एका वेश्येचे मनोगत..............
मीना शेषु व त्यांची संग्राम हि संस्था वेश्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी लढत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी सातारा शहरात आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कहाणी ऐका एका वेश्येची
पुरुषांची वासना शमविणाऱ्या साधनाची
पशुंकडून ओरबाडले जाणाऱ्या एका स्त्रीची
कहाणी ऐका एका वेश्येची.....
बालपण सगळ चिखलातच गेल
आईच दुधपण बाटलीतूनच पिल
जगायचं रडगाण पण लवकरच कळल
कहाणी ऐका एका वेश्येची....
शाळा कसली माहीतच नाही
शिक्षणाचा तर मला गंधच नाही
भातुकलीचा खेळ ठाऊकच नाही
पशूंचा सहवास तर नवीनच नाही
कहाणी ऐका एका वेश्येची.....
संसार पडलाय उघड्यावर
सुहागरात्रही केली दुसऱ्याबरोबर
संसाराचा गाडा माझ्याच देहावर
कहाणी ऐका एका वेश्येची.....
रात्र-रात्र ज्यांनी आम्हाला जागविल
वेश्या-वेश्या म्हणून त्यांनीच हिणवल
समाजातील घाण म्हणून गावाबाहेर हाकलल
कहाणी ऐका एका वेश्येची....
तान्हुल्याला माझ्या मात्र मी घडविलं
नरकातून या बाहेर ढकललं
आमच आयुष्य असच गंजल
त्याच्या तरी आयुष्यात नंदनवन फुलविल
कहाणी ऐका एका वेश्येची....
या जगात वेश्या असूनही ४ वर्षांच्या चिमुरडीपासून ते ८० वर्षांच्या आजींवर देखील बलात्कार होतो. त्या जर नसत्या तर स्त्रियांना जगणे अशक्य झाले असते.....
प्रतिक्रिया
अमितसांगली साहेब, अतिशय सुन्न करणारी कविता आहे.
अमितसांगली साहेब, अतिशय सुन्न करणारी कविता आहे.
समाजातील हे वास्तव तुम्ही तुमच्या कवितेतुन मांडल आहे व तेही अतिशय योग्य शब्ब्दात. आपल्या समाजाच पाप आपण कसे कमी करणार आहोत देव जाणे. वेश्या ही ही एक माणुसच असते व तिलाही मन आशा आकांक्षा असतात हे सगळेच विसरतात खर तर त्या ही एक प्रकारे समाजाची सेवाच करत असतात स्वताच सत्व विकुन आपल्या समाजातील इतर स्त्रियांच पुरुषी वासनांधतेपासुन एक प्रकारे रक्षणच करत असतात. खरच कविता वाचुन सुन्न झालो आहे.
एक अतिशय ज्वलंत व दाहक विषय तुम्ही अतिशय संयत पणे कवितेत हाताळलेला आहेत.
निश
कविता उत्तम
बलात्काराचे लोजिक मात्र पटले नाही
कडवा पुरोगामी
वासना वेश्यांकडे जाऊन शमविता
वासना वेश्यांकडे जाऊन शमविता येत असूनही बलात्कार होतात. त्या जर नसत्या तर बलात्कारांचे प्रमाण वाढले असते.
...................................................................................................................
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी.
=)) =))
साहेब, अहो वेश्येकडे जाणे म्हणजे भूक लागली म्हणून चौकात जाऊन वडापाव खाऊन येण्यायेवढे सोपे असते का हो?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
म्हणजे, बलात्कार करणे हे सोपे
म्हणजे, बलात्कार करणे हे सोपे असते असं तुम्हाला म्हणायचंय का?
= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =
वप्या यू टू ?
तुझ्याकडून अशी प्रतिक्रिया यावी ?
ह्या शब्दांसाठी ती प्रतिक्रिया होती रे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
मी टु काय?
अरे बाबा, रबर मिळाले की ते ताणायचे ही शिकवण मला मिपाच्या बाळकडूत पाजली गेली आहे. मग, आलं काही की बोलायचं...
पण एक सांग, तुझ्या वरच्या प्रतिसादातुन मी उल्लेखलेला प्रश्न उद्भवत नाही का?
याचे उत्तर नाही असे असेल तर जे प्रायश्चित्त असेल ते मी भोगायला तयार आहे...
= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =
काय अगदी अनुभव असल्यासारखी
काय अगदी अनुभव असल्यासारखी चर्चा करताय रे,
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
ही कविता मायबोली या
ही कविता मायबोली या संस्थळावरदेखिल दुसर्या एका आय.डी.ने (अर्चनाचव्हाण) लिहिलेली आढळली. तो आय.डी. तुमचाच आहे का?
ती माझी मैत्रीण आहे.
ती माझी मैत्रीण आहे...तिला कविता आवडली म्हणून तिने मायबोलीवर टंकली आहे...
...................................................................................................................
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी.
?
तिच्या स्वतःच्या नावावर?
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
बलात्कार वासनेपोटी होत नाहीत
.....
त्याची अन्य कारणे आहेत.
कडवा पुरोगामी
सविस्तर
बलात्कार मुख्यत्वे वासनेपोटीच घडतात असा माझा समज आहे. तसे नसल्यास अन्य करणे कोणती हे सविस्तरपणे जाणून घेण्यास उत्सुक आहे.
शक्य झाल्यास यावर सविस्तर सांगावे जेणेकरून स्त्रिया त्या दृष्टिने सावधगिरी बाळगू शकतील.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
न्यायवैद्यक प्रयोगशाळेत काम
न्यायवैद्यक प्रयोगशाळेत काम करताना बलात्काराची अनेक प्रकरण पाहीली.. राजघराण म्हणतात त्यात पुर्ण तथ्य आहे.
