मोठ्यांचे मोठेपण आणि त्यांची विनम्रता!
विश्वविहार करताना नारद मुनी एकदा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात पोहोचले.निरनिराळ्या वयातील विद्यार्थी तिथे बसून अभ्यास करत होते. त्यातील काही विद्यार्थी ७०-७५-८० वर्षांचे होते. ते पाहून नारदांना गम्मत वाटली. ते वसिष्ठ ऋषींना म्हणाले, "माझा शिष्य ध्रुव (ध्रुव तारावाला) याला तर मी थोड्याच काळात अढळ पदावर पोहोचवले पण तुमचे हे शिष्य संपूर्ण आयुष्य घालवून काहीच मिळवू शकले नाहीत. गुरु म्हणून तुम्ही त्यांना काय मिळवून दिले?"
वसिष्ठ ऋषीं त्यांना नम्रपणे म्हणाले, "आपण देवर्षी नारद आहात, तुमची आणि माझी बरोबरी कशी बरे होऊ शकेल?"