राज की समाज....... कारण?(कथा भाग 3 शेवटचा)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
9 Dec 2016 - 12:02 pm

--------------------------
दुस-या दिवशी सुगंधा आणि आण्णा साहेब जिल्ह्याच्या गावी जाऊन आले. आण्णांनी खरच काही दुकानातून बोलणी करून दिली आणि लगोलग ऑर्डर्स पण मिळवून दिल्या गोणपाटाच्या पिशव्यांसाठी. आण्णांनी सुगंधाला त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखिल नेल. ओळख करून देताना सुगंधाचे वडील आणि पति यांच्याबद्धल देखिल माहिती दिली.
आण्णा परतीच्या प्रवासात बरेच खुशीत होते. डाव त्यांच्या मना प्रमाणे साधला होता. सुगंधाला तिच्या संस्थेसाठी ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्यामुळे तिचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला होता. मोठ्या नेत्यांना देखिल आण्णांच्या कामगिरीचे कौतुक वाटले होते. आता संस्थेने सुरु केलेल्या व्यवसायाचा जम बसायला वेळ लागणार नव्हता. म्हणजे सुगंधा आता काही दिवसात निघून जाईल असा कयास आण्णांनी बदला होता. काही दिवसातच ही संस्था आपल्या हातात येणार याची स्वप्न बघत आण्णा खुशीत हस्त होते. ते दोघे गावात परत आले मात्र गावातलं वातावरण तंग आहे हे आण्णाच्या लक्षात आल. उदयने काही गडबड तर करून ठेवलेली नाही ना या विचाराने सुगंधाला गाडीतून उतरवून आण्णा वाड्यावर धावले.

वाड्यात शिरताच समोर उदयला बघून आण्णांनी त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरु केला. "उदय काय झालय नक्की? अरे एक दिवस तुझा बाप बाहेर गेला तर काय गोंधळ घातलात तुम्ही इथे? अरे किती दिवस बापाच्या जीवावर जगणार तू? जरा स्वतः काही करत नाहीस. आणि तुझीच सोय करायला गेलो तर इथे अजून घाण करून ठेवतोस काय?"

"ओ.. बाप आहात तर बापासारख वागा. तुम्ही इथे वाड्यावर बोलावून माझ्या शैलावर हात टाकलात का ते बोला..." उदयने आण्णाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत उलट त्यांच्या अंगावर धावून जात सवाल केला.

"हो... टाकला होता हात... पण सुटली साली रांड. सरळ येत नव्हती म्हणून इथे बोलावली होती. काय करशील?" आण्णा भडकून म्हणाले.

त्यांच्या उत्तराने उदय भलताच भडकला आणि म्हणाला,"बर झाल मला बहिण नाही... नाहीतर तुम्ही तिला देखिल सोडल नसत."

"ए भेनच्योद... आता गपतो का? की घालू ही गुप्ति तुझ्या नरद्यात्. गावात काय झालय ते बोल. कोणाच मयत आहे की काही घोळ झालाय ते सांग. बाकी गप् बसायच गुमान. समजलास?" अंगावर आलेल्या उडायला ढकलत आण्णा म्हणाले.

आण्णाचा अवतार बघून उदय थोडा वरमला आणि म्हणाला,"ती शैला गायब आहे वाड़यावरुन पळाल्यापासून."

उदयच्या बोलण्याने बेफिकीर होत आण्णा म्हणाले,"गायब तर गायब. दिला असेल जीव तिने. तू तुझी दूसरी सोय बघ. आणि जरा घरात आणलेल्या बाईकडे बघ. पाळणा हलवून टाक परत एकदा. एकदा पालिका निवडणुका आल्या की वेळ मिळणार नाही." त्यांनी तो विषय तिथेच संपवून टाकला.

दुस-या दिवशी आण्णांच्या कार्यालयात पोलिस चौकशिला आले. पण आण्णानी माहीत नाही म्हणून हात वर केले. शैलाच कोणीच नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी फाईल बंद केली.
------------
असेच दोन महीने गेले. संस्थेचे काम आता नीट चालायला लागले होते. सुगंधाने तिच्या परतीची तयारी सुरु केली. एक दिवशी अचानकपणे लक्ष्मीबाई आणि त्यांची सुन बाराच्या सुमाराला सुगंधाच्या घरी आल्या.

"अरे वहिनी आज इथे कुठे?" त्यादोघीना बघून सुगंधा आश्चर्याने म्हणाली.