वासनेपेक्षाही खुनशी वृत्ती, सुड घेण्याची इच्छा, स्त्रियांच्या वागण्याचा(दिलेल्या संकेतांचा) लावला गेलेला चुकीचा अर्थ, अतिशय बंदीस्त व स्त्रियांना कःपदार्थ मानणार्या समाजात झालेले पालनपोषन हे व अशी इतर कारण नेहमी दिसायची.
तसेच ८०-९०% नोंदवलेले बलात्कार हा फसलेला व्यवहार असायचा हे ही नमुद करु इच्छीतो.
शारीरिकदॄष्ट्या धडधाकट स्त्रीवर प्रलोभन किंवा धमकी यांचा वापर न करता एकाच पुरुषाने बलात्कार करणे ही फार कठीन गोष्ट आहे..
___________________________________________________
अन्य कारणं वाचायला द्या
अन्य कारणं वाचायला द्या डॉक्टर .
०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====
♥ " मेरा पती ' पती '
... तेरा पती ' वनस्पती '
" ♥
बलात्काराची कारणे
या विषयावर समाजशास्त्रज्ञांनी. बरीच वर्षे बरेच अध्ययन केलेले आहे.
आंतर्जालावर भरपूर माहिती मिळू शकेल.
एक दुवा - http://en.wikipedia.org/wiki/Causes_of_sexual_violence
१) बलात्कारातून वासना शमत नाही (अर्थात मनोविक्रुत नसलेल्यांचीच !)
२) स्त्रियांचा (आधुनिक) पेहेराव, सिनेमे ही बल्त्कारांची कारणे न्हवेत.
३) सामाजिक / अर्थिक / कौटुंबिक कारणांमुळे अनेक पुरुषांना लग्न करता येत नाही. त्यांसाठी चालवला गेलेला वेश्याव्यवसाय ही जगातली सर्वात जुनी बाजारपेठ आहे !
४) मनुष्यास अनेक स्त्रियांची संग करण्याची बायोलॉजिकल आवड असते आणी संस्क्रुती व समाज त्यास प्रतिबंध करतात. तद्वत वेश्यांमुळे स्वैराचार कमी होतो - अथवा वेश्यांपुरता मर्यादित राहतो.
५) स्वैराचार अन बलात्कार या दोन पूर्णपणे वेगळ्या गोश्टी आहेत. स्वैराचार बायोलॉजिकल आहे. बलात्कार ही विक्रुती आहे.
कडवा पुरोगामी
प्रवृत्तीची तुलना विक्रुती बरोबर
बलात्कार ही विकृती आहे. वासना ही सहज प्रवृत्ती आहे, प्रवृत्तीची तुलना विक्रुती बरोबर करणेच मला क्लेशदायी वाटते. असो
कडवा पुरोगामी
२) स्त्रियांचा (आधुनिक)
२) स्त्रियांचा (आधुनिक) पेहेराव, सिनेमे ही बल्त्कारांची कारणे न्हवेत.
असे म्हणणार्या मानसशास्त्रज्ञांची कीव करावीशी वाटते. म्हणजे त्यांना सत्य जाणायचे नाही का ते जाणवत असूनही स्वीकारायचे नाही. आयबीएन ७ या चॅनेलवर सिंधुताई सकपाळांची मुलाखत लागली होती. त्यात त्यांनी या कमी कपडे घालून फिरणार्या हुच्चभ्रू आणि तथाकथित आधुनिक स्त्रियांवर टीका केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या संपर्कात आलेल्या बहुतेक बलात्कार पिडीत महीला या झोपडपट्टीतल्याच होत्या. त्यांच्यावर बलात्कार करणारे कोण रिक्षावाले, ट्रक ड्रायव्हर इ. कारण काय? त्यांच्या मते या उत्तान कपड्यात बघितलेल्या स्त्रीया बघून चाळवलेली वासना या झोपडपट्टीतल्या मुलींवर निघते. तुलनेने हुच्चभ्रू समाज सुरक्षित कवचात वावरतो.
मला सिंधुताईंचे अनुभवाचे बोल पटतात.
बाकी मानसशास्त्र वगैरे चालूद्या.
"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे
काय म्हणावे ह्या पुप्याला ?
त्याला अजून आंतरजालावरती कोणती मते मांडावीत आणि खाजगीत कुठली हे कळतच नाही.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
अरे पुपे त्यांना असे म्हणायचे
अरे पुपे त्यांना असे म्हणायचे होते की ज्या ललना असे तोकडे कपडे वापरतात त्यांच्यावर बलात्कार होत नाही.
छ्या ! मानसशास्त्राला कमी लेखतोस..? पुराणमतवादी दिसतोस !!!
***
आमच्याकडे कशावरही, कोणावरही, कितीही पिंका टाकून मिळतील.
