भारतीय सैन्य आणि प्रांतिक सीमेचे शिक्के ...

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in काथ्याकूट
21 Aug 2016 - 12:38 pm
गाभा: 

आज टीव्हीवर १६ मराठा बटालियनच्या जवानांचे मनोगत ऐकत होतो तेव्हा एक गोष्ट जाणवली की भारतीय सैन्य हे मराठा गोरखा जाट अशा अनेक रेजिमेंटमध्ये विभागलेलं आहे...आपल्या लढाईत सगळे एकत्र येतात पण मग असे वर्गीकरण का ?देशाच्या सैनिकाला प्रांतिक सीमावादाच्या पलीकडे असायला हवं....अशा रेजिमेंटमुळे नक्की काय साध्य होतं ?

मुळात जर सैन्य भरतीसाठी हे वर्गीकरण असेल तर सैन्यात आल्यावर ते तसे असता कामा नये...कारण प्रांतिक सीमा मागे टाकून तो सैनिक भारतीय म्हणून आलेला असतो....

ब्रिटिशांनी जर हे रेजिमेंट बनवले असतील तर ते अजूनही हद्दपार का करण्यात आलेले नाहीत?

जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत !

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

21 Aug 2016 - 12:42 pm | संदीप डांगे

बापू उत्तर देतीलच

चंपाबाई's picture

21 Aug 2016 - 1:36 pm | चंपाबाई

ते पूर्वीच्या काळी ब्र्टिशानी निर्माण केले.

अगदी पूर्वी त्या त्या जातीच्या गटात तेच लोक असत.

आजकाल असे बंधन नाही.

पण ती नावे परंपरेने असल्याने व त्या त्या जातीला अभिमानास्पद वाटत असल्याने ती तशीच आहेत. त्यात काही गैरही नाही.

आता काही जातीच्या लोकाना उदा. समजा ब्राह्मण .. हे चुकीचे वाटते. तर त्यानीही सरकारला विनंती करुन ब्राह्मण बटालियन काढावी व सुरुवातीला काही वर्षे आपल्या जातीचेच लोक त्यात भरुन शौर्य गाजवावे.

मग कालांतराने नाव तसेच ठेवून सर्व जातीधर्माचे लोक त्यात भरावेत.

....

प्रत्येक गावात ब्राह्मणपुरी असते... पूर्वी त्यात फक्त ब्राह्मणच रहायचे ... आजकाल ब्राह्मण परगावी परदेशी उडाल्याने व त्या जागा बाकीच्यानीही विकत घेतल्याने सर्वच लोक त्यात रहातात.

पण गल्लीचे नाव मात्र ... आजही ब्राह्मणपुरीच असते.

...
तसेच हेही.

आनंदी गोपाळ's picture

21 Aug 2016 - 9:51 pm | आनंदी गोपाळ

The 1st Brahmans was an infantry regiment of the British Indian Army. It was raised at Oudh by Captain T Naylor in 1776 for service in the army of Nawab Wazir of Oudh, and was known as the Nawab Wazir's Regiment. It was transferred to the East India Company in 1777. In 1922, it was designated as the 4th Battalion 1st Punjab Regiment. It was disbanded in 1931.
<<

जौद्या ना?

आनंदी गोपाळ's picture

21 Aug 2016 - 10:01 pm | आनंदी गोपाळ

It was raised at Oudh by Captain T Naylor in 1776 for service in the army of Nawab Wazir of Oudh, and was known as the Nawab Wazir's Regiment.

म्हंजे, ही जी काय फर्स्ट ब्राह्मण इन्फंट्री रेजिमेंट आहे, तिला अ‍ॅक्चुअली अवधच्या नबाब वजीराची रेजिमेंट म्हणत असत. मग हिचं नांव फर्स्ट ब्राह्म्ण कुठून आलं वगैरे काही विकी संदर्भ?

एकंदरात,

Over the years the battalion was known by a number of different designations:

1776 Nawab Wazir's Regiment
1777 30th Battalion of Bengal Sepoys
1781 23rd Regiment of Bengal Sepoys
1784 29th Regiment of Bengal Sepoys
1786 29th Bengal Sepoy Battalion
1796 2nd Battalion 9th Regiment of Bengal Native Infantry
1824 21st Regiment of Bengal Native Infantry
1861 1st Regiment of Bengal Native Infantry
1885 1st Regiment of Bengal Infantry
1901 1st Brahman Infantry
1903 1st Brahmans

British and Indian officers of the 1st Brahmans, 1912.
1922 4th Battalion 1st Punjab Regiment

हे त्याच विकीत लिहिलेलेल आहे. ही अशी नांवे का बदलतात याबद्दल कुणी सांगेल काय? १९०१ ते डिसबँड होईस्तोवर १९३१.

बाकी स्वतंत्र भारताच्या सेनेत ही रेजिमेंट नाही. मला रेजिमेंट्स थोड्या स्कूल हाऊसेस सारख्या वाटतात. एकेमेकांवर जीव अवलंबून असणार्‍या सैनिकांत अस्मिता चेतविण्यासाठी दिलेली प्रतिके. आय मीन बापू सारख्या ऑथेंटिक सैनिकाने इथे त्यांच्या रेजिमेंटातील इतर भारतीय जाती/प्रांतातील लोकांबद्दल लिहिले आहेच की.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2016 - 10:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

हे त्याच विकीत लिहिलेलेल आहे. ही अशी नांवे का बदलतात याबद्दल कुणी सांगेल काय?

ह्याचा संबंध सरळ तत्कालीन इतिहासाशी आहे, प्रत्येक नावाखाली मला जे सर्वात probable अन plausible ऐतिहासिक कारण वाटते ते लिहितो मी

1776 Nawab Wazir's Regiment
(तैनाती सेना पर्व, ब्रिटिश/पाश्चात्य तालमीत तयार झालेल्या रँक अँड फाइल पद्धतीच्या पलटणी एतद्देशीय संस्थानिकांच्या तैनातीत सालीना तनख्यावर नियुक्त होऊ लागल्यामुळे, अन ह्या पलटणी त्या त्या राजवाड्याच्या खाशा अंगरक्षकांत असल्यामुळे, ती ओळख पटावी असे नाव)
1777 30th Battalion of Bengal Sepoys
(कंपनी बहाद्दूर ने पहिले पाय रोवले ते मद्रास अन कलकत्त्यातच (फोर्ट सेंट जॉर्ज अन फोर्ट विल्यम) तिथे त्यांची अजून जमीन बळकवायची करामत सुरु झाली, साहजिक आर्मीची गरज वाढू लागली अन लोकल लोक भरती केले गेले, नेटिव्ह लोकांची (बंगाल्यांची) तिसावी बटालियन म्हणून हे नाव आले असावे
1781 23rd Regiment of Bengal Sepoys
1784 29th Regiment of Bengal Sepoys
1786 29th Bengal Sepoy Battalion
हे आकडे बदलायचे कारण म्हणजे दरवेळी बटालियन/रेजिमेंटला अमुकच लोक असावेत असा नियम नसे, तर शत्रू किती मातब्बर आहे ह्यावर एखाद्या बटालियनची नफरी ठरत असे, असे जर दोन किंवा जास्त रेजिमेंट/बटालियन सम्मिलित झाल्या तर वरील प्रमाणे आकडे अन नावे रिवाईज होत असावेत
1796 2nd Battalion 9th Regiment of Bengal Native Infantry
1824 21st Regiment of Bengal Native Infantry
1861 1st Regiment of Bengal Native Infantry
1885 1st Regiment of Bengal Infantry
आर्टिलरी अन इनफंट्री मध्ये फरक करता यावा अन त्या रेजिमेंट अन बटालियन मध्ये भरती कुठले लोक झाले असावेत ते सांगणाऱ्या नावांची ही जंत्री वाटते
1901 1st Brahman Infantry
1903 1st Brahmans
त्या काळची एकंदरीत जातीव्यवस्था पाहता (उत्तर भारत अन बंगालकडली तर कायस्थ हे मुलकी सेवांत बरेच घुसलेले होते अन ब्राह्मण-भूमिहार हे फौजी सेवेत, म्हणून कदाचित ही नावे पडली असावी)

आनंदी गोपाळ's picture

21 Aug 2016 - 10:03 pm | आनंदी गोपाळ

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2016 - 2:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

मा. प. सर,

मला खरंतर ह्या विषयावर एक लेखच लिहायचा होता, पण वेळ साधेना, तरीही आता आपण विषय काढलाच आहेत तर एकाच मेगाबायटी प्रतिसादात जितके सांगता येईल तितके सांगतो.

प्रथमतः रेजिमेंट्सची नावे कशी पडली किंवा त्याला जाती कश्या संलग्न झाल्या? तर इथे हे लक्षात घ्यायला हवे की ईस्ट इंडिया कंपनीचं शासन होतं तेव्हा रेजिमेंट्सची नावे अशी जात आधारित नव्हती, तर प्रांतिक होती, उदाहरणार्थ बंगाल नेटिव्ह इनफंट्री, बॉम्बे नेटिव्ह इनफंट्री "काली पांचवी" (काळ्या/एतद्देशीय सैनिकांची पाचवी बटालियन) जाती आधारित रेजिमेंट्स आल्या 1871 नंतर त्याकाळी अपराधी , लढाऊ, वगैरे विभागात भारतीय जाती वाटल्या गेल्या होत्या, त्याकाळी अपराधी जमाती म्हणून नोंदवल्या गेलेल्या पारधी वगैरे जाती आजची तो शिक्का डोक्यावर घेऊन जगतात, तो भाग वेगळा, तर अश्या लिस्टस मध्ये एक भारतातल्या लढाऊ जमातींची लिस्ट सुद्धा तयार झाली होती, त्यात जाट, मराठा, शीख, राजपूत इत्यादी जमातींचा समावेश होता,पुढे त्या रेजिमेंट्स ची नावे जी पडली ती तशीच राहिली कारण भारतीय सेना आपल्या ट्रेडिशन खूप प्रेमाने जतन करते, गम्मत म्हणजे नव्या परंपरा आत्मसात सुद्धा करते, आज आपल्या वापरात असलेल्या दहीने मूड, पीछे मूड वगैरे कमांड पैकी बहुतेक सगळ्या इंडियन नॅशनल आर्मी ने डिझाईन केलेल्या कमांड मधून प्रेरित आहेत.

हा झाला थोडा इतिहास,

आता थोडे सध्याच्या स्थिती बद्दल,

सध्या रेजिमेंट्सची नावे जरी तीच असली तरी त्यांचे composition प्रांतिक नसते, मुळात जीसी (जेन्टलमन कॅडेट्स) जेव्हा आयएमए मधून पास होत असतात तेव्हा त्यांना चॉईस विचारतात पण पेरेंटल क्लेम नसेल तर सहसा रेजिमेंट अलोकेशन हे रँडोम असते, म्हणजे जसवंतसिंह ओबेरॉय नामक शीख अधिकारी मराठा लाईट इनफंट्रीला येतो तर विशाल हनुमंतराव देशमुख नामे पोरगा ग्रेनेडीयर्सला येतो, हे झाले अधिकाऱ्यांचे , रिक्रुट जवानांचे बोलायचे झाले तर नाव मराठा लाईट इनफंट्री आहे म्हणून फक्त मराठी जवान असतील असे नसते , गंमत म्हणजे ह्या "मराठा लाईट इनफंट्री" चे मुख्यालय विवावस्पद अश्या बेळगावी मध्ये आहे. मराठा लाईट इनफंट्रीची भरती जाहिरात निघते तेव्हा त्यात वेगवेगळ्या गावी भरती कॅम्प/मेळावे भरवले जातात, ते फक्त महाराष्ट्रात नसते तर जाहिरात नीट वाचल्यास ती भरती महाराष्ट्र, कर्नाटक, अन केरळचा काही भाग इतक्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गावात होते, त्याचे कारण म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या लोकांची फिजिकल बिल्डप वेगळी असते, तुम्ही गोरख्यांना लावत असलेले नियम पंजाबी लोकांस लावू शकत नाही, माझा एक जवळचा मित्र अधिकारी आहे आर्मी मध्ये पंजाब रेजिमेंटला टिपिकल सावळा असा पवित्रन नायर, केरळी, पण तो जितका अस्खलित पंजाबी बोलतो तितकी कोणी इतर बोलताना आजवर पाहिलेले नाही,

शेवटी कसंय हो की रेजिमेंट्सच्या नावात प्रांतिकवाद आपण सामान्य लोक पाहतो, आर्मी मध्ये त्याला cultural exchange चे एक माध्यम म्हणून ट्रीट केले जाते, अन मुळात इंडॉक्टरीनेशन असले कडक असते की तुम्ही कोणीही असा एकदा रेजिमेंट धरली की त्या रेजिमेंटची आन बान शान हे तुमचे सर्वस्व असते, ह्या निष्ठा इतक्या पक्क्या असतात की 'मेजर. परमानंद सदाशिव कुलकर्णी' हा इसम आपली 85 सेमी छाती 90 सेमी पर्यंत फुगवून म्हणतो की "मी एक प्राऊडेस्ट महार आहे, माझ्या रेजिमेंट सारखी रेजिमेंट नाही अन सिक्कीम बॉर्डरची रखवाली फक्त आम्ही काटक महारच करू शकतो" , "वैभव सुखीप्रसाद तिवारी" नामक एखादा कॅप्टन आपल्या सातारी जवानाला पोरगे झाल्याचे ऐकून अस्सल सातारी टोन मध्ये "रम पाज समद्यास्नी अन घरला बी ने थोडी भाड्या" असे सांगतो , तिथे फक्त अन फक्त रेजिमेंटच असते, बुंदेलखंडी मुसलमान ग्रेनेडियर्स मध्ये भरपूर असतात पण अतिशय मानाने ते ग्रेनेडियर्सचा युद्धघोष म्हणजेच "राजा रामचंद्र की जय" करतात,

तेव्हा, रेजिमेंटच्या नावात प्रांत वगैरे आपण लोक शोधतो ते लोक फक्त ते नाव प्रचंड मोठे करायला सतत धडपडत असतात, त्यात मद्रासी, मराठी, भैय्या, पंजाबी असे नसते, हेच भारतीय थलसेनेचे सर्वोत्तम सौंदर्य आहे असे मला वाटते.

काही राहिले असल्यास किंवा चुकले असल्यास कर्नल चितळे सर ते नीट दुरुस्त करतील तर इट वूड बी एन ऑनर

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Aug 2016 - 2:38 pm | माम्लेदारचा पन्खा

आणि मी कोणी सर वगैरे नाही हो....उगाच लाजवू नका !

बेस्टच सांगितलस समजावून बापू.
परफेक्ट.
आर्मीवाल्यांच्या काही सिस्टीम्स असतात, शिस्तीने आणि त्यांच्या काही आडाख्याने परफेक्शन आणलेले असते. त्याबाबतीत माहीती जरुर विचारावी पण असेच का तसेच का असे सिव्लीयन्स च्या परस्पेक्टीव्हने शंका विचारणे मला तरी गैर वाटते.
एनीवे सहज कालचाच किस्सा..
काल ऑफीसला जाताना मराठा लाईटची एस्कॉर्ट जिप्सी गावातून पास होत होती. मागे ट्रुप असणार पण नवीन झालेले बायपास, गावातील अडचणीचे रस्ते टाळून, सगळे ट्राफिकचे नियम पाळून, इतक्या सफाईने अन वेगाने ती ड्रायव्हरने गावाबाहेर काढली की गावातल्या ड्रायव्हरला पण तशी जमणार नाही. एसटीचे ड्रायव्हर सुध्दा गंडतात. जवळपास ७ किमी मी बरोबर होतो. तो ड्रायव्हर तर कधीतरीच हा रोड वापरत असणार पण कुठल्यातरी परफेक्ट सिस्टीमने ते जात असणार. त्याशिवाय इतकी सफाई नाहीच पॉसिबल. माझ्यासारख्या गंडक्या मॅपिंगवाल्याला हा चमत्कारच वाटतो.

पद्मावति's picture

21 Aug 2016 - 3:07 pm | पद्मावति

सुंदर प्रतिसाद सोन्याबापू. वरील धाग्यातला प्रश्न मलाही पडला होता. त्यामुळे तुमच्या उत्तराची अपेक्षा आणि उत्सुकता होतीच. अतिशय मुद्देसुद माहिती. धन्यवाद.

