साहित्यिक

मोकलाया दाही दिश्या ते भटकाया दाही दिश्या : एक प्रवास

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
6 Oct 2015 - 3:33 pm

(ढेस्क्लेमर: या लेखातून माझा कुणालाही हिणवण्याचा अथवा दुखावण्याचा हेतू नाही. याउलट 'हसण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी हसणे' हा माझा हास्य'बाना' सर्वांपर्यंत पोचविण्याचा एक किंचीतसा प्रयत्न आहे! तरीही कुणाला माझ्या लेखातील/काव्यातील काही जागांना आक्षेप असल्यास कळवावे, दुरूस्ती किंवा तो भाग काढून टाकण्यासाठी संमंना सांगून प्रयत्न केला जाईल!)

न्मसर्कार म्हणडलि!

संस्कृतीकलाइतिहासवाङ्मयकथाकविताप्रेमकाव्यमुक्तकविडंबनव्युत्पत्तीशुद्धलेखनविनोदसाहित्यिकkathaaऔषधोपचारप्रवासशिक्षणमौजमजाआस्वादलेखप्रतिभाविरंगुळा

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
5 Oct 2015 - 9:10 pm
धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
2 Oct 2015 - 9:33 am

दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल.

तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५

वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता

स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा

कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे

फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम.

कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का?

(संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको)

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

दिवाकरांच्या नाट्यछटा

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
30 Sep 2015 - 11:01 pm

रामराम मंडळी!
शतशब्दकथा लिहून आणि वाचून आपणा सर्वांना भरपूर विरंगुळा मिळाला असेल.असाच काहीसा, पण शब्दमर्यादा नसलेला, मराठी साहित्यातला एक वेगळा अन जुना प्रकार म्हणजे दिवाकरांच्या नाट्यछटा. का कोणास ठाऊक, पण शतशब्दकथा आणि नाट्यछटा यांच्यात काहीतरी नातं- साम्य तरी आहे असं नेहमी वाटतं .

इतिहासवाङ्मयकथाभाषासाहित्यिकसमाजप्रकटनविचारआस्वादसमीक्षा

एक होती मुंबई.. ("Mumbai Fables")

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जनातलं, मनातलं
30 Sep 2015 - 1:18 pm

पोर्तुगीज व्यापारी लोकांची भारताला सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी मुंबई शहराचा पाया रचला. ते मुळात सक्तीने धर्मप्रसार करायला आले होते. १५०९ साली फ्रान्सिस्को अल्मेडाने मुंबई बेटावर पहिली धाड घातली आणि स्थानिक लोकांना लुटले. अनेकांना जबरदस्तीने किरिस्तांव केले. पुढे अशाच धाडी पडत गेल्या आणि १५३२ साली नुनो डाकुन्हाने गुजरातच्या सुलतानाला हरवून वसई काबीज केली.

मुंबईची सुरुवात ही अशी झाली.

इतिहासवाङ्मयसाहित्यिकसमाजसमीक्षा

मटणाचं कालवण! (शतशब्द्कथा)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
30 Sep 2015 - 12:07 pm

फाट्यावरच्या ट्रकमधून गर्दी सांडून ओघळ फुटल्यासारखी गाव आणि वस्त्यांकड निघालेली.
कलंडलेल्या उन्हातनं तिघी वस्तीकडं निघाल्या. गर्दीत मिसळू न देण्यासाठी सासूने त्या दोघींचे हात धरलेले!

भयानक दुष्काळ पडलेला! दुष्काळी कामावरूनच तिघी परतत होत्या. स्वयंपाकासाठी काय करायचं हा नेहमीचा प्रश्नही सोबत चालत होता. पण कुणीच काही बोलत नव्हत. मुक्याच जणू!

नेहमीच्या वळणावर तिघी थांबल्या. थोरली सून रस्ता उतरली, ढासळलेल्या पवळंवरून पलिकडं गेली. कंबरेच्या विळ्याने 'विचका' स्वयंपाकासाठी काढू लागली. अचानक पलिकडे एक बैल मरून पडलेला दिसला तसं दचकून तिनं मागं पाहिलं!