"सुगंधा तू मला माझ्या मूली सारखी आहेस म्हणून आज तुझ्याकडे आले आहे. काल संस्थेत चर्चा होती की तू आता जाणार आहेस. अग अशी आम्हाला एकट सोडून जाऊ नकोस ग. अग माझ्या नव-याने आणि नालायक मुलाने गावातल्या अनेकांच्या आयुष्याची वाट लावली आहे. मी तर संपूर्ण आयुष्य फ़क्त नरक यातनाच् भोगल्या ग. तुझ्या रूपाने मला, माझ्या सुनेला आणि गावातल्या बायकाना आशेचा किरण दिसला आहे. पण तू गेलीस की हे आमच प्रामाणिक काम बंद होणार. माझा हलकट नवरा ही संस्था ताब्यात घेईल. म्हणून म्हणते जाऊ नकोस." हळव्या होत आणि सुगंधाचा हात धरत लक्ष्मीबाई म्हणल्या.

"वहिनी अहो मग तुम्ही काय शिकलात इतक्या महिन्यात? अहो थोडा आत्मविश्वास वाढवा. तुम्ही सर्व स्त्रीया एकत्र आलात तर उदय आणि आण्णा सारख्या नाराधमाला नक्की धड़ा शिकवू शकाल." सुगंधा त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हणाली.

"सुगंधा त्यांना राजकीय पाठबळ खूप आहे ग. तुला काय वाटत मी प्रयत्न केले नसतील? पूर्वी कधी कधी मला ते जिल्ह्यात घेऊन जायचे. तुला ज्या मोठ्या साहेबांकड़े नेल होत तिथे मला ही नेल आहे त्यांनी दोन-चार वेळा. त्यावेलील मी मोठ्या साहेबांच्या बायकोकडे आण्णांच्या अपरोक्ष गा-हाण घातल होत. तुला माहीत आहे त्या काय म्हणाल्या? म्हणे तुझ्या एकटीच्या दुःखापायी आम्ही काय आण्णाला देशोधडीला लाऊ का? हा घरातला प्रश्न आहे. जरा कुठे थोड़ सहन कराव बाई माणसाने. आण्णा पक्षाला पैसा पुरवतात. गावात काम आहे... पंचक्रोशित नाव आहे. जळणारी लोक असतात. लोकांच् ऐकून तू काही करु नकोस बर. एकटी पडशील. त्यानंतर साहेबांनी ह्यांना सांगितल मला जिल्ह्यात आणायच नाही. आम्ही वाड्यावर आलो आणि त्यादिवशी माझी जी पिटाई झाली की मला हॉस्पिटलमधे पंधरा दिवस ठेवाव लागल. साहेब-वहिनी येऊन गेल्या. आणि माझ तोंड कायमच बंद झाल. तुझ्या रूपाने मला आशेचा किरण दिसला आहे. माझ काय ग रहिलय. पण हिची माझ्या सुनेची काळजी वाटते." लक्ष्मीबाई पोटतिडकीने बोलत होत्या.

"वहिनी इतके दिवस काही का नाही बोललात? मला आता गेलच पाहिजे... पण तुम्ही चिंता करू नका. मी परत येईनच. नगर पालिका निवडणुका तोंडावर आहेत. आण्णा उदयला उभ करायची तयारी करत आहेत. त्यामुळे सध्या संस्थेच्या कामाला धोका नाही. तुम्ही दोघी संस्थेला बंद पडू देऊ नका. सर्व बायका एकजुटीने रहा. मी अजून काही महिने येऊन जाऊन असेनच. त्यामुळे आण्णा घाई करणार नाहीत. माझ्या मनात काही उपाय आहेत तुमच्या प्रश्नावर. माझ्यावर विश्वास ठेवा. बस आत्ता इतकंच सांगू शकते." सुगंधाने लक्ष्मीबाईचा हात हातात घेत त्यांना आश्वासन दिले.

"तुझ्यावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास आहे सुगंधा." अस म्हणून लक्ष्मीबाई सुनेला घेऊन निघाल्या.
-----------------------------
निवडणुकांचे वारे वाहायला लागले. त्यामुळे आण्णा आणि उदय उद्योगाला लागले. त्यांना सध्या संस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आणि तसही सुगंधा गेलीच होती. फक्त संस्थेच्या कामासाठी महिन्यातून एखाद-दोन वेळा येऊन जात होती. त्यामुळे निवडणुकीनंतर सगळा कारभार हातात घेऊ असा आण्णांनी विचार केला होता. सुगंधा जेव्हा केव्हा गावात येत होती तेव्हा तिला गावातल्या बायकांकडून सगळ्या खबरी कळत होत्या. पण ती शांत होती. आता बायकाच् काय पण गावातल्या पुरुषमंडळीना देखील सुगंधाबद्दल आदर निर्माण झाला होता. त्यांना देखील आण्णाची आणि उडायची आरेरावी नकोशी झाली होती. त्यामुळे बायकांच्या माध्यमातून या पुरुषमंडळीनी देखिल सुगंधाला भेटून आण्णापासून सुटकारा व्हायला मदत मागितली होती.