आता मी पण जरा वाहत्या गंगामाईमधे हात धुवून घेऊ का? :)

मलाही एक प्रश्न पडतो. मी असे ऐकलंय की सेना अधिकारांच्या जॉब इंटरव्यू मधे उत्तम इंग्रजी येणं आवश्यक असतं. हे खरं आहे का? असेल तर असे का? म्हणजे अधिकारी लोक जेव्हा हाताखालच्या जवानांशी संवाद साधतात तेव्हा हिंदी भाषे मधेच बोलत असतील नं मग इंग्रजीचा आग्रह कशासाठी?
डिफेन्स बॅकग्राउंड च्या लोकांशी कधी माझा थेट संबंध कधी आला नाही त्यामुळे माहिती सगळी ऐकीव पण खूप कुतूहल आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2016 - 8:47 pm | कैलासवासी सोन्याबापु

सेनेत भरती होताना इंग्रजी उत्तम लागतेच किंबहुना सर्विस सेलेकशन बोर्डचा एक महत्वाचा भाग इंग्लिश भाषेतच असतो, आता ह्याची कारणे काय?

१. अधिकारी हा फक्त आपल्या कनिष्ठ सैनिकांशीच बोलत नसतो, तर त्याला इतरही ठिकाणी "लायझनिंग" करावे लागते, ह्या लायझनिंग मध्ये लोकल ऑटोमोबाईल डीलरशिप सोबत चर्चा करून त्यांना कॅन्टीन योजनेत सामील करवून बेस वरील लोकांना स्वस्त वाहने, किराणा इत्यादी उपलब्ध करवून देणे ते मिलिटरी ऍटेशे म्हणून भारताच्या एखाद्या तिसऱ्या देशातील वकीलातीत पोस्टिंग झाल्यास त्या देशाच्या मिलिटरी प्रशासनासोबत संबंध वृद्धिंगत करणे इत्यादी कामे सुद्धा करावी लागतात, ह्या कामात सफाईदार फर्डी इंग्लिश अतिशय जास्त कामी येते, त्याशिवाय मागच्या एक दोन दशकांपासून एक नवे ट्रेंड सुरु आहे ते म्हणजे "जॉईंट मिलिटरी एक्सरसायझेस" ह्या कवायतींमध्ये मध्यलेव्हलचे अधिकारी (मेजर, लेफ्टनंट कर्नल) हे अतिशय महत्वाचे असतात, त्यांचे काम इंग्लिश बोलणारी परदेशी सेना अन आपले हिंदी/पंजाबी/मराठी बोलणारे जवान ह्यांच्यात समन्वय साधणे सुद्धा होय, अश्या प्रसंगी इंग्रजी भाषेची उत्तम जाण असणे खूप गरजेचे आहे.कल्पना करा अलास्का मध्ये एक ऑपेशन युद्धाभ्यास होते आहे भारतातून गोरखा रेजिमेंट गेली आहे, अमेरिकन डेल्टा फोर्स सोबत अभ्यास सुरु आहे, दिवासभरातली कामे क्लास झाल्यावर स्ट्रॅटेजी डिस्कशन सुरु आहे अश्यावेळी उत्तम इंग्रजी येत असणारच अधिकारी उत्तम दुभाष्याचे काम करून अमेरिकन टीम चा अनुभव अन त्यांच्या टिप्स आपल्या जवानांपर्यंत पोचवू शकतो.

हुप्प्या's picture

22 Aug 2016 - 9:13 pm | हुप्प्या

कधीतरी अमेरिकन लोकांशी संबंध येईल म्हणून फर्डे इंग्लिश यावे हे पटत नाही. दुभाषे अशाकरताच असतात ना? चिनी सैनिक अधिकारी असा विचार करतील का? नाही. ते उत्तम दुभाषा बरोबर घेऊन अमेरिकन लोकांशी संवाद साधतील.
पण आपण इंग्रजीबद्दल आपल्याला इंग्रजांच्या कृपेने एक अहंगंड आहे. इंग्रजी सफाईदार बोलेल तो उच्चभ्रू, सुसंस्कृत वगैरे. सैन्यदल तर ब्रिटिश रितीरिवाज, परंपरा यांचा प्रचंड अभिमान बाळगून आहे हे वेळोवेळी दिसतेच. त्यामुळे त्यांनी इंग्रजीला डोक्यावर चढवली तर आश्चर्य वाटायला नको.
उद्या जर चीनशी संबंध सुधारले आणि त्यांच्याशी जॉइंट एक्सरसाईज करायची वेळ आली तर सैन्य चीनी भाषा अभ्यासू लागेल का? आजिबात नाही. तिथे दुभाषाच वापरणार. रशियन सैन्याशी असे सहकार्य करायचे झाले तर काय? अरबी सैन्य? इराणी सैन्य? सगळे काही इंग्रजीला शिरसावंंद्य मानत नाहीत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Aug 2016 - 9:34 pm | कैलासवासी सोन्याबापु

उत्तर ते ही तार्किक उपलब्ध आहे, पण नकोच, तुम्ही एकंदरीत आर्मी, त्यांच्या परंपरा, त्यांची भाषा वगैरे बद्दल टोकाची मते बनवून घेतली आहेत, अन कदाचित तीच बरोबर आहेत असे स्वतःला समजावून सुद्धा टाकले आहेत (स्वतःच!) त्यामुळे तुम्हाला मी दिलेले उत्तर पटणे किंवा त्यातून तिसरेच फाटे न फुटणे हे अशक्य दिसते, तस्मात आमचा पास :)

बाकी एकंदरीत शैली अन शब्दरचना विलक्षण ओळखीची वाटली एकदमच! असो!

कधीतरी अमेरिकन लोकांशी संबंध येईल म्हणून फर्डे इंग्लिश यावे हे पटत नाही. दुभाषे अशाकरताच असतात ना?

कधी तरी युद्ध होईल म्हणून कायम युद्धसज्ज रहावे हे पटत नाही. हव्या तेव्हा बाजारातून बंदूका घेता येतील की विकत.

सुबोध खरे's picture

23 Aug 2016 - 1:23 pm | सुबोध खरे

या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत
एक म्हणजे आपले सर्व कायदे, पत्रव्यवहार, कार्यालयीन कामकाज हे इंग्रजीत चालते. सर्व राज्यांना मान्य होईल अशी दुसरी भाषा अधिकृतपणे जरी हिंदी असली तरीही ती बऱ्याच दक्षिणेकडील राज्यांना( राजकारणासाठी) मान्य नाही.
शिवाय शस्त्रास्त्रे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे इ बाहेरून येणाऱ्या युद्ध साहित्याची तांत्रिक माहिती हि पण इंग्रजीतच असते. यामुळे इंग्रजीला पर्याय नाही हि वस्तुस्थिती आहे.
सैन्यातील अधिकाऱ्याला जर एखादी विदेशी भाषा येत असेल तर तो एक फार महत्त्वाचा गुण समजला जातो आणि त्यासाठी त्याला ए सी आर मध्ये जास्त गुण दिले जातात. याचे कारण तुम्ही जेंव्हा एखादा हेर शत्रूचा सैनिक पकडता तेंव्हां त्याच्याशी संभाषण करणे आणि माहिती काढून घेणे. किंवा त्यांच्यातील संभाषण ऐकणे या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी दुभाषांमार्फत करणे कठीण असते.
काश्मीर मध्ये अफगाण अतिरेकी ( तालिबानचे) पकडले तेंव्हा त्यांना पुशतो सोडून दुसरी भाषा येत नव्हती. अशा वेळेस पुश्तो येणार लष्करी अधिकारी अतिशय कामाचा असतो. हि उणीव अमेरिका जेंव्हा अफगाणिस्तानात शिरली तेंव्हा त्यांना फार मोठ्या प्रमाणावर जाणवली. अरबी भाषा बोलणारे लष्करी अधिकारी हे मध्यपूर्वेत UAE, इराक, इराण सारख्या देशात फार कामास येतात.
हीच गोष्ट मँडरिन भाषे बद्दल आहे. चिनी सैनिक काय बिनतारीयंत्रावर काय बोलतात हे अशी भाषा येणाऱ्या अधिकाऱ्याला सहज समजू शकते.चीन बरोबर ध्वज बैठक होते अशावेळेस आपले मँडरिन येणारे अधिकारी तेथे आवर्जून उपस्थित असतात पण आपल्याला मँडरिन येते हे न दाखवता.
राहिली गोष्ट इंग्रजी संस्कृतीची. त्यात नंतरच्या काळात बरेच बदल झाले असून बरेच अर्ध आंग्ल अधिकारी जाऊन तेथे स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले अधिकारी उच्च पदावर आल्यावर हा बदल झाला आहे. उदा. आता आर्मीच्या सगळ्या पार्टीत लाउंज सूट आवश्यक नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Aug 2016 - 2:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

खरे पाहता, कुठल्याही जॉईंट exercise मध्ये संभाषण हे इंग्लिश मधेच होते, अमेरिकन आर्मी फक्त उदाहरण म्हणून घेतली होती. असो, काही अजून मुद्दे डॉक्टरांनी अन जोशी साहेबांनी मांडले आहेतच म्हणा

हुप्प्या's picture

24 Aug 2016 - 1:41 pm | हुप्प्या

सैनिकांनी युद्धसज्ज असणे अपेक्षित आहे की फर्डी इंग्रजी बोलणे? शस्त्रसज्ज आणि भाषेवरील प्रभुत्त्वात फरक कळत नसेल तर आपली कीव करावी तितकी कमीच!

भारतीय सैन्याचा अनेक वर्षे रशियन सरकारशी आणि सैन्याशी घनिष्ठ सहकार्य होते. त्याकरता तमाम सैनिक फर्डे रशियन बोलत होते का? आजिबात नाही. त्याकरता दुभाषे नेमले जात होते.
शस्त्रांची माहिती येण्याइतके इंग्रजी येणे आणि इंग्रजांच्या तोडीचे इंग्रजी येणे ह्यात फरक आहे. बँकेच्या अधिकार्याला, प्राध्यापकालाही इंग्रजी यावेच लागते. पण त्याचा सैनिकी अधिकार्यांच्या इंग्रजी प्रभुत्त्वाइतका गवगवा केला जात नाही. अशा नागरी सेवेतल्या लोकांना इंग्रजाला लाजवेल अशा प्रकारे इंग्रजी संस्कृतीने थबथबलेले कपडे, जेवण, शिष्टाचार लागत नाहीत. सैनिकांना तसे का करावे लागते? सांस्कृतिक गुलामगिरी ह्याखेरीज अन्य उत्तर मलातरी सापडत नाही.
रशियन, चिनी, इराणी, कोरियन सैनिक इतके इंग्रजी संस्कृतीत मुरावेत असे त्यांचे देश प्रयत्न करतात का? आणि ते केले नाहीत म्हणून त्यांचे सैनिकी बळ कमी समजले जाते का?

फेरफटका's picture

23 Aug 2016 - 8:52 pm | फेरफटका

भारताच्या घटनेप्रमाणे भारताच्या राज्यकारभारासाठी दोन अधिकृत भाषा आहेत - हिंदी आणी ईंग्रजी. बाकी १४ प्रादेषिक भाषांना अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता आहे. त्यामुळे ईंग्रजीचा तिरस्कार करण्यात काहीच अर्थ नाहीये. मुळात कुठल्याच भाषेचा तिरस्कार करण्यात काही अर्थ नाहीये. उगाच ईंग्रजी ला प्रतिवाद म्हणून मँडरीन वगैरे फाटे फोडणं गैरलागू वाटतं.

हुप्प्या's picture

24 Aug 2016 - 1:44 pm | हुप्प्या

इंग्रजी भाषा येणे हे आवश्यक असते. केवळ सैनिकांनाच नव्हे तर वकील, बँकर्स, आर्थिक उलाढाल करणारे, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, पायलट, बोटीवर काम करणारे सगळ्यांनाच ती यावी लागते. पण कपडे, खाणेपिणे, शिष्टाचार हेही अस्सल इंग्रजी सरंजामशाही काळातले असावेत असे या इतर वर्गातील लोकांना वाटत नाही. ते फक्त सैन्यात. माझा आक्षेप ह्या सांस्कृतिक गुलामगिरीला आहे. भाषेला आजिबात नाही.

सुबोध खरे's picture

26 Aug 2016 - 9:20 pm | सुबोध खरे

हुप्प्या - साहेब
<
strong>माझा आक्षेप ह्या सांस्कृतिक गुलामगिरीला आहे. भाषेला आजिबात नाही.हे मान्य
पण लष्करात कोणत्याच गोष्टीचा असा "आग्रह" होत नाही. आपण भाषण हिंदीत केले तरीही चालते. मी दारू पिट नाही आणि माझ्या घरात मी कोणालाही दारू पाजली नाही. यामुळे माझ्या कोणत्याही सामाजिक परिस्थितीत फरकी पडला नाही. कित्येक अधिकारी तर सामिषही अजिबात खात नाहीत आणि अशा सर्व अधिकाऱ्यांचे कुठेही अडत नाही.
दुर्दैवाने बहुसंख्य लोकच "मानसिक" गुलामगिरीतून बाहेर आलेले नाहीत त्यामुळे इंग्रजी फाडफाड बोलता आलं आणि हात दारूचा ग्लास धरता आला म्हणजे आपण मॉडर्न झालो हि व्याख्या जशी बाकी नागरी समाजात आहे त्याचेच प्रतिबिंब लष्करात पाहायला मिळते.

योगेश कोकरे's picture

24 Aug 2016 - 10:09 pm | योगेश कोकरे

हुप्या आपलं मत पटलं . मध्यन्तरी एका महत्वाच्या यांत्रिकी प्रकल्पामध्ये चिनी आणि जपानी अभियंत्यांशी संबंध आला होता . ते लोक तांत्रिक दृष्ट्या इतके हुशार होते पण एक बोंब होती .त्यातल्या खूप कमी लोकांना इंग्लिश येत होते. बाकीच्यांचे इंग्लिश इतके टुकार होते के विचारू नका . परंतु त्या जपानी कंपनी ने प्रत्येक अभियंत्याला एक दुभाषा दिला होता. परंतु डायरेक्ट संभाषण हे ते लोक तोडक्या इंग्लिश भाषेत करायचे. आणि वर हुप्या ने म्हटल्या प्रमाणे त्यांना इंग्लिश येत नाही याच काही वाटत नव्हता . किंबहुना अभियांत्रिकीचे शिक्षण हे मातृभाषेतून झाल्यामुळे त्यांचे तंत्रज्ञान हे खूप अस्सल दर्जाचे झाले होते. या उलट आपले इंजिनिर्स हे तांत्रिकदृष्ट्या इतके चांगले नाहीत. हल्ली तर आबा , काका , दादा , राव यांची अभियांत्रिकी महाविद्यालये इतकी झालेत ना कि त्यातून कोणत्या दर्जाचे शिक्षण शिकवतात यांच्याबाबतीत शंका आहे . त्यातून बाहेर पडणारे अभियंते हे अभियंता म्हणण्याइतपत शंका येते . बाकी सैन्य मध्ये इंग्लिश वापरणे या बाबतीत मत वेगळे आहे .जर तो त्यांच्या स्टॅंडर्ड procedure चा भाग असेल तर त्याला विरोध नाही. पण फक्त इंग्लिश चा बाऊ करणे पटत नाही . माझं मत तर असा आहे कि अभियंत्या लोकांनी जापानी चिनी भाषा पण शिकावी . पण सध्या जगात तंत्रज्ञानात ते लोकांचा दबदबा आहे. आपल्या इथे खूप क्लिष्ट तंत्रज्ञान वापरायचे असल्यास जापानी किंवा चिनी यांनाच बोलावतात .

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Aug 2016 - 3:12 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

अभियांत्रिकीचे शिक्षण हे मातृभाषेतून झाल्यामुळे त्यांचे तंत्रज्ञान हे खूप अस्सल दर्जाचे झाले होते.

योगेश कोकरे's picture

26 Aug 2016 - 4:09 pm | योगेश कोकरे

चिनी किंवा जपानी अभियंत्याबरोबर काम केले असल्यास लक्षात येईल.

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Aug 2016 - 8:59 pm | अनिरुद्ध.वैद्य

जर्मन, अमेरिकन अन ब्रिटीश लोकांसोबतच काम केलंय. येवढा फरक नाही वाटला.

तंत्रज्ञान अन मातृभाषा ह्याचा अर्थाअर्थी संबंध वाटत नाही. खाली अमितदादांनी म्हण्टल्याप्रमाणे तंत्रज्ञानाची भाषा किंवा ते बनवण्याचा संबंध गणीत व विज्ञानाशी.

कल्पना सुचुन त्यांना सही सही कार्यान्वत करणे ह्यासाठी जे वातावरण लागते ते महत्वाचे.

अमितदादा's picture

26 Aug 2016 - 10:59 pm | अमितदादा

अगदीच सहमत. ह्यांना काही चिनी/जपानी अभियंते भेटले ज्यांचा दर्जा उच्च होता, ह्यांना वाटलं हि भाषेची कमाल आहे. खरे उत्तर यांनी यांच्या प्रतिसादात लिहले आहे.

हल्ली तर आबा , काका , दादा , राव यांची अभियांत्रिकी महाविद्यालये इतकी झालेत ना कि त्यातून कोणत्या दर्जाचे शिक्षण शिकवतात यांच्याबाबतीत शंका आहे . त्यातून बाहेर पडणारे अभियंते हे अभियंता म्हणण्याइतपत शंका येते .

त्यांना तुम्ही विचारायला हवं होतं की तुमच्या देशात अशी महाविद्यालये आहेत का हो, जेंव्हा त्यांनी नाही ब्वा असे उत्तर दिले असते तेंव्हा याना समजलं असत कि मातृभाषा विज्ञान समजण्यासाठी काही प्रमाणात मदत जरी करत असली तरी उच्च तंत्रज्ञान निर्मिती साठी इतर अनेक घटक कारणीभूत असतात.

अनिरुद्ध.वैद्य's picture

27 Aug 2016 - 12:22 am | अनिरुद्ध.वैद्य

अभियंते लोक्स रोज्गारक्षम देशात (हा नॅस्कॉमचा आकडा, म्हणजे सॉफ्टवेअर धरले तरी चालेल) असतांना तंत्रज्ञान निर्मीतीची भाषा करणच चुकीच आहे!

संदीप डांगे's picture

27 Aug 2016 - 12:30 am | संदीप डांगे

कारण बाकीचे 75% पब्लिक इच्छा, कुवत, aptitude नसताना प्रवेश घेतं... मेंढरामधून वाघाची अपेक्षा चुकीची तसेच इंजीनीरिंग शिकण्याचा उद्देश नोकरी मिळवणे आहे, आवड नाही

चंपाबाई's picture

27 Aug 2016 - 3:47 am | चंपाबाई

कुवत असणारे लोकही पैशासाठीच डिग्री घेतात ना ?

अमितदादा's picture

26 Aug 2016 - 3:36 pm | अमितदादा

किंबहुना अभियांत्रिकीचे शिक्षण हे मातृभाषेतून झाल्यामुळे त्यांचे तंत्रज्ञान हे खूप अस्सल दर्जाचे झाले होते.

हे काय जास्त पटत नाही, मुळात उच्च विज्ञान आणि क्लिष्ट तंत्रज्ञान यांची भाषच गणित आहे. सगळा खेळ आकड्यांचा, theoram, principle यांचा आहे. हे समजून घ्यायला मातृभाषा हवी अस काही नाही. मातृभाषेचा नक्कीच फायदा होत असेल पण एका ठराविक लेवल नंतर नाही.

मुळात जर्मन, जापनीज, चिनी लोक तंत्रन्यांनात अग्रेसर आहेत याची खूप करणे आहेत. उत्तम शैक्षणिक सोयी, शासन धोरण, उद्योगांचा पाठिंबा, सामाजिक जाणिवा आणि प्रेफेरेन्सस यांचा सुद्धा वाटा आहे.

ज्यास्त नाही ,,, थोडा पटलं ना ..बस्स

फेरफटका's picture

26 Aug 2016 - 8:00 pm | फेरफटका

योगेश कोकरे, आपल्या प्रतिसादात थोडा विरोधाभास जाणवला, तेव्ह्ढा मांडतोयः

"किंबहुना अभियांत्रिकीचे शिक्षण हे मातृभाषेतून झाल्यामुळे त्यांचे तंत्रज्ञान हे खूप अस्सल दर्जाचे झाले होते."

पण फक्त इंग्लिश चा बाऊ करणे पटत नाही . माझं मत तर असा आहे कि अभियंत्या लोकांनी जापानी चिनी भाषा पण शिकावी . पण सध्या जगात तंत्रज्ञानात ते लोकांचा दबदबा आहे.

ईंग्रजी चा बाऊ नको, पण मँडरीन / जॅपनीझ भाषा शिकावी. (चीनी आणी जपानी अशा भाषा नाहीयेत. मँडरीन आणी जॅपनीझ आहेत).

योगेश कोकरे's picture

26 Aug 2016 - 8:59 pm | योगेश कोकरे

माहितीबद्दल आभारी आहे . भारतात सध्या मोठे अभियांत्रिकी प्रकल्प ते लोक करत असल्यामुळे ती भाषा येत असेल तर चांगले आहेच कि . आपण इंग्लिश भाषेच्या बाबतीत खूप बाऊ करतोय म्हणून पटत नाही म्हटलंय .

सुबोध खरे's picture

26 Aug 2016 - 9:14 pm | सुबोध खरे

हे सर्व मान्य केले तरी भारतीय भाषेत आजतरी तांत्रिक ज्ञान उपलब्ध नाही हि वस्तुस्थिती आहे आणि आपण मँडरिन किंवा जपानी भाषा शिकून त्यात तंत्रज्ञान शिकावे अशी भारतात तरी स्थिती नाही. तेंव्हा सद्य स्थितीत इंग्रजी शिवाय पर्याय नाही.
इंग्रज शिष्टाचाराचा दुराग्रह नसावा हे मान्य पण इंग्रजी भाषेचा द्वेष नको.

फेरफटका's picture

23 Aug 2016 - 8:45 pm | फेरफटका

धन्यवाद बापू. हाच आणी असाच प्रतिसाद अपेक्षित होता तुमच्याकडून. एक नंबर!

सैन्यातील इंग्रजी सक्तीच्या मागे असलेला हा इतका तर्कशुद्ध आणि सखोल विचार तुमच्यामुळे मला प्रथमच समजतोय.
सुंदर आणि मुद्देसुद उत्तराबदद्ल धन्यवाद बापु.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Aug 2016 - 9:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

@सोन्याबापू :

तुमच्या चपखल व मुद्देसूद प्रतिसादांमुळे भारतिय सैन्यासंबंधीचे सर्वसामान्यांच्या मनातले बरेच गैरसमज दूर होतील.

"काहीवेळेस धाग्यापेक्षा प्रतिसाद उजवे असतात" हे तत्व या ठिकाणी परत एकदा अधोरेखित झाले आहे ! :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2016 - 9:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

आभार डॉक्टर सर,

जेव्हा अकादमी लिहीले तेव्हाच मनात "नो युअर फोर्सस" नामक एक लेखमाला लिहायचे मनात होते, आजवर मुहूर्त लागलाच नाही, बघू चान्स मिळेल तसे सुलभ भाषेत युनिफॉर्म सर्विसेसची ओळख करून देणारे काही लिहिता आले तर बघू

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Aug 2016 - 9:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

जरूर लिहा.

भारतात पारंपारिकरित्या सशत्र सेना मुलकी जनतेपासून जराश्या वेगळ्याच राहतात. एखाद दुसरे पब्लिक रिलेशन फंक्शन होत असले तरी ते बहुतेक शस्त्र-अस्त्रांची तोंडओलख याच प्रकाराचेच असते. भारतात काही काळाचे सक्तीचे (किंवा ऐच्छिक) सैनिक शिक्षण नसल्याने सर्वसामान्य नागरिकाची सैन्याबद्दलची माहिती नगण्य असते.

सैनिक व त्यांच्या कामाबद्दल बद्दल (युद्ध असले की लढतात आणि इतर वेळी बॅरॅक्समध्ये राहतात यापलिकडे) फारशी माहिती नसल्याने सर्वसामान्य लोकांच्या मनांत बरेच गैरसमज असतात. मग त्यांच्या भावना एकतर "सीमेवर लढणारे आपले संरक्षक" इतका सोपा अर्थ किंवा "शांततेच्या काळात उगाच केला जाणारा खर्च" असा अवास्तव विचार; अशी वैचारिक टोके असतात. या टोकांमध्ये असणारी अनेक तथ्ये सतत अंधारातच राहतात.

त्यामुळे, सशस्त्र सेनांबद्दल माहिती काही/शक्य प्रमाणात तरी मुलकी नागरिकांत प्रसारीत करणे हे दोन्ही बाजूंच्या फायद्याचे आणि दोघांतील सौदार्ह्य वाढवायला मदतीचे होईल असे वाटते.

+ १

बापू आणि चलत मुसाफिर, ह्यांचे प्रतिसाद एकदम मस्त...

(स्वगत : आता अल्सेशियनचा पण धागा काढायला पाहिजे.)

माम्लेदारचा पन्खा's picture

22 Aug 2016 - 10:52 am | माम्लेदारचा पन्खा

प्रतिसाद नेहमी उजवेच असणार कारण ते अधिकारी व्यक्तीनी दिलेले आहेत....माझा आपला एक अडाणी प्रश्न होता....!

चलत मुसाफिर's picture

21 Aug 2016 - 9:31 pm | चलत मुसाफिर

श्री सोन्याबापू यांच्या प्रतिसादात काही दुरुस्ती सुचवू इच्छितो.

भूदल सैन्यातील राजपत्रित अधिकारी हे अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा परीक्षांमधून गुणवत्ता तत्त्वावर निवडले जातात. त्यांचे प्रशिक्षणही एकत्र होते. त्यानंतर त्यांना सैन्याच्या विविध विभागांत, जाति-धर्म-प्रांत-भाषा हे विचारात न घेता नियुक्त केले जाते. अर्थात सोन्याबापू यांनी म्हटल्याप्रमाणे मुलगा हा वडिलांची पलटण हक्काने मागून घेऊ शकतो.

जवांनांची भरती हा संपूर्ण वेगळा प्रकार आहे आणि माझ्यामते पंखासाहेबांचा लेख त्या संदर्भातला आहे.

इंग्रजांनी भारतीय (यात पाकिस्तानीही आले) समाजाचे लढाऊ आणि गैरलढाऊ जाती असे अधिकृत वर्गीकरण केले होते. त्यानुसार जाट, शीख, मराठा, राजपूत, डोगरा, बलोच, मुस्लिम, महार, गोरखा वगैरे "लढाऊ" जातींच्या नावावर रेजिमेंट निर्माण केल्या. याला तत्कालीन व्यापक राजकीय संदर्भही आहेत पण माझे ज्ञान तोकडे पडत असल्यामुळे लिहू शकत नाही.

सगळी इंग्रजी सेना अशीच उभी राहिली असे काही नाही. काही रेजिमेंट या खालसा केलेल्या राज्यांचे सैनिक इंग्रजी सेनेला जोडून बनवल्या गेल्या. (मला वाटतं, पंजाब रेजिमेंट, शिंदे Horse, इत्यादि. चू.भू.द्या.घ्या). 1857 मध्ये बंडखोर शिपायांनी वेढलेली दिल्ली पुन्हा काबीज करून घेण्यासाठी 'Hodson's Horse' ही रेजिमेंट अंबाल्याला उभी करून दिल्लीवर उत्तरेकडून हल्ला चढवला गेला. William Hodson याने पंजाबमधील शीख तरुणांची भरती करून ही रेजिमेंट उभी केली. ही रेजिमेंट अजून भारतीय सैन्यात आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात जातिनिहाय भरतीची ही पद्धत तशीच ठेवली गेली. (योग्य कीअयोग्य हा वेगळा मुद्दा). पण सैन्याला प्रातिनिधीक स्वरूप यावे यासाठी काही बदल करण्यात आले. ग्रेनेडिअर, गार्डस, महार अशा काही रेजिमेंट अखिल भारतीय करण्यात आल्या. राजपुताना रायफल्ससारख्या काही रेजिमेंटसाठी जाति-गुणोत्तर ठरवून दिले गेले. जम्मू-काश्मीर रायफल्स, नागा, बिहार अशा नव्या रेजिमेंटचीही निर्मिती केली गेली. सर्वात मोठा बदल म्हणजे सैन्यभरतीच्या जागांचे वाटप हे आता जनगणनेच्या आधारे करण्यात येते. जनगणनेदरम्यान संकलित केलेल्या माहितीमधून R.M.P. म्हणजे Recruitable Male Population असा एक घटक अगदी जिल्हानिहाय मोजला जाऊन त्यानुसार रंगरूट भरतीच्या जागा वाटल्या जातात.

भारतात झपाट्याने झालेल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक बदलांचा प्रभावही या प्रक्रियेवर पडला आहे. मराठा रेजिमेंटच्या जागा महाराष्ट्रातून पूर्णपणे भरल्या जात नसल्यामुळे त्यांना आपल्या जाती-भाषेच्या अटी शिथिल करणे भाग पडले. आता या रेजिमेंटमध्ये दक्षिणेतील जवानही दिसून येतात. दिल्ली व आसपासच्या भागात जमिनींचे भाव गेल्या दोन दशकांत गगनाला भिडल्यामुळे येथील जाट-राजपूत समाजातील युवकांचा सैन्याकडे ओढा कमी झाला. परिणामी, त्या रेजिमेंट आता पार बिहार ते उत्तराखंडपर्यंत सर्व भागातील जवान स्वीकारतात.

सुवर्ण मंदिरावरील लष्करी कारवाईनंतर काही शीख जवानांनी सशस्त्र उठाव केला होता. त्यानंतर एखाद्या रेजिमेंटमध्ये त्याच समाजाचे किती अधिकारी असावेत यावर अतिशय सक्त नियंत्रण ठेवले जाते.

मुलायम सिंह यादव हे संरक्षण मंत्री असताना त्यांनी, यादव रेजिमेंट बनवा असा हट्ट धरला होता. तत्कालीन सेनापतींनी तो हाणून पाडला.

वरील सर्व मुद्दे हे पायदळ सेनेबद्दल होते. त्यापलिकडे सैन्यात अनेक विभाग आहेत. तोफखाना, रणगाडा, यंत्रयुक्त पायदळ,  अभियांत्रिकी या "लढाऊ" विभागांत काही रेजिमेंट जातिनिहाय तर काही अखिल भारतीय आहेत.

दळणवळण, रसदपुरवठा, विद्युत अभियांत्रिकी, कारकून, खानसामे वगैरे तांत्रिक विभागातील भरती मात्र पूर्णपणे अखिल भारतीय असते.

हवाईदल व नौदल यांची संपूर्ण भरती ही अखिल भारतीय असते.

वर दिले आहे त्याशिवाय इतर कोणत्याही राखीव जागा, माझ्या माहितीनुसार सैन्यात नसतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2016 - 9:39 pm | कैलासवासी सोन्याबापु

अतिशय सुंदर!! उत्तम सांगितलेत, माझ्या जुजबी प्रतिसदापेक्षा हाच प्रतिसाद रेफर करावा अशी सगळ्यांना विनंती.

अमितदादा's picture

21 Aug 2016 - 9:47 pm | अमितदादा

+१

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Aug 2016 - 9:58 pm | माम्लेदारचा पन्खा

मला अपेक्षित उत्तर मिळालं....पुनश्च आभार....!

उडन खटोला's picture

21 Aug 2016 - 10:04 pm | उडन खटोला

बेष्ट धागा, सुपरबेष्ट प्रतिसाद. वाचतोय.
बाप्पुअण्णासाब, know your forces बद्दल नक्की च लिहा

धनावडे's picture

21 Aug 2016 - 10:28 pm | धनावडे

सोन्याबापू जमलच तर गोरखा बटालियन बद्दल लिहा

भटक्य आणि उनाड's picture

21 Aug 2016 - 11:36 pm | भटक्य आणि उनाड

बापू आणि चलत मुसाफिर, ह्यांचे प्रतिसाद एकदम मस्त..
अतिशय मुद्देसुद माहिती. धन्यवाद...

मोदक's picture

22 Aug 2016 - 12:24 am | मोदक

+११११

बापू, आज रेजिमेंट ही काय संकल्पना आहे? कारण प्लॅटून,कंपनी, बटालियन, ब्रिगेड, डिव्हिजन या संकल्पना माहित आहेत. रेजिमेंट ही संकल्पना आज कशा प्रकारे वापरतात?

चलत मुसाफिर's picture

22 Aug 2016 - 8:14 am | चलत मुसाफिर

सेक्शन - 10 लोक
प्लाटून - तीन सेक्शन
रायफल कंपनी - तीन प्लाटून
बटालियन - चार रायफल कंपनी
ब्रिगेड - तीन बटालियन

ही पायदळाची सामान्य रचना मानता येईल. अर्थात, कंपनी व प्लाटून यांना मुख्यालयही असते. बटालियनमध्ये सपोर्ट कंपनी आणि हेडक्वार्टर कंपनी असतात. ब्रिगेडमध्ये तीनहून जास्त बटालियन असू शकतात. राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये सहा रायफल कंपनी असतात.

पायदळात रेजिमेंट हा शब्द जाट, राजपूत, मद्रास, मराठा रेजिमेंट या अर्थाने वापरला जातो. एका रेजिमेंटमध्ये 20-25 बटालियन असू शकतात. रेजिमेंटमध्ये गणवेश, युद्धघोष, परंपरा, जात या बाबतीत समानता असते.

रणगाडा विभागात तीन रणगाड्यांचा ट्रूप, तीन ट्रूपची स्क्वाड्रन आणि चार स्वाड्रनची रेजिमेंट असते. (इथे रेजिमेंट = बटालियन).

तोफखान्यात तोफ/बँटरी/रेजिमेंट अशी रचना असते. संपूर्ण तोफखान्याला Corps of Artillery म्हणतात. (इथेही रेजिमेंट = बटालियन).

सारांश: पायदळात एक रेजिमेंट ही अनेक बटालियनची बनलेली असते. इतर विभागात रेजिमेंट हा शब्द पायदळ बटालियनचा समकक्ष मानला जातो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Aug 2016 - 7:29 am | कैलासवासी सोन्याबापु

सेक्शन
|
प्लॅटून
|
कंपनी
|
बटालियन
|
रेजिमेंट
|
ब्रिगेड
|
डिव्हिजन
|
कोर
|
कमांड

नाखु's picture

22 Aug 2016 - 8:35 am | नाखु

धागाकर्ता मापं यांचे जाहीर आभार.

त्याखेरीज असे "वाचनखूणा" प्रतिसाद मिळालेच नसते..

बाप्पू स्वतंत्र लेखमाला लिहायचं मनावर घ्याच जरा.

बानकशी प्रतिसाद माहीतीने आनंदीत नाखु

मी-सौरभ's picture

22 Aug 2016 - 9:29 am | मी-सौरभ

ना खु काका

सुबोध खरे's picture

22 Aug 2016 - 9:45 am | सुबोध खरे

बापूसाहेबांच्या ताजमहालाला आमची एक वीट
THE WORD Regiment is derived from Latin word ‘regimen’ which means a rule or system of order, and describes the Regiment’s functions of raising, equipping and training of troops. Every Regiment has its own characteristic colours, uniform and insignia, and accomplishments in combat zone.
They become a fundamental object of allegiance, pride and esprit de corps of its soldiers. In the Indian Army Regiments are of two kinds - battalion-sized units of arms like the Armoured Corps, Artillery, Engineers, and Signals, or a specific mixture of Infantry battalions.
In Artillery, the complete Artillery mass in the order of battle is known as the Regiment of Artillery. The Infantry Regiments are identified by their distinctive individual names; they have a Regimental Centre for training and equipping of the staff for the infantry battalions of the Regiment.
The Centre maintains records of each soldier till he retires and is out of service. The Record office and the Pay and Accounts offices perform these functions.
These Regimental Centres send qualified soldiers to infantry battalions which are assigned to tactical units - Brigades and Divisions.
The infantry battalions known by their individual Regimental number and name are active units fit to fight and carry out desired duties in the battle.
The Regiments are headed by a Colonel, who is a high-ranking officer. The Colonel of the Regiment is the head of the family and is responsible for the protection of the best interests of the Regiment.
He is almost always an officer of General rank who at one time served in the Regiment. The idea is that such a person would take personal interest in the well-being of the Regiment, its troops and its widows.
The way the wounded and dead are handled in a battle is a powerful example of Regimental spirit. In the Regiments of Indian Army it is a matter of honour not to let a wounded comrade fall into enemy hands.
Many a time special operations have been carried out to recover wounded soldiers. A major feature of the Regimental system has been to train young officers to ‘know their men better than their mothers do and care even more.’
Practically it requires officers to learn the Regimental language in the shortest possible time; not to eat till their men are fed; excel their men in physical fitness and handling of weapons; become epitomes of military disciplines in punctuality, turnout, and thoroughness; play games with their men, spend time in their langars and dining rooms, coach them to be the best in the unit in all soldierly activities, sports and behaviour.
They are guided by just one ideal that is, their performance and that of their men must be worthy of the good name of the Regiment. This system gives them a sense of belonging and a cause bigger than themselves and acts as a crucible for promoting espirit-de-corps.
Regiments provide a living example of how Indians, without abandoning their religious belief or ethnic pride can whole heartedly work together for the good of the country.
It is a brotherhood in which Hindus, Muslims, Sikhs and Christians try to excel in their service for the good name of their Regiment, Indian Army and the Country.
Battle Honour days have been devised to remind all ranks of a Regiment of the achievements and sacrifices of their predecessors.
There is nothing better than the study of Regimental history to understand these traditions and inculcate pride in them. Every opportunity is taken to remind the members of those achievements and traditions so that a high standard of behaviour, courage and comradeship is set.
This is done through the Part-I orders, evening roll call time, lectures, unit Darbars and Mandir, Masjid, Gurudwara, Church parades.
It is with this repeated treatment that a soldier learns to practice unselfishness and find roots and pride in the traditions of a Regiment.
Hence, we can say that the Regiment becomes the religion of those who have the honour to serve in it.

सुबोध खरे's picture

22 Aug 2016 - 9:51 am | सुबोध खरे

रेजिमेंटेशन चे फायदे आणि आवश्यकता यावर एक नजर
कोअर कमांडर १५ कोअर श्रीनगर, लेफ्ट जनरल आटा हस्नेन यांच्या ब्लॉग वरून साभार
A commentary on Indian society and the Indian Army's Regimentation; why this support system for soldiers is still the best
The trigger for this piece is a question from a Facebook friend, to whom I am most thankful. The question alluded to reasons why Post Traumatic Stress Disorder (PTSD) is so rampant in the US and indeed other Armies operating in areas such as Afghanistan and Iraq and in the same light what is the experience of the Indian Army with PTSD in our operational areas. This is as good a question as any and why it never struck me to write on this earlier beats me. Perhaps I am just presumptuous and I take our Army for granted just as so many others among my countrymen do. A saving grace is that in 2011 while in command of 15 Corps in Kashmir I instituted a study to examine stress levels in my Corps which undoubtedly has the highest level of operational engagements anywhere in the Army. 7000 officers and men were given an instrument by my outstanding medical staff, whose contributions remain a little unsung in the world of machismo and a bit of 'ramboism'. The reason for this was the run of suicides we were hit with. The study did help the Army’s outstanding doctors to arrive at various reasons for suicides but that is not the subject of this essay although I do not wish to underplay the findings. The study helped me as an individual to arrive at my own reasons for the levels of stress or lack of it in operational areas all over the Army's vast deployment.
Let me describe three scenarios from my own operational experience. The first is from Op Pawan, the IPKF's long drawn deployment in India’s first out of area operation (OOAP). The second is from the LoC where I take the case of a unit deployed in a mode to ensure the sanctity of the LoC (which essentially means, no change to its current status, which in turn means that not an inch of the territory in our control should change ownership) and prevent any infiltration of terrorists from POK. And, the third is of an RR unit deployed in depth but close to a forested area with population centres nearby in Kashmir. These are classic examples of the way Infantry and some other Arms function in operational areas.
new_img
After the blood and gore of the intense phase of operations in the Jaffna Peninsula in Oct-Jan 1987 the IPKF settled to more routine counter insurgency (CI) operations. There was really nothing routine about them because the LTTE's well-trained cadres fought almost like regulars and less like militants. Units were deployed in company groups at operating bases (COBs) with an area of responsibility. The LTTE could muster as many as 100-200 men at a given point and if ambushed could actually conduct counter ambush drills to break the ambush, quite unlike militants. Their own ambushes were well sited, in large numbers and almost always accompanied by IEDs. Patrols which went out could not let down their guard even within hundred meters from the gate of their posts. Units which remained inside posts without dominating their periphery suffered because the approaches were mined by daring young tigers that crept up as close as ten meters from posts. Trees were booby trapped as were bushes. On the coastline near the town of Mullaitivu an attempt to occupy posts with 20 men or so met with response from 50 or more militants, leading to the Army suffering heavy casualties. Leave parties left and arrived once in three weeks when the road was opened and there was no certainty about reaching destinations without an engagement. As a company commander, if I went on an operation with two platoons I always remained worried about the state of security at my COB where only 20 men were left. Equally when I was at the COB I was always ready to rush for reinforcement of any other company or my own men out on operations. So what can be expected in such an environment except a severe state of tension especially since failure meant loss of quite a few lives. The Indian Army takes casualties with much concern and a high loss of lives without commensurate infliction of higher losses on the adversary is hugely frowned upon, leading to even accusations of inaction and cowardice on part of officers. An entry such as this in your CR means the end of career.
neww_imgt
The LoC deployment is in posts and picquets and in some places can be as low as eight men. In the Uri sector is a high altitude area of height 14000 feet and more where snow levels top 35 feet and the area of approximately a company plus (functionally 120 men) is cut off for six months. Extremely difficult evacuation of sick soldiers or casualties by helicopter is possible only with severe risk. The evacuation of small posts to reach the mother post before heavy snow sets in is always fraught with danger and is a unit commander’s nightmare. That leaves routes open which terrorists could sneak through with risk only terrorists can take. Every year a few frozen bodies of dead terrorists are found. In summer, isolated posts can be attacked by Pakistan regulars mixed with terrorists (BAT teams). So can our logistics parties which carry out advance winter stocking for almost six months and move on predictable routes every day, be ambushed en route by shallow raiding Pakistan elements. By day it is essential to carry out snow clearance in winter. In summer there is the challenge of carrying water from sources which keep receding to a far distance (there is no system of bottled water in the Army). Then comes night and four to six man ambushes have to be deployed along the LoC fence from last light to well after first light. To ensure the right density a major part of the sub unit remains deployed along the LoC Fence and the remaining personnel ensure the security of the post.
A brief description of the functioning of RR units on the CT grid is outlined. Every RR unit has its peculiar area of operations. The threat is of standoff fire by terrorists or sneak attacks on posts and not large scale attacks of the LTTE kind. In today’s environment the RR unit’s source of tension is more from bandhs and stone throwing mobs which target their vehicles or patrols. Quick thinking independent decisions are required from junior leaders keeping propriety in mind and degree of response. Small vehicle convoys have been targeted by mobs leaving soldiers in quandary over the need to fire or not to save themselves and Government property. The pressure for results in urban areas and nearby forests is ever present and unit commanders drive their troops to ensure domination and control, gain intelligence and execute innovative operations while seeking contact. I would classify tension here as high but lower than the LoC where threat to life and possibility of adverse contact is far higher.
The tour of duty for Indian soldiers is usually two to three years; that of troops of western armies is six months. Despite terrain constraints the western armies depend far more on helicopter support for logistics and even for bail outs in adverse tactical situations; not so in the Indian Army except for casualty evacuation. The Indian soldier as much as the western one does not fear for his life, but prevailing uncertainty and lack of rest are two major factors for stress. Climatic conditions in high altitude areas can be a major source of tension and if soldiers fear anything it is the effects of climate. Avalanches top the list. In Sri Lanka where operational conditions were far more life threatening I used to look into the eyes of my soldiers and draw solace from that; hardly ever did I find fear writ on their faces. If there was it was due to the possibility of being isolated or detached from the subunit. The necessity of buddy contact was essential. One does not fear for life but of being detached from the subunit or being taken prisoner. What is remarkable is the complete lack of emotions to losses of even close buddies in operations. Our soldiers take the disorder of battle extremely well as well as deprivation of comforts. I always emphasized on the need for ‘sleep/rest management’ of the soldiers because that is an area which is usually neglected by the leadership. Soldiers cannot be expected to function 24x7 but the demands of their responsibility expect exactly that. On the LoC night and day is the same in terms of alert.
There are cases of suicides but hardly ever is this work related. The availability of the mobile phone acts as the biggest threat. In the tense environment of the LoC or RR related operations bad news from home can act as a trigger. In many such instances it is young soldiers unable to bear the additional tension of problems at home; problems as seemingly irrelevant as a newlywed wife unable to get along with the mother in law. Sitting far away on a remote post the immediate world around the soldier may be perceived by him to be within his control but not the world around his home where the problems affect him much more. In his post or on patrol he can still share his immediate concern about safety with his buddy or his superior but sharing home based problems is a greater challenge. Marital problems are one dimension, property problems in rural areas and absence at crucial moments when something legal is involved can be extremely stressful. While leave policy of units is always liberal and the government has sanctioned two free trips home with other trips at concessional rates it is a question of timing. Everyone cannot be away from duty at harvest time or during festivals and that is a problem which the units minimize through whatever they can do to compensate.
The experience of western armies has been the inability of returning soldiers to merge in society; that is a form of PTSD or an effect. Loss of partners while they were away, inability to concentrate on jobs, fits of anger and regret due to unpalatable actions in dealing with aliens and innocents in way off lands, etc; all add to the terrible isolation that individual citizens feel in developed societies. That is the saving grace of Indian society where despite prickly problems of farmer suicides or rural poverty there is family and societal support for those who are away serving the nation. It may all disappear in due course and the mishandling of OROP may very well contribute to the soldier’s dwindling confidence in the support system which Indian society and family system continues to provide.
More than anything else the psychological well-being of soldiers is contingent upon the efficient functioning of the Regimental system of the Indian Army. To a visiting DG of a CAPF(/CentralArmed Police Forces) I strongly recommended a day be spent with an RR unit. This was in response to his query as to what makes an RR unit tick and achieve so much. He was kind to take my advice, spent a day at Baramula and then rang me up to say that he had got the answer. Bonding of the cap badge and the lanyard has been taken by the Indian Army to such a high level that camaraderie is natural; a soldier’s problems, from womb to tomb (notwithstanding stray cases of neglect of widows reported once in a while) are the unit’s problems. There has been much talk of diluting the Regimental system; the British could not help it and had to compromise with theirs due to downsizing. They taught us what Regimentation means; today the Indian Army can teach them a few lessons in psychological strengthening of soldiers through the Regimental system.

खरंच वाखु साठवून ठेवण्यासारखा हा धागा आहे. सगळेच प्रतिसाद केवळ अप्रतिम.

सोन्याबापु, चलत मुसाफिर, सुबोध खरे आणि इतर, कृपया या विषयावर सविस्तर माहिती द्या हि नम्र विनंती.

सैनिक आणि डॉक्टर या लोकांपध्दल मला कायम अतिशय भितीयुक्त आदर आहे. एक आपल्या सीमेचे रक्षण करतो आणि एक आपल्या शरीराचे. फक्त हेच दोन लोक '२४ तास कामावर' असतात.

तसं काय नाय, ह्या दोघाबद्दल पूर्ण आदर बाळगून लिहितो, मी स्वतः 24 तास कामावर असतो. :)

नाखु's picture

23 Aug 2016 - 8:45 am | नाखु

मलाच असे का दिसत आहे..

