2013 - 14:10
कृपया मला अन्य काही पर्याय नाही ही ओळ मला अन्य काहीच पर्याय नाही अशी वाचावी.

स्पंदना 14/02/2013 - 06:38
रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला हवी काय खुर्ची, निवारा वगैरे? मुजरा मुटेसरकार!

गंगाधर मुटे 16/02/2013 - 14:07
विशालभौ, अमेयजी धन्यवाद. कुठे राहिली आज ही गाय माझी? घरी खात नाहीच चारा वगैरे हा शेर जिथे ढेप-सरकी तिथे थांबते ही घरी खात नाहीच चारा वगैरे असा वाचून पहावा.

सुधीर 17/02/2013 - 09:33
काही कडवी छान जमली आहेत. खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला खरा तोच असतो पिणारा वगैरे ’अभय’ भोवती घे लपेटून धारा प्रवाहास नसतो किनारा वगैरे व्वा!

गंगाधर मुटे 13/02/2013 - 14:10
कृपया मला अन्य काही पर्याय नाही ही ओळ मला अन्य काहीच पर्याय नाही अशी वाचावी.

स्पंदना 14/02/2013 - 06:38
रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला हवी काय खुर्ची, निवारा वगैरे? मुजरा मुटेसरकार!

गंगाधर मुटे 16/02/2013 - 14:07
विशालभौ, अमेयजी धन्यवाद. कुठे राहिली आज ही गाय माझी? घरी खात नाहीच चारा वगैरे हा शेर जिथे ढेप-सरकी तिथे थांबते ही घरी खात नाहीच चारा वगैरे असा वाचून पहावा.

सुधीर 17/02/2013 - 09:33
काही कडवी छान जमली आहेत. खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला खरा तोच असतो पिणारा वगैरे ’अभय’ भोवती घे लपेटून धारा प्रवाहास नसतो किनारा वगैरे व्वा!
लेखनविषय:
गहाणात ७/१२.....

गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

मला अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे

बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

जयवी ·

जयवी 12/02/2013 - 15:18
तरही गझल म्हणजे एक कुठला तरी मिसरा कुणाच्या तरी गझलेतला घेऊन लिहीलेली गझल. ह्यात "मज दोन आसवांना हुलकावता न आले" हा मिसरा सुरेश भटांचा आहे.

प्रसाद१९७१ 15/02/2013 - 17:40
लावुनी आग मनाला, सोडुनी गेलीस तू अश्रुंचा पूर वाहिला, विझवता ने आले | दिल्यास संधी तू अनेक झेल घेण्याच्या गळकेच हात माझे, कॅच झेलता न आले | :-) ह्या मर्त्य ललना की अप्सरा स्वर्गातल्या बायको साथीला, भरुनी डोळे बघता न आले. | :-)

जयवी 12/02/2013 - 15:18
तरही गझल म्हणजे एक कुठला तरी मिसरा कुणाच्या तरी गझलेतला घेऊन लिहीलेली गझल. ह्यात "मज दोन आसवांना हुलकावता न आले" हा मिसरा सुरेश भटांचा आहे.

प्रसाद१९७१ 15/02/2013 - 17:40
लावुनी आग मनाला, सोडुनी गेलीस तू अश्रुंचा पूर वाहिला, विझवता ने आले | दिल्यास संधी तू अनेक झेल घेण्याच्या गळकेच हात माझे, कॅच झेलता न आले | :-) ह्या मर्त्य ललना की अप्सरा स्वर्गातल्या बायको साथीला, भरुनी डोळे बघता न आले. | :-)
लेखनविषय:
काव्यरस
आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले माझे असून “माझे” संबोधता न आले आभाळ पापण्यांना सांभाळता न आले मज दोन आसवांना हुलकावता न आले राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या गंगेस पाप सारे स्वीकारता न आले बरसात तू सुखाची, केली सदैव देवा झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले जयवी - जयश्री अंबासकर

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
काव्यरस

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)


मी तुझा साथ सोडून गाऊ कसा?
तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा

वाटले मोगर्‍याला तुला पाहुनी
पालखीला मिळालाय भोई जसा

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा

झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू;  फ़क्त खावा रसा

कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा