श्रावण सगळा सरला
टिपूस नाही पडला.
बळीराजाच्या अश्रूंनी
धरती जळून गेली.
सांगड घातल इंद्राला
वरुणराजा धावत आला
वादळ फोडून पाऊस बरसला.
गुरं-ढोरं पुरात गेली वाहून
पीक सगलं खलास झालं
बळीराजाच नशीब फुटलं.
वरुण राजा
तू तर देव आकाशाचा
का वागतो लहरी सारखा?
गत जन्मांच्या कर्मांचा
का हिशोब घेतो आता?
झाल्या चुका माफ कर
कृपा कर पामरांवर
सांगड घालतो तुच्या चरणी
पुढच्या वर्षी तरी
पाऊस पाड नेमान.
प्रतिक्रिया
1 Sep 2014 - 1:17 pm | विवेकपटाईत
कवितेच्या जागी टाकायचं होत. चूक झाली.
1 Sep 2014 - 1:50 pm | पोटे
तुमचाही वरुणराजा झाला
1 Sep 2014 - 4:40 pm | कंजूस
साकडं /सांगड ?
1 Sep 2014 - 7:19 pm | विवेकपटाईत
लिहिताना चूक झाली, त्या वेळी लक्षात आलं नाही. धन्यवाद.