तसं काय नाय, ह्या दोघाबद्दल पूर्ण आदर बाळगून लिहितो, मी स्वतः 24 तास मिपावर असतो. :)

सुबोध खरे's picture

23 Aug 2016 - 9:37 am | सुबोध खरे

अभ्या सेठ
तुमचा प्रतिसाद थोड्या चुकीच्या गृहितकावर आधारित आहे.
डॉक्टर किंवा सैनिक २४ तास कामावर नसतात तर लष्कराची गस्त आणि रुग्णालय सेवा हि २४ तास चालू असायलाच ( अत्यावश्यक सेवा) लागते.यात पोलीस, रेल्वे आणि अग्निशमन दले पण येतात.
आपले कार्यालय जर २४ तास x ३६५ दिवस चालू असेल तर आपणही हा दावा करू शकता.

अभ्या..'s picture

23 Aug 2016 - 9:50 am | अभ्या..

सॉरी डॉक,
मी माणूस 24 तास ऑन ड्युटी हा विचार करत होतो, कार्यालय किंवा फॅक्टरी, कंपनी म्हणून विचार केला नाही.

वामन देशमुख's picture

23 Aug 2016 - 9:55 am | वामन देशमुख

तसं काय नाय, ह्या दोघाबद्दल पूर्ण आदर बाळगून लिहितो, मी स्वतः 24 तास कामावर असतो. :)

अभ्या,

आपण आपल्या वरील प्रतिसादात :) ही स्मायली टाकलीय याचा अर्थ हा प्रतिसाद गंभीर नसून आपण जस्ट विनोद करताहात असं मला वाटतंय.

माझं असं वाटणं बरोबर आहे का आणि या प्रतिसादातून मला जे वाटतंय तेच तुम्हाला अभिप्रेत आहे का हे सांगाल का?

वामन देशमुख's picture

23 Aug 2016 - 9:58 am | वामन देशमुख

हा प्रतिसाद अभ्या यांना आहे,

तुमचा प्रतिसाद थोड्या चुकीच्या गृहितकावर आधारित आहे.

या प्रतिसादाशी त्याचा संबंध दिसला तर तो केवळ योगायोग समजावा.

:)

उडन खटोला's picture

23 Aug 2016 - 6:27 pm | उडन खटोला

अभ्या द कामोत्सुक. ;)

स्वाती दिनेश's picture

22 Aug 2016 - 9:27 pm | स्वाती दिनेश

धागा, वाचते आहे.
वाखुसा
स्वाती

खटपट्या's picture

22 Aug 2016 - 10:12 pm | खटपट्या

खूप छान आणि मोलाची माहीती.

तिमा's picture

23 Aug 2016 - 6:01 pm | तिमा

वा.खु. साठवण्यासारखा धागा आणि विशेषतः काही प्रतिसाद. तसेच विनाकारण जातीय पिंक टाकण्याचा प्रयत्न, वाद न घालता, अभ्यासपूर्ण प्रतिसादांनी कसा झाकला गेला, याचे हा धागा हे उत्तम उदाहरण.

मनिम्याऊ's picture

24 Aug 2016 - 3:17 pm | मनिम्याऊ

विनाकारण जातीय पिंक टाकण्याचा प्रयत्न, वाद न घालता, अभ्यासपूर्ण प्रतिसादांनी कसा झाकला गेला, याचे हा धागा हे उत्तम उदाहरण

+१००

तेजस आठवले's picture

23 Aug 2016 - 7:28 pm | तेजस आठवले

सोन्याबापू, गुरखा रेजिमेंट आणि पर्यायाने गुरखा ह्या समूह बद्दल माहिती देऊ शकलात तर उत्तम. हा समूह अतिशय कडवा असतो असे वाचले आहे. तसेच प्रचंड चिकाटी आणि शौर्य ह्याबद्दल कथा ऐकल्या आहेत. हे सैनिक परदेशातील (नेपाळ) येथील असू शकतात का ? तसे असल्यास भारतीय सैन्यात त्यांना कसे सामावले जाते ?

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 7:39 pm | संदीप डांगे

गुरखा हे नेपाळीच. मूळ शब्द गोरक्षक. नैसर्गिक अंगकाठी काटक, चपळ, शिस्तबद्धता आणि आदेशपालनात सर्वोत्कृष्ट अशे यांची खासियत आहे. ही माणसे धन्याला अतिशय लॉयल असल्याने त्यांना अनेक ठिकाणी आपलेसे केले गेले आहे. सिण्गापुरात दंगल नियंत्रनानिमित्त गोरखांना पाचारण केले गेले, आज सिंगापुरात गोरखा कायदा सुव्यवस्थेचा कणा आहेत. त्यामागे त्यांचे अत्युच्च दर्जाचे सेवाव्रती असणे हे आहेच. इतर अनेक गोष्टी आहेत.

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 7:42 pm | संदीप डांगे

मूळ शब्द गोरक्षक आहे ह्याबद्दल काही खात्री नाही, आता जालावर चेक केले. असे काहीही नाही आढळले (च्यायला, कुठनं कुठनं काय वाचनात येतं कोण जाणे) चुकीच्या माहितीसाठी क्षमा असावी.

अनिरुद्ध.वैद्य's picture

24 Aug 2016 - 1:15 pm | अनिरुद्ध.वैद्य

म्हणजे गोरखनाथांशि संबंधीत लोक्स असे भरपुर ठिकाणी वाचण्यात आलेय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Aug 2016 - 8:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

गुरखा/गोरखा, लिंबु, लेपचा, भुटीया ह्या पूर्वी हिमालयीन राज्यांतल्या (नेपाळ, उत्तर बंगाल, सिक्कीम) इथल्या लढाऊ जमाती होत, ह्यांचे वैशिष्ट्य म्हणजे लहानखुरी चण पण विलक्षण लढाऊ बाणा, अतिशय जास्त चिवटपणा, मुळात पहाडी जमाती असल्यामुळे ह्या जमाती विलक्षण जास्त काटक असतात, ह्यांच्यासाठी सिंगापूरच नाही तर अगदी ब्रिटन सुद्धा आजही खुले आहे, आजही ब्रिटिश आर्मी गोरखा रेजिमेंट मेन्टेन करते अन रिटायर्ड गोरखा जवानांस रिटायरमेंट नंतर नागरिकत्व मिळण्याचे ऑप्शन सुद्धा बहुतेक खुले असते, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ ह्यांची पेरेंट रेजिमेंट सुद्धा गोरखाच होय, अन गोरख्यांबद्दल त्यांनी एक विलक्षण वाक्य म्हणून ठेवले आहे "जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही मृत्यूला घाबरत नाही तेव्हा, एकतर तुम्ही खोटे बोलता आहात किंवा तुम्ही गोरखा आहात"(If u say u do not fear death, either you are lying or u r a Gorkha), गोरखे कालीभक्त असून त्यांचा युद्धघोष हा "जय महाकाली, आयो गोरखाली" हा असतो, वरती सांगितल्याप्रमाणे, गोरखा रेजिमेंट मध्ये गोरखा सोबत इतर भारतीय जमाती म्हणजेच लिंबु (ही खरेतर नेपाळी जमात) लेपचा, भुटीया (ह्या सिक्कीमीज जमाती होत) सुद्धा भरती केल्या जातात, गोरखाज ने मिळवलेली पदके, गौरव अन त्यांचे युद्ध सन्मान (बॅटल ऑनर्स) पाहूनच छाती दडपून जाईल इतके अतुलनीय अन प्रचंड शौर्य गोरखा जवानांनी अन अधिकारी मंडळीने गाजवले आहे, त्यांना अधिकारी मंडळी अतिशय लाडाने "जॉनीज", असे म्हणते.

बरेच निरागसही असतात हे लोक्स. बालपण इंडस्ट्रीयल एरीयामधे गेल्यामुळे बर्‍याच गुरखा वॉचमन लोकांशी दोस्ती होती...गफ्फा मारायला खूप मजा येते या लोकांबरोबर. एक गुरखा तर रेल्वेतून उतरल्यावर सात दीवस चालत घरी जातो कारण खूप दर्‍याखोर्‍यात घर आहे त्याचे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Aug 2016 - 10:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

होय, भोळे असतात अन निस्सीम इमानदार, बंगाल मधून एकदा एका सुट्टीला घरी जाणाऱ्या गोरखा जवानाने (बिष्णु श्रेष्ठ) गँगरेप अन दरोडा ह्याच्या प्रयत्नात असलेले , जवळपास १५ सशस्त्र दरोडेखोर एकदम उरावर घेतले होते, ते ही फक्त आपली खुकुरी परजत!, २ सप्टेंबर २०१० मध्ये, मुळात गाडीवर दरोडा पडला तेव्हा ३५ वर्षांचा श्रेष्ठ निवांत झोपला होता, त्याला दरोडेखोरांनी उठवले तेव्हा तो त्यांना मुकाट पैसे देणार होता, तितक्यात दरोडेखोरांनी एका १८ वर्षीय मुलीला उचलले, त्यावेळी मात्र श्रेष्ठ ने भडकून एकदम सगळे उरावर घेतले होते, आधीच गोरखा, त्यात सैनिक, त्यातही भारतीय थलसैन्यातला, बॉस त्याला तोड तोडगा चेटूक काहीच नसते, डोके फिरले की संपले!

श्रेष्ठची कथा आपण इथे वाचू शकता

.

(लढ्यात जखमी झालेला श्रेष्ठ)

.

(अतुलनीय शौर्य प्रदर्शनासाठी सेना मेडल घेताना श्रेष्ठ)

खटपट्या's picture

24 Aug 2016 - 10:07 pm | खटपट्या

याच्याबद्दल ऐकले होते. भारी माणूस.

अमितदादा's picture

24 Aug 2016 - 10:11 pm | अमितदादा

श्रेष्ठची कथा वाचून मलाही काही वर्षांपूर्वी वाचलेली एका ब्रिटिश गोरखा सैनिकाची शौर्यगाथा आठवली. दिपप्रसाद पुन याच नाव, अफगाणिस्तान मध्ये असताना एकट्याने 30 तालिबान सैनिकांचा एकट्याने खातमा केला.
http://www.nationalturk.com/en/hero-british-army-gurkha-soldiers-dippras...

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Aug 2016 - 10:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

होय, दीपप्रसाद पुन अन "आय लव्ह न्यूयॉर्क" प्रिंट ची (फक्त) बॉक्सर चड्डी घातलेला अन पोस्ट वर तालिबानी हल्ला झाला म्हणून तसाच बंकर मध्ये रायफल घेऊन उभा राहिलेला अमेरिकन सैनिक झॅकरी बॉईड हे खासे प्रसिद्ध झाले होते

वेदांत's picture

24 Aug 2016 - 9:44 am | वेदांत

खुप छान माहीती मिळत आहे..

पैसा's picture

24 Aug 2016 - 10:20 am | पैसा

खूप माहितीपूर्ण प्रतिसाद आहेत.

भारतीय सैन्य आणि प्रांतिक सीमेचे शिक्के ...

हे शीर्षक वाचून दचकले होते. पण प्रतिसाद वाचून जीव भांड्यात पडला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Aug 2016 - 11:15 am | कैलासवासी सोन्याबापु

तुझ्याहून डब्बल मी दचकलो होतो =))

संदीप डांगे's picture

24 Aug 2016 - 1:03 pm | संदीप डांगे

=)) साहजिक आहे!

बाळ सप्रे's picture

24 Aug 2016 - 2:29 pm | बाळ सप्रे

सोन्याबापू यांचा प्रतिसाद दिलासादायक आहे. निदान सैन्यात तरी जातीपातीवरून उच्चनीच मानसिकता नाही.
तरीदेखिल सामान्य नागरीकांचा समज हा दिसणार्‍या रेजिमेंटच्या नावावरूनच होतो (जसा माझा आणि इतर वाचकांचा या आधी होता).

लोकांची जातीबाबतीतची मानसिकता बदलणे हे फारच कठीण आहे, त्यामुळे ही नावे बदलून सैन्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात थोडासा फरक पडणार असेल तर ह्या जातीच्या नावांना चिकटून रहाण्यात विशेष हशील आहे असे वाटत नाही.

कपिलमुनी's picture

24 Aug 2016 - 3:10 pm | कपिलमुनी

Short Service Commission बद्दल अधिक माहिती मिळेल का ?
माझ्या अपुर्‍या माहितीनुसार यामधे १५ वर्षेच सर्विस असते आणि नंतर रीटायरमेंट असते ( काही लोकांनाच पर्मनंट कमिशन मिळते)

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Aug 2016 - 4:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझ्यामते ह्याचे सर्वोत्तम उत्तर डॉक्टर खरे देऊ शकतील.

सुबोध खरे's picture

24 Aug 2016 - 8:42 pm | सुबोध खरे
ओम शतानन्द's picture

24 Aug 2016 - 3:50 pm | ओम शतानन्द

सैन्यात आरक्शण का नाही ?

सुबोध खरे's picture

24 Aug 2016 - 8:40 pm | सुबोध खरे

सैन्यात १००% आरक्षण आहे आणि त्यासाठी आपली जात फक्त मनाने आणि शरीराने "भारतीय" असणे आवश्यक आहे. बाकी कोणत्याही जातीला प्रवेश नाही.

चंपाबाई's picture

24 Aug 2016 - 10:51 pm | चंपाबाई

लोकाना माहीत आहे .. . कोण मरतय आणि कोण चरतय .... चिंता करु नये.

सुबोध खरे's picture

24 Aug 2016 - 11:22 pm | सुबोध खरे

तुम्ही आर्मी जॉईन करणार होतात ना? मग शेपूट का घातली?
जा जरा सियाचेन काश्मीर फिरुन आणि चरुन या.-)))

सुबोध खरे's picture

24 Aug 2016 - 11:23 pm | सुबोध खरे

शॉर्ट सर्व्हिस कमिशन मेडिकल अॉफि सर 45 वयापर्यन्त आहे.

सुबोध खरे's picture

24 Aug 2016 - 11:28 pm | सुबोध खरे

http://jobsworld.pk/army-medical-corps-m-cadet-commission-2016-jobs/ ईथे पणा नोकरी आहे.

अर्धवटराव's picture

26 Aug 2016 - 2:55 am | अर्धवटराव

चरुन मरायला अनेकजण देशाबाहेर चालले आहेत... त्या दुर्दैवी जीवांचं कौतुक करण्याचा नतद्रष्टपणा सुद्धा चालु आहे.

भटक्य आणि उनाड's picture

26 Aug 2016 - 1:18 am | भटक्य आणि उनाड

१०० % सहमत...

राजाभाउ's picture

31 Aug 2016 - 10:31 am | राजाभाउ

जबरदस्त उत्तर . डॉक दंडवत घ्या __/\__

सिरुसेरि's picture

24 Aug 2016 - 4:59 pm | सिरुसेरि

माहितीपुर्ण लेख .

एक सामान्य मानव's picture

24 Aug 2016 - 9:35 pm | एक सामान्य मानव

हाच निकष लावला तर कधीतरी होणार्या लढाईसाठी सैन्यतरी कशाला? शत्रु आला कि भरती सुरु करावी.

संदीप डांगे's picture

24 Aug 2016 - 9:39 pm | संदीप डांगे

हा हा , गंमत म्हणून ठीक आहे, पण मला कायम शिरोधार्य असलेलं वाक्य टाकतो,

"Victory loves preparation"

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Aug 2016 - 10:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

The more you sweat in peace, the less u bleed in war

अर्धवटराव's picture

24 Aug 2016 - 11:38 pm | अर्धवटराव

काय खतरनाक फिलॉसॉफी आहे.
डांगे साहेब आणि बापुसाहेब.. दोघांनाही धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Aug 2016 - 6:58 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम धागा!

सैन्यामध्ये अधिकारी, सुभेदार आणि इतर रँक मध्ये जातीय आणि प्रांतिक भेदभाव नसला तरी उच्च निच्चतेचे भेदभाव खूप असतात असे ऐकले होते. जसं की वेगळी मेस, आहाराचा मेनू, वेगळी स्वच्छता गृहे, वेगळी क्लब्स, वेगळ्या गाड्या. प्रोटोकॉल समजू शकतो पण तोच न्याय त्यांच्या कुटुंबाला पण लागू असतो वाटतो. प्रांतिक सीमावाद नसतो हे म्हण्यासाठी ठीक आहे पण "ग्राही-ग्राही" हा शब्द खूप प्रचलित आहे सैन्यामध्ये. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

चलत मुसाफिर's picture

26 Aug 2016 - 10:19 pm | चलत मुसाफिर

सेनेत अधिकारी आणि जवान हे खांद्याला खांदा लावून छातीवर गोळी झेलतात. कारगिलपासून मागे इतिहासात जात जात कोणतेही युद्ध घ्या, तुम्हाला प्रत्येक लढाई-चकमकीत अधिकारी कामी आलेले आढळतील. युद्धभूमीवर तुम्ही मागे उभे राहून, कमरेवर हात ठेवून हुकूम सोडू शकत नाही. तुमच्या एका हुकुमावर तुमचे जवान जिवाची पर्वा न करता शिर हातावर घेऊन लढावेत अशी जर तुमची अधिकारी म्हणून अपेक्षा असेल (आणि ती तशी असायलाच हवी. शेवटी देशाचा प्रश्न आहे), तर तेवढा आदर, दरारा, विश्वास, प्रेम आणि धाक हे तुम्हाला घाम गाळून, प्रसंगी रक्त सांडून कमवावे लागतात. कारण ज्याने बॉम्बगोळ्यांच्या वर्षावात तुमचा हुकूम मानायचा आहे, तोही एक अभिमानी, कर्तव्यपरायण सैनिक असतो.

हे असे नाते निर्माण करायचे असेल, तर अधिकारी आणि जवान यांच्यामध्ये प्रसंगी निकटता आणि प्रसंगी अंतर हे दोन्ही असणे जरुरी आहे.

जातिसंस्था हे आजही भारतीय समाजातील एक कटुसत्य आहे. सेना ही समाजाचाच भाग असून सैनिक हे व्यापक समाजाइतकेच भले-बुरे असतात. जातिअंत हे ध्येय म्हणून कितीही उच्च असले, तरी ते अंमलात आणणे हे सेनेचे कार्य नव्हे. समाजाच्या सर्व बलाबलस्थानांनी युक्त असे सैनिक एकत्र करून, त्यांना प्रशिक्षित करून, त्यांना कुशल आणि प्रेरणादायक नेतृत्व देऊन देशरक्षणासाठी तयार करणे हे सेनेचे कार्य आहे.

जातिभावनेमुळे कुणाही सैनिकावर अन्याय होणार नाही आणि या भावनेचा राष्ट्रकार्यासाठी सकारात्मक उपयोग होईल इतकेच सेना करू शकते, आणि करतेही.

वरील शब्द politically incorrect वाटतील, पण ते सत्य आहेत. पण उद्या, जातिविरहित सैन्य हे आपले कार्य अधिक निष्ठेने व कुशलतेने करू शकेल अशी सामाजिक प्रगती भारतात झाली तर भारतीय सेना सर्व जातिविशिष्ट पलटणी ताबडतोब विसर्जित करील याबद्दल मला तरी मुळीच शंका नाही. पण ती वेळ अजून यायची आहे.

विशुमित's picture

27 Aug 2016 - 12:49 pm | विशुमित

जातीच्या संदर्भाबाबत प्रतिक्रियेशी सहमत. सैन्यामध्ये कोणाची जात काढणे हा खूप मोठा गुन्हा आहे. पण माझा सैन्यामधील हुद्यानुसार उच्च- निचतेबद्दल संभ्रम आहे. ट्रूप/कंपनीच्या आतमध्ये आणि युद्धजन्य परिस्थिती मध्ये हा प्रोटोकॉल समजू शकतो पण "फॅमिली वेलफेर" सारख्या कार्यक्रमामध्ये जो सैनिकांच्या कुटुंबियांसाठी असतो तिथे ही हा भेदभाव पाहायला मिळाला, हे मी माझ्या एका काकांच्या बरोबर दिघी येथे अनुभवलं आहे.

कमांड हॉस्पिटल मध्ये सुद्धा अधिकारी-सुभेदार हुद्यावर असणाऱ्यांना विशेष वागणूक दिली जाते, असे मला आलेल्या अनुभवावरून दिसले.
आहाराच्या मेनू/रेशन मध्ये सुद्धा रँक नुसार फरक असतो, असे ऐकले आहे. असे का हे समजले नाही.
CSD कॅन्टीनमध्ये सुद्धा अधिकारी-सुभेदार-आणि इतर रँक वाल्यांसाठी वेगळी लाईन असते, हे पटलं नाही.

मी अधिकारी वर्गाच्या आकसातून हे लिहले नाही पण प्रत्येक सैनिकाला त्याच्या कामा व्यतिरिक्त सोयी सुविधा आणि वागणूक समान मिळाली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. शेवटी प्रत्येक सैनिक हा प्राण पणाला लावून, हाल अपेष्टा सोसत देशाचं रक्षण करत असतात. (इथे "प्रत्येक सैनिक" सर्व सैनिक या अर्थाने घ्यावा)

मिपा/अन्य सोशल मीडिया वरती भारतीय सैन्याच्या कार्यपद्धती बदल विचार मांडणे, विरोध करणे, चुका शोधणे हे कायदेशीर/नैतिकतेच्या कक्षेत बसते का? हे जाणकारांनी समजून सांगावे, ही विनंती. नसेल तर मी माझी प्रतिक्रिया मागे घेतो. (हा पळपुटेपणा समजला जाऊ शकतो पण भारतीय सैन्य ही आपल्या भारतीयांसाठी अति संवेदनशील बाब आहे आणि मला तो आदर टुचभर ही कमी होऊन द्यायचा नाही)

चलत मुसाफिर's picture

27 Aug 2016 - 2:21 pm | चलत मुसाफिर

हेतू निर्दोष असेल तर कोणत्याही विषयावर चर्चा होऊ शकते

चलत मुसाफिर's picture

27 Aug 2016 - 2:33 pm | चलत मुसाफिर

सैन्यातील हुद्द्यांची उतरंड ही युद्धक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी निर्माण केलेली आहे. शंभर लोकांची कंपनी जर एका व्यूहरचनेनुसार बिनचूक हल्ला करू शकली नाही तर लढाई जिंकता येणार नाही. युद्ध सांगून होत नसते. आज्ञापालनाची मानसिकता सैन्यातील प्रत्येकाच्या (अधिकारी व जवान दोन्ही) रक्तात भिनलेली असते. ती शांतिकालातही तशीच शाबूत रहावी यासाठी सदोदित, निरंतर, कठोर प्रशिक्षण हे सेनेचे इतिकर्तव्य होऊन बसते. त्यात मानसिकता हा मूळ मुद्दा असल्यामुळे "नोकरी आणि घर" असा फरक करणे अशक्य असते. पण हुद्दा काहीही असला तरी अखेर प्रत्येकजण हा पलटणीसाठी प्राणाला पेटून लढणारा सैनिकच असतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Aug 2016 - 2:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

विशुमत सर, चमु सर,

थोड्या वेळात ह्या विषयावर माझे विचार मांडतो, ते परिपूर्ण असावेत त्यांच्यावर प्रश्न येऊ नयेत असे नाही तर माझ्या अल्पमतीला जे सुचतील ते सांगतो

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Aug 2016 - 6:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

चमु ह्यांच्याशी सहमत! :)

सुबोध खरे's picture

27 Aug 2016 - 7:15 pm | सुबोध खरे

विशुमित साहेब
भारतीय सैन्यात कॊणतीही जात किंवा धर्म मानला जात नाही. धर्म हा प्रत्येकाच्या घरात बंदिस्त असतो. उदा दहीहंडीसाठी हुल्लडबाजी किंवा मशिदीवर भोंगे लावले जात नाहीत. परंतु ज्येष्ठ आणि कनिष्ठ हे मात्र फार कसोशीने पाळले जाते. लष्करात एका पातळीपर्यंत लोकशाही आहे आणि जेवढी आहे ती नागरी लोकांच्या पेक्षाही नक्कीच जास्त चांगली आहे.
परंतु जेंव्हा प्रत्यक्ष कामाची वेळ येते तेंव्हा हुकूमशाहीच आहे(आणि असावी लागते.) एखाद्या वेळेस अधिकाऱ्यांनी सैनिकाला दिसताक्षणीच गोळ्या घालायचा आदेश दिला तर तो त्याने विनातक्रार पाळलाच पाहिजे. अन्यथा दंगली, आंदोलने इ. वेळेस हे तर आपलेच लोक आहेत मी गोळ्या चालवणार नाही असे सैनिक म्हणून लागले तर अनागोंदी होऊ शकते.
मी विक्रांत वर असताना आमच्या कॅप्टन ने मला स्पष्ट शब्दात सांगितले होते कि डॉक्टर, बहुसंख्य वेळेस मी तुला असे का करायचे त्याचे स्पष्टीकरण देईन. परंतु काही वेळेस हे स्पष्टीकरण तुला मिळणार नाही आणि तू केवळ मी आज्ञा दिली म्हणून ती तंतोतंत पाळणे आवश्यक आहे.
अधिकारी आणि सैनिक यामध्ये सुद्धा असा सुस्पष्ट फरक केला जातो आणि हा भरती पासून कसोशीने पाळला जातो. सैनिकांच्या डोक्यात हा माणूस अधिकारी आहे आणि त्याची आज्ञा पाळलीच पाहिजे याबद्दल कोणताही किंतु असता कामा नये. यासाठी पायदळ नौदल आणि वायुदलात त्यांची मेस वेगळी असते. त्यांची घरे वेगळी असतात. त्यांना मिळणाऱ्या सुविधा या त्यांच्या हुद्दयाप्रमाणेच असतात.रेशन मध्ये फरक नाही. उलट सैनिकांना गणवेश बूट इ गोष्टी फुकट मिळत असत आणि अधिकाऱ्यांना मात्र विकत घ्याव्या लागत.
अधिकाऱ्यांना गणवेश भत्ता मिळत असे (पण २००५ साली सात वर्षात एकदा ७०००/- रुपये मिळत आणि माझ्या नौदलातील पांढरा गणवेश विकत घेऊन धुवून पांढरा शुभ्र वापरण्यायोग्य ठेवणे यासाठी हा भत्ता फारच अपुरा असे) आता तो १४०००/- आहे.
मेस मध्ये सैनिकांना जेवण पूर्ण फुकट असते. अधिकाऱ्यांना आपले जेवण अधिकाऱ्यांच्या इतमामाने ठेवण्यासाठी साधारणपाने रेशन मिळून सुद्धा महिना १८००-२००० रुपये अतिरिक्त द्यावे लागत. बाहेरून दिसताना अधिकाऱ्यांचे जेवण हे जास्त चकाचक दिसते आणि लोकांचा गैरसमज होतो.
CSD कॅन्टीनमध्ये सुद्धा अधिकारी-सुभेदार-आणि इतर रँक वाल्यांसाठी वेगळी लाईन असते हे एक बहुसंख्य नागरी माणसांना न पटणारे कारण आहे. पण कुठेतरी हा माणूस वरिष्ठ आहे हे सारखे सैनिकांच्या मनावर बिंबवले जावे यासाठी या गोष्टी वेगळ्या असत.
जहाजात किंवा रेजिमेंट मध्ये रोज सैनिक आणि अधिकारी एकाच वातावरणात राहत असतात. त्यातून लष्करी अधिकारी आणि आजकाल सैनिक यांची पदवी एकच असते. बी ए किंवा बी एस सी. त्यामुळे सैनिकांना आपण अधिकाऱ्यांपेक्षा कमी नाही असा गंड निर्माण होऊ शकतो, इंजिनियर किंवा डॉक्टर या अधिकाऱ्यांच्या बाबतीत असा प्रश्न कमी वेळेस येतो. इंजिनियरिंगचे वरिष्ट सैनिक हे पदविका धारक (डिप्लोमा) असतात. आणि अधिकारी पदवी धारक असतात. वैद्यकीय खात्यात तर डॉक्टर आणि इतर असा सरळ फरक असल्याने हा प्रश्न कधीच येत नाही.
"अतिपरिचयात अवज्ञा" होऊ नये म्हणून या गोष्टी फार कसोशीने पाळाव्या लागतात.
वायुदलात (आणि नौदलात) एकंदर सैनिकांचे शिक्षण बऱ्याच वरच्या पातळीचे असते आणि बरेच सैनिक पदवीधर आहेत त्यामुळे सैनिकांना आपण अधिकाऱ्यांपेक्षा कमी नाही असा गंड पटकन होऊ शकतो त्यातून वायुदल हे फक्त ८० वर्षे अस्तित्वात आहे आणि त्यांच्या परंपरा अशा नाहीतच. त्यामुळे तेथे शिस्तीच्या बाबतीत परिस्थिती थोडी कठीण आहे. वायुदल हे वैमानिकांचे, वैमानिकांसाठी आणि वैमानिकाने चालविलेले असे मला एका वायुदलाच्या तळावर वायुसैनिकाने सांगितले होते. त्याला मी ताडकन जबाब दिला होता कि जेंव्हा युद्ध होईल तेंव्हा वायुदलात प्रत्यक्ष लढाईत लढणारा माणूस हा वैमानिकच असेल आणि तू वायुदलाच्या तळावर शान्त बसलेला असशील. नौदलात आणि पायदळात अधिकारी आणि सैनिक (च काय डॉक्टर सुद्धा) दोघेही प्रत्यक्ष युद्धात भाग घेत असतात. त्याच्या आगाऊपणाला उत्तर देण्यासाठी मी थोडी अतिशयोक्ती केली असली तरी हि सत्य गोष्ट आहे.
नौदलात असताना आमच्या कॅप्टनने स्पष्ट आदेश दिलेले होते कि अन्न फुकट गेले तरी चालेल पण अधिकाऱ्यांचे अन्न सैनिकांना( अधिकाऱ्यांचे आचारी वाढपी इ सैनिक असले तरीही) देता येणार नाही. त्यांनी त्यांचे जेवण सैनिकांच्या मेस मध्ये "च" जाऊन घेतले पाहिजे. सैनिक आणि अधिकारी यातील हा फरक त्यांना कायम डोक्यात ठेवलाच पाहिजे.
युद्धजन्य परिस्थिती मध्ये हा प्रोटोकॉल समजू शकतो पण "फॅमिली वेलफेर" सारख्या कार्यक्रमामध्ये जो सैनिकांच्या कुटुंबियांसाठी असतो तिथे ही हा भेदभाव पाहायला मिळतो कारण प्रत्यक्ष युद्धाचे वेळेस सैनिकांना शिस्त लावायला वेळ मिळत नाही.
जगभरात कोणत्याही लष्करात पूर्ण लोकशाही आणणे अशक्य आहे. मग ते अमेरिकन असो कि फ्रेंच. तेथील सैनिक ही अशाच तर्हेच्या तक्रारी करत असतात.

चंपाबाई's picture

28 Aug 2016 - 12:01 am | चंपाबाई

पाकिस्तानात असेच असते का ? की ते अब्दालीला फॉलो करतात ?

( अब्दाली रात्री टेहळणी करत असताना मराठा सैन्य तळात त्याला छोट्या छोट्या शेकोट्या व धूर दिसला.. उसने पूछा ये क्या है ? उसका नौकर बोल्या ... खाविंद ! ये लोग जात , पोटजात , धर्म , पद , वर्ण के अनुसार अलग अलग खाना पकाते है..

अब्दाली बोल्या ... जो लोग खाने कू एक नहीं होते वो लडने कू एक कैसे होंगे ? देख लेना अल्ला की दुवा से हमही जीतेंगे !

इस्वास पाटलांच्या पुस्तकात लिवलय . )

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Aug 2016 - 8:59 am | अनिरुद्ध.वैद्य

वॉव! मग तो जिंकलाच असता ;)

चंपाबाई's picture

28 Aug 2016 - 9:28 am | चंपाबाई

विश्वास पाटलानी पुस्तकात लिहिलय.

( फादर ऑफ हिंदुस्तान, फादर ऑफ पाकिस्तान व फादर ऑफ अफगाणिस्तान ... हे तीन्ही आम्ही प्रातःस्मरणीय मानतो. )

चंपाबाई's picture

28 Aug 2016 - 9:33 am | चंपाबाई

( फादर ऑफ हिंदुस्तान, फादर ऑफ पाकिस्तान व फादर ऑफ अफगाणिस्तान ... हे तीन्ही आम्ही प्रातःस्मरणीय मानतो. ) हे वाक्य माझे म्हणजे चंपाबाईचे आहे...