हम्म्म्म
म्हणजे पुराणमतवादी स्त्रियांनी जे वर्षानूवर्षे परपुरुषांपासून लपवून ठेवले, त्यातले बरेच काही ह्या ललना सार्वजनिक करत असल्याने आदरास पात्र ठरत असाव्यात का ? आणि मग अशा ललनांच्या तुलनेत अंगभर कपडे घालून वावरणार्या स्त्रियांच्या विरोधात रोष वाढत असावा काय ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
देवीतुल्य स्त्रियांच्या
देवीतुल्य स्त्रियांच्या संदर्भात आपण (पक्षी: मी स्वतः) काही मतप्रदर्शन करणे अयोग्य ठरेल. तसेच संस्कार आमच्यावर (पक्षी - आमच्या पुर्वजांवर) वैदिक कालापासून (पक्षी - ज्याचा कालखंड नक्की ठरवता येत नाही) होत आलेले आहेत. असे संस्कार होणे म्हणजे महारोग आहे असे आम्ही (पक्षी - मी स्वतः) मानत नाही. या कारणामुळे तुम्ही (पक्षी - तु स्वतः) आम्हाला ( पक्षी - मला) पुराणमतवादी (पक्षी - बुरसटलेल्या विचारांचा) मानु शकता, तो तुमचा तुम्ही आधुनिक असल्याचा दमदार पुरावा (फक्त आंतरजालावर उपयोगात येणार) असू शकतो. मात्र हे सर्व होत असतांना भारत हा स्त्रियांना रहाण्यासाठी अजिबात चांगला देश नाही, किमान तुम्ही लग्न झाल्यावर सौदी अरेबियात स्थलांतर वा पलायन करावे.
***
आमच्याकडे कशावरही, कोणावरही, कितीही पिंका टाकून मिळतील.
असहमत
मुळात शमन ऐवजी दमन करण्यास शिकवणारी तुमची संस्कृती आणि संस्कार आम्ही फाट्यावरती मारत असल्याने तुम्ही मतप्रदर्शन केले तरी आम्ही ते समजून घ्यायचा प्रयत्न देखील करायचो नाही.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
अपेक्षित प्रतिक्रिया ! केवळ
अपेक्षित प्रतिक्रिया !
केवळ दमनच भारतीय संस्कृती शिकवते हे आंग्ल विद्वानांचे मत मान्य करुन, मुळात अभ्यास न करता, भारतीयांना तुच्छ लेखतच तुम्ही मत प्रदर्शन करता हे काय आम्हाला माहित नाही काय? मोठे व्हा !!
***
आमच्याकडे कशावरही, कोणावरही, कितीही पिंका टाकून मिळतील.
च्यायला ...हे म्हणजे तुम्ही
च्यायला ...हे म्हणजे तुम्ही घातली की वल्कले आणि यांनी घातली की स्कर्ट
सुहास
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक आमच्या ही डोक्यात जातात. (सही-सौजन्य : बिरूटेसर )
किती सारे पक्षी?
थोडे अवांतर - नानासाहेब, किती साऱ्या पक्षांचा उल्लेख करताय आपण? गोंधळायला होते.
यावरून सध्या हयात नसलेल्या एका स्त्री पुढाऱ्यांच्या विधानाचे विडंबन करावेसे वाटते...
पक्ष असो वा पक्षी उडालेले सर्वच एक दिवस मिपावर परत येतात...!
या जगात वेश्या असूनही ४
या जगात वेश्या असूनही ४ वर्षांच्या चिमुरडीपासून ते ८० वर्षांच्या आजींवर देखील बलात्कार होतो. त्या जर नसत्या तर स्त्रियांना जगणे अशक्य झाले असते ?
हे वाक्य थोडेस खटकते आहे
बळजबरीने / परिस्थीतीमुळे या व्यवसायात ओढलेल्या मुलींबद्दल/ महिलांबद्दल नो कमेंट्स्,
पण समाजात अशाही काही मुली/स्त्रीया आहेत ज्या कमी वेळात जास्तीत जास्त पैसा मिळतो , सर्व गरजा विनासायास पुर्ण होतात म्हणुन स्वखुशीने यात उतरल्या आहेत. अशांना काय म्हणणार मग ?
पियुशा......
http://lovelypiyu.blogspot.com
पण समाजात अशाही काही
पियुशा'शी १०० % सहमत!.. आजकाल अश्याच बायकांची / मुलींची संख्या जास्त आहे..... जास्त करून मेट्रोसिटीज मध्ये......
कहत कबीरा सुन भाई साधु, यह दुनिया बडी दिवानी..
महादेवको छोड दिया और पूजवा जाय भवानी!!!
पियुशी सहमत .
पियुशी सहमत .
०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====
♥ " मेरा पती ' पती '
... तेरा पती ' वनस्पती '
" ♥
दु:ख मांडणारी कविता म्हणुन
दु:ख मांडणारी कविता म्हणुन ठिक आहे, पण पुर्णतः पटली नाही.
आणि ते बलात्काराबद्दल जे लिहिलंय ते देखील नाही. वेश्यागमन हा नैसर्गिक वासना / भुक मिटवण्याचा राजमार्ग आहे, आज जरी याला राजमान्यता किंवा समाजमान्यता नसली तरी या घटकाला पर्याय या दोन्ही संस्थांना उभारता आलेला नाही.
या उलट बलात्कार, हा मानसिक चिड किंवा विकृतीचा परिणाम आहे, तो अगदी परस्त्रीवर केला गेला असावा असं नाही. लग्नाच्या नवरा बायकोत होणार प्रत्येक शरीर संबंध कायद्याच्या चौकटीत ' बलात्कार' नाही असं सिद्ध करता येईल का ?
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
ओके...
कविता सेंटी वग्रे लिहिली असती तर अजुन ट्यार्पी मिळाला असता.
अंशतः ठीके पण बरीच पटली नाही... प्रयत्न चांगला आहे पण इंटेंसिटी पोचली नाही...
= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =
लग्न म्हणजे free sex..any
लग्न म्हणजे free sex..any time.
व
Free sex is Always Expensive
वा वा!!! आपले विचार वाचुन
वा वा!!! आपले विचार वाचुन आनंद वाटला.
पण काय हो, तुमच्या वडीलांना कीतपत खर्चिक पडलं म्हणे त्यांचं लग्न?
***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/
वा वा
हीन प्रतिसाद आणि त्याहून हीन व असभ्य पातळीवरचे प्रत्युत्तर...
पण एकूण दोन्ही आवडले कारण अश्याच वेळी कोण किती कुठल्या पाण्यात आहे हे समजते.
<<अश्याच वेळी कोण किती
अश्याच वेळी कोण किती कुठल्या पाण्यात आहे हे समजते.
हे खरंच आहे.
***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/
तुमच्या मुलीचं लग्न झालं का
तुमच्या मुलीचं लग्न झालं का हो कुलकर्णीसाहेब?
आणखी प्रश्न विचारायचे आहेत पण सभ्यतेची मर्यादा म्हणून इथेच थांबते.
काका तुमच्या मते ' लग्न ' ह्य
काका तुमच्या मते ' लग्न ' ह्य नात्याला तुम्हि लावलाय तो एकच अर्थ आहे का?
०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====
♥ " मेरा पती ' पती '
... तेरा पती ' वनस्पती '
" ♥
घसरलात अकु.
अगदी सगळ्या बाप्जाद्यांची एका वाक्यात वाट लावलीत.
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
एक सूचना...
अविनाशराव - मला अशी आशा आहे की तुम्ही हे विधान इथे केवळ विनोदनिर्मितीसाठी डकवलं असावं. जर हे एखादं पाश्चिमात्य व्यासपीठ असतं तर कदाचित हलक्या दर्जाचा विनोद म्हणून खपून गेलं असतं.
परंतु आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये हे दूर दूर पर्यंत स्वीकारार्ह होवू शकत नाही. खरंच सांगतो जोक म्हणूनही हे विधान मी आजवर वाचलं वा ऐकलं नव्हतं. जालावरील आपले आचरण हे या बाबतीत तरी फारच गंभीर असायला हवे. जे झाले ते बदलता येणार नाही परंतु याबद्दल क्षमा मागून आपण मिपावरील आपल्या भगिनींचा विश्वास पुन्हा मिळवू शकता.
चर्चा खेदजनक!
चर्चा खेदजनक!
बिपिन कार्यकर्ते
बिका मला तरी
चर्चा योग्य वाटत असुन केवळ "तो" प्रतिसाद खेदजनक वाटतो आहे. त्या वरील शिल्पाब व रेवतीचा प्रतिसाद अतिशय योग्य असुन माझ त्यास अनुमोदन आहे. म्हातरी मेल्याच दु:ख नाही हो, पण काळ सोकावतो आहे. अश्या प्रतिसाद कर्त्यांना वेळीच चेपल पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी थट्टा मस्करीला मर्यादा घतल्या गेल्या पाहिजेतच.


***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
"सार्वजनिक ठिकाणी कुणी अशी
"सार्वजनिक ठिकाणी कुणी अशी थट्टा मस्करी करते याला मर्यादा घतल्या गेल्या पाहिजेतच" असे म्हणायचे आहे का तुम्हाला ??
बिल्ला क्रमांक बराच जुना आहे तुमचा. पहिल्यांदा अशी मस्करी पाहिली की काय ?
===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================
होय तसच म्हणायच आहे.
>>>>>पहिल्यांदा अशी मस्करी पाहिली की काय ?
नाही ह्या पुर्वि देखिल अनुभवली आहे. अश्याने कळत-नकळत धागा भलत्या दिशेने भारकटत जाऊन व्यक्तीगत पातळीवर येतो आणि मग पातळीच गायब होते.
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
काही च्या काही.
विषय : गंभीर व गहन
कवितेचा आशय : सामन्य
कवितेची मांडणी : अती सामान्य
धागा : अजुन जरा शिजायला हवा आहे किंवा जरा कच्चा आहे.
प्रतिसाद : नेहमी प्रमाणेच ......ढासू.
एक शंका : वेश्या ही स्त्रीच असते हे गृहितक मला तरी पटत नाही . आपल्याला ?
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.
वरील काही प्रतिसादांवरून ही
वरील काही प्रतिसादांवरून ही चर्चा अश्लीलतेकडे झुकते आहे.. असे वाटते.... कृपया आवरा!!!
स्त्री ही कुणीही कशीही असली.. तरी ती "देवी"चेच एक रुप असते.. हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे..... सध्याचे वाढते वेश्या-प्रमाण हा "कलीयुगा"चा परिणाम आहे...
त्यामुळे सूज्ञ आणि सभ्य सुजाण लोकांनी तरी वेश्यांना आपल्या आई किन्वा बहिणीप्रमाणे मानावे.. व ज्यांना पुन्हा सुशिक्षित समाजात यायची इच्छा असेल.. अश्या बायकांना जरूर मदत करावी.....
आणि ज्या बायकांना सुधरण्याची इच्छा नसेल.. त्यांच्या कडे लक्ष देऊ नये....... त्यांना नमस्कार करून देवी'मातेजवळ त्यांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करून पुढे चालू पडावे....त्यातच सर्वांचे हित सामावले गेले आहे.
कहत कबीरा सुन भाई साधु, यह दुनिया बडी दिवानी..
महादेवको छोड दिया और पूजवा जाय भवानी!!!
अगदी! म्हणुनच मी अशा धार्मिक
अगदी!
म्हणुनच मी अशा धार्मिक लोकांची देशाला गरज आहे असं म्हणाले होते. कलियुगात हे असेच होणार!
***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/
वरील काही प्रतिसादांवरून ही
तुम्हाला काय काहिहि वाटेल
बाकी कोणालाच कशी अश्लीलता दिसत नाहिये 


कोण रे तो म्हणतोय! अश्लीलता ही बघणार्याच्या दृष्टीकोनात असते म्हणून?
ऋषिकेश
------------------
माझे मिपावरील लेखन इथे वाचा
>>स्त्री ही कुणीही कशीही
>>स्त्री ही कुणीही कशीही असली.. तरी ती "देवी"चेच एक रुप असते..
आणि पुरुष (मेले) राक्षस/दैत्य/चांडाळ असतात.
>> हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे..... सध्याचे वाढते वेश्या-प्रमाण हा "कलीयुगा"चा परिणाम आहे...
अगदी अगदी. ययाती वैग्रेंनी केला तो राजविलास, बाकीच्यांनी केलेली ती **बाजी.
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
खूप बोलकी प्रतिक्रिया ....
खूप बोलकी प्रतिक्रिया ....
रोचक, रंजक चर्चा
काहि लोकांची पातळी काय ते ही समजते आहे
कोणते धार्मिक?
देवाधिदेव ब्रह्मदेवाने काय केले?
देवांचा राजा इंद्र याने काय केले?(गौतम ऋषी )
रावणही काहिंसाठी देवच ( शिवाय धार्मिक) त्याने काय केले?
अता आधूनीक धार्मिकांमध्ये साक्षात शंकराचार्य जयेंद्र सरस्वती ,
स्वामी नित्यानंद ,स्वामी अग्नीवेश, स्वामी निश्लानंद ,
सत्य साईबाबा ,माता ममतामई (तीच ती लिपस्टिक वाली),
यांच्या सारख्या धार्मिक लोकांची खरेच देशाला गरज आहे?
तात्पर्य धार्मिकता असणे म्हणजे पाप,व्यभिचार, नीच कार्य,भ्रष्टाचार होत नाही असे समजणे हि अंधश्रद्धा आहे.
वर एका प्रतिसादात समाजात अशाही काही मुली/स्त्रीया आहेत ज्या कमी वेळात जास्तीत जास्त पैसा मिळतो , सर्व गरजा विनासायास पुर्ण होतात म्हणुन स्वखुशीने यात उतरल्या आहेत. अशांना काय म्हणणार मग ?
याचा उल्लेख आला आहे त्या बद्दल-
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-PUN-racket-in-pune-padmaja-b...
अभिनेत्री पद्मजाला तीन दिवस कोठडी
अनेक मराठी चित्रपट, नाटकात झळकलेली अभिनेत्री पद्मजा बापटसह अन्य दोघींना मंगळवारी पुण्यात वेश्याव्यवसाय करताना अटक करण्यात आली होती. बुधवारी तिला न्यायालयाने तीन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर अन्य दोघांना जामीन मंजूर केला आहे.
.
.
.
.
.
.
.
देतो स्पष्ट उत्तरे, पुढे व्हावयासी बरें !!
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञाम् |
जानन्तु ते किमपि तान् प्रति नैष यत्नः|
उत्पत्स्यतेS स्ति मम कोSपि समानधर्मा|
कालोह्ययं निरवधर्विपुला च पृथ्वी |
धार्मिकता असणे म्हणजे
धार्मिकता असणे म्हणजे पाप,व्यभिचार, नीच कार्य,भ्रष्टाचार होत नाही असे समजणे हि अंधश्रद्धा आहे >>.
काय दिवस आलेत, चक्क आत्म्याशी सहमत व्हावे लागत आहे
सुहास
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक आमच्या ही डोक्यात जातात. (सही-सौजन्य : बिरूटेसर )
अरे तो अ 'जात 'शत्रु आहे.
अरे तो अ 'जात 'शत्रु आहे. आत्मा नाही.
________________________________
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!
अरे तो अ 'जात 'शत्रु आहे.
खोड जाणार नाही, काय पण एकेकाचे छंद
हा तसे दिवस वाईट्टच आले आहेत हे दिसते आहे
.
.
.
.
.
.
.
.
अवांतरः- त्यांच्या डोळ्यात कुसळ आहे आणि तूमच्या मुसळ
(न्यारेफन)
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञाम् |
जानन्तु ते किमपि तान् प्रति नैष यत्नः|
उत्पत्स्यतेS स्ति मम कोSपि समानधर्मा|
कालोह्ययं निरवधर्विपुला च पृथ्वी |
धार्मिक शब्दाचा अर्थ कित्ती बदलला आहे ?
धार्मिक म्हणजे धर्माने चालणारा. पुराणामधील / ईतीहासामधील / तथाकाधित धर्मगुरुंचे आचरण म्हणजे "धार्मिकता " नाही.
पतीव्रतेने (!) पावित्र्य जपणे हा धर्म आणि वेश्येने "तिचे" काम करणे हा ही धर्मच.
काही वेश्या हया तथाकथित कुलीन स्त्रीयाम्पेखा अधिक "धार्मिक" असतात.
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.
अभ्यास वाढवा!
अभ्यास वाढवा!
देवीची दोन रूपे एकमेकशी बोलत असताना भावार्थ वेगळाच असण्याची शक्यता जास्त असते . म्हणजे एक रुप जर म्हणतसेल छान दिसतेयस तर त्याचा अर्थ सोंग दिसतेयस असाही होऊ शकतो .
अर्थ बदललेला नाही,म्हणने तेच आहे
तुम्हि चष्मा काढलांत तर दिसेल
तुमचा गोंधळ उडलेला आहे,
धार्मिकतेची व्याख्या पुन्हा एकदा तपासा.
