गाभा:
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार.
https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-cou...
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार.
https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-cou...
प्रतिक्रिया
15 Feb 2018 - 1:19 pm | manguu@mail.com
मुंबई: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांची परवानगी न घेताच दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांची अखेर सुटका झाली आहे. या खटल्यातून एसीबी कोर्टाने दोषमुक्त केल्यानं कृपाशंकर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/congress-leader-k...
15 Feb 2018 - 1:32 pm | जानु
अश्या निकालांमुळे सामान्य आणि अधिक सामान्य हे लोकांच्या मनात ठळकपणे अधोरेखित होते.
15 Feb 2018 - 2:36 pm | श्रीगुरुजी
कृपाशंकर त्या काळात आमदार असल्याने त्याच्यावर खटला दाखल करण्यासाठी विधानसभा अध्यक्षाच्या परवानगीची आवश्यकता होती. २०१४ मध्ये तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील (भ्रष्टव्याधी खांग्रेस) यांनी कृपाशंकरला वाचविण्यासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे न्यायालयाने त्याच्यावर खटला चालविण्यास नकार दिला आहे. एका अध्यक्षाने परवानगी नाकारल्यानंतर दुसर्या अध्यक्षाला परवानगी देता येत नाही. 'आदर्श' अशोक चव्हाणांवरील खटल्यासाठी राज्यपालांची परवानगी मागितली होती. तत्कालीन खांग्रेसी राज्यपालांनी चव्हाणांना वाचविण्यासाठी परवानगी नाकारली. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर नवीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी खटल्यासाठी परवानगी दिली. परंतु डिसेंबर २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने आरोपपत्रातून चव्हाणांचे नाव काढून टाकले. त्यावेळी हे कारण दिले की आधीच्या राज्यपालाने परवानगी नाकारल्यानंतर नवीन राज्यपालाची परवानगी कायदेशीर मानली जात नाही. कृपाशंकर असो वा चव्हाण, दोघांनाही तत्कालीन खांग्रेस-राष्ट्रव्याधी सरकारने वाचविले आहे.
15 Feb 2018 - 4:00 pm | आनन्दा
आयला यांनी जाता जाता कुठेकुठी पाचरी मारून ठेवल्यात देव जाणे.
15 Feb 2018 - 7:22 pm | कपिलमुनी
गुन्हेगार आमदार खासदार असला तरी परवानगी वगैरेचा नियम बदलायला हवा. पोलीस आणि न्यायालयासमोर सगळेजण सारखे हवेत.
15 Feb 2018 - 7:56 pm | सुबोध खरे
यात अजून वाईट गोष्ट म्हणजे आदर्श मध्ये प्रचंड घोटाळा आहे हे उच्च न्यायालयानेच मान्य केले असूनही केवळ राज्यपालांनी परवानगी दिली नाही म्हणून केवळ तांत्रिक कारणावरून त्यांच्यावर खटला भरता येत नाही.
वा रे कायदा
16 Feb 2018 - 12:12 am | manguu@mail.com
गोमांस , मशीद , मदरश्यात राष्ट्रगीत , ट्रिपल , नोकरीतले आरक्षण , व्हाट्सपवर प्रधानसेवकांच्या विरोधी लिहिल्यास शिक्षा, नोटाबंदी .. इ इ बाबतीत एका रात्रीत नवीन कायदे करणे आणि ते राबवणे जमते , मग हे का जमू नये ?
उपयोग काय त्या भौमताचा ?
16 Feb 2018 - 1:56 pm | सुबोध खरे
माहिती नसताना पिचक्या टाकणे सोडणार नाहीच का तुम्ही?
यासाठी कायदा केला तरी तो राज्यसभेत पास होणार नाही. तीन तलाक सारखा
आणि मुळात यासाठी घटना दुरुस्ती करायला लागेल म्हणजे २/३ बहुमत दोन्ही सभागृहात ते केंव्हा येईल तेही माहिती नाही.
मोदी सरकारने १२०० जुने आणि कालबाह्य कायदे रद्द केले
https://www.indiatoday.in/mail-today/story/narendra-modi-law-ministry-ra...
आणि काँग्रेसने १९८८ साली पास झालेला बेनामी मालमत्तेचा कायदा २८ वर्षे प्रलंबित ठेवला (का ते विचारू नकाच गडे!!)
आणि इथे तुम्ही फक्त फुसकुल्या सोडताय.
गोमांस , मशीद , मदरश्यात राष्ट्रगीत , ट्रिपल , नोकरीतले आरक्षण , व्हाट्सपवर प्रधानसेवकांच्या विरोधी लिहिल्यास शिक्षा, नोटाबंदी .. इ इ बाबतीत एका रात्रीत नवीन कायदे करणे आणि ते राबवणे जमते
हे सर्व कायदे होतेच
फक्त या सरकारने अंमलबजावणी सुरु केली
गोवध हत्याबंदी तर आपल्या घटनेतच घटनाकारांनी लिहिली आहे. आता सांगा डॉ आंबेडकर मूर्ख होते म्हणून.
16 Feb 2018 - 2:23 pm | manguu@mail.com
हो का ?
घटनेतच गोवधबंदी लिहिलेले असताना गोव्यात खुशाल गायी कापणारे दीदशहाणे म्हणायचे की काय ?
एका राज्यपालाने आदेश दिला की पुन्हा दुसर्या राज्यपालाने त्याबाबत आदेश देऊ नये , हा कायदा आहे की संकेत ?
16 Feb 2018 - 3:46 pm | सुबोध खरे
तुम्हीच शोधून सांगा बरं
16 Feb 2018 - 3:44 pm | manguu@mail.com
भाजपाने कायदा केला का नाही, असे विचारले की २/३ चे तुणतुणे वाजवत बँडवाले पळत येतात.
१९९१ नंतर ( कदाचित त्याच्याही आधीपासून ) नेमके कोणते सरकार २/३ बहुमतात होते ? तरी तेंव्हा काँग्र्सने अमका कायदा का केला नाही अन तमका का केला नाही, हे विरोधक विचारतच होते ना ?