सुबोध खरे's picture

28 Aug 2016 - 10:31 am | सुबोध खरे

हो ना अब्दाली त्याच्या खानसाम्या आणि चोपदाराबरोबरच जेवत असे आणि
म्हणूनच त्याने बंगालपासून कन्याकुमारीपर्यःत दैदिप्यमान विजय मिळवलै

सुबोध खरे's picture

28 Aug 2016 - 10:37 am | सुबोध खरे

आणि तुमच्या इतर दोन्ही फादर ची राष्ट्रे पहा कशी सोन्याचा धूर काढत आहेत.

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Aug 2016 - 11:09 am | अनिरुद्ध.वैद्य

परम दयाळु अब्दाली हिंदुस्थानाच्या धर्मशाळेत मुक्काम न ठेवता परत गेलेत ते ही युद्धात जिंकलेलं सगळे परत टाकुन!
दैवी नायक ;)

चंपाबाई's picture

28 Aug 2016 - 11:56 am | चंपाबाई

ते कुठले तरी प्रभू जन्मभूमी गरियसी की कायसे म्हणून परत आले...
तसेच अब्दालीही बोलले व त्यानी कविता लिहिली ...

By blood, we are immersed in love of you.
The youth lose their heads for your sake.
I come to you and my heart finds rest.
Away from you, grief clings to my heart like a snake.
I forget the throne of Delhi
when I remember the mountain tops of my Afghan land.
If I must choose between the world and you,
I shall not hesitate to claim your barren deserts as my own

अब्दालीनं विंग्रजाना विंग्लिस शिकिवला काय?

सुबोध खरे's picture

28 Aug 2016 - 12:59 pm | सुबोध खरे

आणि अफगाण लोक सुद्धा किती स्वामीभक्त?
त्यांनी आपला देश जसाच्या तसा ठेवला आहे. सतराव्या शतकात
बापाची आठवण तशीच.

ते मूळ पश्तू कवितेचे इंग्रजी भाषंतर आहे.

लव ऑफ ए नेशन.

http://www.itdunya.com/showthread.php?57326-Ahmad-Shah-Abdali-Poetry

इथे मूळ कविता आहे... गांधारीची भाषा !

सुबोध खरे's picture

28 Aug 2016 - 5:54 pm | सुबोध खरे

मग अब्दाली तर हराम झाला.
त्याला जन्मभूमी जन्नतपेक्षा प्यारी झाली.
मुसलमान असून अल्ला सोडून जन्मभूमी
तोबा तोबा
लाहौल विला कुवत

सुबोध खरे's picture

28 Aug 2016 - 5:58 pm | सुबोध खरे

आणि ते 17 व्या शतकातून सहाव्या शतकात (पैगंबरांच्या)काळात केंव्हा जाणार?

माम्लेदारचा पन्खा's picture

28 Aug 2016 - 6:25 pm | माम्लेदारचा पन्खा

आता टेंशन नाही डॉक...जाऊदे तुम्ही नका इतकं महत्त्व देऊ...

अनुप ढेरे's picture

28 Aug 2016 - 8:31 pm | अनुप ढेरे

कविता छान आहे! आवडली.

उडन खटोला's picture

28 Aug 2016 - 7:37 pm | उडन खटोला

चंपू, लौ यु.
नेहमीप्रमाणेच अभ्यासु प्रतिसाद द्यायला इतरांना उद्युक्त करतेस. किती उचक्या लागत असतील नै तुला? फ़क्त जनसेवा म्हणून च सहन करतेस ना गं?

तेजस आठवले's picture

27 Aug 2016 - 6:10 pm | तेजस आठवले

उत्तम प्रतिसाद

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Aug 2016 - 8:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

उच्च निच्चतेचे भेदभाव खूप असतात असे ऐकले होते. जसं की वेगळी मेस, आहाराचा मेनू, वेगळी स्वच्छता गृहे, वेगळी क्लब्स, वेगळ्या गाड्या. प्रोटोकॉल समजू शकतो पण तोच न्याय त्यांच्या कुटुंबाला पण लागू असतो वाटतो.

त्याला "उच्च-नीच" असे नकारात्मक पाहिले तर कठीण होऊन बसेल, त्याला (व्यावसायिक दृष्ट्या)"वरिष्ठ-कनिष्ठ" असे म्हणाल्यास आपण त्या "रँक कॉन्शसनेस" चे "इसेन्स" पकडू शकू असे वाटते.ऑफिसर्स-जेसीओ-ओआर मेस वेगवेगळ्या का असतात? तर शुद्ध उत्तर प्लॅनिंग (पर्सोनेल मॅनेजमेंट ते कॉम्बॅट) ते भडास काढणे, सगळ्यासाठी. कारण आर्मी पूर्णपणे नीड टू नो बेसिस वर काम करते, कोणाला कुठल्या मिशन बद्दल काय अन किती माहिती असावे ह्याचेसुद्धा कडक नियम असतात, उदाहरणार्थ ,एखादे मिशन पार पाडताना केजुअल्टी किती होऊ शकतात, जखमी लोकांना बाहेर कसे काढायचे, शत्रूच्या गोटात हत्यारे कुठली आहेत ह्याचे (जर उपलब्ध असले तर) इंटेलिजन्स रिपोर्ट्स त्या हत्यारामुळे कुठल्या प्रतीच्या अन किती जखमा होऊ शकतात, त्यांना टेकल करायला कुठली औषधे हत्यारे फिल्ड हॉस्पिटलला असावी, फिल्ड मेडीक युनिट ड्युटी ला किती जवान डेप्युट करायचे हे डिटेल्स सीओ ने डॉक्टर सोबत डिस्कस करायचे असतात, ही डिस्कशन होतात मेस मध्ये! आता मेस मध्ये का ? तर वरती खरे साहेब म्हणाले आहेत तसे माणुस जरी 24 तास काम करत नसला तरी सैन्य करते, अन कठीण परिस्थिती मध्ये सीओ अव्याहत फक्त "बॉईज"चा विचार करत असतो, अश्यावेळी जर ऑफिसर्स/ओआर मेस एक केली अन एखाद्या ओआर (शिपायाने) जर वरती दिलेली मेडिकल कॉन्टिनजन्सी डिस्कशन ऐकली तर काय होऊ शकते, कर्णोपर्णी वार्ता होऊन एकंदरीत पूर्ण युनिटचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते, जवान साधे असतात, 10-12वी पास पोरे असतात ती तरुण, 18 ते 22 मधली सहसा 22 पर्यंत पोरे लान्स नाईक होऊन जातात, त्या पोरांना फक्त "कॉम्बॅट" शिकवलेली असते, "कॉम्बॅट मॅनेजमेन्ट" नाही, त्यांचा विश्वास असतो "सीओ साब" वर हा सीओ साब तोच असतो ज्याला वर्षानुवर्ष अगोदर एनडीए मध्ये शिकवतात "Lead your men into battle, because there is no runner up trophy for the war" , एक कारण हे झाले मेस वेगळी ठेवायचे,उरला मुद्दा भडास, जवान अगदी आज्ञाधारक बाळे असतात असे नाही, कधीमधी एखाद्या अधिकाऱ्याचा त्यांनाही राग येतो, दिलेली शिक्षा रुचत नाही पण कडक लष्करी शिस्तीपाई ती निभवावी लागते, परत संध्याकाळी जर तोच अधिकारी अन तोच जवान एकाच मेस मध्ये असले तर त्या जवानाला परत डिनर प्रोटोकॉल पाळणे क्रमप्राप्त झाले, मग भडास काढणार कुठे तर ओआर मेस! मजबूत दारू प्या आपापसात त्या अधिकाऱ्याचा उद्धार करा, मनाची पाटी कोरी करा अन दुसऱ्या दिवशी सकाळी परत फ्रेश मूड ने पीटी परेडला फॉलइन व्हा, अशी ती सोपी सुलभ अनलॉजी असते!. दुसरे म्हणजे मेनू, तो वेगळा असतो असे माझ्या ऐकिवात नाही, त्याबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल, फॅमिली, ह्या बाबतीत मला तितकीशी कल्पना नाही, पण आर्मी ऑफिसर्स वाईव्ज ह्यांनी चालवलेले "आर्मी वाईव्ज वेल्फेर असोसिअशन" त्याच्या अंतर्गत भरवलेली प्रदर्शने, त्यांनी आर्मी पेराप्लेजिक सेंटरला वेळोवेळी दिलेला भरघोस आर्थिक अन भावनिक आधार हे पाहता आर्मी हीच एक प्रचंड मोठी फॅमिली असल्याचे पटते. ह्यावर अजून काही मुद्दे आहेत, मांडलेल्या मुद्दयांनी जर तुमचे तार्किक समाधान होत नसले तर अजून मांडेन म्हणतो मी मुद्दे :)

ता. क. - स्वच्छतागृहे वेगळी असली तरी एखाद्या आयएएस अधिकऱ्याच्या हापिसात असतील त्या तोडीची स्वच्छ असतात, बाकी हायरर्की हे जीवनात कायम असलेले सत्य आहे, तुलना करायची म्हणूनच नाही पण हेच सेम मुलकी प्रशासनात सुद्धा असते, किंबहुना तिथे तर आयएएस मेस अन क्लर्क मेस मध्ये दर्जात्मक अंतर दाखवून देणारे घटकही असतात, इतकेच कश्याला कॉर्पोरेट-इंडस्ट्रियल मध्ये पहा, एमप्लॉयी लोकांना सोडेक्सो कूपन अन मॅनेजमेन्ट मधल्या हाय लेव्हल जनतेला गोल्फ क्लब मेम्बरशिप्स वगैरे, हे सुद्धा "उच्चं नीच" म्हणावे का?? माझ्यामते नाही :)

विशुमित's picture

30 Aug 2016 - 4:05 pm | विशुमित

बापू साहेब-
कोणत्या ही संस्थेमध्ये वरिष्ठ- कनिष्ठ चा मुद्दा मला पहिल्या पासूनच मान्य आहे. त्या बाबत माझे काहीच दुमत नाही.

तशी मी माझ्या मनाशी पक्की खून गाठ बांधून ठेवली आहे की कनिष्ठ-मध्यम-वरिष्ठ ही उतरंड युगें न युगे चालत आली आहे आणि ती अशीच युगें युगे चालत राहणार आहे . त्याला कोणतेच क्षेत्र अपवाद नसणार आहे.

आणखी फक्त एका गोष्टीचे वाईट वाटते ते म्हणजे अधिकाऱ्यांच्या घरी सहायक (हेल्पर) म्हणून काम करणाऱ्या जवानांचे. ह्याच्यावर थोडा प्रकाश टाकला तर या मागची पार्श्व भूमी समजेल. तुमचे काही अनुभव असतील तर अति उत्तम.

अप्पा जोगळेकर's picture

30 Aug 2016 - 4:42 pm | अप्पा जोगळेकर

साहेब,
नक्की प्रॉब्लेम काय आहे ? शिक्षण कमी असणार्‍या, गरीब घरातल्या आणि शारिरीक क्षमता उच्च असणार्‍या लोकांनी हमाली कामे किंवा टगेगिरी करत बसण्यापेक्षा एक शिस्तबद्ध, प्रगतीकडे नेणारी, क्रीडा/शिक्षण यासाठी उद्युक्त करणारी जीवनशैली स्वीकारली तर आनंदाची गोष्ट नाही का ?
या पार्श्वभूमीची माणसे जी लष्करात नसतात त्यांना सहसा अन-ऑर्गनाइझ्ड सेक्टर मधे जसे हेल्पर, अनस्किल्ड वर्कर वगैरे पद्धतीचे काम करावे लागते.
तिथे त्यांना कोणती मानाची वागणूक मिळणार आहे ?

विशुमित's picture

30 Aug 2016 - 5:26 pm | विशुमित

अप्पा साहेब जी,

मी सैन्यामध्ये भरती होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्यांत यशस्वी होऊन आणि प्रशिक्षण घेऊन सुद्धा हेल्परच काम करावं लागणाऱ्या जवानांबद्दल बोलत आहे.

"शिक्षण कमी असणार्‍या, गरीब घरातल्या आणि शारिरीक क्षमता उच्च असणार्‍या लोकांनी हमाली कामे किंवा टगेगिरी करत बसण्यापेक्षा">>>> ह्याच्याशी असहमत...!! याचा अर्थ असा घायचा का की सैन्यात भरती होणारे बहुतांश अगोदर हमाली आणि टगेगिरी करायचे?

माझ्या पाहण्यात असलेली चांगली आर्थिक परिस्थिती असणारी गावातील प्रत्येक घरातील लोक सैन्यात रुजू आहेत.

(तसं मला प्रॉब्लेम माझ्या घरातील व्यक्तीची, जी सैन्यात आहे, ह्या कथित वरिष्ठ-कनिष्ठ पद्धतीमुळे हेळसांड होते त्याचे दुःख वाटले म्हणून हा लेखन प्रपंच)
सैन्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे नेहमी अति संवेदनशील असते, हे मी आधीच नमूद केले आहे. तुम्हाला माझे प्रश्न विचारणे आवडले नसेल तर माझा पूर्ण विराम.

अप्पा जोगळेकर's picture

31 Aug 2016 - 11:36 am | अप्पा जोगळेकर

ह्याच्याशी असहमत...!! याचा अर्थ असा घायचा का की सैन्यात भरती होणारे बहुतांश अगोदर हमाली आणि टगेगिरी करायचे?
साहेब मी सैनिक केडरच्या लोकांबद्दल बोलत आहे. कमिशन्ड किंवा नॉन कमिशन्ड अधिकारी नव्हे.
सधन घरातील किती टक्के लोक सैनिक म्हणून भरती होतात ?

सैन्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे नेहमी अति संवेदनशील असते, हे मी आधीच नमूद केले आहे
असे काही नाही. होली काऊ असे काहीच नसते.

विशुमित's picture

31 Aug 2016 - 12:35 pm | विशुमित

म्हणजे गरीब घरातील आहेत म्हणून, ज्या उद्देशासाठी सैन्यात भरती झाले तो उद्देश सोडून अधिकाऱ्यांची हेल्पर गिरी करायला मिळणे हे थोर भाग्य आहे असे म्हणायचं आहे का तुम्हाला? नेमका हाच विचार मला खटकला

सधन घरातील किती टक्के लोक सैनिक म्हणून भरती होतात ?>>>>>
सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, इ मधील अशी किती तर गावं आहेत जिथे घरागणीस मुले सैन्यात आहेत. पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तरांचल, हरियाणा राज्यातील किती तरी सधन घरातील मुले सैन्यात जाणे प्रतिष्ठेचे मानतात.
तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यामधील किती तरी उच्च शिक्षित मुले सैन्यात भरती होतात. (ही मी प्रातिनिधिक उदाहरणे दिली आहेत, बाकी प्रांतांचे पण योगदान आहेच )

मी सैन्य संस्थेला होली कॉव च मानतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Aug 2016 - 6:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

आणखी फक्त एका गोष्टीचे वाईट वाटते ते म्हणजे अधिकाऱ्यांच्या घरी सहायक (हेल्पर) म्हणून काम करणाऱ्या जवानांचे

विशुमितजी,

बहुतेक आपला एकसारखे दिसणारे गणवेश असल्यामुळे आर्मीचे वेगवेगळे आर्म/कोर त्यांची फंक्शन इत्यादी बद्दल प्रचंड जास्त गोंधळ उडालेला आहे असे वाटते, ऑर्डर्ली ज्यांना बॅटमॅन असेही म्हणतात हे खास प्रशिक्षित असे लोक असतात, ही मंडळी आर्मी सर्विस कोरची असते, ह्यांचे शास्त्रशुद्ध हाऊसकिपिंग, केटरिंग बार टेंडिंगचे ट्रेनिंग बंगलोर स्थित कॉलेज मध्ये मिळते, ह्या व्यतिरिक्त "सहाय्यक" ही एक पोस्ट असते ज्यात एक सैनिक strictly अधिकाऱ्याचा पर्सर म्हणून डेप्युटेड असतो, अश्या सैनिकांना कधीही अधिकाऱ्याची वैयक्तिक कामे करावी लागत नसतात, एखादा अधिकारी तसे करवून घेत असल्यास ते दुर्दैवी अन वन ऑफ इट्स काईन्ड उदाहरण होय, बाकी डिटेल नंतर बोलतो तूर्तास ह्या 2 लिंक्स कामी याव्यात, प्रश्न असल्यास जरूर विचारावेत ही विनंती विशेष, मला उत्तर द्यायला आवडेल

लिंक क्रमांक एक

लिंक क्रमांक दोन

ह्याच्याशिवाय एक वैयक्तिक प्रश्न विचारतो, राग मानू नये ही विनंती, इंडियन आर्मी विषयी आपल्या मनात काही अढी बसलेली आहे का? असल्यास ती चूक आहे असे मी म्हणणार नाही, ती जर काही चुकीच्या संकल्पनांमुळे बसली असेल तर त्या मी साफ करायचा प्रयत्न करू शकेल, अन ती अढी ठेवायचा तुम्हाला हक्कही आहेच, शेवटी आर्मी ही पण हाडामांसाच्या माणसांची बनलेली असते, हे तुम्ही काय किंवा मी काय कोणीच विसरू शकत नाही, हे ही खरेच

-कळावे
बाप्या

विशुमित's picture

31 Aug 2016 - 9:57 am | विशुमित

बापू साहेब-
माहिती साठी तुमचे खूप खूप आभार..!!

