गद्य-पद्य
ताव मारीता जीभेने, विसरुन सारे ते पथ्य
बळ लाभता ओठांना, सुरसुरते ते मद्य
भाव उधळता मनाने, तोडून सारे जे बंध्य
कळ लागता जीवाला, सरसर सुचते ते पद्य
ताव मारीता जीभेने, विसरुन सारे ते पथ्य
बळ लाभता ओठांना, सुरसुरते ते मद्य
भाव उधळता मनाने, तोडून सारे जे बंध्य
कळ लागता जीवाला, सरसर सुचते ते पद्य
हरवलेले ते सापडले
सापडले हरवल्यानंतर
हरवले सापडण्याआधी
कळाले सापडल्यानंतर!
तेच होते ते जरी
ते न राहिले तसे तरी
हवे होते ते तसेच तेव्हा
कळाले सापडल्यानंतर!
भाव पुसा बाजाराला
दाम जरी ना लाविला
अनमोल ते आहे खरे
कळाले सापडल्यानंतर!
शब्दांचा ना लागे ठाव
जरी दोन अक्षरांचा गाव
'सुख' म्हणती सारे त्याला
कळाले सापडल्यानंतर!
- संदीप चांदणे
आणि तो दिवस पुन्हा खूप दिवसांनी येतो,
उगाचच खूप मोठे झाल्याचे भासवतो,
मित्रांच्या शुभेच्छा संदेश पहात भूतकाळात रमवतो,
शाळेच्या वर्गात, क्रिकेटच्या ग्राउंडवर, मंदिराच्या पायऱ्यांवर, रेल्वेच्या क्रॉसींगवर, गावच्या नदीवर,
कधी धरणावर तर कधी विष्णूच्या तळ्यावर फक्त मनानेच हुंदडत असतो,
पाणावलेल्या डोळ्यांत एकच प्रश्न अनुत्तरीत असतो,
आपण उगाचच एवढे मोठे का होत असतो,
आणि तो दिवस पुन्हा खूप दिवसांनी पुन्हा येतो.
इतिहासाच्या तासाने आम्हाला फारच छळले,
पानिपतच्या लढाईत कोण जिंकले,कोण हरले,
हे शिकून तरी काय कळले,
आयुष्याच्या इतिहासात खरे तेच यशस्वी ठरले,
ज्यांनी आपल्या शत्रूचेही मन जिंकले.
भूगोलाच्या तासाला नाही कळले चंद्र व सूर्यग्रहण,
विधात्याने निर्मिले 'मानव' हे क्षुद्र उपकरण,
ऊन-सावलीच्या खेळाने करतो तो स्वतःचे मनोरंजन,
त्याच्या अचाट क्षमतेने झालो थक्क नि गेलो भांबाबून.
पुण्यात शनिवारवाड्यासमोर जो पुल आहे ना
तिथे खुप गर्दी असते, गोंगाट असतो
डुप्लिकेट पीनांचे चार्जर तिथे मिळतात
ते अगदीच टाकाऊ असतात
मला तो भाग आवडत नाही
स्वारगेटला तुडुंब भरलेल्या पीएमटी बघितल्यावर मला भोवळ येते
चिंचवडला प्रशस्त महामार्गावरील हॉटेलात पावाबरोबर फरसाण्याची भाजी खाल्ल्यावर मला अशीच भोवळ आली होती
तेव्हापासून मिसळपाव हा पदार्थ मी व्यर्ज केलाय
झालेय आता सासुरवाशीण तरी आई तुझ्याकडे यायचंय
आई तुझ्याकडे यायचंय , मला परत लहान व्हायचंय
नाही सहन होत ग आता जबाबदारीच ओझ
तुझ्या कुशीत शिरून मला खूप खूप रडायचंय
नाही इथे कुणालाच माझ ऐकायचंय
मनात साठलेलं तुलाच फक्त सांगायचंय
पुन्हा तुझी आळशी मुलगी मला बनायचंय
पुन्हा मला उशिरा पर्यंत लोळायचय
तुझ्या हातच गरमगरम जेवायचंय
इथे कुणाला माहीतही नाही मला काय आवडत,
सासुरवाशिणी साठी नसतो हा नियम जाणलंय मी
तरीही आई मला तुझ्याकडे यायचंय
मला तुझ्याकडे यायचंय आई, मला पुन्हा लहान व्हायचंय .
होईल का ग हे शक्य नाही ना !!!!
एक योद्धा होता तो
शून्यातून सगळं विश्व निर्माण करणारा योद्धा
जो हात तो धरायचा
त्या मनगटांमधे जोर यायचा
जो माणूस तो जोडायचा
तो पोलादी होऊन जायचा
हजार हत्तींचं बळ दिलं होतं त्याने एका मरगळलेल्या पिढीला
ईतकं की पुढे दोनेक पिढ्या
पेटत राहिले होते ते निखारे
त्याच्या स्वतःच्या आतलं वादळ
त्याने भिनवून टाकलं होतं हजारो-लाखो नसांमधे
त्याने कधी कुणापुढे हात नाही पसरले
उलट जे हात पसरत होते
त्यांच्या धमन्यांमधे असं काही रक्त खेळवलं
की न भूतो असा पराक्रम घडवला त्या हातांनीही
येण्यास जन्मा थोडा उशीर झाला
अन जीवनी सगळाच गोंधळ झाला !
उशीर का झाला ?
गोंधळ का झाला ?
पूर्वजन्मीच्या जीवनाच्या जगण्याचा
करता करता हिशोब पाप-पुण्याचा
शोधताना चुका मागच्या जन्मांच्या
वेळ खूप गेला अन थोडा उशीर झाला....!
आता हिशेबात चुका नाहीत करायच्या
असा प्रामाणिक निश्चय मनाशीच केला -
स्फुर्तीदाते: मितभाषी आणि त्यांचे लाघवी मूल.
प्रश्न पहिला माझा,
रे गड्या मितभाष्या,
काय पिवुनि तुवा
वाजवला हा ढोल-ताश्या!
मूळ बघता सर्व वादांचे
असे बस फक्त पिण्याचे
अध्यात्म नाहीरे षंढाचे
हे तुज नाही कळायाचे.
भेद भावा तु बघ जरा
अज्ञानास फाडती टरा टरा
डोळे फिरवती गरा गरा
दंभ नाहीच इथे खरा
तुम्हा नसे त्याची प्रचिती
म्हणुनि त्या खोटा म्हणती
मनापासुनि ते ओरडती
अंधारासी मी एकच पणती.
जव्हेरजींच्या उदासीकडे बघून आमचेही दु:ख खदाखदा करत वर आले... ;) ;)
घरात जरा उदासच वाटलं
हापिसात काल, जरा मटणंच हाणलं
सायबाच्या स्टेनोला बघण्यात पण- पाणी प्यायचं राह्यलं!
बोंबलून-ओरडून जवा घसा कोरडा पडला
मेल्या जोश्यानं त्यात जगभर पाणीच कोंबलं!
यावर हसून तिनं माझ्याकडे पाह्यलं
सगळ्या रागाचं जणू 'पाणी-पाणी' झालं!