तरीही नवे कायदे येणे अन जाणे होत होते ना ?
२/३ स्पष्ट बहुमत असलेले याआधीचे शेवटचे सरकार कधी होते म्हणे ?
16 Feb 2018 - 3:46 pm | सुबोध खरे
तुम्हीच शोधून सांगा बरं
16 Feb 2018 - 3:55 pm | manguu@mail.com
१९९१ पर्यंत शोधले, आता त्याच्यामागे शोधायला हवे .
16 Feb 2018 - 3:56 pm | सुबोध खरे
आता 1947 पर्यंत शोधा
15 Feb 2018 - 8:52 pm | manguu@mail.com
२०१६ साली नीरव मोदी घोटाळा प्रधानसेवकाना कळवुनही दोघे दावोसमध्ये एकत्र होते .
http://www.thehindu.com/business/congress-targets-pm-over-davos-photo-wi...
Targeting Prime Minister Narendra Modi for the presence of PNB (Punjab National Bank) fraud accused celebrity jewellery designer Nirav Modi in the Indian business delegation at Davos, Congress president Rahul Gandhi has said "being seen with the Prime Minister helped the businessman flee the country."
15 Feb 2018 - 8:53 pm | manguu@mail.com
http://www.thehindu.com/business/congress-targets-pm-over-davos-photo-wi...
15 Feb 2018 - 10:29 pm | बिटाकाका
सेलेक्टिव्ह रिडींगचं परत एक प्रदर्शन!! आपल्यालाच लिंक्स मधलं आपल्याला हवं ते वाचायचं आणि नको ते दुर्लक्ष! ते हरिप्रसाद काय म्हणाले ते वाचा परत!
https://m.timesofindia.com/business/india-business/pnb-fraud-nirav-modi-...
बाकी, डावोस च्या कार्यक्रमात कुणालाच नरेंद्र मोदींनी बोलावलं नव्हतं! ते तिथे यजमान नाही, अतिथी होते. आपल्या अंधभक्तना सुखवण्यासाठी थर्ड क्लास राजकारणाचं प्रदर्शन मांडणारे त्या निरव मोदींच्या प्रायव्हेट पार्टीत मश्गुल होते म्हणे.
काही माध्यमांनी मांडलेला आणि जालावर उपलब्ध असलेला घटनाक्रम -
२०११ - पहिल्यांदा लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आले. आणि इथून घोटाळ्याला सुरुवात झाली.
२०१८...
१ जानेवारी - निरव मोदी कुटुंबासकट देशाबाहेर
३ जानेवारी - पीएनबी ला संशयास्पद व्यवहार सापडले.
२३ जानेवारी - निरव मोदी मोदींसोबत डावोसमध्ये.
२९ जानेवारी - पीएनबी ने निरव मोदी विरोधात २८० कोटींच्या गैरव्यवहाराची तक्रार दाखल केली.
१४ फेब्रुवारी - पीएनबी ने अजून दोन तक्रारी दाखल केल्या आणि हा घोटाळा ११५०० कोटींच्या आसपास असल्याचे ईडी ला सांगितले.
माध्यमे ईडीने 5100 कोटींची संपत्ती जप्त केल्याच्या बातम्या दाखवत आहेत. शिवाय निरव मोदीने सहा महिन्यात पैसे परत करणार असल्याचे कळवल्याची बातमीही दाखवत आहेत.
असो, स्वतःच्याच नाकाखाली झालेले घोटाळे बाहेर निघाल्यावर घाईत आरोप करून नंतर तोंडावर आपटल्याचा हा काही पहिला प्रकार नाही.
15 Feb 2018 - 10:33 pm | बिटाकाका
सेलेक्टिव्ह रिडींगचं परत एक प्रदर्शन!! आपल्यालाच लिंक्स मधलं आपल्याला हवं ते वाचायचं आणि नको ते दुर्लक्ष! ते हरिप्रसाद काय म्हणाले ते वाचा परत!
https://m.timesofindia.com/business/india-business/pnb-fraud-nirav-modi-...
बाकी, डावोस च्या कार्यक्रमात कुणालाच नरेंद्र मोदींनी बोलावलं नव्हतं! ते तिथे यजमान नाही, अतिथी होते. आपल्या अंधभक्तना सुखवण्यासाठी थर्ड क्लास राजकारणाचं प्रदर्शन मांडणारे त्या निरव मोदींच्या प्रायव्हेट पार्टीत मश्गुल होते म्हणे.
काही माध्यमांनी मांडलेला आणि जालावर उपलब्ध असलेला घटनाक्रम -
२०११ - पहिल्यांदा लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आले. आणि इथून घोटाळ्याला सुरुवात झाली.
२०१८...
१ जानेवारी - निरव मोदी कुटुंबासकट देशाबाहेर
३ जानेवारी - पीएनबी ला संशयास्पद व्यवहार सापडले.
२३ जानेवारी - निरव मोदी मोदींसोबत डावोसमध्ये.
२९ जानेवारी - पीएनबी ने निरव मोदी विरोधात २८० कोटींच्या गैरव्यवहाराची तक्रार दाखल केली.
१४ फेब्रुवारी - पीएनबी ने अजून दोन तक्रारी दाखल केल्या आणि हा घोटाळा ११५०० कोटींच्या आसपास असल्याचे ईडी ला सांगितले.
माध्यमे ईडीने 5100 कोटींची संपत्ती जप्त केल्याच्या बातम्या दाखवत आहेत. शिवाय निरव मोदीने सहा महिन्यात पैसे परत करणार असल्याचे कळवल्याची बातमीही दाखवत आहेत.
असो, स्वतःच्याच नाकाखाली झालेले घोटाळे बाहेर निघाल्यावर घाईत आरोप करून नंतर तोंडावर आपटल्याचा हा काही पहिला प्रकार नाही.
