निवडणूक हे लोकशिक्षणाचे साधन आहे, असे कुणीतरी म्हणून गेल्याचे (उगाचच) आठवले!
व्यक्तीरेखांना नावे दिल्यामुळे चित्रण अधिक चांगले झाले.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
पैसे खाउन भ्रष्ट नेत्यांना मतदान करणार्या मोठ्या जनतेने दुरावस्थेचे रडगाणे बंद करावे. निवडणूक निकालावर विपरीत परिणाम करणार्या अश्या मतदारांना कसे बदलता येईल?
हे चित्र जर प्रातिनिधीक म्हणले तर ह्या परंपरा अश्याच चालू रहाणार्?चित्र बदलणार कधी?
>>पैसे खाउन भ्रष्ट नेत्यांना मतदान करणार्या मोठ्या जनतेने दुरावस्थेचे रडगाणे बंद करावे. निवडणूक निकालावर विपरीत परिणाम करणार्या अश्या मतदारांना कसे बदलता येईल?
+१
बाकी हा वतनदारी आणि खोट्या झुलीसाठी स्वांतत्र्य गहाण ठेवणार्याचा पण देश आहे, हे पण आहे.
मोडक परत एकदा जबरदस्त लेख.....
मतासाठी वाटल्या जाणारा पैसा...आणी एखाद्या उमेदवाराची आखणी मस्त मांडली आहे
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
नादलेस लेख... जबरा !!!!
--(अ-राजकारणी)प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
सॉलिड श्रावण काका मस्त आता २३ तारिख होइ पर्यंत लिहित रहा
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
हे मला स्वतःला नेहमीच इंटरेस्टिंग वाटते. बरेच डायनॅमिक असते ते.
निवडणुका खेळल्या जातात त्या अगदी शेवटच्या टप्प्यात असे तुम्ही म्हणलेय ते अगदी खरे आहे. पण अधिक नेमकेपणाने सांगायचे तर निवडणुका खेळल्या जातात त्या मतदानाच्या आधीच्या दोन दिवसात, उघड प्रचाराची मुदत संपल्यावर. त्याच वेळात सगळ्या छुप्या गाठीभेटी होतात, सेटिंग-सेटलमेंट होतात, फिक्सिंग होते अन फिरवाफिरवी पण होते. त्याच काळात प्रचारतात `गांधी-हजारे' उतरतात अन मीठ्-बेलाचा खप पण वाढतो. त्याच वेळा प्रचारात खपलेल्या अन खपवलेल्यांचे तुष्टीकरण पण होते अन काही वेळा मांजा काटणे पण.
निवडणुकांशी कोणत्याही प्रकारे संबंध आलेल्या प्रत्येकाला हे माहिती असते अन याचाच फायदा प्रत्येकजण घेतो. `गरीब' मतदार याच काळात सगळ्याच उमेदवारांकडुन `लाभ' घेतो अन मतदान मात्र जो निवडुन येण्याची शक्यता आहे त्यालाच करतो.
उमेदवारांना निवडणुकात मनुष्यबळाची गरज असते मग अनेक गणपती/दहिहंडी/नवरात्र/मित्र मंडळे त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरवतात. अगदी प्रोफेशनली - पैसे, इतर लाभ याच्या वाटाघाटी करुन. या काळात पैसे हातात आले की मंडळं मग ठरवतात कुठल्या उमेदवाराचे काम करणारे कार्यकर्ते शेवटपर्यंत टिकतील अन मग इतर उमेदवारांच्या बरोबर प्रचारात फिरणारे कार्यकर्ते हळुच गल्लीत शब्द फिरवतात - अमुक अमुक उमेदवारच आपल्या मंडळाचा खरा माणुस. दरम्यान मंडळं अन कार्यकर्ते जमा खर्च मांडण्यात अन कमाई वाटुन घेतात. नंतर मग मतदान होते अन मतमोजणीपण अन उभ्या राहिलेल्या पन्नास उमेदवारातलाच कुणी जिंकतो. विजेता समजतो आपण लय भारी अन हरलेले सगळे कुणी गद्दारी केली ते शोधत बसतात. मंडळं, कार्यकर्ते अन अगदी कधी नाही ते गांधी-हजारे चा सहवास मिळालेले मतदार मात्र खुशीत हसतात, मिस्कील गालातल्या गालात. शेवटी जिंकलेले तेच तर असतात ना!
प्रसन्नदाशी सहमत.
