त्याचा प्लान होता चांगला . अगदी माझ्या आवडीचा होता . पण सध्या कशातच मन नवतं . गेल्या २५ वर्षाच्या आयुष्यात फक्त तेच ५-६ दिवस होते . जेव्हा मला पूर्ण हरल्यासारखं वाटत होतं . नापास होणं मोठी गोष्ट नवती . आधी हि मासिक परीक्षेत झालो होतो . पण लगेच पुढच्या परीक्षेत त्याची भरपाई हि केली होती . एक तर पुस्तकि किडा नवतो . जमेल तेवढ्या स्पर्धा आणि खेळ खेळायचो . त्यामुळे मासिक परीक्षा कधीच गृहीत धरली नवती . सहामाही आणि वार्षिक परीक्षेलाच काय तो अभ्यास करायचो .त्यामुळेच कोणत्याही परीक्षेत नापास होण्याने कधीच एवढं वाईट वाटलं नसतं . पण . त्या रात्री आई बाबांना बोलताना ऐकलं मी . बाबा रडत होते . हे मी कधीच बघितलं नवतं . मी नापास होण्याचा दोष ते स्वतः वर घेत होते . त्या येड्या माणसामुळे बाबांच्या डोक्यात हे खूळ आलं होतं .
गौरव रोज मला विचारायचा . कि मी काय विचार केलाय . पण काही तरी फालतू कारण देऊन आणि विषय बदलून मी फोन ठेऊन द्यायचो . असेच १-२ आठवडे गेले. . आणि बाबांच्याच एका मित्राच्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण होतं . तिथे सगळी ओळखीची मंडळी असणार होतीच . मी तिथे जायला कुरकुर करत होतो . तेव्हा बाबा म्हणाले . . "चूक केली आहेस . लोक बोलणारच . ऐकून घे . जो पर्यंत हि चूक सुधारत नाहीस . तो पर्यंत काहीही उत्तर न देत ऐकून घ्यायचं . उलटून उत्तर देऊ नकोस कोणालाही तू . मी बघतो कोण काय बोलतंय ते . तू फक्त पुढे वर्ष भर काय करणार आहेस ते सांग . पुढे शिकणार नसशील तर तसं सांग स्पष्टपणे . बघू आपण काही तरी . पण जे आहे ते निर्णय घे पटकन . आणि त्या निर्णयामागे ठाम राहा . असा बाय्ल्यासारखा रडत बसू नको . परत स्वतःला खोलीत बंद करून घेतलेलं बघितलं तर लाथ मारून घराबाहेर काढेन . . असला रडवा मुलगा नाही गरजेचा मला . आणि हो . यापुढे तू जे काही करशील ते स्वतःच्या हिमतीवर करायचं . आई वडील म्हणून जे काही करायचं होतं ते गेल्या १८-१९ वर्षात आम्ही केलंय . यापुढे तुझा तू मालक . आमची मदत लागली तर सांग . अन नाही लागली तर चांगलीच गोष्ट आहे . "
वडील ओरडत असताना वास्तविक वाईट वाटायला हवं . राग यायला हवा . किंवा चेहऱ्यावर कमीत कमी अपराधीपणा तरी दिसायला हवा . . पण मला बरं वाटत होतं . हसू येत होतं मला .
एक गोष्ट कळून चुकली होती . कि मी जो काही निर्णय घेईन त्यामागे बाबा उभे असतील खंबीरपणे . आणि मला त्यांनी स्वतःच आयुष्य स्वतः घडवायला सांगितलं होतं .
त्यांना मी मित्राचा प्लान सांगितला . त्यांना फारसा पटला नवता . पण तरी त्यांनी होकार दिला होता . पैसे कमावून घरात मदत होणार असेल . तर का नाही म्हणतील . ते पुढे जे काही म्हणाले. ते आयुष्यभर विसरणार नाही मी . . प्रत्येक शब्द कायम कानात फिरत असतो .
