तद्दनबाई गेली...................................!
शीर्षकांत शेवटी पूर्णविरामांची लांबलचक गाडी असल्याशिवाय वाचकांना लेख उघडून पहावासा वाटणार नाही, अशी भीती इथे अनेक लेखकांच्या मनात आहे असे अलिकडे दिसून येते. ह्याच भीतीचा कासरा धरून, मीही तसेच केले आहे.
तर तद्दनबाई गेली. कधी ना कधीतरी ती, आपल्या सर्वांप्रमाणे जाणार होतीच. पण तरीही तिचे जाणे मात्र माझ्या मनाला लागले. कारण एक जमाना तिने काय गाजवलाय म्हणता!