15 Feb 2018 - 11:18 pm | जेम्स वांड
कोणी ११,००० कोटी रुपये चोरतोय अन कुठंतरी हुंड्यासाठी एक पोरगी स्वतःला पोरगं भासवून अजून दोन पोरींशी लग्न करतीये!
15 Feb 2018 - 11:21 pm | जेम्स वांड
आत्ता कुठं सरकार विरोधात बोंब ठोकायला विरोधकांना वातावरण तयार झालं होतं नव्हतं की प्रवर्तन निदेशनलाय (मराठीत ई डी) ने मोदी म्हणजे निरव मोदीची ₹५१०० करोड फक्त चे सोने नाणे हिरे जवाहिर अन स्थावर जंगम मालमत्ता अटॅच केली ! म्हणजे बघा, ५१०० कोटी ह्याचं किडुकमिडुक फुकुन आले अन ५६०० कोटी बँक री-कॅपिटलायझेशन प्लॅन मध्ये पीएनबीला अलॉट होणार होते! झाली की लेको रिकव्हरी सुरू अन समाप्त
16 Feb 2018 - 12:15 am | manguu@mail.com
काँग्रेस आणि इन्फोशिसचा आधार कार्डाचा निर्णय अगदी योग्यच होता.
त्याबद्दल त्यांचे अन ते राबवत असल्याबद्दल मोदींचे अभिनंदन.
15 Feb 2018 - 11:22 pm | सर टोबी
निरव मोदी व्यवस्थित देशाच्या बाहेर गेल्या नंतर तक्रार करण्यात येते यात तुम्हाला काहीही काळं बेर दिसत नाही? आर्थिक गुन्हेगारांना व्यवस्थित देशाबाहेर घालविण्याचा एक नावाचं पायंडा या सरकारने पडला आहे.
15 Feb 2018 - 11:26 pm | जेम्स वांड
क्वात्रोची प्रकरणात किंवा युनियन कार्बाईडचा वॉरन अँडरसन पळून जाण्यात झालेले पुढीलांचे पराक्रम पाहून ह्यांसी स्फुरण चढले असावे (असलेच तर)
15 Feb 2018 - 11:36 pm | श्रीगुरुजी
तक्रार ब्यांकेने केल्यानंतरच तपास यंत्रणा तपास करू शकतात. आधी ब्यांक, नंतर रिझर्व्ह ब्यांक आणि शेवटी तपास संस्था असा क्रम असतो. या प्रकरणात व आधीच्या मल्या प्रकरणात ब्यांकेने गुन्हेगारांना पळून जाण्याची संधी दिली आणि नंतरच तक्रार नोंदवली.
16 Feb 2018 - 1:33 am | अर्धवटराव
आर्थीक व्यवहारंवर नजर ठेवणार्या सरकारी उच्चपदस्थांना, पर्यायाने सरकारला असल्या घोटाळ्यांचा वास येत नसेल हे शक्य वाटतं. घोटाळेबाजांना ते घोटाळेबाज आहेत हे माहित असुनही देशाबाहेर जाऊ देणे हि सरकारी यंत्रणांची, पर्यायाने सरकारची चुक आहे. नो एक्स्क्युस.
16 Feb 2018 - 6:26 pm | सुबोध खरे
http://www.firstpost.com/business/pnb-fraud-upa-govt-couldve-avoided-nir...
16 Feb 2018 - 7:51 pm | अर्धवटराव
२०१४ पुर्वीचं राष्ट्रीय सुरक्षा, पीकपाणी, आर्थीक क्षेत्रातले कन्सर्न... या सर्वांचं ब्रीफींग मोदी सरकारला निश्चीत देण्यात आलं असणार. या घोटाळ्यांची खबरबात सरकारला नव्हती हे काहि पटत नाहि. अर्थात, याला पुराव्यांचा काहि आधार नाहि. सरकार नामक अजस्त्र यंत्रणा प्रत्येक क्षेत्राची इत्थंबूत माहिती ठेवते असं म्हणतात. नोटाबंदी वगैरे करण्यासोबत असल्या चालु आणि होऊ घातलेल्या घोटाळ्यांना चाप लावता आला असता असं एक नागरीक म्हणुन भाबडी आशा होती.
16 Feb 2018 - 8:02 pm | manguu@mail.com
नोटाबंदीच्या काळातच , त्या डिसेंबरातच नीरव मोदीच्या घरी कुणाचे तरी लग्न झाले. नोटाबंदीत देश तडफडत असताना ऊपरवाले की किर्पा से कार्य निर्विध्न पार पडले.
नीरव तेंव्हाच पळून जाणार होता , २०१६ साली.
http://www.wionews.com/india-news/this-is-how-nirav-modi-planned-his-saf...
17 Feb 2018 - 12:05 am | अर्धवटराव
पण त्यात आश्चर्य वाटण्यालायक काहि नाहि. इतका मोठा स्कॅम करणारा माणुस परतीचे मार्ग आखुनच पुढे जात असणार. सरकारी आशिर्वादाने अगदी राजरोसपणे असले एक्सीट यापुर्वी देखील झाले आहेत.
16 Feb 2018 - 7:38 am | बिटाकाका
उगाच असे कसे होऊ शकते, तसे कसे होई शकते यापेक्षा त्यांना भारतातून बाहेर न जाऊ देण्यासाठी सरकार कायद्याने काय करू शकत होते सांगा. ती बँक स्वतः सांगतेय की त्यांनाच ३ जानेवारीला पहिल्यांदा संशयास्पद व्यवव्हर, तेही २८० कोटींचे, सापडले. त्याच्या चौकशीत हा सगळा घोळ बाहेर आला तेव्हा २९ ला २८० साठी तक्रार दाखल करण्यात आली. ११५०० ची तक्रार १४ फेब ला करण्यात आली.