जाहिर अणि ओपन प्रचाराची मुदत मतदानाच्या आधी २ दिवस संपते, मग सुरु होता खरा प्रचार आणि सेटिंग वगैरे ...
एक आठवण सांगतो...
पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्वाचा आणि हायप्रोफाईल्ड मतदारसंघ, गेल्या २-३ वेळा तिकडुन निवडुन गेलेला एका राष्ट्रीय पक्षाचा एक तरुण रक्ताचा आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेला एक नेता. ऐनवेळी पारडे फिरते आणि ह्याचे तिकीट वरुन कापले जाते, विरोधी पक्षाकडुन लागोलाग ह्याला तिकीट मिळतेच व सर्व तयारीनिशी नवी रसद घेऊन आपल्या जुना पक्ष शहरातुन उखडुन फेकायचा ह्या निर्धाराने मैदानात उतरतो. नव्या कार्यकर्त्यांच्या जोशात प्रचाराच्या काळात मैदान अलमोस्ट मारले गेले असते. समोर उभा असतो तो त्याच्याच जुन्या पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, गाजावाजा सोडा पण त्याचे नावही बर्याच जणांना नवे असते. समोरच्याच्या धडाक्यासमोर ह्या नवख्या उमेदवाराचे व त्याच्या प्रतिष्ठित पक्षाच्या तोंडाचे पाणी पळाले असते.
प्रचाराची मुदत संपते ...
त्याच रात्री केंद्रात असलेला जुन्या पक्षाचा राज्याचा एक वजनदार व सर्वसामान्य जनतेवर प्रभाव असलेला एक महत्वाचा नेता शहरात दाखल होतो. रात्री जेवण वगैरे झाल्यावर परिस्थीतीचा अंदाज घेऊन ४ विश्वासु कार्यकर्ते बरोबर घेऊन हा मोहिमेला निघतो. त्याआधीच ठिकठिकाणच्या गणपती/दहीहंडी मंडळांना, नागरी समित्यांना, तालमींच्या उस्तादांना, सोसायट्यांच्या सचिवांना हा "नेता" येत असल्याचे निरोप परस्पर पोहचवले जातात. हा जाईल तिकडे लोकांचा घोळका जमलेला असतो, ५ मिनीटात कुणाला काय हवे काय नको ह्याची चौकशी करुन व ते देण्याचे लोकल कार्यकर्त्याला सुचना देऊन हा पुढच्या गल्लीत निघतो, एका रात्रीत निम्मा मतदारसंघ पिंजुन काढतो. अनेकविध गटातल्या लोकांना भेटलो, गप्पा मारतो, देण्याघेण्याचे ठरवतो, कुणाकडुन "तंबाखु घे रे, पान लाव , २ च्या सांग" अशी जवळीक साधतो. कार्यकर्त्यांबरोबर दुकानाच्या फळीवर बसुनच स्टिंग लावले जाते. सर्व काही उरकुन मतदानादिवशी हा परत शहराबाहेर जातो.
रितसर मतदान होते, जुन्या पक्षाचे डिपॉझीट जप्त होणार अशी त्या पक्ष सोडलेल्या दिग्गज नेत्याची खात्री असते.
रिझल्ट येतो, लोकांनी ह्या दिग्गजाला डावलुन जुन्या पक्षाच्या अगदीच नवख्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवले असते ...
कशामुळे ?
हा सगळा करिष्मा त्या रात्री मारलेल्या रपेटीचा व केलेल्या "खर्या प्रचारा"चा, तो नेता ह्यासाठी फारच प्रसिद्ध, पुन्हा एकदा त्याने आपला करिष्मा दाखवला असतो ...
असो.
बाकी मोडकांचा लेख नेहमीप्रमाणे भारीच.
शिवाय अगदी वेळेवर आला आहे, पुलेशु, आम्ही वाचतो आहोत व आम्हाला आवडते ही आहे ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
आहे अदिती. त्या जाहिराती भाषणे वगैरेचं महत्व फक्त मध्यमवर्गीयांपुरतेच असते.
असं बघ! बहुसंख्य मध्यमवर्गीय माणसं राजकारणी सगळे चोर, भ्रष्ट असे समजतात. (अन ते काही अंशी खरे पण आहे.) त्याचबरोबर आपण नोकरशहा मधे किमान काही कार्यक्षम अधिकारी असतात असे समजतो. (हे पण काही अंशी खरे आहे.)