अपेक्षेप्रमाणे आण्णांच्या पक्षाने उदयला तिकीट जाहिर केले. उदयने जाऊन फॉर्म भरला. प्रचाराची रण धुमाळी सुरु झाली. फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. दुसरा पक्ष बहुतेक उमेदवार देणार नाही असे बोलले जाऊ लागले होते आणि त्या दिवशी अचानक वीस पंचवीस गाड्या गावात आल्या. दुस-या पक्षाचा उमेद्वार फॉर्म भरायला आला होता.... नव्हे आली होती.

शैला गायकवाड़! उदयच्या विरुद्ध याहुन चांगला उमेद्वार कोण असू शकत होता? आण्णा आणि उदय हड़बडले. गोंधळले. संपूर्ण निवडणुकीचे एकवीस दिवस स्वतः सुगंधा आणि तिचा IPS नवरा गावात ठाण मांडून बसले होते. शैलाच्या बाजूने सुगंधा उभी राहिली होती.

प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली. शैलाला समोर उभी बघून उदय भडकला होता. पण आण्णांनी त्याला शांत केला. निवडणुकी नंतर काय ते बघू असे त्याला समजावले. कारण आण्णांना त्यांच्या जिंकण्याबद्धल पूर्ण विश्वास होता. त्याच कारण देखील असच होत. अत्यंत खालच्या दर्जाचा प्रचार आण्णांच्या गोटातून चालु होता. त. शैलाच्या चारित्र्याबद्दल अत्यंत वाईट शब्दात पोस्टर्स लावले जात होते. घराघरात तिच्या आणि उदयच्या संबंधा बद्दलची वर्णनं लिहून टाकली जात होती.

सुगंधा मात्र शांत होती. तिने प्रचाराचे प्लानिग व्यवस्थित केले होते. गाव सोडलेली शैला आणि उमेद्वार शैला यात जमीन आस्मानाचा फरक होता. शैला भावनिक आव्हाहन अजिबात करत नव्हती. ती फ़क्त विकासाचा आराखडा आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलत होती. शैलाला एकूण पालिकेच्या कामाची व्यवस्थित माहिती होती हे दिसत होते. तिचा आत्मविश्वास वाखाडण्यासारखा होता.

आणि मग जसजसे दिवस उलटायला लागले तसतसे आण्णांना थोड़े टेंशन यायला लागले. त्या रात्रि आण्णा खूप उशिरा सभा संपवून आणि कार्यालयातले काम आटपुन वाड्यावर पोहोचले. समोरच उदय पीत बसला होता. ते बघुन त्यांचा पारा चढ़ला. त्यांनी चिडून त्याच्या कमरेत लाथ घातली.

"भाड्या मी इथे जीव काढतो आहे आणि तू आरामात पीत बसला आहेस? अरे मर्द असशील तर त्या शैलाला खेचून चौकात उभ कर आणि चाबकाने फोडून काढ़. अरे काहीतरी कर साल्या नाहीतर तू माझा मुलगा नाहीस." भडकून आण्णांनी वाड्याबाहेर हकलले.

उदयचे डोके अगोदरच फिरले होते. त्यात बापाने घातलेल्या लाथेमुळे तो अजुनच भड़कला. तसाच तिथून निघुन तो शैलाच्या घरी गेला. तिथे पोहोचेपर्यंत त्याने थोड़ा विचार केला. थोड़ डोक शांत केल आणि दाराची कड़ी वाजवली. शैलाने स्वतःच दार उघडले.

"तू?" शैलाने शांतपणे त्याच्याकडे बघत प्रश्न केला.

"शैला मला तुझ्याशी बोलायच आहे. जरा बाहेर येतेस?" उदय कमालीच्या शांतपणे बोलत होता.

"तूच ये घरात. तुला सवय आहे की या घराची आणि मला बाहेर यायची इच्छा नाही." शैला दारातून बाजूला होत म्हणाली.

"एकटीच् आहेस?" उदयने आत घरात नजर टाकत विचारले.

"हो" शैला शांतपणे म्हणाली.