बाकी काही हजार कोटींच्या खालचे घोटाळे करायचेच नाहीत हा मागच्या सरकारने घातलेला पायंडा दुर्लक्ष करून आता त्या आर्थिक गुन्हेगारांना बाहेर घालण्याचा पायंडा आलाय वगैरे दाखविण्याचा आटापिटा कीव करण्याजोगा आहे असे मला वैयक्तिकरित्या वाटते.
असो, त्या आर्थिक गुन्हेगाराच्या प्रायव्हेट पार्टीमध्ये जाणारे, मोदी डावोसमध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून गेले असताना, सोबत फोटो कसा काय काढला म्हणून ओरडत आहेत हे पाहून खूप मौज वाटली. अपेक्षितच आहे म्हणा. जनता सब जानती है!
16 Feb 2018 - 3:30 pm | पुंबा
एका पक्षाच्या, विचारप्रणालीच्या दावणीला बांधले जाऊन अत्यंत असभ्य भाषेत भुंकणार्या ट्रोलांना मिपाईतके अनुकूल वातावरण अन्य कोठे असेल असे वाटत नाही. केवळ आपल्याला पटत नाही अश्या पक्षाला, विचारसरणीला गलिच्छ नावाने उल्लेखायचे प्रकार सहन कसे केले जातात काय माहित नाही. सन्मानपुर्वक चर्चा व्हायची हा इतिहासच म्हणायचा का?
16 Feb 2018 - 3:34 pm | प्रचेतस
अगदी खरे,
आणि दोन्ही बाजूंना असे लोक आहेत.
16 Feb 2018 - 3:39 pm | हतोळकरांचा प्रसाद
प्रचंड सहमत!
एकतर वेडंवाकडं बोला, किंवा डुआयडी म्हणा किंवा वैयक्तिक उखाळ्या पाखाळ्या काढा! कामातून थोडं बरं वाटावं, मत मांडता यावं म्हणून इकडे यावं तर आजकाल हि परेशानी! मजा नाय राव!!
17 Feb 2018 - 7:01 pm | राही
अधिकतर मिपावरच अशी भाषा आणि वैयक्तिक हल्ले दिसतात.
16 Feb 2018 - 3:45 pm | हतोळकरांचा प्रसाद
भाजपच्या नगरच्या उपमहापौराने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी अपशब्द बोलल्यामुळे वातावरणात तापल्याची बातमी मटा दाखवत आहे. (बातमी खरी असल्यास) भाजपला बुडवायला विरोधकांची गरज नाही. असले लोकच पुरेसे असल्याचे चित्र दिसत आहे.
16 Feb 2018 - 3:54 pm | manguu@mail.com
मटाला बातमी आहे. गुन्हा दाखल झाला आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/depu...
16 Feb 2018 - 4:45 pm | प्रसाद_१९८२
या भाजपाच्या लोकांना सत्तेचा कसला माज चढलाय ते या श्रीपाद चिंदमच्या बोलण्यातून दिसते.
थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापर्यंत मजल गेली यांची.
-----
----
https://www.youtube.com/watch?v=kBHfw2aQAsg
16 Feb 2018 - 6:16 pm | विशुमित
वा! काय सुसंस्कृत भाषा!! काय सुसंस्कृत पातळी!!!
.....
काय पार्टी विद डिफरेन्स!!!!
.....
काय त्या घोषणा!!! छत्रपती का आशीर्वाद, चलो चले खाजपके साथ!!!!
....
श्रीपाद छिंदम तुझं कसं रं काय, खाली मुंड वर पाय..!!
16 Feb 2018 - 7:10 pm | manguu@mail.com
साहेब फरार झालेत म्हणे.
भाजपाच्या काळात काहीही गंभीर घडलं की संबंधित लोक लगेच फरार होतात .
16 Feb 2018 - 7:32 pm | सुबोध खरे
काँग्रेसच्या काळात फ्रॉड केलेलय व्यक्ती तुरुंगात बसून मज्जा करीत आणि पैसे कधीहि परत आल्याचे दिसले नाही.
१९९२ साली हर्षद मेहतांच्या घोटाळा झाल्यांनतर पैसे परत आल्याचे किंवा त्याची मालमत्ता जप्त केल्याचे ऐकले नाही. २२०० कोटीच्या घोटाळ्यासाठी
त्यांच्यावर खटला भरून त्याना ५ वर्षाची शिक्षा झाली आणि त्यांना रुपये २५ हजार फक्त चा दंड झाला.
शेवटी विकिलिक्स ने हर्षद मेहतांचे १ लाख ३५ हजार कोटी एकंदर १३ खात्यात स्विस बँकेत आहेत असे उघडकीस आणले. (२०११).
"Black money in Swiss banks mainly from India". Wikileaks 88.80.16.63 Port 9999 (SSL enabled).
याचे पुढे काही झाल्याचे ऐकिवात नाही.
याउलट काल ११,००० कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यावर ताबडतोब कार्यवाही करून ५२०० कोटीची मालमत्ता जप्तही झाली.
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/pnb-fraud-ed...
असेच श्री मल्ल्या यांनी ९००० कोटी चा घोटाळा केला त्यापैकी ६६३० कोटी ची मालमत्ता जप्तही करण्यात आली आहे
http://indianexpress.com/article/business/enforcement-directorate-attach...
एवढे करूनही भाजप सरकारचीच नव्हे श्री नरेंद्र मोदींचीच सर्व चूक असते.
बढिया है
17 Feb 2018 - 12:28 pm | मार्मिक गोडसे
१९९२ साली हर्षद मेहतांच्या घोटाळा झाल्यांनतर पैसे परत आल्याचे किंवा त्याची मालमत्ता जप्त केल्याचे ऐकले नाही.
https://www.google.co.in/amp/s/m.timesofindia.com/city/mumbai/25-years-o...
17 Feb 2018 - 12:35 pm | सतिश गावडे
मी याच्या उलट वाचले आहे. त्याचे पैसे आयकर विभागाकडे आहेत आणि त्याची बायको ते पैसे मिळवण्यासाठी लढा देत आहे.