आर्थिकदृष्ट्या सबल, धनाढ्य वर्ग सरसकट सगळेच भ्रष्ट आहेत, प्रत्येकाला त्याची किंमत मोजुन खिशात टाकता येते असे समजतो (अन ते ही खरे आहे.)
पण हे दोन्ही वर्ग मिळुन एकुण लोकसंख्येची फारच थोडी टक्केवारी होते. कष्टकरी, गरीब जनतेचे प्रमाण त्यांच्यापेक्षा फारच कमी असते अन त्या जनतेशी वरील दोन्ही वर्गांचा फार वरवरचा संबंध येतो. (जेव्हढा आपला आपल्या घरात काम करणार्या मोलकरणीशी येतो तेव्हढाच.) हा जो कष्टकरी, गरीब वर्ग असतो ना त्याला नाडणारे लोक एकतर धनाढ्य उद्योगपती असतात किंवा सरसकट सगळे नोकरशहा. त्यातल्या धनाढ्यांकडुन होणारे शोषण, अन्याय सर्वच समाज सहन करतो कारण त्याला पर्यायच नसतो. पण नोकरशहाकडुन जो अन्याय होतो तो जीवनावर अधिक मूलगामी परिणाम करणारा ठरतो. जे तथाकथीत स्वच्छ नोकरशहा आपल्याला वाटतात ते अनेकदा कष्टकरी जनतेला कर्दनकाळ वाटतात. अन मग त्या जनतेला अश्या वेळी राजकारणी अधिक जवळचा वाटतो. शेवटी राजकारणीच त्यांच्या अडचणींवर उपाय काढतो. रेशनकार्ड हवे, भेटा नगरसेवकाला... लाईट गेले, भेटा नगरसेवकाला.... असे चालते ते. शिवाय राजकारणी पाच वर्षे जे पैसे खातो त्यातला काही वाटा अश्या निमित्ताने समाजात परत येतो नोकरशहाने घेतलेले पैसे तो एकटाच खातो. मग जो मिळुन वाटुन खाणारा असतो त्याच्यामागे अशी जनता उभी रहाते.
पैसे देऊन मते खरेदी करण्यामागे बहुतेकदा या परिस्थितीचा मोठा हात असतो. अन ही गरीब, अशिक्षित, कष्टकरी जनता आपण समजतो तशी भोळीभाबडी, अजाण नसते तर ती हा सर्व विचार करुन मतदान करते. अनेकदा मला वाटते भारतात अद्याप जे लोकशाही, कायदा वगैरे अजुन टिकुन आहे ना ते या अश्या जनतेमुळेच.
पुनेरी, तुम्ही म्हणताय ते अगदी पटेश. बाकी मोडकसरांचा हाही लेख पुन्हा अस्वस्थ करणारा. यातून मी जवळून पाहिलेली एक निवडणूक आठवतेय. जमलं तर त्यावर लिहावं म्हणतोय.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
जोरदार लेख आहे.
तुमच्या नोंदी वाचनीय असतात.
आता दादा जिंकणार की अण्णा याची मलाही तितकीच उत्सुकता लागून राहिली आहे. निकालानंतर (निदान खरड किंवा व्यनि ने)कळवाच.
"Great Power Comes With Great Responsibilities"
नेहमीप्रमाणेच आवर्जून वाचाव्याशा! तसा राजकारण हा मनापासून आवडणारा विषय नाही, तरीही श्रावणदांचा लेख वाचल्याशिवाय पुढेच जावं वाटत नाही. घाशीराम म्हणतात, त्याप्रमाणे लिहीत रहा!
अवांतर : नेत्यांच्या लेकरांनी पण नेताच व्हावं असा काही अलिखित नियम आहे का आपल्याकडे? अलिकडे जरा जास्तच शंका येतेय!
क्रान्ति
अग्निसखा
अण्णा दादांची स्पर्धा भारी...
वाचतोय..
आता २२ तारखेला या मतदारसंघावरती लक्ष ठेवून राहीन
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
प्रतिक्रिया
चांगला
अजून येउदे
सुन्न करणारे चित्र
>>पैसे खाउन
मोडक परत
नादलेस
सॉलिड
!!!
सहमत !
सुरेख
निवडणुकांचे व्यवस्थापन
प्रचारामागचा प्रचार ...
हं ...
हा पण विकासच....
अस्वस्थ
छान.
_____________________________
नोंदी
+१ असेच
अण्णा
केवढी
एकदम
एकदम
गुंतागुंत