" जे काही करणार असशील ते कर . पण जे काही कमावशील त्यातलं ६०% आत्ता तुझ्या आईला द्यायचं , आणि नंतर तुझ्या बायकोला . या बायकाच घर चालवतात लक्षात ठेव. आपण फक्त बाहेरून सामान आणून देतो . त्या पैश्याचं ती काय करते हे तू कधी विचारायचं नाही . उरलेल्या पैशाचं काय करतोस हे ती कधी विचारणार नाही . दुसरी गोष्ट . या वयात व्यसनं लागतात . आम्हीही केलीत . मी नाही म्हणणार नाही . अजुनी करतो . दिवसात २-३ पाकिटं संपवलीत सिगारेट ची एके काळी . दर २-३ दिवसांनी दारू पण प्यायचो . पण म्हणून कधी कामावर फरक पडू दिला नाही . आणि जेव्हा वाटलं कि फरक पडतोय कामावर . सोडून दिलं सगळं . तुला जे करायचं ते कर . जसं जगायचं जग . पण ज्याक्षणी वाटेल कि एखाद्या गोष्टीच्या आहारी जतोएस . त्याक्षणी ती गोष्ट सुटली पाहिजे . कुठल्याच गोष्टीची सवय लाऊन घेऊ नको . कधी तरी मजेसाठी ठीक आहे . . तिसरी गोष्ट . परत एकदा सांगतोय . . तुला जे हवं ते कर . पण तुझ्यामुळे कधी परत आम्हाला ऐकून घ्यावं लागलं कोणाकडून , ते मला चालणार नाही . गेल्या ४५ वर्षात कधी एक थेंब आला नवता डोळ्यातून . काल आला. फक्त तुझ्यामुळे . तुझ्या नावामागे जे आडनाव लागलंय त्याला काही बट्ट्या लावलास . त्या दिवशी तू घरातून बाहेर जाशील . "
अगदी कमीत कमी शब्दात त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या होत्या . फालतू बंधने घालण्यापेक्षा हे असं सांगितलेलं कायम पटतं मला .
त्याच संध्याकाळी गौरव ला तयारी सुरु करायला सांगितली . . प्लान अगदी सोप्पा होता . . त्याच्याकडे पैसे होते . माझ्याकडे अन ऋग्वेदकडे कम्प्युटर चं ज्ञान आणि गेम्स बद्दल वेड होतं . नवीन गोष्टी पटकन शिकायची क्षमता होती . आणि मुख्य म्हणजे . लोकांना बोलण्यात गुंतवून गंडवू शकत होतो दोघे मिळून . तिघांनी मिळून सायबर केफे टाकायचा ठरवला . पैसे अन जागा त्याची . बाकी सांभाळण्याची आणि पुढे वाढवण्याची जबाबदारी आमची . तिघानाही माहिती होतं कि फक्त एवढ्यावरच आम्ही गप्प बसणार नाही . पण आधी सुरुवात . बाकी सगळं नंतर . या एकाच विचारांनी तिघे एकमेकाला शांत करत होतो . अति उत्साह नडतो . तो अजिबात नको होता .
हे सगळं होत असतानाच . . लग्नाला जायचा दिवस आला . आणि तिथे हि तो हरामखोर भेटलाच . बाबा अन मी चिकन बिर्याणी ची मजा घेत बसलो होतो . . तेवढ्यात हे साहेब आणि त्यांचा मुलगा आला . आल्या आल्या म्हणाला . "काय रे, वर्ष भर आता कुठल्या दुकानात काम करणार का? मिळतील १-२ हजार . त्यापेक्षा जास्ती तरी काही करू शकणार नाहीस आत्ता . . "
त्याचाकडे पूर्ण दुर्लक्ष करत योगेशला विचारलं ( त्यांचा मुलगा ) . अरे तू इंजीनारिंग करत होतास ना क़ाय झालं ?
"हो रे . झालं कि पूर्ण . पण दीड वर्ष झालं नोकरी शोधतोय रे . "
मी पुढे काही बोलणार तेवढ्यात बाबा त्या काकांना म्हणाले . . " काय मग . पाठवता का याला आदित्य च्या कम्प्युटर दुकानात ? पगार देऊ त्याला २-३ हजार . त्याला कामगार मुलं पाहिजे होतीच तशीही . . "
असं वाटलं कि उठून बाबांना मिठीच मारावी . जो चेहरा झाला होता त्या काकांचा . वाह . . या सगळ्यात बिचारा योगेश सापडला . . असो . सुक्याबरोबर ओलं पण जळतं . .