Harshad Mehta's wife fights to get back Rs 688 cr
Return my money, Harshad Mehta's wife tells I-T dept
17 Feb 2018 - 6:03 pm | मार्मिक गोडसे
आता भक्तही फेकू लागलेत.
16 Feb 2018 - 8:53 pm | विशुमित
https://www.facebook.com/mahancp.official.impupdates/posts/1207383952728571
16 Feb 2018 - 9:41 pm | मामाजी
भाजपाच्या काळात काहीही गंभीर घडलं की संबंधित लोक लगेच फरार होतात याचा साधा व सरळ अर्थ असा की काॅंग्रेस /यूपीए च्या काळात
करोडोंचे घोटाळे करून इथे रहायला काहीही भीती नव्हती. परंतू आपल्या मता प्रमाणे आता अशा घोटाळेबाजांवर फरार व्हायची पाळी आली आहे. असो, नकळत का होइना, आपल्या सारखा मोदींचा मनापासून द्वेष करणार्याने पण हे मान्य केले की मोदींच्या शासनात घोटाळेबाजांवर फरार होण्याशिवाय दूसरा पर्याय नाही.
19 Feb 2018 - 4:34 pm | मार्मिक गोडसे
घोटाले पहले भी हुए लेकिन क्या
• सत्यम वाला राजू भाग पाया?
• क्या सहारा श्री भाग पाया ?
• क्या आसाराम भाग पाया ?
• क्या तेलगी भाग पाया ?
• क्या हर्षद मेहता भाग पाया ?
• क्या हितेन दलाल भाग पाया ?
नहीं सब पकड़े गये और सबको इसी देश के कानून ने दण्ड दिया लेकिन अब ?
• ललित मोदी भाग गया
• माल्या भाग गया
• नीरव मोदी भाग गया
• नीशल मोदी भाग गया
• केतन मेहता भाग गया
• मेहुल चौकसी भाग गया
• जयेश भाग गया।
चौकीदार इनसे मिला हुआ है।
आए थे देश में विदेश से काला धन लाने।।
और विदेश को देश का सफेद धन भेजने लगे।।
जागो भारत जागो।
1
19 Feb 2018 - 4:49 pm | अनुप ढेरे
थापाथापी किती कराल?
गोडसेजी ललित मोदी कधी पळाला सांगा की वाईच?
आणि केतन मेहता कोणे नक्की? मला तरी सिनेमाचा डायरेक्टर केतन मेहता माहिती आहे.
16 Feb 2018 - 11:12 pm | manguu@mail.com
छिंदम पूर्वी काँग्रेसचा होता , मग तो भाजपात आला.
ही काँग्रेसची संस्कृती आहे म्हणे ...
भाजप्यानी त्याला शुद्ध् करुन तिकिट दिले , संघाची टोपी दिली , मग आता दगड त्यानाच मारतील ना ?
18 Feb 2018 - 3:38 pm | बिटाकाका
विशुमित साहेब,
अत्यंत संतापजनक प्रकार, मला खात्री आहे कि त्या व्यक्तीला योग्य धडा शिकवतील.
पण मी काय म्हणतो, पक्षाच्या एका व्यक्तीने असं काही केलं की तो पक्षाचा अजेंडा असल्यासारखं संस्कार वगैरे काढण्यात येतात. मग त्याच पक्षाचे हे खालील बातमीतील खासदार, शाळेतील मुलांचा संडास बंद आहे म्हटल्यावर स्वतःच्या हाताने साफ करतात तेव्हा तो किती संस्कारी पक्ष आहे असे म्हणण्यात काही अडचण असेल काय? अर्थात डबल स्टॅंडर्ड नसतील तर! शिवाय एखाद्या पक्षाच्या नेत्याने बलात्कार, शिवीगाळ, गुंडागर्दी केली तर त्या पक्षांचेही संस्कार काढण्यात येतात काय? आवश्यकता भासल्यास संदर्भ देण्यात येतील.
https://www.google.co.in/amp/s/m.timesofindia.com/india/watch-bjp-mp-cle...
19 Feb 2018 - 10:33 am | विशुमित
मला वाटतंय तुम्ही माझा प्रतिसाद पुन्हा चष्मा न घालता वाचला आहे.
खाजप नावाचा एक पक्ष " छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आला" आणि त्या पक्षाचे एक पाईक त्यांचा जाहीर अपमान करत आहेत.
पायिका बरोबर तुमच्या आवडत्या पक्षाची पण लोक लक्तरे वेशीला टांगणारच ना.
एका हाताने वाजणारे डब्लस्टन्डर्ड च डफडे वाजवण्या पेक्षा गळ्यात ढोल बांधा आणि दोन्ही साईडने बडवा. मी लेझीम बरोबर गजी डाव धरतो.
...
मी त्या संस्कारी खासदारांची बातमी वाचली नव्हती. सगळ्याच बातम्या वाचल्या पाहिजेत आणि त्या लगेच ताज्या घडामोडीवर चिटकवल्या पाहिजेत. प्रत्येक बातमीचा प्लस मायनस करून जर त्या नल्लीफय झाल्या तर त्या पक्ष्याबाबत, त्या विचारसरणी बाबत ब्र काढायचा नाही असा कोणता नियम नसावा मिपा वर.
बाकी त्या खासदारांचा आणि त्यांच्या संस्कारी पक्षाचा लय पुळका आला असेल तर अवश्य नवीन धागा काढा किंवा ताज्या घडामोडीवर ठळक अक्षरात प्रतिसाद टाकला असता तरी चालले असते.
मी चष्मा काढून नक्की पोच पावती देईन.
19 Feb 2018 - 11:03 am | बिटाकाका
होका, आता बातमी वाचली का मग ती? काय म्हणणं आहे मग त्या बातमी बद्दल? नाही मत म्हणून सांगा!
****************************
माझा आवडता पक्ष तुमच्या आवडीनुसार ठरतो हे मला माहितीच नव्हतं, हे भारी आहे.