उदयला आश्चर्य वाटले. आणि बर देखील. तो घरात आला आणि मग मात्र त्याचा पवित्रा बदलला. त्याने शैलाचे बखोट धरले आणि तिला खसकन स्वतःकडे ओढत म्हणला,"ए भवाने... फार चर्बी चढ़ली ग तुला. ज्यांच्या जीवावर उड़ते आहेस ते आयुष्यभर साथ नाही देनारेत तुला. साsssली रांड... गप गुमान पडून राहा एका कोप-यात निवडणूक होई पर्यंत. समजलिस? नाहीतरी तू हरणारच आहेस. मग बघून घेईनच मी तुला. कोण उभ राहील ग मग तुझ्या पाठीशी?"

"एssss तुझ्या आईच्या.... " त्याने धरलेला हात झटकत अचानक शैला कडाडली. "भेनच्योद तूझ्या औकातीत राहा.. समजलास? मी ती जुनी शैला नाही; जी तुला घाबरायची. कुठली ठस्सन देतोस् रे भाड्या? काय करणार तू मला? आणि माझ्या माग रडायला आहे कोण मला? इज्जत जी काही होती ती तू आन तुझ्या बापान कधीच वेशीला टांगली आहे. माझ्या नावाची पोस्टर्स लावत फिरता आहात ना ती कहाणी पुऱ्या गावाला अगोदरच माहित आहे. एक लक्षात ठेव.... मला ना आगा... ना पीछा... जिंकेन् की हारेन ते पुढच पुढे. पण मी राहणार याच गावात. तुझ्या नाकावर टिच्चून. हात तर लाव... नाय भर चौकात नागवा करून चाबकाने फोडला तर नावाची शैला नाही. चल चालता हो. मादरच्योद....... तुझ्या सारख्या नपुसकाला ज्याचा माज आहे तेच पायाने ठेचून तुझा जीव घेतला पाहिजे; म्हणजे पुढे भविष्यात तुझ्यासारखे नपुंसक नराधम जन्मणार नाहीत...."

शैलाचा आवाज टिपेला पोहोचला होता. बाजूच्या घरातले कार्यकर्ते, सुगंधा ... तिचा नवरा... सगळेच धावत आले. सगळ्यांना बघुन उदय घाबरला. धड़पडत मागे सरकत तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी गावात आदल्या रात्रीच्या प्रसंगाचीच चर्चा होती. पण शैला मात्र शांत होती. ती तिचा प्रचार करत होती. अनेकांनी तिला पोलीस कम्प्लेंट करायला सांगितले. पण तिने नकार दिला. मात्र एवढे सगळे होऊनही आण्णांचा विश्वास दांडगा होता. त्यांनी गावात पैसा वाटायला सुरुवात केली. आता हा फ़क्त हार-जीत चा प्रश्न नव्हता त्यांच्यासाठी. हा आण्णांच्या अस्तित्वाचा प्रश्न झाला होता. लोकहि म्हणत होते; काहीही झाल तरी आम्ही आण्णांच्या बाजूने आहोत. काल आलेली ही बाई गावाला काय देणार असेही असे म्हणत होते. शेवटचे दोन दिवस तर दारू-चिकन-मटणाचा जोर लावून दिला होता आण्णांनी. लोकं देखील शैलाच्या सभेला जात नव्हते आणि आपल्या घरच्या बायकांना देखील जाऊ देत नव्हते. तरीही शैला शांतच होती.

याच दुमश्चाक्रीत मतदान आले. गावातील प्रत्येक पुरुष आणि बाई मतदान केंद्रावर पोहोचते आहे की नाही हे आण्णा आणि उदय जातीने बघत होते.

................ आणि रिजल्ट लागला. पुन्हा एकदा आण्णा साहेबांचा विजय होऊन त्यांच्या साम्राजाचे पाय पक्के आणि कायमचे रोवले.................... जाऊ नयेत म्हणून गावातल्या लोकांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणत शैला गायकवाड़ला प्रचंड बहुमतांनी निवडून दिल होत!!!

चांगल्याचा वाईटावर विजय झाला होता.......

कथा

प्रतिक्रिया

ग्रेंजर's picture

9 Dec 2016 - 2:22 pm | ग्रेंजर

मस्त!!!!! पण लवकर संपवल्या सारखं वाटलं.

आवडली कथा. सुखांत असल्यामुळे जास्त भावली.

कथा आवडली. अजून रंगवता आली असती असे वाटले.

ज्योति अळवणी's picture

9 Dec 2016 - 7:39 pm | ज्योति अळवणी

तुमच्या प्रतिसादासाठी धन्यवाद. काहीशी सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळे मूळ गाभ्याशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करेल आहे. त्यामुळे लवकर संपल्या सारखी वाटते.

खटपट्या's picture

10 Dec 2016 - 12:18 am | खटपट्या

छान कथा. असेही लोक असतात हे ऐकून वाइट वाटले. अगदी चित्रपटात शोभावी अशी पात्रे आहेत...