पुढे २-३ दिवसात आमचा स्वतःचा सायबर कॅफे सेट झाला होता . गावातल्या २ सायन्स कॉलेज आणि एक इंजिनियरिंग कॉलेज च्या अगदी मधोमध होता . म्हणजे लोकेशन अगदी परफेक्ट होती गौरव ची . बाकी जाहिरात आम्ही केलीच होती . कॉलेज मधील मित्रमंडळी होतीच . सुरुवातीचे ४-५ दिवस मोकळे बसून काढल्या नंतर अक्षरशः जेवायला पण वेळ मिळत नवता . पुढल्या वर्षात " सायबर कॅफे " या साच्यातून बाहेर पडून . इतर हि बरेच छोटे मोठे व्यवसाय जोडले गेले त्यात . आपल्या आवडत्या व्यवसायात उतरलो होतो . आणि सगळे खर्च सोडून आरामात १०-१२ हजार हातात येत होते . .
शेवटी व्हायचं तेच झालं . व्यसन लागलं . पण पैसे कमवायचं . त्याचा परिणाम . कॉलेज ला जायचा विचार डोक्यातून काढून टाकला . परत ते क्लासेस आणि घोकंपट्टी करायची इच्छा नवती अजिबात . शिकत गेलो ते कम्प्युटर शी निगडीत गोष्टी . जमतील त्या मार्गाने . घरातले हि खुश होते . नापास झालो म्हणून पडून न राहता काही तरी करत होतो . .
पण या कॅफे चालवण्याच्या १-२ वर्षाच्या वेळेत भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या .
एक . कि काही झालं तरी, जर आई बाबा पाठीशी असतील . तर बाकीचे तेल लावत गेले तरी काही घंटा फरक पडत नाही . . दोन . प्रत्येकाला इंजिनियर होण्याची गरज नाही . पण तरीही जमेल तेवढं शिकायची गरज आहेच . आणि आपल्याला आवडेल आणि शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेला जमेल तेच शिकावं . तीन . ' नातेवाईक' आणि ' आप्त' या नावाखाली जे काही आपल्यात घरात जेवण करत आपल्यालाच ऐकवणारे हरामखोर लोक असतात . त्यांचं ऐकून घेण्याची काही एक गरज नसते . हे गरजेला कधीच उपयोग पडत नाहीत . उपयोगी येतात ते मित्र . आणि शिकत रहा आयुष्यभर . .
प्रतिक्रिया
21 Apr 2015 - 11:55 am | एस
मस्त!
21 Apr 2015 - 4:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
५०००० % सहमत. सख्खे आई-बाप आणि जवळचे जी-मित्र सोडुन चौथ्या कोणालाही महत्त्व देउ नये. स्वानुभव. नातेवाईक मंडळी तर चक्क "सुरक्षित अंतर पाळा" वर ठेवावी. त्यातही जी आगाउ पणा करतीलं त्यांना शिस्तीत तोंडावर फाट्यावर मारावं.
21 Apr 2015 - 7:30 pm | हाडक्या
+१०००० हो.. अनुभव असा की त्यांच्यापैकी बर्याच जणांची मदत भावनेपेक्षा उपद्रवक्षमताच खूप.. (४ चांगल्या नातेवाइकांसाठी ५० असले सहन करावे लागतात.. :| )
21 Apr 2015 - 11:56 am | नेत्रेश
Part 1 Link
21 Apr 2015 - 1:00 pm | मास्टरमाईन्ड
१००% पटलं
21 Apr 2015 - 3:04 pm | संदिप एस
सुपर्ब! असं वाटतय कि माझीच कहाणी मला कोणीतरी सांगतय!
सेम टू सेम सी॑क्वेन्स... एक्दम नॉस्टॅलजीक का काय म्हणतात तसे झालेय..
21 Apr 2015 - 4:47 pm | अनुप ढेरे
आवडलं!
21 Apr 2015 - 9:15 pm | एक एकटा एकटाच
पुढचा भाग येउ द्यात लवकर
22 Apr 2015 - 12:46 am | सौन्दर्य
एकदम परफेक्ट. जाम आवडलं. ऑल द बेस्ट, पुढील वाटचालीसाठी.
22 Apr 2015 - 10:34 am | अद्द्या
सगळ्यांचे धन्यवाद :)