****************************
महिलांना सुरक्षा देणार म्हणून १५ वर्षे सत्तेत असणाऱ्या सरकारच्या एका मंत्र्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होता म्हणे. एकतर सेमच लॉजिक किंवा (इतर वेळेससारखा)लॉजिकच्या डोक्यात ढोल घालायचा.
****************************
एका राष्ट्रीय पक्षाच्या एका अगदी नगरसेवक लेवलच्या माणसाने अतयंत घाणेरडा प्रकार (तुम्ही जाहीर म्हणताय) केला की लागले लोक लगेच स्वतःचे डबडे वाजवायला आणि पक्षाचे संस्कार काढायला. कोण कुणाचा ढोल वाजवतोय ते दिसतच आहे. पंधरा वर्षे सत्तेत राहून महाराजांच्या गडकिल्ल्यांची दुरुस्ती न करताना महाराजांबद्दलचा आदर कुठे जातो काय माहीत.
****************************
(एका विशिष्ट पक्षाच्या) लेन्सेस लावून फिरणार्यांना चष्म्याची गरज नसावी, त्यांनी न लावताही बातम्या वाचल्या तरी चालतील.
19 Feb 2018 - 12:16 pm | विशुमित
मी म्हणतो खाजप ला काही बोलले कि एवढा पुळका का यावा आपल्याला? काहीतरी आत्मीयता असल्याशिवाय उर भरून येणार नाही.
लांबलचक धागा काढा हो आपल्या आवडत्या पक्ष्याच्या कर्तृत्वाचा. त्यानंतर ठरवू लेन्सेस घालायचे का नाही ते!
दुसऱ्याच्या फाटक्या चड्ड्या कशाला दाखवत बसलात.
....
१५ वर्षाच्या सरकारचे मला कशाला सांगत बसलात? उगाच वडाची साल पिंपळाला जोडायची.
बादवे ३ वर्ष्यात किती गडकिल्ल्यांची दुरुस्ती आपल्या प्राणप्रिय संस्कारी पक्षाने केली याचा लेख जोखा देता का ?
स्मारक बनवण्यासाठी किती भराव टाकला समुद्रात आता पर्यंत, बातमीच यायची बंद झाली? आम्ही कसे मग यांचे गुणगान गायचे?
19 Feb 2018 - 12:58 pm | बिटाकाका
हाहाहाहा, आपल्याला (परत एकदा) मुद्दा कळलेलाच नाही. तो कोणता खाजप का काय पक्ष म्हणत आहात त्याबद्दल मी बोलत नाहीये. साहेब, आपली चिडचिड बाजूला ठेवा. आपलं लॉजिक मी सांगत आहे. तुम्ही त्या पक्षाचे संस्कार काढायला किंवा महाराजांबद्दलसाहित्य पक्षाची भूमिका ठरवायला जे लॉजिक लावलं, तेच लॉजिक तुम्ही इतर पक्षांना लावता का हा थेट प्रश्न तुमहाला विचारला आहे. याचं उत्तर नाही असेल तर, शेंम्बडं पोरागार्हही त्याला डबल स्टॅंडर्ड म्हणतात हे सांगेल.
***********************************
खाजप, आत्मीयता, उर, फाटकी चड्डी, प्राणप्रिय वगैरे शब्दांना अतिअवांतर सदरात टाकून फाट्यावर मारण्यात आलेले आहे.
***********************************
गडकिल्ल्यांच्या डागडुजीचे दर्शन घडवण्यासाठी आपल्याला वैयाक्तिक कॅपॅसिटीमध्ये निमंत्रण देण्यात येत आहे.
19 Feb 2018 - 2:46 pm | विशुमित
तुम्हाला नीट इस्कटून दाखवतो..
माझा मूळ प्रतिसाद--
वा! काय सुसंस्कृत भाषा!! काय सुसंस्कृत पातळी!!!== कोणाची? छिंदमची.
.....
काय पार्टी विद डिफरेन्स!!!!==>> हि पार्टी संस्काराचे सगळ्यांना धडे शिकवत फिरत असते. पण त्यांच्या नाकाखालील उपमहापौर अशी गलिच्छ भाषा वापरते. कोणत्या पार्टी आणि विचारसरणीचा आहे हे साहजिक लोक विचारणारच. आजकाल हीच पद्धत आहे नेत्यांचे मूल्यमापन करायची. तुम्हाला रुचले नसेल तर हे वाक्य तुमच्या लेखी फाट्यावर मारले असते तरी चालले असते.
.....
काय त्या घोषणा!!! छत्रपती का आशीर्वाद, चलो चले खाजपके साथ!!!!==>> निवडणुकीच्या वेळेस या घोषणा देऊनच सत्तेवर आले आणि त्यांचे पाईक काय भाषा वापरते हे उपरोक्त दिलेल्या विडिओ मध्ये ऐकलेच असेल. खाजापच तुमचा काही संबंध नाही हे (नाईलाजाने) तुम्ही जाहीर केलेच आहे, त्यामुळे या वाक्यावरून मी दुसऱ्या पार्ट्याना का झोडावे हे समजले नाही.
....
श्रीपाद छिंदम तुझं कसं रं काय, खाली मुंड वर पाय..!! ==>> याच्याबद्दल तुम्हाला आक्षेप नसावा असे तुमच्या प्रतिसादातून (सौम्य) दिसून आले आहे.
...............
<<<तुम्ही त्या पक्षाचे संस्कार काढायला किंवा महाराजांबद्दलसाहित्य पक्षाची भूमिका ठरवायला जे लॉजिक लावलं, तेच लॉजिक तुम्ही इतर पक्षांना लावता का हा थेट प्रश्न तुमहाला विचारला आहे.>>>
==>> का नाही लावणार? आणि कोणत्या पक्ष्याच्या/संघटनेच्या नेत्या-कार्यकर्त्याने एवढे हीन दर्जाचे उद्गार महाराजांविषयी काढलेत याची यादी देता का ? मी त्यांचा निषेद करायला आणि संस्कार काढायला मागे पुढे बघणार नाही.