'धार्मिक म्हणजे धर्माने चालणारा.' चालणे, आचरण करणे हे वेगळे आहे काय?
धार्मिक लोकांची देशाला गरज आहे
हे विधान धार्मिकतेची कोणती व्याख्या स्पष्ट करते?
म्हणून धार्मिक रावणाचे उदारहण दिले आहे.
देवदासी हि वेश्याच असते ना...
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञाम् |
जानन्तु ते किमपि तान् प्रति नैष यत्नः|
उत्पत्स्यतेS स्ति मम कोSपि समानधर्मा|
कालोह्ययं निरवधर्विपुला च पृथ्वी |
माझा गोंधळ
तुमचा (माझा) गोंधळ उडलेला आहे, :- आपले मत आपण व्यक्त केलेत.धन्यवाद.
रावण हा धार्मिक असेल पण सिता हरण हा अधर्म त्याने केला व रामचंद्रनी त्याचा ( धर्माने ) वध केला.
गीत रामायणातल्याएका वेग्ळ्या प्रसंगातील गाण्याची उगीच आठवण झाली.
मी धर्माचे केले पालन - वाली वध ना खल निर्दलन.
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.
माझा गोंधळ
तुमचा (माझा) गोंधळ उडलेला आहे, :- आपले मत आपण व्यक्त केलेत.धन्यवाद.
रावण हा धार्मिक असेल पण सिता हरण हा अधर्म त्याने केला व रामचंद्रनी त्याचा ( धर्माने ) वध केला.
गीत रामायणातल्याएका वेग्ळ्या प्रसंगातील गाण्याची उगीच आठवण झाली.
मी धर्माचे केले पालन - वाली वध ना खल निर्दलन.
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात जी २० संस्थेच्या सदस्य देशांमधे स्त्रीयांसाठी सर्वात वाईट देश म्हणून भारताची निवड झाली आहे.
सर्वेक्षण घेणार्या संस्थेच्या सी इ ओ मुलाखतीत म्हणाल्या
What would you say has been one of the most shocking findings of this survey?
Perhaps the fact that India was ranked worse than Saudi Arabia. Virtually, every aspect of a women’s life in Saudi Arabia is controlled by men. They cannot drive or enter the Olympics. They’re generally forbidden from leaving home, travelling outside the country, working, studying, marrying, filing a court case or seeking medical care without being accompanied by or receiving the written consent of a male guardian. In India, women, to a great extent, have many of these freedoms and some people may be surprised by the fact it polled worse than Saudi Arabia. However, Saudi Arabia’s wealth means schooling and healthcare for women are of a good quality, while practices like infanticide, child marriage, wife-beating and trafficking are commonplace in India and maternal mortality rates are extremely high.
३७०
पाच खंडातील ३७० लोकांना प्रश्न विचारून हे सर्वेक्षण झाले आहे.
एकूण ३७० लोकांना प्रश्न विचारून काढलेल्या निष्कर्षांची दखल आणखी किती घेणार म्हणा! असो.
ही फक्त माहितीची देवाणघेवाण!
आम्हाला तर हे ही आठवलं...
आम्हाला तर हे ही आठवलं... http://news.bbc.co.uk/2/hi/5103914.stm
बिपिन कार्यकर्ते
:-)
अहो पण ते सर्वसामान्य ३७० लोक नाहीत. असं बघा ३७० श्रामो, बिका (पक्षी : जाणकार, इंडस्ट्री एक्स्पर्ट, माहितीचा खजिना असलेले) आहेत तरी दखल घ्यायची नाही म्हणता? ओक्के आम्हाला काय तुमचा आदेश यायचीच खोटी.. रिजेक्ट तो रिजेक्ट....
स्वगतः हा आता रॉयटर्स, ३७० जाणकारांची मते, सर्व्हेची पद्धत नक्की काय की सगळेच आक्षेपार्ह? ....
आक्षेपार्ह
काहीही आक्षेपार्ह नाही त्यातले. ते रॉयटर्स उच्च असेल. ते ३७० जाणकारही उच्च असतील. सर्वेची (की पोल?) पद्धतही अगदी शास्त्रोक्त असेल... आक्षेप नाहीच. त्या आधारे देश असुरक्षीत ठरवणे आणि असले प्रमाणविपर्यास असलेले मामले येथे देऊन चर्चेला (गैर)दिशा देण्याचा प्रयत्न करणे आक्षेपार्ह आहे.
तुम्ही वैयक्तिक नामोल्लेखावर घसरलात. त्यात उपरोध/उपहास आहे. अनाठायी. कारण मी (आणि बिकानेही) कधीच आम्ही कसले तज्ज्ञ आहोत वगैरे दावा केलेला नाही. तसा दावा दिसला तर दाखवून द्या.) तो दावा मागे घेतो. एरवी, या मुद्यावर हा शेवटचा प्रतिसाद.
बर बॉ
काहीही आक्षेपार्ह नाही त्यातले. ते रॉयटर्स उच्च असेल. ते ३७० जाणकारही उच्च असतील. सर्वेची (की पोल?) पद्धतही अगदी शास्त्रोक्त असेल... आक्षेप नाहीच.
ओके म्हणजे आक्षेप जो निष्कर्ष येतो आहे त्याच्याशी आहे? जर शेवटचा नंबर आला नसता, समजा चौथा पाचवा आला असता तरी मग ही बातमी काथ्याकूट व्हायची अथवा हाच दुवा इथे देणे खोडसाळ वाटायची शक्यता नसती असे वाटतेय. आता शेवटचा नंबर आलाय. ही बातमी ताजी आहे म्हणून इथे दिली. एकंदर चर्चेत अगदीच अस्थानी मला तरी वाटली नाही. तुम्हाला वाटली असेल तुमच्या मताचा आदर आहे.