सैन्याबद्दल मला नितांत आदर आणि आपुलकी आहे. फक्त घरातील एक व्यक्ती जी सैन्यामध्ये आहे, त्यांच्या बरोबर काही काळ राहण्याची संधी मिळाली. त्यावेळेस जे काही खटकलं त्याबद्दल मी माझे काही प्रश्न मांडले.
बहुदा मी नागरी आयुष्य आणि आर्मीचे आयुष्य यांची तुलना करत होतो त्यामुळे असेल कदाचित. आर्मी बद्दल अढी वगैरे असं काही ही नाही, गैरसमज नसावा.

गंम्बा's picture

31 Aug 2016 - 12:21 pm | गंम्बा

त्यांच्या बरोबर काही काळ राहण्याची संधी मिळाली. त्यावेळेस जे काही खटकलं त्याबद्दल मी माझे काही प्रश्न मांडले.
बहुदा मी नागरी आयुष्य आणि आर्मीचे आयुष्य यांची तुलना करत होतो

विशुमत जी - नागरी आयुष्यात खटकण्यासारख्या गोष्टी आर्मीच्या आयुष्यापेक्षा १०० पट जास्त असतील.

विशुमित's picture

31 Aug 2016 - 12:37 pm | विशुमित

तीव्र सहमत..!!

माझा रोख याच गोष्टींसाठी होता.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/video-of-army-personnel-came-co...

(पण अशी संवेदनशील माहिती जवानांनी उघड करू नये असे प्रामाणिक मत आहे. तक्रार करण्यासाठी प्रॉपर चॅनेल चा वापर करायला पाहिजे होता.)

Armed Forces Special Powers Act च्या सैनिकांना अमर्याद पॉवर देणार्‍या तरतुदींवर, त्याच्या होत असलेल्या सुयोग्य/ गैर वापरावर त्याच्या आवश्यकतेवर अनावश्यकतेवर.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याचा धोका पत्करुन चर्चा व्हावयास हरकत नसावी.

सुबोध खरे's picture

26 Aug 2016 - 9:23 pm | सुबोध खरे

वेगळा धागा काढा
आरामखुर्चीत विचारवंत भरपूर आहेत मिपा वर त्यांचे म्हणणे (दुसरी बाजूही) हि ऐकायला मिळेल. ( हे मी उपहासाने नाही तर गंभीरपणे लिहीत आहे)

खरय खरे साहेब
मुलभुत मानवी हक्काचा विचार करणारे सर्व चोर लफंगे
भारतीय घटना लिहीणारे व मुलभुत मानवी हक्काच्या तरतुदी त्यात करणारे सर्व समिती सदस्य
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ज्यांनी अ‍ॅफ्स्पा संदर्भात जो नुकताच निकाल दिला
जीवन रेड्डी कमिशन
इरोम शर्मिला सारखे संधीसाधु वर्शानुवर्षे उपोषणाचे ढोंग करणारे व शेवटी हळूच चोरपावलाने राजकारणात घुसणारे
आणि सर्वसामान्य घरातल्या मणीपुरी गृहीणी ज्यांनी रस्त्यावर उतरुन अंगावरील सर्व कपडे काढुन
नग्नावस्थेत निदर्शने केली आणि मनोरमा
हे सर्वच आरामखुर्चीतलेच विचारवंत आहेत.
आणि हो हे मी उपहासाने लिहीत नाहीये गंभीरपणे लिहीतोय या लोकांचा नाटकीपणा या
गृहीणींचा लटका राग आणि अश्लील निदर्शन मला चुकीचाच वाटतो.
लेख लिहीतो स्वतंत्र तोपर्यंत हे वाचुन घ्या टाइमपास म्हणुन
आणि हो हे मी अजिबात उपहासाने लिहीत नाहीये
गंभीर विनोद करतोय
http://www.outlookindia.com/website/story/indian-army-rape-us/296634

अमितदादा's picture

27 Aug 2016 - 12:55 pm | अमितदादा

गंभीर अनुमोदन. फक्त एक दुरुस्ती इरोम शर्मिला हि आरामखुर्ची तील विचारवंत नसून पलंगावरील/गादीवरील विचारवंत आहे, कारण 16 वर्ष ती त्यावरच होती. आणखी एक लेख लिहताना संतोष हेगडे कमिटी चा रिपोर्ट चा हि विचार करा.

चंपाबाई's picture

27 Aug 2016 - 2:42 pm | चंपाबाई

वर्षानुवर्षे उपवास / उपोषण करणार्‍यानी नंतर राजकारणात जाउच नये का ?

अनिरुद्ध.वैद्य's picture

27 Aug 2016 - 9:36 pm | अनिरुद्ध.वैद्य

नेहमी दहशतवादी वगैरेंचीच साईड घेऊन का बोलतात हो? येखाद दोन मानवी हक्कवाले दाखवा न ज्यांनी दहशतवादी कँपवर जाउन प्रबोधन्वगैरे काही केले असेल? दहशतवाद्यांचे व्हिक्टीम माणसेच असतात न? अन त्यांना कधी हक्क नसतो का जगण्याचा?

तेजस आठवले's picture

27 Aug 2016 - 6:09 pm | तेजस आठवले

जातीय / धार्मिक पिंक, तेढ वाढविणारी वक्तव्ये ह्यांकडे दुर्लक्ष करून ह्या धाग्यावर चांगली चर्चा होत आहे हे निरीक्षण आणि होत राहील हे अपेक्षा.
काही आयडींना उत्तर देत बसण्यापेक्षा आपण आपली रेघ मोठी केली की ते आपोआप निष्प्रभ होतील ह्याची खात्री वाटते.

सहमत. धाग्यावरील बरेचसे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

सुबोध खरे's picture

27 Aug 2016 - 9:24 pm | सुबोध खरे

Brigade of the Guards
Parachute Regiment
Mechanised Infantry Regiment
Punjab Regiment
Madras Regiment
The Grenadiers
Maratha Light Infantry
Rajputana Rifles
Rajput Regiment
Jat Regiment
Sikh Regiment
Sikh Light Infantry
Dogra Regiment
Garhwal Rifles
Kumaon Regiment
Assam Regiment
Bihar Regiment
Mahar Regiment
Jammu & Kashmir Rifles
Jammu & Kashmir Light Infantry
Naga Regiment
1 Gorkha Rifles (The Malaun Regiment)
3 Gorkha Rifles
4 Gorkha Rifles
5 Gorkha Rifles (Frontier Force)
8 Gorkha Rifles
9 Gorkha Rifles
11 Gorkha Rifles
Ladakh Scouts
Arunachal Scouts
Sikkim Scouts
भारतीय लष्कराच्या सर्व रेजिमेंटची नावे आपण पाहिलीत तर काही गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतील त्या म्हणजे बहुसंख्य रेजिमेंट्स या सीमावर्ती भागातील राज्यांच्या आहेत. यात अंतर्गत चार राज्यांचे (फक्त बिहार मद्रास महार आणि मराठा) हे अपवाद आहेत. महाराष्ट्राच्या ( नावाने का होईना) दोन रेजिमेंटस आहेत. यात प्रांतिक वाद इ काही नसून प्रत्यक्ष ज्या प्रांतातील लोक जास्त युद्धमान राहिले तेथे योद्धे आणि वीर यांची गौरवशाली परंपरा असल्याने लष्करात जाणे हे मान सन्मानाचे समजले जाते.या रेजिमेंट्सच्या वैभवशाली परंपरा त्या लष्करातील कामगिरीला आवश्यक समजल्या जात असल्याने त्या तशाच कायम ठेवल्या गेल्या.
राहिली गोष्ट प्रत्यक्ष लढाईची. राजस्थान मध्ये युद्ध झाले तर राजपुताना रायफल्सचे लोक किंवा चीन बरोबर युद्ध झाले तर सिक्कीमचे किंवा अरुणाचल प्रदेशाचे लोक केवळ देशासाठीच नव्हे तर आपल्या भूमीसाठीशिवाय संस्कृती आणि भाषिक कारणासाठी प्राणपणाने लढतील हा गोष्ट वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी लक्षात घेतल्याने सरकारने हि प्रांतिक नावे असलेल्या रेजिमेंट्स चालू ठेवण्यासाठी अनुमती दिली. शिवाय सिक्कीम स्काऊट्स चे सैनिक तेथे युद्ध झाले तर आपल्या "मातृभूमी"शी आणि तेथील "हवामाना"शी चिरपरिचित असतात. एखादा राजस्थानी राजपूत तेथील स्थानिक माणसांकडून जितकी चांगली माहिती काढू शकेल तेवढी दुसऱ्या राज्यातील माणूस नाही.
महार रेजिमेंट हि बरखास्त झालेली असताना महार जातीतील योध्द्यांना मनाच्या नोकऱ्या मिळाव्यात म्हणून डॉ बाबासाहेब आंबेड्करांच्या आग्रहाखातर परत सुरु झाली आहे. परंतु या रेजिमेंट मध्ये सर्व जाती आणि धर्माच्या लोकांचे मिश्रण आहे केवळ महार नाहीत हि गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. महार रेजिमेंट हि सर्वात जास्त सरमिसळ असलेली रेजिमेंट आहे.
The Mahar Regiment was originally intended to be a regiment consisting of troops from the Mahars in Maharashtra, the Mahar Regiment is one of the only regiments in the Indian Army that is composed of troops from all communities and regions of India.

n the July 1941, B. R. Ambedkar was appointed to the Defence Advisory Committee of the Viceroy's Executive Council. He used this appointment to exert pressure within the military establishment for a Mahar regiment. He also appealed to the Mahars to join the Army in large numbers. In October, the Army gave in, and the 1st Battalion of the Mahar Regiment was raised in Belgaum
पहा -- https://en.wikipedia.org/wiki/Mahar_Regiment.

गामा पैलवान's picture

28 Aug 2016 - 6:46 pm | गामा पैलवान

चंपाबाई,

>> ( फादर ऑफ हिंदुस्तान, फादर ऑफ पाकिस्तान व फादर ऑफ अफगाणिस्तान ...
>> हे तीन्ही आम्ही प्रातःस्मरणीय मानतो. )

बांगलादेशास फक्त आई आहे. बिनबापाचा असल्याने प्रात:स्मरणीय नाहीये तुम्हाला वाट्टे?

आ.न.,
-गा.पै.

मला भारतीय सैन्याबद्दल अतीव आदर आहे. अमित दादा, सोन्याबापू यांच्यामुळे चर्चाही खूप चांगली चालू आहे, म्हणून माझे एक निरीक्षण किंवा शंका नोंदवतो. शंका बरीच विशुमित यांच्याप्रमाणे आहे.
मी गेल्या चार महिन्यात सहलीसाठी म्हणून गढवाल रायफल्स चे मुख्यालय लॅन्सडाऊनी आणि कुमाऊ रायफल्स चे मुख्यालय रानीखेत पाहून आलो. मी सध्या बेंगाल इंजिनिअरिंग ग्रुप चे मुख्यालयआहे त्या रुरकी या ठिकाणी राहतो. इथे सैन्य दलातील लोकांची संख्या बरीच लक्षणीय आहे.
सर्वसाधारणपणे आपल्या मनात सैनिकी पेशाबद्दल खूप आदर असतो. मात्र मी इथे कामाच्या स्वरुपाविषयी काही वेगळेच पहिले.
माझ्या मुलांच्या शाळेतील पालक सभेला एका वेळीस किमान १० ते १२ गर्द शेवाळी रंगातील मिलिटरी जिप्सी गाड्या व त्यांचे चालक आलेले असतात. हा सरकारी पैश्याचा गैरवापर नाही काय ?
शक्तिमान गाडीचा सर्रास वापर शाळेच्या बस सारखा करतात, हे हि मनाला पटत नाही.
इतकेच काय, अधिकाऱ्याच्या पत्नी व मुलांसोबत मॉल आणि बहुपडदा चित्रपट गृहातसुद्धा गणवेशातील जवान येतो व मध्यंतरात चहापाणी आणून देतो. हे खरोखर योग्य आहे काय? यात कसली आलीय देशसेवा?

केवळ इतकेच नाही, संध्याकाळी व्हॉलीबॉल खेळायला माझे दोन कर्नल मित्र माझ्या टीममध्ये येतात. त्यांचं अनुभवही खूप भारी होता. बॉल कोर्टबाहेर गेल्यावर, ते आणायला जायचेच नाहीत, इतरांनी आणण्याची वाट पहायचे, शेवटी तुझा रुबाब ऑफिसमध्ये असे आम्ही स्पष्ट सांगितल्यावर थोडे माणसाळले. कदाचित हा एक व्यक्तिनिष्ठ अनुभव असू शकेल.

पण एकंदरीत जवानाच्या सेवेचा खासगी कामासाठी बराच गैरवापर होतो असे निरीक्षण नोंदवतो .

तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे. बऱ्याच वेळा भारतीय आर्मी विषयी आलेल्या अतीव प्रेमामुळे असले विषय चर्चेला येणे अवघड होऊन बसत, त्यामुळं काही चुकीच्या प्रक्टिस वर सुद्दा बोलणं अवघड होत. आर्मी ऑफिसर ना खरं तर पर्सनल गरजा साठी सहायक म्हणून जवानांची नेमणूक होते यांना बॅटमॅन बोललं जातं, परंतु सर्रास हे जवान ऑफिसर बरोबर त्याची पत्नी, मुले यांची ही सेवा करताना दिसतात. हि इंगजी पद्दती बद्दल अनेक जवान मध्ये असंतोष आहे. खालील दिलेली लिंक पहा यांच्यामध्ये एक NSG trained कमांडो जवान त्याची कार्यकीर्द फक्त ऑफिसर चा फॅमिली servent म्हणून घालवतो. हि आर्मी रेसौर्स च पूर्ण वेस्ट आहे. हे जुन्या काळामध्ये चालून गेलं, परंतु सामाजिक जाणावा प्रगल्भ असणाऱ्या पिढीतील जवनांना हे सध्या मानवात नाही, त्यातूनच मग जवान आणि ऑफिसर यांच्यात चकमकी झालेल्या दिसून आलेलं आहे.

सासंद कमिटी ने या पद्धती वर जोरदार आक्षेप नोंदवले आहेत. तसेच त्यावेळचे आर्मी चीफ VK सिंग यांनी सुद्धा हि पद्दत बंद करून आर्मी ऑफिसर ला फक्त buddies नेमण्याची गरज व्यक्त केलीय, जे फक्त ऑफिसर ना प्रोफेशनल तसेच कार्यालयीन कामात मदत करतील. हि पद्दत बहुदा वायुदल आणि नौदल यात नसावी, जाणकार अधिक प्रकाश टाकू शकतील. तसेच पोलीस दलातील उच्च पदस्थ ऑफिसर सुद्धा हि पद्दत वापरतात, बरेच पोलीस शिपाई घरघुती नोकर म्हणून वापरले जातात. याबद्दल मुंबई मिरर ने एक लेख प्रसिद्ध केलेला, जालावर शोधा, सापडेल.

http://www.tehelka.com/2014/04/army-officers-using-jawans-as-domestic-st...

तसेच आणखी माहिती साठी जाणकारांचे वरचे तसेच येणारे प्रतिसाद वाचा.