महाराजांविषयी प्रेम असणारे किती जणांनी लगेच येऊन या गोष्टीचा निषेद केला मिपावर (त्यामध्ये तुम्ही पण येता)? २-३ जण सोडले तर कोणीच नाही.
कोणी निषेद का केला नाही हे मी विचारत नाही फिरणार. तो ज्याचा त्याचा प्रश्न.
फक्त विचारावे वाटते (तुम्हाला नाही ) आता कुठे गेले ते भिडे-एकबोटे-राजे? मोहीम उघडली नाही महाराष्ट्रभर?
19 Feb 2018 - 12:51 pm | विशुमित
<<<होका, आता बातमी वाचली का मग ती? काय म्हणणं आहे मग त्या बातमी बद्दल? नाही मत म्हणून सांगा!>>>
==>> काही विशेष वाटले नाही. संडासात हात घालून खूप मोठे झेंडे गाडले अशातला भाग नाही. असले काम वर्षानु वर्षे एक जातिसमूह करत आला आहे. आणि आता सुशिक्षित बेरोजगार (जातीविरहित) मॉल्स-ऑफिसेस मध्ये करताना आढळतात. मी त्यांचा आभारी आहे .
जनार्दन मिश्रा यांना यातून नक्की काय सांगायचे आहे? कि मी मिश्रा असून, खासदार असून देखील संडास मध्ये हात घालतो?
मुळात हि बातमी आणि छिंदमच्या बातमीची तुलनाच पटली नाही. चष्म्याचा नंबर व्यक्तिसापेक्ष वेगळा असू शकतो, यावर विश्वास असला तरी म्हशीला जिराफ म्हणायचे म्हणजे जरा अतीच होते.
19 Feb 2018 - 1:00 pm | बिटाकाका
म्हणजेच मुद्दा कळलेला नसताना आगपाखड चालू आहे.
******************************************
यातही जातीचा रेफेरन्स आणण्याचे कारण कळले नाही.
19 Feb 2018 - 2:54 pm | विशुमित
छिंदम प्रकरणात जनार्दन मिश्रांचे उदाहरण देण्याचे कारण कळले नाही.
कशाची तुलना करायची होती तुम्हाला?
म्हणजे चांगले केले तर ते फक्त खाजपमुळेच आणि गलिच्छ वागला की पार्टीचा काही संबंध नाही.
वाह्ह रे डबल ढोलकी..!!
19 Feb 2018 - 4:53 pm | बिटाकाका
म्हणूनच अजूनही म्हणतो, मुद्दा समजलाच नाही. ते डबल ढोलकी माझे लॉजिक नाही, ते तुमव्हे आहे त्यावर मी प्रश्नचिन्ह उभे करतोय.
****************************
जर पक्षाच्या एका कार्यकर्त्याने वाईट काम केले तर त्या पक्षाचे संस्कार काढत आहात, मग जर पक्षाच्या एका कार्यकर्त्याने चांगले काम केले तर पक्ष चांगला असे का नाही म्हणणार? यासाठी तुम्हाला एक चांगल्या कामाचं उदाहरण दिलं तर तुम्ही तिथे ते काम चांगले कसे नाही हे सिद्ध करण्यासाठी जात मध्ये आणलीत. हरकत नाही, दुसरे एखादे निर्विवादपणे चांगले काम पुढे आणले तर मग तरी ते वरचं लॉजिक लावणार का?
****************************
एका पक्षाच्या नेत्याने, बलात्कार केला तर तो पक्ष वरच्या तुमच्या लॉजिकने असंस्कारी पक्ष ठरतो की नाही?
****************************
असो, मुद्दाच मुळात समजला नसल्यामुळे (किंवा मी समजण्यात अपयशी ठरलो असे म्हणण्यास माझी हरकत नसल्यामुळे) पुढे मुद्दे मांडण्यात मुद्दा नाही. एका गलिच्छ विचारसरणीच्या माणसाला भाजपने हाकलून लावले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. बाहेरून घेतलेल्या फालतू लोकांमुळे किती किंमत मोजावी लागू शकते हे आतातरी भाजपच्या लक्षात आले असावे, नसेल तर...गॉड हेल्प देम!
- ताकाला जाऊन भांडे लपवणे संघटनेचा निषेधकर्ता बिटु (स्वाक्षरी स्टाईल :साभार, नाखु)
19 Feb 2018 - 5:12 pm | विशुमित
अच्छा चोर पोलिसांसारखा लुटुपुटुचा खेळ खेळायचा होता हे आधीच सांगितले असते तर बरं झाले असते. व्यनि वरती चर्चा होऊ शकली असती.
उगाच वेळ घालवला मी माझा.
ग्रोव उप. कॉम्प्ल्यन घायला सुरु करा.
19 Feb 2018 - 6:34 pm | बिटाकाका
त्येच म्हणलं मी आजून चिकलफेक कस्काय सुरू झाली न्हाय!
************************************
बलिशपणा वगैरे कुठे आहे तो दिसूनच येतोय, त्यामुळे ते एक फाट्यावर मारण्यातच आलेलं आहे.
************************************
अच्छा ग्रोन अप होऊन तुमच्यासार्की चिकलफेक कराची आस्ती व्हय, मंग राहुद्या! तुमीच बरं ग्रोन अप! आजून कॉम्प्लेन का काय नका पिऊ!
************************************
लॉजिकच्या डोक्यात शेवटी ढोलच!
16 Feb 2018 - 4:19 pm | manguu@mail.com
भारतात इतके कोटीकोटीचे घपले होत आहेत. काळा पैसा मिळाला आहे , कर वसूल होत आहे.
मग परदेशी देश गुंतवणूक करायला अजुन का पैसा देत आहेत ? गुंतवणूक हे चारिटी वर्क अजिबातच नव्हे. त्यावर त्याना returns ही अपेक्षित असणारच ना ?