जगात इतरही लोक आहेत व काही देशात अमुक निष्कर्षापर्यंत येण्याकरता काही निकष लावले जातात. जगात अन्य देशांच्या तुलनेत आपल्याला कोठे गणले जाते हे समजुन घेणे अगदीच खोडसाळ नसावे. कोण्या एका विशिष्ट सर्व्हे/पोलच्या आधारे ते तुम्हाला विपर्यास केला जाणे, खोडसाळ वाटू शकते अन्य कोणाला नसेलही वाटत. कदाचित अश्या एका सर्व्हेमधे (पोल)नंबर वरचा आला असता तर ह्याच सर्व्हेचा (पोल) मसंवरच्या चर्चेत सकारात्मक पुरावा म्हणून वापर केला ही गेला असता.
असो. इतर सगळे बरोबर असेल पण निष्कर्ष मान्य नाही असे म्हणणे पण 'डिनायल' मधे मोडले जाउ शकते. पण मग इथे मला ररांनी मागे लिहलेली बहुमताच्या जोरावरची गोष्ट आठवते. असो.
राहीला मुद्दा, तज्ज्ञ असल्याचा दावा. मान्य आहे तुम्ही स्व:ता तसा केला नाही व करणार नाहीत. तो तुमचा विनय आहे. पण सर, तुमच्या आयडीची ओळख मसंवर एका अभ्यासु, जाणकार, माध्यम क्षेत्राला जवळून पाहिलेल्या व्यक्तीचे आहे हे सर्वमान्य आहे मग तुम्ही ते मान्य करा अथवा अमान्य
असो तुमच्या मनाला क्लेश दिल्याबद्दल माफी मागतो.
भारताचे नाव खराब झालेले दिसते आहे अश्या गोष्टींकडे बघू नये, बोलू नये, ऐकू नये असे तुम्ही नक्कीच सांगणार नाही असे वाटतेय म्हणूनच हा उपप्रतिसादाचा प्रपंच.
लहान तोंडी मोठा घास घेत
लहान तोंडी मोठा घास घेत श्रामो, बिका, सहज यांच्यासारख्या दिग्गजांच्या चर्चेत तोंड घालत आहे, माझी ती लायकी नाही हे माहित आहे तरी धाडस करत आहे त्याबद्दल सदर त्रिमूर्ती मला क्षमा करेल याची खात्री आहे.
समजा मी परा चांगला आहे असे विधान केले तर मला फारसा पुरावा वगैरे देण्याची गरज भासत नाही, तशी फारशी अपेक्षा कुणीही करत नाही, करु नये कारण ते एक विधान असते. कालानुरुप चांगले म्हणजे काय याच्या व्याख्या बदलत असल्या तरी परा चांगला आहे हे विधान पुरेशी माहिती देत नसले तरी आक्षेपार्ह्य असू शकत नाही.
मात्र मी परा दुष्ट आहे, परा चांगला नाही असे म्हटले तर माझ्यावर त्याच्या दुष्टपणाला सिद्ध करण्याची जबाबदारी येते. मी ज्या गोष्टीमुळे त्याला दुष्ट म्हणत आहे त्या गोष्टी दुष्ट आहेत हे मला सिद्ध करावे लागते. हे दुष्ट असणे नैतिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक अशा विविध निकषांवर घासून पहावे लागते. केवळ मला परा दुष्ट वाटत आहे अथवा माझ्यासारख्या अल्पसंख्य लोकांना तो दुष्ट वाटत आहे हे पुरेसे नाही.
३७० लोक कितीही हुषार असले तरी ते १३० कोटींच्या देशाबद्दल तो वाईट आहे असे म्हणत असले तरी त्याला कितपत महत्व द्यायचे हे पहायला हवे.
अर्थात, मिपावर देश कसा चालवावा हे दोन चार मिपाकर ठरवतात, मिपाकरांनी काय वाचावे हे चार मिपाकर ठरवतात तिथे त्या ३७० जणांनी काय घोडे मारले? आहे आमचा भारत देश वाईट ! चुकूनही पाऊल ठेवू नका या भुमीवर. संपला विषय !! हाका नाका.
***
आमच्याकडे कशावरही, कोणावरही, कितीही पिंका टाकून मिळतील.
गडबड
सर्वप्रथम त्या बातमीकडे भावूक होउन पाहू नये.
अमुक देश वाईट आहे हा बातम्याचा मथळा - सनसनीखेज.. प्रकार आहे. पण अश्या शब्दांनी लक्ष वेधले जाते तसे गैरसमज, विनाकारण तंटे (आठवा व्यंगचित्र गदारोळ) होतात. असो ह्या शब्दांच्या पलिकडे पाहूया.
असे समजा की वीस लोकांनी परीक्षा दिली व त्यात कोणाचा तरी शेवटच्या क्रमांक आला. यापेक्षा जास्त नाही...अमुक देश वाईट आहे, देश सोडा, भयावह परिस्थिती तसे काही अहवालात म्हणले नसणार. व असे समजुन उगाच आक्रंदन करत बसण्याची गरज नाही. की कोणाचे काय मत आहे यावरुन कोण देशप्रेमी कोण देशद्रोही असे वर्गीकरण करायची गरज नाही. सगळ्यांना भारताबद्दल, मराठी भाषेबद्दल प्रेम आहे म्हणूनच सगळे इथे बागडत आहेत.