इतिहासकथासाहित्यिकसमाजजीवनमानराहणीभूगोललेख

क्षण

rutusara's picture
rutusara in जनातलं, मनातलं
29 Sep 2015 - 2:54 am

“सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत…की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा !”

पाडगावकरांची एक अत्यंत गोड कविता. पहिल्यांदा वाचली तेव्हा खूप आवडली. त्यानंतर प्रत्येक वेळेला त्याहून जास्तच आवडत गेली.

खरंच किती सुंदर कल्पना आहे. गाणं म्हणत जगायचं ….प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन गाणं.. आणि त्या गाण्याला जिवंत करतो आपण, आपल्या आजूबाजूची माणसं आणि आपले अनुभव! जेष्ठ कवियित्री शांता शेळके यांनीही म्हणून ठेवलंच आहे , “जीवनगाणे गातच राहावे …”

साहित्यिकजीवनमानविचारलेख

एका 'कोसला'प्रेमीचे प्रेमप्रत्र

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
29 Sep 2015 - 12:19 am

(हे विडंबन नव्हे, ही 'कोसला'ला दिलेली एक मन:पुर्वक छोटेखानी सलामी - जव्हेरगंज)

********

प्रती :- शंभरातील एकास...

प्रिये मी हा असा उकिडवा बसलोय. तुलाच पत्र लिहीत. बनियन बाहेर वाळत घातलाय. आंघोळ अजुन व्हायची आहे. साबणही संपलाय. तुझी खुप आठवण येते. उदाहरणार्थ बादलीत पाणी वगैरे काढलयं.

सकाळी तुला बघितलं. भाजी मंडईत. घासाघीस करत होतीस. गुलाबी परकर पोलकं चांगलं होतं. बरी दिसलीस. मी तिथेच शेजारी ऊभा होतो. उदाहरणार्थ झिपऱ्या वगैरे नीट बांधत जा.

साहित्यिकसमाजमौजमजाप्रकटनलेखप्रतिभाविरंगुळा

ll गंगास्मरण ll

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
26 Sep 2015 - 1:11 am

सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो.
(जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे!

तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती
तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती

तू कल्याणी, नीरदायिनी
तुलाच नमितो सांबसदाशिव,
हरहर गंगे तुलाच स्मरती
भगिरथाचे पुत्र चिरंजीव

प्रकटयोगिनी बिकटगामिनी
तुझ्या तटाचे कडे निसरडे….
कितीक आले गेले भुलले
तुझ्या किनारी शांत निमाले

कविता माझीभावकवितासांत्वनाकरुणमांडणीवावरसंस्कृतीइतिहासवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोल

एक पूर्ण ताट

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
17 Sep 2015 - 1:23 pm

“या आजोबा बसा, काय हवय आपल्याला?”
“थकलोय हो, खूप भूक लागलीय. काही खायला असेल तर द्या ना.”
“कसली भूक?”
“कसली म्हणजे? भूक काय वेगवेगळी असते?”
“हो आजोबा या हॉटेलात येणाऱ्या प्रत्येक माणसाची भूक वेगळी असते. कुणाला ज्ञानाची भूक, कुणाला मनोरंजनाची भूक तर कुणाला फक्त मैत्रीची भूक.”
“बापरे कठीण आहे एकंदरीत सारा प्रकार. इथे निदान पाणी तरी मिळेल का?”
“मिळेल ना. कुठले पाणी हवेय आपल्याला काव्याचे कि साहित्याचे?”
“अहो मला खरच भूक लागलीय हो. त्या कट्ट्यावरची माणसे म्हणत होती इथ मिनिटा मिनिटाला जिलब्या पडतात. ते ऐकूणच मी माझी भूक भागवायला इथवर आलोय.”

मुक्तकसाहित्यिकप्रकटनविचारविरंगुळा