जी गुंतवणूकीची गरज आहे , ती भारतातूनच पूर्ण होऊ शकत नाही का ?
16 Feb 2018 - 6:18 pm | सुबोध खरे
मग परदेशी देश गुंतवणूक करायला अजुन का पैसा देत आहेत ? गुंतवणूक हे चारिटी वर्क अजिबातच नव्हे. त्यावर त्याना returns ही अपेक्षित असणारच ना ?
तुम्हीच उत्तर द्या
16 Feb 2018 - 8:06 pm | दुर्गविहारी
लोक हो ! शांत व्हा आणि पुण्यातल्या या मिसळींचा आनंद घ्या. ;-)
पुण्यातील प्रसिद्ध मिसळींची खाद्यसफर
17 Feb 2018 - 11:23 am | manguu@mail.com
नीरव मोदीला LOU नेमके कधी आणि किती रकमेचे दिले होते ?
जानेवारी २०१७ च्या आसपासच जास्त रकमेचे LOU दिले होते ना ?
17 Feb 2018 - 7:17 pm | श्रिपाद पणशिकर
If you just connect the dots, observes the developments IT'S A TIP OF ICEBERG.
Splendid its a Masterstroke if you can read between the lines. More Names yet to come in light. राहुल बाबा च्या आजुबाजुचे जबर दलदलात ऊभे आहेत, ते जितकि धडपड बाहेर निघण्याचि करतिल तेव्हढेच अडकत जातिल. महत्वाच म्हणजे सरकार सुध्दा घाई करताना दिसत नाहि आहे. फुरसत मे है.
17 Feb 2018 - 7:23 pm | श्रिपाद पणशिकर
Nirav Modi was just a "Bait"
आता कॉंग्रेसला दंगे घडवण्याशिवाय किंवा मणी ला पाठवुन पाकिस्तानची मदत मागितल्या शिवाय त्यांच अस्तित्वच कठीण आहे. योगायोग हा आहे कांग्रेस पेक्षा दारुण अवस्था पाकिस्तानचि झालिय. पुढच्या आठवड्यात पाकिस्तान अधिकारीक भिखारी देश ठरेल.
17 Feb 2018 - 8:13 pm | manguu@mail.com
छान.
17 Feb 2018 - 8:23 pm | श्रीगुरुजी
नीरव मोदीच्या भामटेगिरीतही अपेक्शेप्रमाणे खांग्रेसच सामील आहे. अभिषेक सिंघवी, चिदंबरम्, राहुल अशी नावे बाहेर येत आहेत.
https://m.timesofindia.com/india/abhishek-manu-singhvi-refutes-sitharama...
18 Feb 2018 - 8:00 am | manguu@mail.com
ललित मोदीचा पासपोर्ट काँग्रेसनेच रद्द केला होता.
त्याने त्याचा पासपोर्ट मिळवण्यासाठी जी केस लढली , त्यात त्याच्या बाजूने सुषमा स्वराजांची मुलगी वकील होती.
http://indianexpress.com/article/india/india-others/sushmas-daughter-par...
18 Feb 2018 - 8:57 am | manguu@mail.com
18 Feb 2018 - 8:57 am | manguu@mail.com
पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा ताजा असतानाच आणखी एक महाघोटाळा उघड झाला आहे. पान परागचे संस्थापक एम. एम. कोठारी यांचे चिरंजीव आणि रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांनी पाच बँकांना चुना लावला असून सुमारे ५०० कोटी रुपये घेऊन फरार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कानपूरमध्ये हा घोटाळा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
......
*कोठारी यांच्या कार्याची दखल घेऊन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचा गौरव केला होता.*
..................
https://m.maharashtratimes.com/india-news/businessman-vikram-kothari-abs...
व्यापारी हू मै ... असे कुणीतरी बोलले होते.
18 Feb 2018 - 11:20 am | सुबोध खरे
व्यापारी हू मै ... असे कुणीतरी बोलले होते
कोण हो आणि कुणाला असं म्हणाले?
18 Feb 2018 - 12:31 pm | manguu@mail.com
चौकीदार हू ....
https://youtu.be/2azUk65IERw
18 Feb 2018 - 12:57 pm | श्रीगुरुजी
खांग्रेसी अभिषेक मनू सिंघवी आणि नीरव मोदी यांचं साटंलोटं स्पष्ट व्हायला लागलंय. भ्रष्टाचाराच्या इतर सर्व प्रकरणांप्रमाणे या प्रकरणामागे खांग्रेसी हातच दिसतोय.
timesofindia.indiatimes.com/india/singhvis-wife-bought-rs-1-5-cr-gems-from-nimo/articleshow/62965922.cms
18 Feb 2018 - 1:03 pm | अग्निकुंड
तुम्ही तुमच्या घरच्या वीजवापराचे मोठे बील भरत असाल तर तुम्ही कोळसा घोटाळ्यात सामील आहात.
तुम्ही २जी फोनचे मोठे बील भरले असतील तर तुम्ही २जी घोटाळ्यात सामील आहात.
तुम्ही ज्या बिल्डींग्मध्ये राहता तिथल्या कोण्या भाडेकरुने घोटाळा केला तर तुम्ही त्या घोटाळ्यात सामील आहात.
-इति लॉजिकाय विद्महे आरोपाय धीमही निर्मला मंत्री प्रचोदयात
22 Feb 2018 - 8:44 pm | डँबिस००७
५०० कोटीचा आणखी एक महा घोटाळा उघड झाला आहे.
५०० कोटीचा महा घोटाळा ?
आणखी एक फुसकुली !!
22 Feb 2018 - 8:52 pm | manguu@mail.com
नंतर तो ३ हजार कोटीचा झाला आहे.
28 Feb 2018 - 6:49 pm | गामा पैलवान
प्रा.डॉ.,
बहुधा भागवतांना ही परिस्थिती अभिप्रेत असावी.
आ.न.,
-गा.पै.