असो.
असो.
***
आमच्याकडे कशावरही, कोणावरही, कितीही पिंका टाकून मिळतील.
३७०
३७० हा आकडा आला तेव्हाच धाग्याचं काश्मीर होणार, असा अंदाज श्रामोंनी वर्तवल्याचं काही आंतरजालीय सूत्रांकडून समजतं
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तेच
मी तेच म्हणत होतो, अजून कसा कुणालाही तो आकडा दिसला नाही! दिसला एकदाचा. आता मी मरायला मोकळा.
प्रमाणविपर्यास
प्रमाणविपर्यास असल्याने त्या सर्वेक्षणात भारत पहिल्या क्रमांकावर असता तरी मी तो निष्कर्ष आणि त्या आधारे येथील चर्चेतील त्याचा समावेश नाकारला असता. असल्या बातम्यातून, प्रमाणविपर्यास असल्याने, चर्चाविपर्यासही होतो, म्हणून त्या बातम्यांना किती महत्त्व द्यायचे हे गंभीर विषयांवरच्या चर्चांमध्ये नीट ठरवले पाहिजे. दिसली बातमी की आण इथे असे तुमच्यासारख्यांनी करता कामा नये. पाच-पन्नास प्रमाणबद्ध अभ्यासपूर्ण सर्वेक्षणे झाली आणि त्यातून ठोसपणे भारत असुरक्षीत आहे हे दिसले तर त्या ३७० जणांच्या सर्वेक्षणाचे महत्त्व या पाच-पन्नासाच्या तुलनेत क्षुद्र ठरतेच की. तसे येथे घडले नाही.
मूळ प्रतिसादात मी फक्त त्या बातमीमागचा येथील चर्चेच्या संदर्भातील प्रमाणविपर्यासामुळे येणारा फोलपणा दाखवला होता.
हे
कोणी मला मराठीतून समजवून सांगीतले तर काही उत्तर देउ शकेन.
पुन्हा एकदा खुलासा- वर चर्चेत (गेले अनेक वर्ष ऐकत) आलेला युक्तीवाद की वेश्या आहेत म्हणून सामान्य स्त्रियांची इज्जत वाचते. पुन्हा महीलांची तंग वेशभूषा, स्वेच्छेने.. महीला, पुराणकालात धर्म अमुक तमुक असे अनेक उल्लेख आले. चर्चा नेहमीप्रमाणे लैंगीकतेच्या आजुबाजुलाच घुटमळत होती. म्हणुन फक्त लैगिंक सुरक्षा इतकेच नव्हे तर स्त्रीयांसाठी समाजात पोषक वातावरण म्हणजे काय, स्त्रीयांना समाजाने नेमके उपलब्ध करुन दिलेले स्वातंत्र्/व्यवस्था याचे जागतीक निकष काय ? त्या अनुषंगाने हे आलेले ताजे निरीक्षण. एकंदर अजुन व्यापक मुद्दा यावा म्हणून ती बातमी इथे डकवली.
त्याचे निष्कर्ष मान्य करा न करा. पण असे काही आहे व या सर्वाचा विचार व्हावा म्हणुन ....
आता यात कोणता खोडसाळपणा, प्रमाण विपर्यास, फोलपणा असेल तर... ठीक आहे माझा अभ्यास वाढवतो इतकेच म्हणतो.
बलात्काराशी निगडीत कायद्याची अंमलबजावणी /धाक
बलात्काराशी निगडीत कायद्याची अंमलबजावणी व म्हणून नसलेला धाक हे ही एक कारण असु शकेल असे वाटते.
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.
सहज तुमची 'तगमग' समजते.आग
सहज तुमची 'तगमग' समजते.
आग असल्या शिवाय का धुर निघणार? कदाचीत विपर्यास केला गेला असेलही. (पाश्चात्य माध्यमांचा खोडसाळपणा नवा नाही.) पण म्हणुन सर्वेक्षणामध्ये नमुद केलेल्या परिस्थितीच्या अगदिच उलटी वा परिस्थिती तितकीशी वाईट नाही असे म्हणण्याच धारिष्ट्य कुणीही दाखवणार नाही.
मनीच्या बाता: गण्या चार मोठी माणसं बोलत असताना तुला मध्ये नाक खुपसायची गरज होती का?.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
;)
बघा!! सहज, बिका आणि श्रामो यांचा 'चार' मोठी माणसं म्हणतो.. डब्बल कोणाला मोजलेस?
(ह घ्यालच)
ऋषिकेश
------------------
माझे मिपावरील लेखन इथे वाचा
नाना नाय दिसला का तुला?
नाना नाय दिसला का तुला?

माझ्या लेखी तोही मोठाच.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
पटला का रिपोर्ट ? मग कधी
पटला का रिपोर्ट ? मग कधी जाताय सौदी मध्ये ?
===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================
एस.......अर्थात बिनतोड सर्विस
विमे ,
-/\-
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.
दुर्दैवानं खरंय!
ड्रायवींगचं जाउद्या च्यायला एका असहाय्य बाळाचा जगण्याचाच हक्क केवळ स्त्री आहे म्हणून हिरावून घेतला जातो म्हणजे काय परिस्थिती आहे याचा अंदाज येतो. दर दोन दिवसाड नदीत, कचराकुंडीत भ्रूण सापडल्याच्या बातम्यां वाचतो आहे.
__________________________________________________________________________________
"And it never ceases to amaze me how many individuals feel their own ability to grasp a topic is a clear indication that anyone else can grasp it"
-Unknown author!